27 July Bitambatmi All pages

Open Book

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग.११७, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विक्रोळी विधानसभा आणि प्रेरणा शिक्षण सहाय्यक संस्था यांच्या तर्फे १० वी, १२ वी आणि पदवी परीक्षेत उत्कृष्ठ गुण संपादन करून उत्तीर्ण झालेल्या यशवंत गुणवंत कांजूरमार्ग- भांडूप- विक्रोळीकर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्व उपनगर उपशहरअध्यक्ष योगेश सावंत, विभागअध्यक्ष विश्वजित ढोलम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कै विमल मेहेरा व अशा मेहेरा यांच्या स्मरणार्थ व कॉलिटी फ्रुट्स वाशी नागेश सिद्धाप्पा नवलगुंड व सुपरडोन इलेक्ट्रिकल्स प्रा लि भावेश शाहा दिलीप प्रशांद व धनवंत शहा, दादर ह्यांच्या सहकार्याने सदर उपक्रमाला विभागातील सुमारे ४५० विद्यार्थ्यांचा बॅग आणि प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग.११७ चे शाखाअध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभागअध्यक्ष ॲड. प्रथमेश कृष्णा धुरी आणि प्रेरणा शिक्षण सहाय्यक संस्था संस्थापक/अध्यक्ष उमेश मोरे यांनी केले होते.

अविनाश उबाळे
ठाणे : मुंबई व ठाणे महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. शहापुर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात प्रचंड पर्जन्यवृष्टी सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत १३७.६६ मीटर एवढी वाढ झाली आहे.असून भातसा धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात सततच्या पडणा-या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य येवा देखील वाढत आहे.त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी,जलाशय परीचलन सुचीनुसार नियमित करणेसाठी, शनिवारी दुपारी १.०० वाजता भातसा धरणाचे पाच वक्रद्वारे ०.२५ मीटर ने उघडण्यात आले आहेत. परिणामस्वरूप भातसा धरणातून नदीमध्ये ८६.७६५ क्युमेक्स (३०६४.१०६ क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग प्रवाहीत झाला आहे.
धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उघडण्यात आले असून १२४६.२६ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील तानसा,मोडकसागर,पाठोपाठ भातसा हे धरण देखील आता तुडुंब भरले आहे. शनिवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे तातडीने उघडले असून भातसा नदी किनाऱ्या लगतच्या साजीवली,सरलांबे ,तुते ,सावरशेत,सापगाव, खुटघर ,खुटाडी अशा अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.यासंदर्भात शहापूर तहसीलदार यांना लेखी कळविण्यात आले आहे.असे जलसंपदा विभागाच्या भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अभियंता गणेश कचरे व सहाय्यक अभियंता शाम हंबीर यांनी मााहिती देेेताना सांंगितले.मुंबईला पाणी पुरवठा करण्याची महत्वाची जबाबदारी भातसा धरणावर आहे.प्रतिदीन  २००० एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते. या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९  मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६ .१० दशलक्षघनमिटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चोरस किलोमिटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तिर कालवा ६७ किलोमिटर आहे. तर डावा कालवा ५० किलोमिटर आहे.भातसाधरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राव्दारे १५ मेगावॅट एवढी विजनिर्मिती केली जाते शनिवारी भातसा धरण भरल्यानंतर जलपूूूजन करण्यात आले.
०००००

