27 Feb Bitambatmi All pages

Open Book

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ मराठी भाषा गौरवदिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील मराठी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहीनीच्या संपादकांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

मुंबई   :  मुंबई महानगर प्रदेशाची उपकंपनी असलेल्या बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक बेस्टच्या बसेस शहरातील रस्त्यांवर धावताना आणि सरासरी मुंबईकरांची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या बसेसची संख्या आता केवळ २४९ वर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात याची पुष्टी केली.

यावरून हे स्पष्ट होते की बेस्ट स्वतःच्या बसेस पेक्षा भाड्याने घेतलेल्या बसेसवर अधिक अवलंबून आहे. विलेपार्लेचे आमदार पराग अळवाणी आणि अंधेरी पश्चिमेचे आमदार अमित साटम यांच्यासह अनेक आमदारांनी बेस्टच्या मालकीच्या बसेसमध्ये सातत्याने कपात करण्याबाबत सरकारकडून उत्तर मागितले होते. जानेवारी २०२६ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात फक्त २४९ बसेस का राहिल्या असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला.

भारताचा झिम्बाब्वेवर ७२ धावांनी दणदणीत विजय

चेन्नई : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६च्या सुपर ८ फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. प्रथम फलंदाजी करत भारताने २० षटकांत ४ बाद २५६ धावांचा प्रचंड डोंगर उभारला आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला १८४ धावांपर्यंतच मजल मारता आली. पण त्याचबरोबर भारताचा पुढचा सामना हा वेस्ट इंडिज संघाबरोबर आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा आजचा विजय हा भारतीय संघासाठी नक्कीच आत्मविश्वास देणारा ठरलाय हे नक्की. भारताच्या या विजयानंतर सोशलमीडियावर मात्र बचेंगे तो और भी लढेंगे हा टॅग व्हायरल झाला होता.

टॉस जिंकून झिम्बाब्वेने गोलंदाजी स्वीकारलीमात्र भारतीय फलंदाज सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडले. अभिषेक शर्माने २६ चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावत डावाला वेग दिलातर हार्दिक पांड्याने २३ चेंडूत ५० धावा करत शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला. तिलक वर्मा १६ चेंडूत नाबाद ४४ धावा करत अखेरपर्यंत ठाम उभा राहिला. पॉवरप्लेमध्येच मोठी धावसंख्या उभी राहिल्याने झिम्बाब्वेवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण झाला आणि भारताने स्पर्धेतील अव्वल धावसंख्यांपैकी एक नोंदवली.

२५७ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात सावध झालीमात्र ब्रायन बेनेटने आक्रमक खेळी करत भारतीय गोलंदाजांना काही काळ ताण दिला. त्याने फटकेबाजी करत डाव शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. १८व्या षटकात हार्दिक पांड्याने अचूक यॉर्कर आणि नियंत्रित मारा करत केवळ ९ धावा दिल्या. १९व्या षटकात अर्शदीप सिंगने निर्णायक झटका देत टोनी मुनयोंगा याला अचूक यॉर्करवर ११ धावांवर बाद केले. त्या षटकात फक्त ३ धावा आणि एक बळी मिळाल्याने झिम्बाब्वेची आशा संपुष्टात आली. १९ षटकांनंतर झिम्बाब्वेची धावसंख्या १६४/५ अशी झाली होती.

अखेरचे षटक शिवम दुबेने टाकले. त्या वेळी बेनेट ८६ धावांवर खेळत होता आणि शतकाच्या उंबरठ्यावर उभा होता. पहिल्याच चेंडूवर त्याने एकेरी घेतली. पुढील चेंडू नो-बॉल ठरला आणि फ्री-हिटवर ताशिंगा मुसेकिवाने षटकार ठोकलामात्र लगेचच लाँग-ऑनवर संजू सॅमसनने घेतलेल्या अप्रतिम झेलामुळे मुसेकिवा ७ धावांवर बाद झाला. बेनेटने त्यानंतर षटकार आणि चौकार ठोकत शतकाच्या दिशेने झेप घेतलीपण तो ५९ चेंडूत ९७ धावांवर नाबाद राहिला. अखेरच्या षटकात २० धावा मिळाल्यातरी सामना भारताने ७२ धावांनी जिंकला.

