साहेबांचा घातच झाला….
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात हा अपघात नसून घातच असल्याचा दावा दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन रोहीत पवार यांनी आज मीडियासमोर मांडला. साहेबांचा विमान अपघात घडवून आणल्याचा संशय रोहीत…
raigad news and updates
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात हा अपघात नसून घातच असल्याचा दावा दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन रोहीत पवार यांनी आज मीडियासमोर मांडला. साहेबांचा विमान अपघात घडवून आणल्याचा संशय रोहीत…
रायगड जिल्ह्यात २०२६ साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिसूचना जिल्हाधिकारी किशन…
४ मार्च रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन अलिबाग : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. मात्र मार्च २०२६ महिन्यातील पहिला सोमवार (२ मार्च) हा होळी सणानिमित्त स्थानिक सुट्टीचा…
माथेरान मध्ये एवढ्या महागड्या शौचालयांची आवश्यकता आहे का ? मुकुंद रांजणे माथेरान : प्रशासकीय राजवटीत माथेरान मध्ये जवळपास दहा शौचालये आणण्यात आली आहेत. स्त्री आणि पुरुषांच्या करिता वेगवेगळ्या स्वरूपात असणाऱ्या या शौचालयांची किंमत अडतीस लाख रुपये प्रति असून एवढ्या महागड्या शौचालयांची खरोखरच या दुर्गम भागातील पर्यटनस्थळावर आहे का? असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे. यातील एक शौचालय नगरपरिषदेच्या आवारात याठिकाणी अगोदरच दोन शौचालय असताना देखील नाहक एवढी महागडी शौचालय खासकरून अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी बसविण्यात आले आहे. तर काही शौचालये अद्यापही नगरपरिषदेच्या आवारात धूळ खात पडून आहेत. माथेरान मध्ये आजमितीला खर्चिक पर्यटकांचा भरणा होत नाही. पर्यटन कशाप्रकारे वाढेल इथे पर्यटन वाढीसाठी वाहतूक व्यवस्था त्याचप्रमाणे सुस्थितीत रस्ते असावेत, पाणी, वीज सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासकीय राजवटीत माथेरान पुढील काही वर्षे पिछाडीवर गेल्याचे बोलले जात आहे. नगरपरिषदेच्या तिजोरीत खळखळाट असून कामगारांना त्याचप्रमाणे लहानसहान कामे करणा-या ठेकेदाराला वेळेवर पगार,बिले मिळत नसल्याच्या तक्रारी येत असतात. एखादया निकृष्ट कामांबाबत केलेल्या कामांची बिले किती अदा केली आहेत याबाबत कुणी माहितीच्या अधिकारात माहिती मागविल्यास मोगम उत्तरे देऊन कामात चालढकल सुरू असते.मोठया कामातील ठेकेदाराला शुल्लक रक्कमेसाठी अभय दिले जात असून पाठिशी घातले जात आहे. आजवर इथल्या विकास कामांबाबत सकारात्मक कामे न होता सुध्दा लाखो,करोडो रुपयांची बिले अदा करण्यात आलेली आहेत यामागे कुणाचा वरदहस्त आहे. प्रशासकीय राजवटीत मोठया प्रमाणावर अनाठायी खर्च आणि भ्रष्टाचार झाल्याचे नागरिक बोलत आहेत.एकंदरीत माथेरान नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभार बाबतीत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई बरोबरच दोषी असणाऱ्या या मंडळींना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
आरोग्य यंत्रणेचा नाविन्यपूर्ण उपक्रम…! मालवण: आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रोत्सवानिमित्त जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने भाविकांच्या सेवेसाठी सज्ज ठेवलेले ‘सेफ हाऊस हॉस्पिटल ‘ हे खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरले आहे. जिल्हा रुग्णालय,…
हेरिटेज वास्तूंची डागडुजी परवानगीविना होत असल्याने शिवराष्ट्र पॅनेलचे गटनेते सिताराम कुंभार संतप्त मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरान मध्ये असणाऱ्या हेरिटेज वास्तूंच्या डागडुजी किंवा नूतनीकरण करावयाचे असल्यास हेरिटेज कमिटीच्या परवानगी शिवाय…
सनियंत्रण समिती बरखास्त करण्याची स्थानिकांची मागणी मुकुंद रांजाणे माथेरान: माथेरान मधील हातरीक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा पूर्णपणे बंद करून या श्रमिकांना एकूण ९४ पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असताना देखील सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आदेश धुडकावून लावले असून फक्त २० ई रिक्षा देण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी, सचिव तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली यामध्ये आणखीन फक्त वीस ई रिक्षांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यातील १३ ई रिक्षा प्रशासन खरेदी करणार असून सात ई रिक्षा नगरपरिषदेने उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.त्याबाबतची अंमलबजावणी केव्हा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या वीस ई रिक्षा सुरू असल्या तरी त्यासुध्दा वाढत्या पर्यटनामुळे खूपच कमी पडत आहेत.त्यामुळे उर्वरित ५४ हातरीक्षा चालकांच्या वाट्याला पुन्हा एकदा ही अमानवीय प्रथा नशिबी असणार आहे. सनियंत्रण समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे ही समिती ज्यांना या गावाविषयी सहानुभूती नाही,इथले पर्यटन बहरावे,स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याबाबत काहीएक देणेघेणे नसल्याने ही समितीच बरखास्त करून टाकावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. ———————————— सनियंत्रण समितीच्या झालेल्या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत काही निमंत्रित पदाधिकारी,पर्यावरण क्षेत्रात काम करणारे काही सामाजिक कार्यकर्ते आणि रिक्षा संघटनेचे काही सदस्य उपस्थित होते.या प्रतिनिधींना बैठकीत चर्चा करण्याची कोणतीही संधी दिली नाही.या समितीने सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावल्याने ई रिक्षा वाढीसंदर्भात प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ———————– महाराष्ट्रातुनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातुन याठिकाणी मोठया प्रमाणावर पर्यटक येत असतात.स्वातंत्र्य पूर्वकाळापासून इथे हातरीक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा सुरू आहे.ही प्रथा बंद करण्यासाठी स्थानिकांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती.त्यानंतर ई रिक्षाचा प्रायोगिक तत्वावरील प्रयोग यशस्वी झाल्याचा अहवाल आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ६ फेब्रुवारी पर्यंत ७४ हातरीक्षा बंद करून चालकांचे ई रिक्षा द्वारे पुनर्वसन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.ही मुदत संपून गेल्यावर आंदोलन सुध्दा करण्यात आले त्यानंतर प्रशासनाने १२ फेब्रुवारी पर्यंतची मुदतवाढ मागवून घेतली होती.
