नवी मुंबई : यंदाच्या २९ महानगर पालिकांच्या निवडणूकीत सर्वाधिक वादग्रस्त राहीलेल्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत अखेर भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी चँलेंज दिल्याप्रमाणे भाजपला एकहाती सत्ता मिळवून देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा टांगा पलटी केला.
नवी मुंबईत भाजपाने ७२ जागा जिंकल्या तर शिंदेंची शिवसेना केवळ २८ जागां जिंकू शकल्या..
नवी मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार ताकद लावली होती. त्यातून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्धही झाले होते. एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला, तर गणेश नाईकांनीही त्याला प्रत्युत्तर देत शिंदेंना टांगा पलटीचे आव्हान दिलं होते.
एकनाथ शिंदे यांच्याकडे हरामाचा पैसा आहे, नवी मुंबईच्या विकासासाठी असलेल्या सिडकोच्या जमिनी त्यांनी विकल्या आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला. भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं तर शिंदेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांचा ‘टांगा पलटी, घोडे फरार’ करणार असं आव्हान गणेश नाईकांनी दिलं होतं. आता गणेश नाईकांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला आणि नवी मुंबईवर पुन्हा एकदा सत्ता काबीज केली.

महाराष्ट्रातील २९ महानगर पालिकांमध्ये घवघवित यश मिळविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देशातील सगळ्यांनीच कौतुक केले पण या एतिहासिक विजयानंतर घरी लेक दिविजाने अभिमानाने मारलेल्या या मिठीनंतर फडणवीसांच्या चेहऱ्यावरील अगणित आनंद शब्दात पकडणे कठीण आहे…
विरार :- विधानसभेत भाजपाकडून पत्कराव्या लागलेल्या नामुष्कीजनक पराभवाचा वचपा हितेंद्र ठाकूरांनी आज वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणूकीत काढला.बहुजन विकास आघाडीने एकूण ११५ जागांपैकी ७१ जागांवर विजय मिळवित एकहाती सत्ता काबीज केली. भाजपाने ४३ जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. उर्वरित पक्षांना एकही जागा मिळालेली नाही.
या विजयासह वसई–विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता कायम राहिली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपला गड यशस्वीपणे राखत पुन्हा एकदा पक्षाची ताकद सिद्ध केली आहे. अनेक प्रभागांमध्ये चारच्या पॅनलने विजय मिळवत बविआने वर्चस्व प्रस्थापित केले.
या निकालामुळे वसई–विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची राजकीय पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात महापालिकेच्या कारभारावर बविआचा ठसा अधिक ठळकपणे दिसणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विजयाकडे घोडदौड करीत असताना लालबाग परळने ठाकरे बंधूंना हात दिला. लालबाग-परळच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचाच भगवा फडकल्याचं पाहायला मिळाले. गिरणगावचा गड ठाकरे बंधूंनी राखला. गिरण गावातील सातपैकी सहा जागांवर ठाकरे बंधूंचा विजय झाला, तर एका जागेवर समाजवादी पक्षाचा विजय झाला. श्रद्धा जाधव, पेडणेकर, किरण तावडे यांच्यासह ठाकरे बंधूंच्या युतीच्या सहा उमेदवारांनी विजय मिळवला. मुंबई शिवसेनेची आणि शिवसेना मुंबईची ही बाळासाहेब ठाकरेंची टॅगलाईन असायची. यात उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवसेना ही ठाकरेंचीच हे दाखवून दिले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची, असाप्रश्न निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिला असला, तरी हा लढा सुप्रीम कोर्टात अद्यापही सुरु आहे. मात्र मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना पसंती दिल्याचे या निकालाने पाहायला मिळाले.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या २८ जागांच्या तुलनेत उद्धव ठाकरेंना दुप्पटीहून अधिक ६६ जागा मिळाल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीने ठाकरे समर्थक मतांची एकजूट झाली, तरीही एकनाथ शिंदेंनी वेगळी चूल मांडल्यामुळे मराठी मतांचे काही प्रमाणात विभाजन झाल्याचे बोलले जाते. मात्र तरीही भाजपनंतर ठाकरेंची शिवसेना ही मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ६६ आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २८ नगरसेवकांची मुंबईतील एकत्रित शिवसेनेची ९४ ही बेरीज भाजपापेक्षा अधिक आहे. मनसे आणि शिवसेना जशी एकत्र आली तशी भविष्यात ठाकरे बंधू आणि शिंदे एकत्र येतील का ? असा सवाल राजकीय वर्तुळात हलक्या आवाजात विचारला जात आहे.