अनिल ठाणेकर
ठाणे: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी येऊर अभ्यासिका आणि ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी व ठाणे स्टेशन कम्प्युटर क्लासेस येथून  दिंडी काढण्यात आली. यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मोठÎा उत्साहात पारंपारिक वेशात दिंडी सोहळा साजरा केला.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे ठाण्यातील अभ्यासिकांमधून विविध धार्मिक सण मोठÎा उत्साहात साजरे केले जातात. यंदाही येऊर अभ्यासिका आणि ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी व ठाणे स्टेशन कम्प्युटर क्लासेस,  डम्पिंग अभ्यासिका, लोकमान्य नगर अभ्यासिका, घोलाई नगर अभ्यासिका, दिघा अभ्यासिका, दिवा अभ्यासिका, मापानपाडा अभ्यासिका, भोलानगर अभ्यासिका, मुंब्रा अभ्यासिका येथून  दिंडी काढण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम “जय हरी विठ्ठल“ आणि “पांडुरंग हरी“ यांच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संतांचे विचार, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 वारकरी परंपरेतून पर्यावरण संवर्धनाचा जागर
सुनिल इंगळे
उल्हासनगर :आषाढी एकादशीच्या निमित्ताने एसएसटी महाविद्यालयाने आपल्या स्थापनेपासून सातत्याने जोपासलेली वृक्षदिंडी यंदाही भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि निसर्गसंवर्धनाचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी, नागरिक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदाच्या वृक्षदिंडीस विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब क्षिरसागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत पोलीस अधिकारी व कर्मचारीही या जनजागृतीपर उपक्रमात सहभागी झाले.
महाविद्यालयाच्या संजीवनी सांस्कृतिक समिती, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), ग्रीन क्लब आणि डीएलएलई विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणींच्या प्रतिमेच्या पूजन व आरतीने झाली. त्यानंतर महाविद्यालयातून निघालेली वृक्षदिंडी नेताजी चौक व व्हीनस चौक मार्गे पुन्हा महाविद्यालयात दाखल झाली. मार्गभर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा जयघोष, टाळ-मृदंग, लेझीम आणि अभंगांनी परिसर भक्तिमय झाला. विद्यार्थ्यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’ या संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा जागर करत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि ‘हरित पर्यावरण, सुरक्षित भविष्य’ असे संदेश देत जनजागृती केली.
यानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. दिंडी पूर्ण झाल्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून दरवर्षी आयोजित केली जाणारी ही वृक्षदिंडी आज एसएसटी महाविद्यालयाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख बनली असून, शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी, भारतीय संस्कृतीची जपणूक आणि पर्यावरण संवर्धनाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा हा उपक्रम उल्हासनगर परिसरात प्रेरणादायी ठरत आहे.
०००००

– स्वयंसेवक आणि पोलिस प्रशासनाला सॅल्युट
पंढरपूर- “माऊली माऊलीच्या जयघोषात पंढरपूर दुमदुमले आहे. अक्षरशः लाखो भक्तांचा महासागर पाहून मन तृप्त झाले. पंढरपूरचा शिवाजी चौक ते  विठ्ठल मंदिर आणि चंद्रभागा नदीला आलेला भक्तांचा महापूर ओलांडताना आणि असंख्य भक्तांच्या लाटा अंगावर झेलताना आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आणि आनंद मिळाला. दिनदुबळे, कष्टकरी विठ्ठलाचरणी लीन होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले २० ते २५ लाख भाविक, दर्शनासाठी १५ ते २० किलोमीटर लांबच्या लांब लागलेल्या रांगा पाहून भक्तांच्या सहनशीलतेला आणि श्रद्धेला सलाम करायला हवा. मी जगभर फिरतो; नुकताच अमेरिकेत जाऊन अर्जेंटिना-स्पेन फुटबॉल अंतिम लढतच्या सामन्याचा सहपरिवार आनंद घेतला. तेथून १७ ते १८ तास प्रवास करून आल्यानंतर तातडीने पंढरपूर गाढले. कारण १९९७ पासून मी आषाढी एकादशीची वारी न चुकता दरवर्षी करतो. कोविडचा अपवाद वगळता माझ्या पंढरपूर वारीला २५ वर्षे झाली. त्यामुळे वारीतील भक्तांच्या चेहऱ्यावरील तो निरागस आनंद, सुख पाहून मला अभिमानाने म्हणावेसे वाटते, माझ्या पंढरीची वारी जगात भारी,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत शनिवारी विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर म्हणाले. ते पुढे म्हणाले, “वारीतील भक्तांचा कमालीचा शिस्तबद्धपणा, कुठलाही त्रागा न करता मिळेल त्या रस्त्याने हरिनामात तल्लीन झालेले भाविक, दर्शनासाठी जाताना जागा मिळेल तिथे तंबू ठोकलेले भाविक, तहानभूक विसरून माऊली माऊलीचा जयघोष करणारे वारकरी पाहून महाराष्ट्रात, संतांच्या भूमीत जन्माला आल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आषाढी एकादशी वारी हे महत्त्वाचे जणू वैभव आहे. तसेच लाखोंच्या गर्दीला आवरण्यासाठी स्वयंसेवक आणि पोलिस प्रशासन यांच्या कामगिरीला सॅल्युट करावासा वाटतो.”
शुक्रवारी महेंद्रशेठ घरत यांनी कांबे-रसायनी येथून पंढरपूर येथे दाखल झालेल्या दिंडीत सहभागी होऊन वारकरी यांच्यासोबत महाप्रसाद घेतला. यावेळी युवा अध्यक्ष निखिल ढवळे उपस्थित होते, तर शनिवारी चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तांच्या महासागरात महेंद्रशेठ घरत डुंबले. त्यानंतर त्यांनी तरघर, उलवे येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रासादिक भजन मंडळाच्या दिंडीला भेट दिली. यावेळी मनोहर ओवळेकर, उत्तम कोळी आणि वारकरी बंधूंनी महेंद्रशेठ घरत आणि गुलाबशेठ घरत यांचे स्वागत केले.