सत्यम फाउंडेशनकडून माथेरानच्या शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन मुकुंद रांजाणे माथेरान : गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टच्या प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर माथेरान या शाळेत सत्यम फाउंडेशन नवी मुंबई यांच्या वतीने किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान लागणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचे वेंडिंग मशीन बसवण्यात आले. माथेरान मधील यापूर्वी बीजे रुग्णालय नगरपरिषद दवाखाना आणि नगरपरिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी या प्रकारचे वेल्डिंग मशीन लावण्याचे काम सत्यम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. माथेरान सारख्या दुर्गम भागात नवी मुंबईच्या या फाउंडेशन मार्फत सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले. सत्यम फाउंडेशनचे सर्वेसर्वा कुमार सत्यम यांच्या अथक प्रयत्नातून शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यात आली. यावेळी गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त श्री शशी भूषण गव्हाणकर सर शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश ढोले शिक्षक श्री संघपाल वाठोरे, विदुला गोसावी यासह सत्यम फाउंडेशन या संस्थेचे प्रमुख कुमार सत्यम, संचालक प्रभाकर तांबें यांसह अन्य उपस्थित होते.
संरक्षण भिंतीमुळे पंचवटी नगरच्या रहिवाशांना दिलासा नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या प्रयत्नांना यश! मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरानचा परिसर हा चोहोबाजूंनी डोंगर दर्यांनी हा संपूर्ण भूभाग व्यापलेला आहे. जागेअभावी अनेकांनी पूर्वीपासून जवळपास(चार दशकांपासून) कड्यालगत कुटुंबाच्या निवाऱ्यासाठी घरे बांधलेली आहेत.झोपडपट्टी म्हणून हा भाग आजही ओळखला जात आहे.पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कड्यालगत असणाऱ्या घरांच्या बाजूच्या मातीची पूर्णपणे धूप होऊन वाहून गेली आहे त्यामुळे तेथील रहिवाशांना अतिवृष्टी काळात जीव मुठीत धरून रात्रभर जागे राहून आपले जीवन कंठावे लागत होते. पंचवटी नगर येथील रहिवासी राकेश कोकळे यांनी याबाबत मागील पंधरा वर्षांपासून अनेकदा प्रशासनाला निवेदने देऊनही काहीएक साध्य झाले नव्हते.अखेरीस ही बाब विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी आपल्या परीने अधिकारी वर्गाशी चर्चा करून याभागात संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.या महत्वपूर्ण कामामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मागील अनेक वर्षा पासून पंचवटी नगर भागात जमिनीची धूप होत होती. अनेक वर्षे त्या ठिकाणचे रहिवासी असणारे राकेश कोकळे पाठपुरावा करीत असताना मी पाहत होतो. प्रत्येक वेळी या कामासाठी राजकीय अडथळे येत असताना या भागातील गोर गरीब व्यक्तीची घरे वाचली पाहिजे या सामाजिक भावनेने मी ठेकेदार आणि पालिका अधिकारी यांना सूचना केली होती.त्यानुसार याठिकाणी संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. शिवाजी शिंदे—गटनेते माथेरान नगरपरिषद आमच्या पंचवटी नगर येथील माझ्या घराच्या मागील बाजूस दरवर्षीच्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी वाहून जात होते. त्यामुळे तेथील मातीची प्रचंड प्रमाणात धूप होऊन हा भाग पूर्णपणे धोकादायक बनला होता. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना जीव मुठीत धरून पावसाळ्यात जीवन जगावे लागत होते. मी अनेकवेळा याबाबत प्रशासनाला लेखी निवेदने दिली होती की या ठिकाणी संरक्षण भिंत उभारावी परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अनेकवेळा विविध वर्तमानपत्रात बातम्या सुध्दा दिल्या होत्या. अखेरीस नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी पाठपुरावा करून याठिकाणी संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे आम्हा रहिवाशांना दिलासा मिळाला आहे याबद्दल मुख्याधिकारी राहुल इंगळे, नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, नगरसेवक तथा गटनेते शिवाजी शिंदे,तसेच पत्रकार मुकुंद रांजाणे यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे. राकेश कोकळे–पंचवटी नगर रहिवासी,माथेरान
हरारे : विरारचा छोरा आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडला १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत करून सहाव्यांदा वर्ल्डचॅम्प बनण्याचा मान मिळविला. योगायोग म्हणजे भारताच्या या सहावर्ल्डकप विजेतेपदात टिमचा कॅप्टन दुसऱ्यांदा विरारचा छोरा ठरला आहे.…