मुंबईत २५ वर्षानंतर ठाकरेंची सत्ता संपुष्टात
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर दुरागामी परिणाम करणाऱ्या या २९ महानगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपा महायुतीने आपाला विजयी अश्व चौखुर उधळलाच पण मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेसह सत्ताही आणली. तब्बल २५ वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता भाजपाने संपुष्टात आणली तर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एकहाती सत्ता आणली. मुंबईत भाजपा तर ठाण्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना नंबर १ ठरली.
मुंबईत शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर होणाऱ्या या महानगर पालिकेच्या लढतीकडे अवघ्या देशाचे लक्ष होते. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २० वर्षातील आपले वाद मिठवित एकत्र येत ही निवडणूक लडवल्यामुळे लढत चुरशीची झाली. पक्ष आणि चिन्ह दोन्ही हिरावून घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी मुंबईत भाजपा महायुतीला चुरशीची लढत दिली. पुणे आणि पिंपरीत पवार घराण्याची वाताहत होत असताना त्यातुलनेत ठाकरेंनी मुंबईत आपला गड राखण्याचा कसोशिनेने प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ६६ तर मनसेने ६ जागां जिंकत कडवी झुंज देत भाजपाल एकहाती मुंबईची सत्ता घेण्यापासून ८८ जागांवर रोखले. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या २८ जागांमुळे मुंबईत आता भाजपाचा महापौर असेल.
मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जबर नुकसान सहन करावे लागले. २०१७ साली एकत्रित शिवसेनेकडे ८७ जागा होत्या. त्या तुलनेत पक्ष आणि चिन्ह आणि भाजपाची साथ असूनही एकनाथ शिंदे यांना फक्त २८ जागाच जिंकता आल्या. घराणेशाहीचा फटका शिंदेंना मुंबईत बसला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा आणि मुलगी. माजी खासदार राहुल शेवाळेंची वहीणी, खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी, आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा पराभूत झाला.
याउलट ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी एकहाती सत्ता आणत गेल्यावेळेपेक्षा अधिक नगरसेवक निवडूण आणले. ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे हे समिकरण या निवडणूकीमुळे पुन्हा एखदा दृड झाले.

स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकींच्या निकालानंतर महाराष्ट्रात आता फक्त एकच ब्रँड डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट असल्याचे आज सिध्द झाले. राज्यातील भाजप व महायुतीच्या विजयामागे फडणविसांचा विकासाचा अजेंडा आणि डबल इंजिन सरकारचा विश्वास असल्याचे निकालातून दिसून आले. “डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच आज महाराष्ट्राचा ब्रँड बनला आहे,”.
केवळ शहरी भागातीलच नव्हे तर ग्रामीण भागातही आलेले निकाल हे विकासावरचा पर्यायाने भाजपावरील विश्वास दर्शवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते, असा स्पष्ट कौल मतदारांनी या निकालाव्दारे दिला आहे. राज्यातील २९ महानगर पालिकात भाजपचे ५१ टक्क्यांहून अधिक उमेदवार विजयी झाले आहेत. भारतीय जनात पक्षाचा महाराष्ट्रातील आजवरचा हा सर्वाधिक भव्यदिव्य असा विजय आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासारके दिग्गज नेते भाजपाचे महाराष्ट्रात नेतृत्व करीत असतानाही विधानसभेपाठोपाठ नगरपंचायत आणि महानगर पालिकेत भाजपाला मिळालेले नाही.
मुंबईत भाजपाचा पहिल्यांदा महापौर बनणार आहे. भाजपा आणि एकुणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची तब्बल दोन पीढ्यांनी पाहिलेलेली स्वप्नपुर्ती त्यामुळे होणार आहे.
महानगर पालिकांच्या या निकालामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकाच निकालात राज्यातील अनेकांना निकालात काढले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या महाराष्ट्रातील राजकारणातील महत्व संपुष्टात आणले. मुंबईतून ठाकरेंच्या सत्तेला हादरा दिला. आणि हो महायुतीतील एकनाथ शिंदेंच्या महत्वकांक्षेलाही मुंबईतील निकालामुळे आळा घातला आहे. नाही म्हणायला शिंदेंनी ठाण्याचा गड राखला असला तरी खरी शिवसेना म्हणून स्वताला साबित करण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्रात भाजपापुढे या सगळ्यांचीच पिछेहाट झाली आहे.