अनिल ठाणेकर
ठाणे, आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सोयीचा आणि सुरक्षित व्हावा, यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या विशेष प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या (TOD Special Trains) चालवण्याचा निर्णय घेण्यासोबतच सावंतवाडी रोड (SWV) स्थानकावर ३ प्रमुख लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नियमित थांबा (Experimental Stoppage) मंजूर केला आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
कोकणातील प्रवाशांची, पर्यटकांची आणि चाकरमान्यांची गर्दी व होणारी गैरसोय लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्यांण यांची भेट घेऊन विशेष गाड्यांची मागणी केली होती.
१. सावंतवाडी रोड (SWV) स्थानकावर नियमित मंजूर झालेले नवीन थांबे, कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे जारी केलेल्या सूचनेनुसार सावंतवाडी स्थानकावर खालील गाड्यांना थांबा मंजूर झाला आहे. (KR/CO/O/NOTI/२०२6-२७  date – २4 July २०२6): CSMT – मंगळुरू – CSMT एक्स्प्रेस  (Daily): गाडी क्र. १२१३३ (CSMT ते MAJN): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — सकाळी ०७:०२ / ०७:०४ (दिनांक २६ जुलै २०२६ पासून लागू). गाडी क्र. १२१३४ (MAJN ते CSMT): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — रात्री २३:३० / २३:३२ (दिनांक २७ जुलै २०२६ पासून लागू). हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम ‘राजधानी’ एक्स्प्रेस (Tri-Weekly): गाडी क्र. १२४३२ (NZM ते TVC): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — सकाळी ०६:१८ / ०६:२० (दिनांक २६ जुलै २०२६ पासून लागू). गाडी क्र. १२४३१ (TVC ते NZM): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — सकाळी ०९:४४ / ०९:४६ (दिनांक २८ जुलै २०२६ पासून लागू).लोकमान्य टिळक टर्मिनस – त्रिवेंद्रम ‘गरीब रथ’ एक्स्प्रेस (Bi-Weekly): गाडी क्र. १२२०१ (LTT ते TVCN): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — पहाटे ०२:०२ / ०२:०४ (दिनांक २७ जुलै २०२६ पासून लागू). गाडी क्र. १२२०२ (TVCN ते LTT): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — पहाटे ०३:२८ / ०३:३० (दिनांक ३० जुलै २०२६ पासून लागू).२. गणेशोत्सव २०२६ विशेष गाड्यांचे वेळापत्रक:मध्य रेल्वेने ११ सप्टेंबर २०२६ पासून खालील विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे (Railway Letter No.T.3२२/X-१२/Ganpati Specials/२०२6 date – २4 July २०२6):CSMT – सावंतवाडी – CSMT (दैनिक स्पेशल). ट्रेन क्रमांक: ०११०3 / ०११०4.फेऱ्या व कालावधी: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ (एकूण १६ फेऱ्या). वेळ: CSMT वरून निघणार: १५:३० | सावंतवाडी आगमन: ०४:०० (दुसऱ्या दिवशी).प्रमुख थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ.LTT – सावंतवाडी – LTT (दैनिक स्पेशल).ट्रेन क्रमांक: ०११७१ / ०११७२. फेऱ्या व कालावधी: ११ ते २८ सप्टेंबर २०२६ (एकूण १७ फेऱ्या).वेळ: LTT (लोकमान्य टिळक टर्मिनस) वरून निघणार: ०८:२० | सावंतवाडी आगमन: २१:०० प्रमुख थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली.दिवा – खेड – दिवा (MEMU – दैनिक). ट्रेन क्रमांक: ०११५५ / ०११५6.फेऱ्या व कालावधी: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ (एकूण १६ फेऱ्या). वेळ: दिवा वरून निघणार: ०७:१५ | खेड आगमन: १४:३५. प्रमुख थांबे: निळजे, तळोजा, कलंबोली, पनवेल, पेन, माणगाव.LTT – मडगाव / रत्नागिरी / सावंतवाडी. ट्रेन क्रमांक: ०११6५ / ०११८५. फेऱ्या व कालावधी: साप्ताहिक व द्विसाप्ताहिक फेऱ्या. वेळ: विशेष वेळेनुसार.प्रमुख थांबे: ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, थिविम.पुणे – रत्नागिरी – पुणे (साप्ताहिक स्पेशल).ट्रेन क्रमांक: ०१44५ / ०१44७. फेऱ्या व कालावधी: १२ ते २६ सप्टेंबर २०२६ (विशेष फेऱ्या).वेळ: पुणे वरून निघणार: ००:२५ (मध्यरात्री) | रत्नागिरी आगमन: ११:५०. प्रमुख थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल.दिवा – चिपळूण – दिवा
· ट्रेन क्रमांक: ०११33 / ०११34. फेऱ्या व कालावधी: ११ ते २८ सप्टेंबर २०२६ (एकूण १५ फेऱ्या). वेळ: दिवा वरून निघणार: १३:४० | चिपळूण आगमन: २१:३०.प्रमुख थांबे: पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड.चाकरमान्यांना व स्थानिकांना होणारे फायदे:
सोयीस्कर प्रवास: ठाणे, दिवा, कल्याण, पुणे आणि मुंबई उपनगरांतील लाखो कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी गावी जाणे सुलभ होईल.
तिकिटांच्या टंचाईपासून मुक्ती: अतिरिक्त गाड्यांमुळे ऐनवेळी होणारी धावपळ व तिकिटांची टंचाई दूर होईल.
MEMU व नवीन थांब्यांचा दिलासा: MEMU गाड्यांमुळे स्थानिक प्रवाशांची सोय होईल, तर सावंतवाडी स्थानकावरील नवीन थांब्यांमुळे सिंधुदुर्ग, सावंतवाडी व परिसरातील पर्यटक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
“गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि वेळेत व्हावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो. कोकणवासीयांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी मान्य केल्याबद्दल आणि तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल आम्ही माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री अश्विनी वैष्णव जी यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”
— खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार नरेश गणपत म्हस्के
००००