फलंदाजांची आक्रमकता आणि गोलंदाजांची अचूकता यांचा उत्तम संगम साधत भारताने हा सामना एकतर्फी केला. ब्रायन बेनेटची ९७ धावांची झुंजार खेळी उल्लेखनीय ठरलीमात्र भारताच्या सर्वांगिण आणि शिस्तबद्ध कामगिरीपुढे ती अपुरी पडली.

नवी दिल्ली : “आजच्या भारतात शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवणे हा सर्वात मोठा ‘गुन्हा’ बनला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला अशा दिशेने ढकलले जात आहे, जिथे प्रश्न विचारणे हा कट मानला जातो आणि मतभेद व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह, मोदीजी हा उत्तर कोरिया नाही जेते हुकुमशाही आहे. हा भारत आहे. “

अशा तीव्र शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्लीत एआय समिटमध्ये युवक काँग्रेसच्या आंदोलकांविरोधात गुन्हे नोंदवल्यानंतर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.  राहुल गांधी यांनी थेट इशारा दिला आहे की, संवैधानिक मार्गाने आवाज उठवणाऱ्यांना आज तुरुंगवास आणि खटल्यांना सामोरे जावे लागत आहे. एका “तडजोड केलेल्या” पंतप्रधानांच्या राजवटीत जनतेची गैरसोय टाळण्यासाठी न्यायाची मागणी फेटाळून लावली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तरुणांपासून कुस्तीगीरांपर्यंत, सर्वांचाच आवाज दाबला!

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना विविध आंदोलनांचा उल्लेख केला आणि सरकारकडून होणाऱ्या दडपशाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये काही प्रमुख घटनांचा दाखला देत सरकारला धारेवर धरले. राहुल यांनी म्हटलं आहे की, भविष्याची चिंता करणाऱ्या तरुणांनी जेव्हा पेपर लीक प्रकरणावर आवाज उठवला, तेव्हा त्यांना न्यायाऐवजी पोलिसांच्या लाठ्या मिळाल्या. देशाची शान असलेल्या महिला कुस्तीगीरांनी जेव्हा भाजपच्या एका प्रभावी नेत्याविरुद्ध गंभीर आरोपांची चौकशी मागितली, तेव्हा त्यांना न्याय देण्याऐवजी आंदोलनाला बदनाम करण्यात आले आणि त्यांना रस्त्यावरून ओढत नेले गेले.

‘प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का?’

आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना ‘राष्ट्रविरोधी’ ठरवण्यात आले. संवादाऐवजी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या, रबर गोळ्या आणि पाण्याचा मारा करण्यात आला. राहुल गांधी यांनी आदिवासींचे प्रश्न, पर्यावरणीय समस्या आणि युथ काँग्रेसच्या आंदोलनाचाही उल्लेख केला. “जेव्हा आदिवासी जमीन आणि जंगलासाठी लढतात, तेव्हा त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. जेव्हा लोक प्रदूषणाविरुद्ध बोलतात, तेव्हा त्याला ‘राजकारण’ ठरवून दाबले जाते. ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे जिथे पंतप्रधान प्रश्नांना घाबरतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नवी दिल्ली :  उद्योगपती अनिल अंबानी यांचा अजून एक फ्रॉड उघडकीस आला आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन विरोधात सीबीआयनं आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. शासकीय बँक व्यवहारांमध्ये २ हजार २२० कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल हा गुन्हा दाखल  झाला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आज दिवसभर अनिल अंबानींची ईडी कडून चौकशी करण्यात आली आहे. सायंकाळी उशीरा त्यांना चौकशीनंतर सोडण्यात आले.