पक्षाचे नाव आणि चिन्ह हिरावून घेतल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी ज्याप्रकारे महायुतीला लढत दिली त्याची दखलही इतिहास घेईलच. पण तुर्तास महाराष्ट्रात देवेंद्र नाम ही काफी है…. हेच खरे.
पक्ष भाजपा शिंदे ठाकरे मनसे काँग्रेस इतर
मुंबई ८८ २८ ६६ ६ २४ १३
२२७ ११६ ७२
ठाणे २८ ७१ १ ० ० ३१
१३१ ९९ १

स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकींच्या निकालानंतर महाराष्ट्रात आता फक्त एकच ब्रँड डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट असल्याचे आज सिध्द झाले. राज्यातील भाजप व महायुतीच्या विजयामागे फडणविसांचा विकासाचा अजेंडा आणि डबल इंजिन सरकारचा विश्वास असल्याचे निकालातून दिसून आले. “डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच आज महाराष्ट्राचा ब्रँड बनला आहे,”.
केवळ शहरी भागातीलच नव्हे तर ग्रामीण भागातही आलेले निकाल हे विकासावरचा पर्यायाने भाजपावरील विश्वास दर्शवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते, असा स्पष्ट कौल मतदारांनी या निकालाव्दारे दिला आहे. राज्यातील २९ महानगर पालिकात भाजपचे ५१ टक्क्यांहून अधिक उमेदवार विजयी झाले आहेत. भारतीय जनात पक्षाचा महाराष्ट्रातील आजवरचा हा सर्वाधिक भव्यदिव्य असा विजय आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासारके दिग्गज नेते भाजपाचे महाराष्ट्रात नेतृत्व करीत असतानाही विधानसभेपाठोपाठ नगरपंचायत आणि महानगर पालिकेत भाजपाला मिळालेले नाही.
मुंबईत भाजपाचा पहिल्यांदा महापौर बनणार आहे. भाजपा आणि एकुणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची तब्बल दोन पीढ्यांनी पाहिलेलेली स्वप्नपुर्ती त्यामुळे होणार आहे.
महानगर पालिकांच्या या निकालामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकाच निकालात राज्यातील अनेकांना निकालात काढले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या महाराष्ट्रातील राजकारणातील महत्व संपुष्टात आणले. मुंबईतून ठाकरेंच्या सत्तेला हादरा दिला. आणि हो महायुतीतील एकनाथ शिंदेंच्या महत्वकांक्षेलाही मुंबईतील निकालामुळे आळा घातला आहे. नाही म्हणायला शिंदेंनी ठाण्याचा गड राखला असला तरी खरी शिवसेना म्हणून स्वताला साबित करण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्रात भाजपापुढे या सगळ्यांचीच पिछेहाट झाली आहे.
पक्षाचे नाव आणि चिन्ह हिरावून घेतल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी ज्याप्रकारे महायुतीला लढत दिली त्याची दखलही इतिहास घेईलच. पण तुर्तास महाराष्ट्रात देवेंद्र नाम ही काफी है…. हेच खरे.
सर्वद फाउंडेशन आयोजित
‘सर्वद स्टार पुरस्कार’ २०२६
मुंबई: सर्वद फाऊंडेशनच्या वतीने सर्वद स्टार पुरस्कार २०२६ दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख २१ मार्च २०२६ आहे. पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत होणार आहे. विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थीना नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. शिक्षण विभाग, शिक्षक, प्राध्यापक, खेळ, कला, चित्रपट, सामाजिक कार्य, इतिहास, वित्त, प्रेस, मीडिया, वैद्यकीय, व्यवसाय, संशोधन, समाजसेवक,कवी, लेखक, कलाकार, चित्रकार, पर्यटन, प्रशासकीय सेवा, संगीत यापैकी किंवा इतर क्षेत्रातील मान्यवर आपले नामांकन पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी ८६५२५६१८६७ किंवा ८६५५९ २०५७१ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच आपला प्रस्ताव मजकूर लिहून पाठवावा. पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती डॉ. सुचिता पाटील आणि ओंकार देशमुख संचालक, सर्वद फाउंडेशन यांनी कळवले आहे.
