14 April Bitambatmi All pages

Open Book
एक अजरामर “आशा”
राजेंद्र हुंजे
आशा भोसले यांचा प्रवास म्हणजे फक्त यशाची कहाणी नाही…
तो संघर्षातून उभं राहण्याचा, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि प्रत्येक वेदनेला सुरांत रूपांतरित करण्याचा प्रवास आहे.
त्यांच्या प्रत्येक गाण्यात त्यांचं आयुष्य दडलेलं आहे…
प्रत्येक शब्दात एक अनुभव, प्रत्येक सुरात एक भावना…
म्हणूनच, त्या केवळ गायिका नाहीत… त्या एक भावना आहेत… एक युग आहेत… एक “आशा” आहेत. मराठी आणि हिंदी संगीतविश्वात अनेक आवाज आले, अनेक गेले… पण काही स्वर असे असतात, जे काळाच्या पलीकडे जाऊन इतिहासात कोरले जातात. आशा भोसले हे नाव म्हणजे असा एक स्वर, जो केवळ गात नाही, तर आयुष्य जगतो, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद आणि प्रत्येक संघर्ष आपल्या सुरांत साठवतो.
कधी हसवणारा, कधी एकटेपणात साथ देणारा असा एक स्वर… तब्बल सात दशकं आपल्या सोबत राहिला. आज तो स्वर कायमचा शांत झाला आहे. हजारो गाण्यांमधून आत्मा ओतणाऱ्या त्यांच्या ९२ वर्षांच्या अद्भुत प्रवासाची आज स्मृतींच्या खिडकीतून उजळणी होते आहे.
८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशाजी या पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या लाडक्या कन्या. संगीताला ईश्वर मानणाऱ्या घरातून त्यांची वाटचाल सुरू झाली. अवघ्या दहा वर्षांच्या वयात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून सुरू झालेला प्रवास, हा संघर्ष आणि यश यांची अनकथित कहाणी ठरला. १९४८ मध्ये ‘सावन आया’ या पहिल्या एकल गाण्याने स्वरांची पहिली चाहूल दिली आणि ‘रात की रानी’सारख्या चित्रपटांतून त्यांचा आवाज घुमू लागला. कोणाला ठाऊक होतं की, हा एक असा युगप्रवर्तक आरंभ आहे, जो शतकानुशतकं अमर राहील.
पिढ्या बदलल्या, संगीताची शैली बदलली… पण आशाजींचा स्वर कधीच फिका पडला नाही. आज संगीतविश्वातील एक सुवर्ण अध्याय संपला आहे, पण त्यांच्या आवाजाची परंपरा आपल्या हृदयात सदैव जिवंत राहील.
आशाताई, तुमच्या हातच्या मटार पोह्यांना मी कायमचा पोरका झालो…या पोस्टसोबत जोडलेल्या फोटोत मी थोडा तुमच्यापासून अंतर ठेवून उभा राहून फोटो घेत होतो…त्यातही आईसारख्या मायेने तुम्ही माझा हात पकडून स्वतःकडे ओढलं…आणि लाजतो काय म्हणत हा फोटो काढलात तोही तुमच्या कॅमेऱ्यात….😭😭😭
आणि त्याचक्षणी माझ्या आईला फोन लावयला सांगितला…त्यावर तुम्ही मी किती अवखळ, खट्याळ, मस्तीखोर आहे याचा पाढा वाचत, तुम्हाला मी घरी येऊन किती त्रास देतो, या सगळ्या तक्रारींची आईकडे जणू सरबत्तीच केली. तेवढं सगळं सांगून झाल्यावर…तुमच्यातल्या मिश्किल स्वभावाप्रमाणे असं काही नाही हं!!! तुमचा मुलगा फारच गुणी आहे, असं म्हणून आईला माझ्या शाबासकीचं प्रशस्तीपत्र दिलंत….हा क्षण मी माझ्या हृदयाच्या कुपीत कस्तुरीसारखा जपून ठेवलाय…काल पासून लिहिण्याचा प्रयत्न करतोय, पण लेखणी धजावत नव्हती…
आशाताई, तुम्ही अमर आहात तुमच्या स्वरांमधून…
आशाताईंची मी घेतलेली एक मुलाखत संध्याकाळी इथेच पोस्ट करणार आहे…आता पोस्टसोबत त्याची झलक जोडली आहे….

अलविदा आशाताई…सुरांचा साज पंचतत्वात विलीन

स्लग – उरले उरात काही आवाज चांदण्यांचे,
आकाश तारकांचे उचलून रात गेली

स्वाती घोसाळकर

मुंबई : उरले उरात काही आवाज चांदण्यांचे , आकाश तारकांचे उचलून रात गेली या केव्हातरी पहाटेच्या गीतातील ओळींना उजाळा देत सुरांचा साज’ आशाताईंच्या रुपाने पंचतत्वात विलीन झाला. करोडो भारतीयांच्या हृदयात आपला स्वरांचे चांदणे शिंपून आशाताईंनी इहलोकीचा आज निरोप घेतला. संपूर्ण देशानं साश्रू नयनांनी सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला.

शासकीय इतमामात आशाताईंच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशा भोसले यांच्या लोअर परेल इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं. राजकारणी, सिनेसृष्टी, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील तारकांनी आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती. आशाताईंना निरोप देताना सचिन तेंडुलकर यांना अश्रु अनावर झाले होते. राज्यपाल जिष्णू देव शर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, राज ठाकरे, अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, राकेश रोशन, नीना गुप्ता, मंगलप्रभात लोढा आणि भय्याजी जोशी, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, , उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे तसंच विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखल जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली.