 महावितरण अधिकार्यांना दिले निवेदन
कल्याण : कल्याण नजीक मोहनेसह आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक राहुल कोट यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. परिसरातील वीज वाहिन्यांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांना वारंवारच्या वीज समस्येतून दिलासा मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रभाग क्र. ०४ अंतर्गत मोहने, शनिवार पाटील नगर, यादवनगर, जेतवननगर, फुलेनगर, गाळेगाव, शिवसृष्टी तसेच आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना प्रचंड सनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसातून अनेक वेळा रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
पावसाळ्याच्या काळात ही समस्या अधिक गंभीर होत असून, मुख्य वीजवाहिन्या, जंपर, इन्सुलेटर तसेच इतर विद्युत यंत्रणांची वेळेवर तपासणी व प्रतिबंधात्मक देखभाल होत नसल्यामुळे वारंवार बिघाड होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पुढील आठवड्यात हवामान अनुकूल होताच दोन स्वतंत्र तांत्रिक पथके नियुक्त करून पॉवर हाऊस ते मोहने, आर. ‘स. गाळेगाव तसेच शिवसृष्टी ते आंबिवली रेल्वे स्टेशनपर्यंत संपूर्ण मुख्य वीज वाहिन्यांचे पेट्रोलिंग, जंपर तपासणी, नाडांच्या फांद्या छाटणे, सैल जोडण्या दुरुस्त करणे व आवश्यक ती प्रतिबंधात्मक देखभाल तातडीने करण्यात यावी.
हे काम तातडीने पूर्ण करून वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यावा. अन्यथा नागरिकांच्या वाढत्या संतापाची व गैरसोयीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील असा इशारा नगरसेवक राहुल कोट यांनी दिला आहे.
००००

मंुबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने चेंबूर जिमखाना येथे सुरु असलेल्या चेंबूर जिमखाना ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या उप उपांत्य फेरीत मुंबईच्या राहुल सोलंकीने मुंबईच्या ओंकार टिळकला २५-५, १९-१४ असे सहज हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे ठाण्याच्या पंकज पवारने ठाण्याच्या झैद अहमद फारुकीवर पहिला सेट २१-२२ असा गमावूनही दुसरा व तिसरा सेट १७-१२ व २५-० असा जिंकून उपांत्य फेरी गाठली. महिला एकेरीच्या उप उपांत्य लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या सोनाली कुमारीला ४-२३, २५-१० व २२-११ असे तीन सेटच्या झुंजीनंतर पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. तर दुसऱ्या उप उपांत्य लढतीत ठाण्याच्या मधुरा देवळेने ठाण्याच्या चैताली सुवारेला २१-१६, २१-१० असे सरळ दोन सेटमध्ये चीत करून आगेकूच केली.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे.
संजय मांडे ( ठाणे ) वि वि कुणाल राऊत ( ठाणे ) २३-१६, १४-१३
प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि महम्मद घुफ्रान ( मुंबई ) २४-१४, १६-२
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे.
प्राजक्ता नारायणकर ( मुंबई ) वि वि श्रुती सोनावणे ( पालघर ) २५-३, १९-१८
मैत्रीयी गोगटे ( मुंबई ) वि वि केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) २३-१९, १६-२५ व २५-६
००००००००००

 अमित ठाकरे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ
मुंबई, दि. २6 जुलै -महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक ११७ आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, विक्रोळी विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील सुमारे १,००० शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग ११७ चे शाखाध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विक्रोळी विधानसभा विभागाध्यक्ष ॲड. प्रथमेश कृष्णा धुरी आणि प्रेरणा शिक्षण सहाय्यक संस्थेचे संस्थापक उमेश मोरे यांनी केले होते. या कार्यक्रमाला विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील (भाऊ) राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले.
हा उपक्रम कै. विमल मेहेरा व कै. आशा मेहेरा यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला. तसेच कॉलिटी फ्रुट्स, वाशीचे नागेश सिद्धाप्पा नवलगुंड, सुपरडोन इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे भावेश शहा (अंधेरी), दिलीप प्रशांद (अंधेरी) आणि धनवंत शहा (दादर) यांच्या सहकार्यामुळे हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करून उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले, तर आयोजकांनी भविष्यातही अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *