Category: मुंबई

Mumbai news

विमानाचा अपघात पायलटनेच घड़वून आणला- रोहीत पवार

स्वाती घोसाळकर मुंबई: जोवर संपुर्ण तपास पुर्ण होत नाही तोवर अजित दादांच्या विमान अपघाताला घात झाल्याचा संशय कायम राहणार आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती इतकी चक्रावणारी आहे की त्यामुळे…

शिंदेंच्या भेटीसाठी राज ठाण्याच्या नंदनवनात !

मुंबई : महापालिका निवडणुकीतील कडूगोड आठवणी बाजूला सारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शिंदेंचे ठाण्यातील घर नंदनवन गाठले. राज ठाकरे नंदनवनात आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. एकनाथ…

मॅक्रॉनयांनी अनुभवला छत्रपतींचा ‘शिवसोहळा’

मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या मुंबई भेटीत खास वेळ काढून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवसोहळा आवर्जुन पाहिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांनी या शिवसोहळ्याचा अनुभव घेतला. शिवसोहळ्यातील…

  पुरुष व महिला गटात पश्चिम रेल्वेला दुहेरी मुकुट

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक व्यावसायिक खो-खो स्पर्धा पुरुष व महिला गटात पश्चिम रेल्वेला दुहेरी मुकुट मुंबई : दादरच्या कै. अजितदादा पवार क्रीडा नगरीत जल्लोषाचा जणू स्फोटच झाला! मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने अमर हिंद मंडळ आयोजित कै. उमेश शेणॉय स्मृती चषक पुरुष व महिला व्यावसायिक ‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धेत कै. उमेश शेणॉय स्मृती चषकावर पश्चिम रेल्वेने असा झंझावाती ताबा मिळवला की प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत विजयाचा जल्लोष आकाशाला भिडवला. पुरुष आणि महिला दोन्ही गटांत दुहेरी मुकुट पटकावत पश्चिम रेल्वेने स्पर्धेत आपले वर्चस्व ठसठशीतपणे सिद्ध केले. या स्पर्धेत पुरुषांमध्ये महाराष्ट्र पोष्ट व  मुंबई पोलिस यांनी उपविजेतेपद मिळवले. तर पुरुषांमध्ये बँक ऑफ इंडियाला तृतीय क्रमांकावर तर बृहन्मुंबई महानगरपालिकेला चतुर्थ क्रमांकावर व महिलांमध्ये महावितरण कंपनीला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते पार पडले. अंतिम सामन्यात २४-१८ चा विजयी जल्लोष! पुरुष गटातील अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने महाराष्ट्र पोष्टवर २४-१८ असा ६ गुणांनी विजय मिळवत थरारक यश संपादन केले. महाराष्ट्र पोष्टने नाणेफेक जिंकून आक्रमणाची निवड केली; मात्र पश्चिम रेल्वेच्या शिस्तबद्ध संरक्षणापुढे त्यांचा डाव कोसळला. विजयी पश्चिम रेल्वेच्या वृषभ वाघ (२.४५ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ सादर करत संघाला भक्कम आधार दिला. राहूल मंडल (२ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी संरक्षणात भिंत उभी केली, तर आदित्य गणपुले (१.५० मि. संरक्षण व २ गुण), मजहर जमादार (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), निखील सोडये (नाबाद १ मि. संरक्षण व २ गुण), अमित पाटील (२.१० मि. संरक्षण) आणि विजय शिंदे (१.२० मि. संरक्षण) यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. पराभूत महाराष्ट्र पोष्टच्या अक्षय मासाळ (१.५० मि. संरक्षण व २ गुण), लक्ष्मण गवस (१ मि. संरक्षण व ४ गुण), प्रतिक देवारे व सनी तांबे (प्रत्येकी १.३० मि. संरक्षण व २ गुण), हर्षद हातनकर (१.२० मि. संरक्षण व २ गुण) आणि प्रज्ञेश पाटील (४ गुण) यांनी दिलेली झुंजार लढत कौतुकास्पद ठरली. सामन्यावर पंच प्रमुख म्हणून देवेंद्र बर्डे यांनी जबाबदारी पार पाडली. तृतीय क्रमांकासाठी चुरशीची लढत पुरुषांच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात बँक ऑफ इंडियाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ३०-२८ असा अत्यंत अटीतटीच्या सामन्यात पराभव करत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या लढतीने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली होती. वैयक्तिक पुरस्काराचे मानकरी ठरलेले तारे पुरुष गट •            उत्कृष्ट संरक्षण : राहूल मंडल (पश्चिम रेल्वे) •            उत्कृष्ट आक्रमक : लक्ष्मण गवस (महाराष्ट्र पोष्ट) •            अष्टपैलू खेळाडू : वृषभ वाघ (पश्चिम रेल्वे) महिला गट •            उत्कृष्ट संरक्षण : पायल पवार (Mumbai…

