Category: महाराष्ट्र

Maharashtra News

 गेल्या सहा महिन्यात सिंधुदुर्गात अपघाती मृत्यूंमध्ये घट

संसदीय सुरक्षा समितीची बैठक संपन्न सिंधुदुर्ग: जानेवारी ते जून, या गेल्या सहा महिन्यात, गतवर्षीच्या (२०२५)   तुलनेत यावर्षी  (२०२६) सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघाती मृत्यूंच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. विविध विभागांनी समन्वयाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे रस्ता सुरक्षेच्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत अशी माहिती परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली.  संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील  जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली. जिल्ह्यात केवळ अपघातांची संख्या कमी करणे हे अंतिम उद्दिष्ट नसून ‘अपघातमुक्त सिंधुदुर्ग’ घडविण्यासाठी शून्य अपघाती मृत्यूचे लक्ष्य ठेवून सर्व संबंधित विभागांनी अधिक प्रभावी नियोजन करावे. वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, रस्ते अभियांत्रिकीतील आवश्यक सुधारणा, व्यापक जनजागृती तसेच आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना खासदार नारायण राणे यांनी यावेळी दिल्या. बैठकीत जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच अपघातमुक्त जिल्हा घडविण्याच्या दृष्टीने विविध विभागांनी राबविणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी जिल्ह्यात रस्ता सुरक्षा क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती सादर केली. विशेष अंमलबजावणी मोहिमा, वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी करण्यात आलेली कारवाई, नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती, अपघातप्रवण स्थळांवरील सुधारणा, तसेच विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा त्यांनी सादर केला. या बैठकीला आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेशकुमार बागुल तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव उपस्थित होत्या. बैठकीत राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक सुधारणा, अपघातप्रवण स्थळांवर कायमस्वरूपी उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक उपायांचा अवलंब, रस्ते अभियांत्रिकीतील त्रुटी दूर करणे, तसेच विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करावा. रस्ता सुरक्षा ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून सर्व संबंधित विभागांनी संयुक्तपणे कार्य केल्यासच अपघातांमध्ये आणखी घट साध्य होऊ शकते असे पालकमंत्री नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले. 000000

महावितरणचे शनिवारी ७२ ग्राहक मेळावे

स्मार्ट मीटरमुळे बिल वाढल्याची तक्रार? हरिभाऊ लाखे नाशिक : राज्यात महावितरणकडून बसविल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरवरून मोठे वादळ उठले आहे. हे मीटर बसवल्यानंतर देयकांत वाढ झाली, बळजबरीने ते बसविले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्या विरोधात आंदोलने होत असून स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसविण्याचा आग्रह धरला जात आहे. स्मार्ट मीटरमुळे निर्माण झालेला संभ्रम आणि संशय दूर करण्यासाठी आता खुद्द महावितरणने पुढाकार घेतला आहे. स्मार्ट मीटरविरोधात नाराजी वाढत असल्याने नाशिक मंडळातील २८, मालेगाव मंडळातील १५ आणि अहिल्यानगर मंडळातील २९ अशा महावितरणच्या एकूण ७२ उपविभागीय कार्यालयांमध्ये शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ग्राहक संवाद मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यांना संबंधित महावितरणचे कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित राहून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करतील. तसेच स्मार्ट मीटरसंदर्भात असलेल्या शंकांची व वीज देयकांबाबतच्या तक्रारींची तपासणी करून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. यावेळी स्मार्ट मीटरचे फायदे, वैशिष्ट्ये, कार्यपद्धती आणि अचूकतेविषयी माहिती देण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत किंवा कुठल्याही कारणाने आलेल्या वाढीव वीज देयकांबाबतच्या तक्रारींचे महावितरणकडून प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे. परिमंडळात पावणे आठ लाख स्मार्ट (टीओडी) मीटर नाशिक परिमंडळात आतापर्यंत एकूण ७ लाख ६५ हजार ७०९ सर्व वर्गवारीच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट (टीओडी) मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक मंडळात ३ लाख ३८ हजार ८५५, मालेगाव मंडळात १ लाख १५ हजार ३७३ आणि अहिल्यानगर मंडळात ३ लाख ११ हजार ४८१ मीटरचा समावेश आहे. स्मार्ट मीटरचे फायदे व माहिती जाणून घेतल्यानंतर नाशिक परिमंडळातील मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांनी स्वेच्छेने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी प्रतिसाद दिल्याचा दावा महावितरणने केला आहे. औद्योगिक ग्राहकांना साकडे? स्मार्ट (टीओडी) मीटर हे पूर्णतः अचूक असून सामान्य वीज ग्राहकांसाठी फायदेशीर असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळविण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर उपयुक्त ठरले आहेत. औद्योगिक ग्राहकांकडे अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे मीटर वापरात असल्याने वीज ग्राहकांनी मेळाव्यांना उपस्थित राहून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे. 000000000

दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त ॲक्शन मोडवर

रस्त्यावर कचरा टाकल्यास दुकानदारांना बसणार दंड  नगरसेवक ऍड. आदेश भगत यांच्या मागणीला यश दिवा,: मागील काही वर्षांत दिवा शहराचे झपाट्याने शहरीकरण झाले असून स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपला दिवा…

विकासकाने केली लाखोंची फसवणूक, घर खरेदी प्रकरणी गुन्हे दाखल

मिरा -भाईंदर मीरा रोड येथील शांतीनगर परिसरात फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घर खरेदीसाठी लाखो रुपये भरूनही फ्लॅटचा ताबा न देता तेच फ्लॅट इतर ग्राहकांना विकल्याप्रकरणी मे. श्रीनाथ इंटरप्रायजेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे भागीदार नरेश सुंदरलाल जैन आणि किसनसिंह तुलसीसिंह राजपूत यांच्याविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्लेझंट पार्क परिसरात राहणाऱ्या सुमनबेन विकास यादव (३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी पारसनाथ गार्डन येथील इमारत क्रमांक ४ मधील दोन फ्लॅट एकूण ३७ लाख ९३ हजार ४०० रुपये किमतीला बुक केले होते. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी धनादेश व रोख स्वरूपात मिळून १३ लाख ९७ हजार रुपये विकासकांकडे जमा केले होते. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फ्लॅटचा ताबा देण्याऐवजी विकासकांनी तेच दोन्ही फ्लॅट इतर व्यक्तींना नोंदणीकृत कराराद्वारे विकले. संबंधित विकासकांनी केवळ एका कुटुंबालाच नव्हे, तर परिसरातील अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, भावेश विजय पटेल, पूनम कनोजिया, सर्वेश यादव, गंगाप्रसाद यादव, नीरज कुमार, चंदन रामचंद्र यादव, उमाशंकर राधेश्याम यादव, चंद्रशेखर यादव, समयलाल यादव, हरिशंकर यादव, बबलू विश्वकर्मा, विमल कुमार यादव आणि अभिषेक यादव यांच्याकडूनही लाखो रुपये स्वीकारून त्यांच्या नावावर बुक केलेले फ्लॅट इतरांना विकण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे मिरा-भाईंदर परिसरातील घर खरेदीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूक, विश्वासघात, धमकी आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संविधान चौरे करत आहेत.

खाद्यपदार्थांच्या आड लपवून मद्याची आलिशान वाहनातून तस्करी

 खाद्यपदार्थांच्या आड लपवून मद्याची आलिशान वाहनातून तस्करीSlug – उत्पादन शुल्क विभागाची कारवाई  ३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट मद्याची वाहतूक करणारी वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे ३४ लाख ८४ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आलिशान वाहनांतून खाद्यपदार्थांच्या आडून अवैध मद्याची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज पालघर जिल्ह्यातील जव्हार खानवेल रोड, विशाल ढाब्याच्या समोर, जव्हार तसेच जव्हार-खंबाळे रोडवर, रातुना फाटया जवळ, रातुना वडवली जव्हार…

संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार

नवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) या रिक्त पदावर सरळ सेवेने नवनियुक्त झालेले संजू उत्तम चव्हाण यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. नवी…

महावितरणतर्फे विरारमध्ये स्मार्ट मीटर जनजागृती मेळाव्याचे आयोजन

विरार : महावितरणच्या विरार विभागामार्फत नालासोपारा (पूर्व) व आचोळे शहर परिसरातील वीज ग्राहकांसाठी १६ जुलैपासून सलग ३ दिवस स्मार्ट मीटर जनजागृती मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे. हा मेळावा महावितरणच्या नालासोपारा…

 डोंबिवलीतील स्पा सेंटरमधून महिलेचे ७० हजारांचे मंगळसूत्र चोरी

 बॉडी मसाज सुरू असताना पर्समधील दागिना लंपास; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल कल्याण : डोंबिवली पूर्व येथील एका स्पा सेंटरमध्ये बॉडी मसाजसाठी गेलेल्या महिलेचे ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक ५० वर्षीय महिला ४ जुलैला दुपारी ३.१५ ते ५.०० वाजण्याच्या दरम्यान डोंबिवली पूर्वेतील टिळक रोडवरील स्पार्कल सलून अँड स्पा येथे बॉडी मसाजसाठी गेल्या होत्या. मसाज सुरू करण्यापूर्वी त्यांनी गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र काढून ते पर्समध्ये ठेवले आणि पर्स भिंतीलगत असलेल्या हुकला अडकवली. मसाज संपल्यानंतर पर्स तपासली असता त्यामधील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मंगळसूत्र न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५ (अ) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप करीत आहेत. स्पा सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. 00000000

 दिव्यातील भराडी देवी सेवा मंडळाकडून वारकऱ्यांची सेवा

 सासवड येथे चहा, बिस्कीट व पाण्याचे मोफत वाटप दिवा :“जीवनातला एक दिवस चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करावी” हा भाव मनात ठेवून दिव्यातील भराडी देवी सेवा मंडळाने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत…

पावसाळ्यानंतर डेंग्यू, मलेरिया आणि जलजन्य आजारांचा धोका वाढला

मिरा –भाईंदर : पावसाळा ओसरत असताना मुंबईसह मिरा -भाईंदर आणि वसई-विरार परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच टायफॉइड, हिपॅटायटिस-ए आणि गॅस्ट्रोएन्टेरायटिससारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अपेक्स हॉस्पिटल्स समूहाने…