Category: होम

– अजित पवार यांच्या आवडीच्या गीतांमधून ठाण्यात २२ जुलै रोजी आदरांजली कार्यक्रम

वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे आयोजन, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांची उपस्थिती ठाणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने वसंतराव डावखरे फाउंडेशन यांच्या वतीने अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असून, त्यांच्या स्मृतींना शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात २२ जुलै रोजी गडकरी रंगायतनमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका व संगीतकार वैशाली सामंत यांच्यासह कलाकारांकडून विविध गीते सादर केली जातील. वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वीरू वाघमारे यांची उपस्थिती होती. दिवंगत अजितदादा पवार यांची स्मृती जतन करण्याबरोबरच ठाणेकरांच्या वतीने आदंराजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे, असे नमूद करीत प्रबोध डावखरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. ते पुढे म्हणाले, “दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ठाण्याबरोबर ऋणानुबंध होते. अजितदादांचा शिस्तप्रिय स्वभाव, प्रशासनाचे सखोल ज्ञान आणि त्यांना सामान्यांविषयी आत्मियतेचा धागा होता. त्याचबरोबरच राज्याच्या सांस्कृतिक, कला, नाट्य क्षेत्रातही त्यांना विशेष रुची होती. त्याअनुषंगाने वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम सादर केला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून अजितदादांना आवडणाऱ्या गीतांची माहिती घेऊन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गडकरी रंगायतनमध्ये २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अजितदादांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील संगीत, साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती राहील. त्याचबरोबर या कार्यक्रमात दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला ठाणेकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबोध डावखरे यांनी केले. त्याचबरोबर यापुढील काळात ठाण्यातील नागरिकांसाठी दरमहा विविध उपक्रमांबरोबरच कार्यक्रम सादर करण्यात येतील, असे प्रबोध डावखरे यांनी सांगितले. ००००००००  

मजूर ते उद्योजक प्रेरणा सन्मान उपक्रम

रमेश औताडे मुंबई : बांधकाम साहित्य क्षेत्रातील अदानी सिमेंट ने मजूर ते उद्योजक या प्रेरणा सन्मान उपक्रमात बांधकाम क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवणारे  मजूर ते उद्योजक असा प्रवास करणारे सुरेंदर चौहान यांचा प्रेरणा सन्मान उपक्रमात सन्मान केला. १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरेंदर अधिक चांगल्या संधी आणि स्थिर भविष्यासाठी मुंबईत आले. त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी मजूर आणि गवंडी म्हणून काम करायला सुरुवात केली. या काळात त्यांनी बांधकाम तंत्र, कारागिरी आणि बांधकाम स्थळावरील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवला. कौशल्य आणि आत्मविश्वास वाढत गेल्यानंतर सुरेंदर यांनी स्वतंत्रपणे छोटे बांधकाम प्रकल्प स्वीकारण्यास सुरुवात केली. ०००००००००

 व्हॉट्सॲपवर बनावट संदेश व्हायरल

 निवडणूक आयोगाचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ठाणे, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR-२०२६) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपवर भारत निवडणूक आयोग (@ecisveep) आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (@ceo_maharashtra) यांच्या नावाने बनावट संदेश आणि मोबाईल क्रमांक व्हायरल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक यंत्रणेने केले आहे. व्हायरल होत असलेल्या संदेशात, “SIR-२०२६ दरम्यान मतदाराच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळली असून, दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क न केल्यास मतदार ओळखपत्र हटवले जाईल,” असा दावा करण्यात आला आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा, दिशाभूल करणारा आणि निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने नागरिकांना अशा कोणत्याही बनावट संदेशांना किंवा अनोळखी मोबाईल क्रमांकांना प्रतिसाद देऊ नये, तसेच कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा कागदपत्रे शेअर करू नयेत, असे आवाहन केले आहे. मतदार यादी, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR-२०२६) किंवा मतदार ओळखपत्रासंबंधी कोणतीही माहिती केवळ भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत माध्यमांवरूनच पडताळून पाहावी, असेही नागरिकांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करत, नागरिकांनी कोणतीही अप्रमाणित माहिती पुढे पाठवू नये, असेही निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे. ००००

आयडियल १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत ९२ खेळाडूंमध्ये आज चुरस

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे दि न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहप्रायोजित १४ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेत ६ वयोगटामधील विजेतेपदासाठी एकूण ९२ खेळाडूंमध्ये १८ जुलै रोजी चुरस राहील. आंतरराष्ट्रीय…

 गांडूळवाड येथे घरावर वीज पडून घराचे नुकसान

 कुटुंबाची मदतीची मागणी ठाणे : शहापूर तालुक्या मध्ये डोलखांब विभागतील परिसरात बुधवारी विजांच्या कडकडास पाऊस झाला गांडूळवाड येथील  बुधा धर्मा हंबीर यांच्या घरावर वीज पडून शेतकरी कुटूंबाचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी साकाळच्या सुमारास घडली. ठाणे जिल्ह्यासह डोलखांब परिसरात पाऊस सुरू होता. त्यामुळे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने. याचा फटका हंबीर कुटुंबीयांना बसला. बुधवारी त्यांच्या घरावर वीज पडून घराचे पत्रे कौले फुटली व इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली. तसेच घराच्या भिंतीलाही विजेच्या प्रवाहामुळे भगदाड पडले आहे. घरावर वीज पडताच मोठा आवाज झाला  घरामध्ये बुधा हंबीर व दोन महिला व लहान मुलं इतर सदस्य होते. घरातील एका पुरुषाला आणि दोन महिलांना विजेचा धक्का बसल्याची माहिती मिळाली असून सुदैवाने त्यांना कोणतीही मोठी इजा झाली नाही.

अजितदादा पवार यांची स्मृतीपत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून विधानपरिषद आणि विधानसभेचे स्मृतीपत्र तसेच तामिळनाडू विधानसभा शोक प्रस्तावाची प्रत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे…

रमेश म्हात्रेंच्या मुलाच्या अटकेसाठी तक्रारदाराचे कल्याणमध्ये बेमुदत उपोषण

कल्याण : शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा मुलगा प्रवीण म्हात्रे हे विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यामुळे मागील वर्षभरापासून फरार आहेत. सतत पाठपुरावा करूनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत म्हणून…

ऐतिहासिक भटाळे तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी १० कोटींचा निधी द्या

– माजी आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी कल्याण : कल्याण शहराच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक भटाळे तलावाचे पुनरुज्जीवन, सुशोभीकरण आणि विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात नरेंद्र पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले आणि भटाळे तलावाच्या जतन – संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कल्याणच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भटाळे तलावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याच परिसरात पूर्वी ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी विस्तीर्ण भटाळे तलाव अस्तित्वात होता. मात्र कालांतराने या तलावात मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आल्याने तसेच अतिक्रमण झाल्याने तलावाचे मूळ स्वरूप नष्ट होत चालले असून आज तलाव शोधावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच तलावामध्ये हळूहळू बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचे सांगत जनावरांचे मलमूत्र तसेच सांडपाणीही सोडले जात आहे. परिणामी तलावातील पाणी प्रदूषित झाले असून पर्यावरणीय संतुलनावरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. इतिहास आणि पर्यावरण या दोन्ही दृष्टीने महत्त्व असलेल्या या तलावाचे संवर्धन, संरक्षण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत तलावाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे. यासाठी १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून भटाळे तलावांचे पुनरुज्जीवन आणि विकास कामे तातडीने हाती घेण्यात यावीत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ०००००

ज्येष्ठ कबड्डी पंच अनिल शेजवळ यांचा पुरस्काराने गौरव

कल्याण : कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित २६ व्या ‘कबड्डी दिन’ सोहळ्यात ज्येष्ठ कबड्डी पंच अनिल शेजवळ यांचा त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आमदार भाई जगताप आणि…