पी. एम. बाथतर्फे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन

पी. एम. बाथतर्फे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन मुंबई :  पीएमबाथ अँड बोट क्लब ट्रस्टच्यावतीने आणि मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने चर्नी रोड २८ फेब्रुवारी व १ मार्चला मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबई जिल्ह्याला संलग्न असलेल्या क्लब मार्फत खेळाडूंनी आपली नावे शुक्रवार २० फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, शिवाजी पार्क, दादर येथे नोंदवावीत.

भाषा गौरव दिनानिमित्त ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’

भाषा गौरव दिनानिमित्त ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’ ‘सुंदरा’ फेम मीना नेरुरकर यांचा कलाश्रमच्या उपक्रमात सहभाग अभिनेते राजा परांजपे यांना अभियान सन्मान पुष्पात नृत्यांजली अर्पण ‘कलाश्रम’ या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम राबवला जातो. यंदा या फेब्रुवारी महिन्यात होणारे हे ७४ वे पुष्प आहे. स्वातंत्र्यसैनिक डॉ. पशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत ही संस्था कार्य करते. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम डॉ. मीना नेरुरकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका अशी त्यांची ओळख आहे. शुक्रवार, २७ मार्च ‘मराठी भाषा गौरव दिनी’ सायंकाळी ४ वाजता. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर चौथा मजला, चित्रकला दालन, प्रभादेवी येथे हा कार्यक्रम होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दिवंगत झालेल्या प्रज्ञावंतांचे स्मरण आणि तसे कार्य करणाऱ्या गुणीजनांना ‘दखलपत्र’ देऊन त्यांचा सन्मान करणारा हा उपक्रम असतो. नटवर्य प्रभाकर पणशीकर यांची पत्नी आणि नाट्यसंपदा संस्थेचे व्यवस्थापन जबाबदारी स्वीकारणाऱ्या दिवंगत विजया पणशीकर, चित्रकार, सजावटकार वसंत तोडणकर, वृत्त निवेदक, लेखक अनंत भावे या दिवंगतांचे स्मरण यावेळी केले जाणार आहे. यांच्या नावाचे ‘दखलपत्र’ सुप्रिया प्रोडक्शन या नाट्यसंस्थेला गती देणाऱ्या अनिता चव्हाण, चित्रकार, सजावटकार प्रकाश लहाने, वृत निवेदक, पत्रकार विशाल पाटील, ज्या गिरणी कामगार पुत्राने कलेच्या प्रांतात यश मिळवले आहे. त्यांना ‘अव्वल पुरस्कार’ देऊन गौरवांकित करण्यात येते. रोख रक्कम, दखलपत्र असे त्याचे स्वरूप असते. दिवंगत आदर्श श्रमिक पांडुरंग परब, आदर्श गृहिणी रुक्मिणी परब यांच्या नावाचा हा मान यंदा  रंगभूषा, प्रकाश योजना, नेपथ्यकार सुनील देवळेकर यांना प्राप्त झालेला आहे. परब यांचे सुपुत्र, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक परब यांचे मार्गदर्शन या पुरस्काराला लाभलेले आहे.  प्रत्येक महिन्याला महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या प्रज्ञावंतांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजा परांजपे यांना निवृत्त पोलीस अधिकारी, गायक हरिश्चंद्र ठोंबरे आणि नृत्यांगना अनघा देसाई ‘बाई मी विकत घेतला शाम’ या गाण्यावरती भावमुद्रा सादर करून नृत्यांजली अर्पण करणार आहेत. २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’चे निमित्त घेऊन संस्थेने ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’ या ६७ व्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. चित्रपट निर्माते, पर्यावरण तज्ञ, संपादक डॉ. किशोर भोईर यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे. डॉ. कामिनीदेवी भोईर यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माते सतीश रणदिवे हे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी होणार आहे. ज्योती शिंदे, शेजल जाधव, मानसी धारप, रोहन वानखेडे, सुजाता गोलटकर, सलोनी बोरकर, मृण्मयी मोडक आदींचा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे. नंदकुमार पाटील हे या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आहेत तर नंदिनी पाटील या संचालिका आहेत.

  वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार

वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार रहिवाशांच्या मोर्चाची घेतली दखल प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर होणार कारवाई – शैलेंद्र कांबळे अनिल ठाणेकर मुंबई, वरळी नाका परिसरातील प्रेम नगर व सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सुमारे २५ वर्षांपासून रखडला आहे. याविरोधात मार्क्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन शक्ती संघटनेच्या वतीने  रहिवाशांनी आज एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती शैलेंद्र कांबळे यांनी दिली. यावळी मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार,बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी,नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते. मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदन सादर करत बैठकीत विकासकाच्या निष्क्रियतेबाबत तक्रार नोंदवली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष अधिकारी मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.दरम्यान, ५७ रहिवाशांना विकासकाने भाडे न दिल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला; मात्र तो बाऊन्स झाल्याची माहिती देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.प्रकल्पासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करावी, तसेच अपयशी विकासकाची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.

 आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील पर्यावरणाची काळजी केवळ दिखाऊपणा

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील पर्यावरणाची काळजी केवळ दिखाऊपणा भाजपा सरकारकडून राज्यात विकासाच्या नावावर पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी – सुरेशचंद्र राजहंस मुंबई : भाजपा महायुती सरकारने मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास केला आणि आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पर्यावरणाची काळजी व्यक्त करत आहेत, हा केवळ दिखाऊपणा  आहे. पर्यावरण आठवडा सारख्या कार्यक्रमात भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती अधिक महत्त्वाची असते. पर्यावरण हा केवळ परिषदांचा विषय नाही, तर तो जनतेच्या श्वासाचा, भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असे मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे. पर्यावरणावर बोलताना सुरेशचंद्र राजहंस म्हणाले की, मुंबईतील ‘पर्यावरण आठवडा’ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास याबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या पण त्यांच्याच सरकारने राज्यात पर्यावरणाची मोठी हानी केली आहे. आरे मधील झाडांची कत्तल, चंद्रपूर ताडोबा– अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जंगलांवर वाढता ताण आहे, वेताळ टेकडी येथील झाडांवर घाला घालण्यात आला, मुंबई तील मँग्रोव्ह्स आणि सॉल्ट पॅन जमिनींवर विकासाच्या नावाखाली अनेक प्रकल्प सुरू आहेत. तपोवन मध्ये वृक्ष तोड चाललेली आहे. या सर्व घटनांनी सरकारची “विकास” ही संकल्पना नेमकी कोणासाठी आहे, हा प्रश्न निर्माण केला आहे. सरकारला खरोखरच पर्यावरणपूरक विकास हवा असेल तर, मोठ्या प्रकल्पांपूर्वी पारदर्शक पर्यावरणीय परिणाम अहवाल जाहीर करावेत. झाडतोडी ऐवजी पर्यायी आराखडे तयार करावेत. मँग्रोव्ह, टेकड्या आणि जंगलांचे कायदेशीर संरक्षण अधिक मजबूत करावे. स्थानिक नागरिक व पर्यावरणतज्ज्ञांचा सल्ला बंधनकारक करावा. केवळ शब्दांमध्ये शाश्वत आणि प्रत्यक्षात वेगळीच कृती ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राची जनता ओळखते. पर्यावरण वाचवायचे असेल, तर घोषणांपेक्षा ठोस कृती हवी. अन्यथा पर्यावरण आठवडा हा फक्त प्रतिमानिर्मितीचा कार्यक्रम ठरेल, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

  भाजपाचे ‘सबका साथ, सबका विकास’ थोतांड

भाजपाचे ‘सबका साथ, सबका विकास’ थोतांड मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे जुने निर्णय रद्द करण्याची भाजपा सरकारची कृती लोकशाहीसाठी घातक – वर्षा गायकवाड मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य…

पुणे मार्केट यार्डमधील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत बैठक

पुणे मार्केट यार्डमधील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत बैठक आडतदारांबरोबर मूळ शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे – अण्णा बनसोडे मुंबई : गेल्या काही वर्षांपासून पुणे मार्केट यार्ड येथील फळ विभागाऐवजी भाजीपाला विभागात डमी आडत्यांमार्फत लिंबू विक्री सुरू…