कालच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. त्यांचे मुंबईतील आलिशान निवासस्थान “अ‍ॅबोड” जप्त केले आहे. अधिकाऱ्यांच्या मतेही मालमत्ता अंदाजे ३७१६.८३ कोटींची आहे.

ही कारवाई मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत करण्यात आली. ईडीने या संदर्भात तात्पुरते जप्तीचे आदेश जारी केले आहेत. सूत्रांच्या मतेहा आदेश अलीकडेच जारी करण्यात आला आहे. हा खटला अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) शी संबंधित एका कथित बँक फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. अ‍ॅबोड पाली हिलमध्ये आहे. “अ‍ॅबोड” नावाची ही आलिशान इमारत मुंबईच्या पाली हिल परिसरात आहे. 

नवी दिल्ली : भारताचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) इस्रायलमध्येही सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय इस्रायल दौऱ्यात हा करार करण्यात आला आहे. या दौऱ्यात भारत आणि इस्रायलदरम्यान अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले.

हा करार भारताच्या डिजिटल व्यवहार क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार, भारतीय नागरिक आणि व्यापाऱ्यांना आता इस्रायलमध्येही UPI च्या माध्यमातून डिजिटल व्यवहार करता येणार आहेत. त्यामुळे भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणालीला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी बळ मिळणार आहे.

UPI इस्रायलमध्ये कार्यान्वित झाल्यामुळे व्यवसायशिक्षण आणि पर्यटनासाठी इस्रायलला वारंवार जाणाऱ्या भारतीय नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापुढे त्यांना दैनंदिन व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन, महागड्या कार्ड शुल्कांवर किंवा रोख रकमेवर अवलंबून राहावे लागणार नाही. केवळ मोबाईलच्या माध्यमातून काही सेकंदांत सुरक्षित आणि सोपे पेमेंट करणे शक्य होणार आहे.

मुंबई : आजचा प्रसंग माझ्यासाठी वेदना आहे, हा क्षण माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणारा आहे. मी पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. समाजातील कोणत्याही घटकाला

वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय  अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं त्यावेळी त्या बोलत होत्या.

आपल्या सर्वांचे लाडके नेते अजित दादा यांच्या अकाली जाण्याच्या अपार दुःखातून आपण अजूनही सावरलो नाहीत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी झाली असून ती भरून निघण्यासारख नाही, असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पहिलंच भाषण केलं. यावेळी, त्यांचा कंठ दाटला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार असून समाजातील कोणत्याही घटकाला मी वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हणत सुनेत्रा पवार  यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन आपण पुढे  जाणार असल्याचे स्पष्ट केले.

अजित दादांना आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहिल्याचे मी पाहिलं. त्यांच स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही, आपण सर्वजण ते पूर्ण करणार आहोत. समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही. सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष आहे, म्हणूनच काम करतच आहे. पुन्हा एकदा आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे. आता शहरात देखील पक्षाचा विस्तार करायचा आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांना पक्षबळकटीला प्रोत्साहन देणारं भाषण सुनेत्रा पवार यांनी केलं.

मुंबई : राष्ट्रवादी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रफुल्ल पटेल दावा करणार अशी चर्चा सुरु झाली असतानाच आज पक्षाच्या विशेष राष्ट्रीय अधिवेशनात स्वता प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदी सुचविले. आणि सर्वानुमते हात उंचावून त्याला अनुमोदन देण्यात आले.

मराठमोळ्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष कुणीही चालतील पण तो पटेल नको अशी जाहीर टिप्पणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यामुळे या वादाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभुमीवर पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्या सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली.

या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीस राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, रुपाली चाकणकर छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

क्रुरकर्मा हुकुमशहा अडॉल्फ हिटलरच्या छळछावण्यात नरसंहार केल्या गेलेल्या लाखो ज्यु समाजाच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या याद वाशेम’ म्हणजेच  जागतिक होलोकॉस्ट स्मृती केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी पुष्पचक्र अर्पण करीत सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी इस्त्रालयचे पंतप्रधान नेतान्याहू मोदीं सोबत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *