रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा…!

कल्याण : कल्याण लोकसभेतील अंबरनाथ मध्ये पाण्याची टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात ही समस्या जास्तच तीव्र झाली आहे.

पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून कानसई विभागातील रहिवाशांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिला आहे. प्रशासन आता तरी या नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देते का हे पहावे लागेल.

अंबरनाथ पूर्वेच्या कानसई विभागातील स्वामी देवप्रकाश गृहसंकुलात मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी थेट आगामी निवडणुकांमध्ये मतदानावरच बहिष्कार करण्याचं निर्णय घेतला आहे.

जवळपास सव्वाशे कुटुंब राहत असलेल्या या गृह संकुलात केवळ 10 मिनिटे पिण्याचं पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. मात्र तक्रारी करूनही पुरेस पिण्याचं पाणी मिळत नसल्याने गृहसंकुलातील रहिवाशी त्रासले आहेत. त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिला आहे. रहिवाशांनी गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारावरच ‘पाणी नाही तर मतदान नाही’ हा इशारा देत आपला संताप व्यक्त केलाय.

तर पाणी प्रश्नाबाबत स्वामी देवप्रकाश गृहसंकुलात नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने माजी नगरसेविका अपर्णा भोईर आणि मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी या नागरिकांची समस्या जाणून घेत त्यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाने जर लवकरच हा पाणी प्रश्न सोडवला नाह तर उपोषण करणार असल्याचं इशारा माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *