Category: Blog

Your blog category

Heading – इनरव्हील क्लब चा ‘अन्नपूर्णा: हॅप्पी हंड्रेड’ कार्यक्रम

 विमानतळ कर्मचारी आणि तृतीयपंथीयांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप मुंबई दि. (प्रतिनिधी): प्रयास एक कोशिश या संस्थेच्या सहकार्याने दि इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तियारा यांनी ‘अन्नपूर्णा : हॅप्पी हंड्रेड’ हा प्रकल्प…

वरुन कुणाचा दबाव आहे का? भाजप पदाधिकाऱ्यावर बलात्कार, फसवणूकीसारखे गंभीर आरोप

 अटक करण्याच्या मागणीसाठी शिवसेना मैदानात मुंबई, दि.(प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर बलात्कार, फसवणूकीसारखे गंभीर आरोप असूनही त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही म्हणून त्याच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब…

श्री गणेश आखाड्याच्या पैलवान विशाल जाधवची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी

रोहतक- हरियाणातील रोहतक येथे १० ते १२ जुलै दरम्यान सुरू असलेल्या सीनियर नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील…

Heading – ठाणे वाहतूक विभागात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

 १२ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे शहर वाहतूक विभागातील पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदलीचे आदेश पोलिस उपआयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी जारी केले आहेत. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांनुसार एकूण १२ पोलिस निरीक्षकांना विविध वाहतूक उपविभागांमध्ये नव्याने नियुक्त करण्यात आले आहे. हे आदेश ८ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आले असून तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. बदल्यांनुसार पोनि. संजय महादेव जाधव यांची कळवा वाहतूक उपविभागातून राबोडी वाहतूक उपविभागात, पोनि. विजयकुमार देशमुख यांची वाहतूक नियंत्रण कक्षातून वागळे वाहतूक उपविभागात, तर पोनि. मिलिंद झांजे यांची कल्याण वाहतूक उपविभागातून कोळसेवाडी वाहतूक उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पोनि. राजू पिंगारे, पोनि. जयपालसिंग राजपूत, पोनि. कृष्णदत्त डखोळे, पोनि. उमेश सावंत, पोनि. युवराज म्हसे, पोनि. दामोदर घने, पोनि. विजय अहिरे, पोनि. अंकुश हुल्के आणि पोनि. रणजित नलवडे यांच्या देखील विविध वाहतूक उपविभागांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. पोनि. रणजित नलवडे यांची प्रशासन शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू होऊन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन या बदल्या करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Heading – विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा

 उल्हासनगर महापालिकेचे आवाहन सुनिल इंगळे उल्हासनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ अभियान सुरू करण्यात आले असून, या मोहिमेत उल्हासनगर शहरातील सर्व पात्र नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेने केले आहे. महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या अभियानादरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन गणना फॉर्म (Enumeration Form – EF) उपलब्ध करून देणार आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह हा फॉर्म काळजीपूर्वक भरून निर्धारित कालावधीत संबंधित BLO यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांकडून गणना फॉर्म प्राप्त होतील, त्यांचाच समावेश मसुदा मतदार यादीमध्ये करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मतदार यादीतील अपात्र, मृत, स्थलांतरित किंवा दुबार नावे वगळून मतदार यादी अधिक विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सन २००२ नंतर प्रथमच इतक्या व्यापक स्वरूपात मतदार यादीची पडताळणी होत असल्याने प्रत्येक पात्र नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, कोणत्याही मतदाराचे नाव सुनावणीची संधी दिल्याशिवाय मतदार यादीतून वगळले जाणार नाही. तसेच नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक घोषणापत्र (Declaration Form) सादर करणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय तक्रारी व अपील दाखल करण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अधिक माहितीसाठी मतदार मदत क्रमांक १९५० वर संपर्क साधावा किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आपल्या घरी भेट देताच त्यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देऊन विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेने सर्व नागरिकांना केले आहे.

