Category: महाराष्ट्र

Maharashtra News

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, आता लढा विद्यार्थ्यांच्या हाती!

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, आता लढा विद्यार्थ्यांच्या हाती! हरिभाऊ लाखे नाशिक – नाशिक-पुणे जलदगती रेल्वेमार्ग मूळ प्रस्तावित सरळ मार्गाने नेण्यात यावा, यासाठी चाललेल्या लढ्याला जनआंदोलनाचे व्यापक रूप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अग्रस्थानी राहण्याची आवश्यकता असल्याकडे लक्ष वेधत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी तरुण व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या भावना पत्राद्वारे कळवण्याचे आवाहन केले आहे. संगमनेर व अकोले तालुक्यात ही मोहीम सुरू असून आता तिचा विस्तार सिन्नर तालुक्यातही झाला आहे. सिन्नर रेल्वे कृती समितीने तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह नागरिकांना लोकशाही मार्गाने आपली भूमिका पत्र मोहिमेतून शासनापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. नाशिक–पुणे जलदगती रेल्वे मार्गासाठी नाशिक- सिन्नर– अकोले– संगमनेर– नारायणगाव– राजगुरुनगर– चाकण या मार्गाचे मूळ संरेखन होते. रेल्वे मंत्रालयाने त्यात बदल करून पुणे– अहिल्यानगर– पुणतांबा– साईनगर शिर्डी–नाशिक असा नवीन मार्ग निश्चित केल्यापासून मूळ मार्गावरील गावांमध्ये असंतोष आहे. ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. नाशिक-पुणे जलदगती रेल्वे ही आपल्या हक्काची आहे. हा हक्क मिळवण्यासाठी आपला संघर्ष अधिकाधिक तीव्र करावा लागेल. ही लढाई एकाच वेळी अनेक माध्यमातून लढावी लागणार आहे, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळात आपण ही लढाई लढत आहोत. प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकजूट करून मुख्यमंत्र्यांकडे हा विषय नेला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या लढ्याला खऱ्या अर्थाने जनआंदोलनाचे रूप देण्यासाठी ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लढा लढला जात आहे, त्या युवकांनी व विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची गरज आ. तांबे यांनी मांडली. संबंधितांनी पत्राद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपली भावना कळवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानुसार संगमनेर व अकोले तालुक्यात ही मोहीम सुरू झाली आहे. आता ही पत्र मोहीम सिन्नर तालुक्यातही राबविली जाणार असल्याचे सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी बबन वाजे यांनी सांगितले. पत्रातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवूया, अशी ही मोहीम आहे. या माध्यमातून हा रेल्वे मार्ग बदलल्यास आमच्या भागातील मुलांचे शिक्षण, पालकांचा रोजगार व विकास थांबेल. त्यामुळे भविष्यासाठी मूळ सरळ रेल्वे मार्ग कायम ठेवा, अशी विनंती विद्यार्थ्यांकडून पत्राद्वारे केली जात आहे. रेल्वे मार्ग परिसरातील नागरिकांना पत्र मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्याचे वाजे यांनी सांगितले. मार्ग बदलल्यास मूळ मार्गावरील भाग विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जाईल, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधी कमी होतील, शेतकऱ्यांच्या मालास बाजारपेठ मिळणे कठीण होईल, आदींकडे लक्ष वेधले जात आहे.

सिंधुदुर्गातील नगरपरिषदा – नगर पंचायतींना निधी वाढवून मिळावा- निलेश राणे

सिंधुदुर्गातील नगरपरिषदा – नगर पंचायतींना निधी वाढवून मिळावा- निलेश राणे सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी)–सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे जिल्ह्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात आणि दरवर्षी त्यात वाढ होत आहे परिणामी…

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ऑनलाईन प्रवेश घेण्यास २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ऑनलाईन प्रवेश घेण्यास २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत असलेल्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे शैक्षणिक सत्र जानेवारी २०२६ करीता नवीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश घेण्यास येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच जानेवारी २०२५ या सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षास प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाचीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण व विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी. एड. (सेवांतर्गत), बी. एड. (विशेष) तसेच विज्ञान विद्याशाखेच्या शिक्षणक्रमांव्यातिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना नियमित पदवी सोवत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी विनाविलंब शुल्कासह घेता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापनेपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील विविध घटकातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय व खाजगी संवेत उच्चपदावर कार्यरत आहेत. मानाची पदे भूषवत आहेत. हे विद्यापीठ सर्वसामान्य ते विशेष पारंगत अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रवेशद्वार ठरत आलेले आहे. येथे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख तसेच वेब रेडिओ, दृकश्राव्य माध्यम व मोबाईलद्वारे देखील मार्गदर्शन केले जाते. दोन वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, दूरशिक्षण क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य यूजीसी मान्यताप्राप्त व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले एकमेव मुक्त विद्यापीठ आहे. विद्यापीठातर्फे सेनादल सैनिक, बंदीजन, कृषि सेवक, शेतमजूर आणि समाजातील इतरही घटक यांच्यासाठी विशेष शिक्षणक्रम आहेत. शिवाय ए.आय. डाटा सायन्स, सायबर ॲक्ट ते बीए, बीकॉम, एम. ए., एम. कॉम., एम. लिब., एम. सी. ए. यासह विविध व आधुनिक कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. हे सर्व शिक्षणक्रम नोकरदारांना आपली नोकरी व व्यवसायिकांना आपला व्यवसाय सांभाळून पूर्ण करता येतात. त्यामुळे संबंधित इच्छुकांना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची व सर्वार्थाने प्रगती साधण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्या अनुषंगाने दिनांक २० जानेवारीपासून विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत विविध ८८  शिक्षणक्रमांचे ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. त्यात प्रमाणपत्र – ३२, पदविका – ३०, पदवी – ११ व पदव्युत्तर १५ शिक्षणक्रमांचा समावेश आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही फक्त ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्र्माचे शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. प्रवेशासाठीची मुदतवाढ ही येत्या दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विहित मुदतीत विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac  या वेबसाईटला भेट द्यावी. तेथे Admission  या पर्यायावरून Prospectus येथे विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत. काही तांत्रिक अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत (०२५३)२२३०५८०, २२३१७१५, २२३०१०६, २२३१७१४ या विद्यार्थी मदत केंद्रावरील दूरध्वनी क्र्मांकावर किंवा ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२ अथवा ९२७२०४६७२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे व विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

म्हाडाच्या मुंबईतील ११८ सदनिकेसाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी

म्हाडाच्या मुंबईतील ११८ सदनिकेसाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ११८ सदनिकांची विक्री जाहीर करण्यात आली आहे.…

अब्दुल सत्तारांच्या मंदिरप्रवेशावर वाद

अब्दुल सत्तारांच्या मंदिरप्रवेशावर वाद भाजपा समर्थक तरुणांनी मंदीर गोमुत्रांनी शुद्ध केले सत्तांरांनी हवं तर धर्मांतर करून हिंदू व्हावे भाजपाची मागणी सिल्लोड : शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन…

 नाशिकमध्ये भाजप बंडखोर आणि मनसेला सत्तेची लॉटरी

नाशिकमध्ये भाजप बंडखोर आणि मनसेला सत्तेची लॉटरी स्थायी समितीत मिळाले स्थान! हरिभाऊ लाखे नाशिक: महापालिकेच्या तिजोरीची चावी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत सोमवारी राजकीय पक्ष व आघाडीच्या तौलानिक बळानुसार १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपने महापौर व उपमहापौरपदाच्या स्पर्धेतील काहींना स्थायीवर संधी दिली. अपक्ष विजयी झालेल्या मुकेश शहाणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाशी आघाडी करीत तर, मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिवसेना शिंदे गटाशी आघाडी करीत स्थायीत प्रवेश मिळवला. महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित लढले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांच्याबरोबर होता. निकालानंतर मनसे शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी करीत एकप्रकारे सत्तेत सहभागी झाली. तर भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे हे अजित पवार गटाने आधीच दिलेल्या पाठिंब्यामुळे अप्रत्यक्षपणे सत्तेत सहभागी झाले. या समीकरणांनी बहुमतात असणाऱ्या भाजपला स्थायीत अधिक बळ मिळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे महापौर, उपमहापौरांबरोबर स्थायी समिती व सभापतीला विशेष महत्व आले आहे. सदस्य पदांसाठी सत्ताधारी भाजपमध्ये मोठी स्पर्धा होती. महापौर व उपमहापौर निवडणूक झाल्यानंतर सर्वांचे लक्ष स्थायी सभापतीपदाकडे आहे. २२ सदस्यांच्या पालिकेत ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. अखेरच्या क्षणी राज्यातील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाला भाजपने उपमहापौरपद देत बरोबर घेतले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. पालिकेत शिवसेना शिंदे गट (२६), राष्ट्रवादी अजित पवार गट (चार), ठाकरे गट (१५), काँग्रेस (तीन), मनसे आणि अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. विविध समित्यामध्ये अधिकतम प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी अन्य राजकीय पक्षांनी समीकरणे जुळवली. महापालिकेत ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपचे नऊ, शिवसेना शिंदे गट मनसेच्या गटाला चार, शिवसेना ठाकरे गट- काँग्रेस आघाडीला दोन, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि् अपक्ष आघाडीच्या एका सदस्याला संधी मिळाली. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडून पक्षनिहाय सदस्यांची नावे जाहीर झाली. भाजपने महापौर पदाच्या स्पर्धेतील माधुरी बोलकर आणि दीपाली कुलकर्णी तसेच उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घ्यावे लागलेले मच्छिंद्र सानप यांच्यासह नितीन निगळ, पल्लवी गणोरे, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड यांची स्थायीवर नियुक्ती केली. शिवसेना शिंदे गट-मनसे आघाडीकडून मनसेच्या मयुरी पवार, शिंदे गटाच्या किरणताई गामणे, राहुल दिवे आणि रंजना बोराडे, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आघाडीच्या भारती ताजनपुरे आणि योगेश गाडेकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपक्ष आघाडीचे मुकेश शहाणे यांची अशा एकूण १६ जणांची स्थायी समितीत सदस्य म्हणून नियुक्ती झाली. आघाडी केल्यामुळे अपक्ष निवडून आलेल्या मुकेश शहाणे यांची लॉटरी लागली. अजित पवार गटाने आधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेही सत्तेत सहभागी महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने एकत्रित लढली होती. ठाकरे गटाला १५ तर मनसेला एक जागा मिळाली. निकालानंतर समीकरणे बदलली. शिवसेना शिंदे गटाने मनसेला सोबत घेऊन पालिकेत गट स्थापन केला. भाजपने मित्रपक्ष शिंदे गटाला सत्तेत बरोबर घेतले. विलास शिंदे उपमहापौर होऊन शिंदे गट सत्तेत सहभागी झाला. दुसरीकडे शिंदे गट आणि मनसेची आघाडी आहे. शिंदे गटाने या पक्षाच्या नगरसेविका मयुरी पवार यांना स्थायीत संधी दिली. या राजकीय समीकरणांनी नाशिक पालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाबरोबर एकप्रकारे मनसेचाही समावेश झाला आहे. एकत्रित निवडणूक लढणाऱ्या ठाकरे गटाने मनसे व काँग्रेसला सोबत घेऊन एकत्रित आघाडी स्थापन करण्याचा आग्रह धरला होता. परंतु, मनसेने शिंदे गटासोबत आघाडी केली. या संदर्भात वरिष्ठ नेत्यांना आधीच माहिती दिल्याचे ठाकरे गटातील पदाधिकारी सांगतात. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

 सिंधुदुर्गात ७० ग्रामपंचायतींवर आता प्रशासक…!

सिंधुदुर्गात ७० ग्रामपंचायतींवर आता प्रशासक…! मुदत संपली, निवडणुकीची प्रतिक्षा.! सिंधुदुर्ग – राजन चव्हाण जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने आता त्यावर प्रशासक नेमण्यात आले आहे. १० व ११ फेब्रुवारी रोजी या ग्रामपंचायतीची…

टिपू सुलतानवरून पुण्यात भाजपा-काँग्रेसचा राडा

टिपू सुलतानवरून पुण्यात भाजपा-काँग्रेसचा राडा दगडफेकीत एकमेकांची डोकी फोडली पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना करणारे वक्तव्य केल्यानंतर राज्यभर भाजपाने जोरदार…

  राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई

राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड पुणे : आर्मी रोइंग नोड येथे नुकत्याच झालेल्या ४३व्या वरिष्ठ राष्ट्रीय रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत…

 “सुनेत्रा पवार यांना काम समजून घेऊ द्या, मग काय करायचे ते…”

“सुनेत्रा पवार यांना काम समजून घेऊ द्या, मग काय करायचे ते…” छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया चर्चेत… हरिभाऊ लाखे नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची दररोज चर्चा सुरु आहे. अखेर शनिवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यापुढे विलिनीकरणाचा विषय आमच्याकडून बंद, असे सांगण्याची वेळ आली. परंतु, त्याच दिवशी नाशिकमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनीही दोन्ही राष्ट्रवदींच्या विलिनीकरणाविषयीच भाष्य केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयीही त्यांनी मत व्यक्त केले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण आणि सुनेत्रा पवार हे दोन विषय यापुढेही चर्चेत राहणार आहेत. महायुतीत सत्तेत असलेले राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्युनंतर अजित पवार गटाची धुरा आता कोणाकडे, असा प्रश्न प्रथम उपस्थित करण्यात येऊ लागला होता. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाशिवाय आता पर्याय नसल्याचा एक विचार पुढे आला. त्याविषयी दोन्ही बाजूकडील एकेका नेत्याच्या दररोज प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजितदादा विलिनीकरणाविषयी आग्रही होते, असे सांगण्यात येऊ लागले. तर, अजित पवार गटाच्या नेत्यांकडून विलिनीकरणाविषयी अजितदादांनी कोणतीच चर्चा केली नव्हती, असा दावा करण्यात येऊ लागला. त्यामुळे या प्रकरणात नेमकी कोणाची बाजू खरी, हे सामान्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना समजेनासे झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात एक लेख लिहिला. त्यात दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडेच जाणार होते, असा दावा केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी, अजित पवार हे स्वत: विलिनीकरणाची अधिकृत घोषणा १२ फेब्रुवारीला करणार होते, असा दावा याआधीच केला होता. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दररोज पुढे येत असल्याचे दिसते. विलिनीकरणाच्या चर्चेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली आहे. नाशिक येथे शनिवारी माध्यमांशी छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली. रोज विलिनीकरणाची चर्चा का होत आहे, हे आपणास कळत नसल्याचे त्यांनी सांगितले. विलिनीकरण आजही करता येईल. एक महिन्याने, दोन महिन्यांनी करता येईल. त्यासाठी घाई करण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विलिनीकरणाच्या विषयावर कोण काय म्हणाले, याविषयी मोघमपणे बोलण्यात काही अर्थ नाही. आता नवीन कॅप्टन त्यासंदर्भात काय ते बघतील. आमदारांची बैठक घेतील. हा म्हणतो, तो म्हणतो म्हणून घाई का करत आहात ? पक्ष संघटना सगळे मिळून तयार होते, पक्ष बनतो. पक्ष म्हणजे बोर्ड आहे का, ऑफिस आहे का, असे प्रश्न उपस्थित करीत भुजबळ यांनी काम करणारे कार्यकर्ते मिळून संघटना, पक्ष तयार होतो. ते सगळे बसून विचार करतील, असे सांगितले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर आता लवकरच आम्ही त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करणार आहोत. यानंतर पक्षातील प्रमुख लोक विलीनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी ज्या नेत्यांना बोलावतील त्यांच्याशी चर्चा होईल. आता नवीन कॅप्टन आल्या आहेत. त्यांना बसू द्या, काम समजून घेऊ द्या. मग काय करायचे ते बघू, असे मंत्री भुजबळ यांनी नमूद केले.