 नवी मुंबईतील ५ हजार अनधिकृत इमारतींच्या प्रकरणावरून खळबळ

 २९५ अधिकाऱ्यांवर जबाबदारी! अनिल ठाणेकर ठाणे-नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या सुमारे ५ हजार अनधिकृत इमारतींच्या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या अनधिकृत बांधकामांसाठी महापालिकेचे २९५ अधिकारी जबाबदार असल्याचा दावा…

 शिक्षकांवर एफआयआर दाखल होणार नाही

 शिक्षणमंत्र्याचे आंदोलकांना आश्वासन मुंबई  :BLO/SIR रद्द करा, शिक्षकांना TET सक्ती नको, तात्काळ FIR मागे घ्या. या मागण्यासाठी मुंबईतील सर्व संघटनांनी एकत्र येऊन आझाद मैदान येथे जोरदार आंदोलन केले. शिक्षण विभागाने…

Heading – पूर्व वैमनस्यातून तरुणाची धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या

मारेकरी अटकेत सुनिल इंगळे उल्हासनगर: मागील भांडणाचे व एकमेकांच्या विरोधात केलेल्या केसच्या वादातून मनात राग धरून तरुणाला भर रस्त्यात अडवून त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी तातडीने त्या मारेकर्‍याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री अकराच्या सुमारास कुर्ला कॅम्प रोड, कालीमाता मंदिरच्या मागे भर रस्त्यात व सुरू असलेल्या पावसात एका तरुणाने दुसऱ्या तरुणांवर धारदार चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करून त्या ठिकाणाहून पलायन केले. या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटना घडलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी रक्ताच्या ठरवण्यात एक तरुण जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याच्या जवळच एक धारदार चाकू रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला होता. पोलिसांनी सर्वप्रथम त्या जखमी तरुणाला जवळच असलेल्या बालाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्याची प्रकृती खूपच गंभीर असल्याने त्याला उल्हासनगरातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या मयत झालेल्या तरुणाचे नाव सतनामसिंग लबाना असल्याचे व तो उल्हासनगरातील कॅम्प नंबर – ५ परिसरातील सेक्शन ३९ वीर तानाजी नगर या परिसरातला राहणारा असल्याचे समजले. सतनामसिंग याला जीव ठार मारून पळून गेलेल्या मारेकराचे नाव गुरप्रीतसिंग उर्फ अनिस करतारसिंग लबाना (१९ ) असून तो देखील वीर तानाजी नगर परिसरातली राहणार असल्याचे पोलिसांना समजले. त्याच दरम्यान हिल्लाईन पोलिसांनी अनिस लबाना याचा शोध घेऊन त्याला त्वरित ताब्यात घेऊन विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला धारदार चाकू व इतर वस्तू पंचनामा करून ताब्यात घेतल्या. याशिवाय या थरारक हत्याचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईल मध्ये चित्रीत केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे घटना घडलेल्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतनामसिंग लबाना याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने त्याचा भाऊ कुलदीप सिंग लभाना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुरुप्रीतसिंग उर्फ अनिस लबाना याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटने संदर्भात विठ्ठलवाडी पोलिसांनी केलेल्या चौकशीत अधिक माहिती मिळाली मयत सतनामसिंग व यातील आरोपी अनिस यांचे एकमेकांच्या कुटुंबीयांच्या विरोधात पूर्वीपासून वाद आहेत. आणि त्याच्या नातेवाईकांनी मयत सतनामसिंग याच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली होती. त्यात त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो त्या केसमधून जामिनावर बाहेर आलेला होता. तेव्हापासून आरोपी व मयत यांच्या कुटुंबांमध्ये वाद सुरू होता. अनिस लबाना याने मयत सतनामसिंग याच्यासोबत असलेल्या मागील भांडणाचे व एकमेकांचे विरोधात केलेल्या केसच्या वादाचे कारणावरून मनात राग धरून सतनामसिंग लबाना यांच्यावर धारदार चाकूने त्याच्या मानेवर छातीवर पोटावर व शरीरावर सापासाप वार करून त्याला जीवे ठार मारले आहे अशी माहिती तपासात पोलिसांना मिळाली आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे करीत आहेत.

Heading – नालेसफाईचे करोडो रुपये वाया

चार दिवसांच्या पावसामुळे खोटे दावे उघडकीस मिरा -भाईंदर शहरात मान्सून सुरू झाल्याने नाले साफसफाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे, घाण पसरली आहे आणि सांडपाणी रस्त्यांवर वाहत आहे, ज्यामुळे महानगरपालिकेच्या साफसफाई प्रणालीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की शहरातील बहुतेक नाले आणि गटारे अजूनही गाळ आणि कचऱ्याने तुंबलेली आहेत. जर नाले वेळेवर आणि प्रभावीपणे स्वच्छ केले असते, तर पावसाचे पाणी नाल्यांमधून सुरळीतपणे वाहून गेले असते. याउलट, अनेक ठिकाणी घाणेरडे गटार रस्त्यांवर वाहत आहे, ज्यामुळे रहिवाशांना मोठी गैरसोय होत आहे. शिवसेना नेते सज्जी आयपी आणि शिवसेना प्रवक्ते रामभुवन शर्मा यांनी महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारावर गटार साफसफाईचे केवळ वरवरचे आश्वासन दिल्याचा आरोप केला आहे. रामभुवन शर्मा म्हणाले की, कंत्राटदाराने केवळ वरवरची स्वच्छता केली, पण वस्तुस्थिती अशी आहे की गटारांमध्ये आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण अजूनही तशीच आहे. त्यांनी असा आरोप केला की, गटार स्वच्छतेवर खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांचा फायदा जमिनीवर दिसून येत नाही.

Heading – कल्याण पुर्वेत केडीएमसीच्या नालेसफाईची पोलखोल

 नाल्यातील कचरा जैसेथे असल्याने पहिल्याच पावसात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता कल्याण : कल्याण पुर्वेतील पिसवली परिसरातील ५० – ५० हाँटेलच्या मागून वाहणाऱ्या नाल्यामध्यील कचरा जैसे थे असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाल्याचे दिसत आहे. या नाल्यामध्यील कचरा न काढल्याने तुंबापुरीचा फटका सखल भागातील घरांना बसु शकतो यांस जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. कल्याण पुर्वेतील पिसवली परिसरातील ५०- ५० धाबा मागील बाजु एकवीरा अपार्टमेंट शेजारील नाला अद्यापही देखील कचरा आणि प्लास्टिक पिशव्या यांच्या गर्तेत सापडला असून यंदा १९ जून ओलांडलेले असले तरी पावसाचा तपास नाही. अशी परिस्थिती असताना लाखो रूपये नालेसफाईसाठी प्रशासन खर्च करते पंरतु ठेकेदाराने या नाल्यासंर्दभात दुर्लक्ष का केले आहे. की,पावसाची वाट पाहत पहिल्या पावसात नाल्यातील कचरा वाहून जाण्याची वाट पाहत आहे, असा आरोप यानिमित्ताने होत आहे. नाल्यातील कचरा  सफाई तसेच तळापर्यंत गाळ न काढल्यास या नाल्याच्या तुंबापुरीमुळे परिसरातील सखल भागातील घरामध्ये पहिल्या पावसात घरामध्ये पाणी शिरण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने आता तरी डोळसपणे या नाल्याची सफाई कशी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. याबाबत केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव यांच्याशी संपर्क साधला असता, या नाल्याची यापूर्वी सफाई केली होती, नाल्यात अद्यापही देखील कचरा आणि स्वच्छता नीट झाली नसेल तर, नाल्याची स्वच्छता संदर्भीत एजन्सी मार्फत करून घेणार असल्याचे सांगितले. ००००००००००