वराह पालन योजनेला सरकारची अखेर मंजूरी

 

मुंबई : राज्य सरकारकडून वराह पालनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वराह पालनासंदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर  आणि मंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसय यांनी वराह पालन योजनेला मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत आता वराह पालनाचा समावेश केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार  वराह खरेदीसाठी शासन ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे. तर, कुक्कुटपालन व मेंढी पालनाप्रमाणे वराह पालनासाठी ही  टक्के व्याज सवलत मिळणार आहे.

चैत्यभूमीवरील

अभिवादनासाठी

 प्रशासन सज्ज

मुंबई : भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवरीस अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र प्रशासन,  मुंबई महापालिका व पोलिस प्रशासन पूर्णतः सज्ज आहेराज्यपाल सीपीराधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत.

चैत्यभूमी परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहेजी/उत्तर विभागातर्फे चैत्यभूमीशिवाजी पार्क  आसपासच्या परिसरात सुरक्षाआरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक तयारी करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून उंच टेहळणी मनोरेही उभारले आहेतयाशिवाय ३२ सीसीटीव्ही कॅमेरे२० मेटल डिटेक्टर आणि ३० हँडहेल्ड मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत.

उन्हापासून संरक्षणासाठी अनुयायांसाठी सुमारे ५०० मीटर अंतरावर दुतर्फा पडदे लावण्यात आले आहेतआरोग्य सेवांसाठी ३० वैद्यकीय अधिकारी आणि ७० सहाय्यक कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून पाच रुग्णवाहिकाएक अतिदक्षता रुग्णवाहिका तसेच दादर चौपाटीवर सुरक्षेसाठी रेस्क्यू बोटही सज्ज ठेवण्यात आली आहे.

 

माथेरान :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून काल येथील कम्युनिटी सेंटर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शुभम गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नगरसेवक सचिन दाभेकर, वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेला प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.कर्जत येथील नेत्रचिकित्सक उपस्थित होते. कुणाला मोतीबिंदू असल्यास त्यांना पनवेल येथील रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत.दिवसभरात तीनशेहून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला असून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनिता रांजाणे,रिझवाना शेख, सोनम दाभेकर,वर्षा शिंदे, उद्योजिका रेखा चौधरी, मनीषा शिंदे, अर्चना कदम, शुभांगी शिंदे,गीता जाधव,कामिनी शिंदे यांसह नगरसेवक सीताराम कुंभार, सोहेल महापुळे,सचिन दाभेकर  आदी उपस्थित होते.
अनिल गायकवाड,प्रशांत गायकवाड, श्रेयस गायकवाड, शेखर गायकवाड,शुभम गायकवाड, अनिल नाईकडे, सुशांत नाईकडे,रुपेश गायकवाड, राजा बल्लाळ, पांडुरंग सोनावळे,किशोर सोनवळे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

ठाणे : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासना मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि जनजागृती व्हावी, या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कळवा येथे ‘ज्येष्ठ नागरिक जनजागृती शिबीर व मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. अशी समाज कल्याण आयुक्त ठाणे यांनी दिली. दरवर्षी ८ ते १४ एप्रिल या कालावधीत राज्यभरात सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिलेले आहेत.
या मेळाव्याचे उद्घाटन आणि मार्गदर्शन करताना कोकण विभाग फेस्कॉमचे कायदेशीर सल्लागार ॲड. प्रमोद ढोकळे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या विविध कायद्यांबाबत अत्यंत मोलाचे आणि सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी श्रद्धा खैरे, सहायक लेखाधिकारी अरुण साळुंखे, वरिष्ठ निरीक्षक मीरा साळुंखे, समाज कल्याण निरीक्षक अभिजीत शिंदे आणि कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याला ज्येष्ठ नागरिक संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पारसिक नगर, कळवा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर गाडे, सचिव डॉ. श्रीराम कुडक आणि ठाणे मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश दिघे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक लेखाधिकारी अरुण साळुंखे यांनी केले आणि अध्यक्षीय भाषणाने या मेळाव्याची सांगता झाली. शासनाच्या विविध योजना आणि कायदेशीर तरतुदींची माहिती मिळाल्याबद्दल उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले

कल्याण : कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे शनिवारी पार पडलेल्या हिंदी चित्रपट गीत संगीताच्या रंगारंग कार्यक्रमात नेत्रदान, देहदानाबद्दलचे आवाहन उपस्थित गानरसिकांच्या संवेदनशीलेतेला स्पर्शून गेल्याचे पाहायला मिळाले. ‘शरद कराओके ॲण्ड लाईव्ह म्युझिक’ यांच्या माध्यमातून प्रमुख गायक निलेश निरगुडकर व मोना कामत-प्रभूगावकर यांच्यासह अन्य गायक गायिकांच्या गायनाच्या मेरी आवाजही पहचान है या गीत-संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी आयोजक शरद ननावरे यांनी आपल्या मुलाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेबाबतची गुंतागुंत याबाबतची माहिती देताना सर्वांना नेत्रदान, अवयवदानाचे महत्व विषद करुन सुंदर शरीराची राख करण्यापेक्षा कुणाच्या तरी आपले अवयव उपयोगी पडतील याकडे डोळसपणे पाहण्याचे आवाहन केले. प्रमुख गायक गायिका यांच्यासह अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील ३२ पुस्तकांचे लेखक असलेले पत्रकार राजेंद्र घरत यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या उत्पन्नातून जमा झालेल्या निधीतील ५१ हजाराची रक्कम ननावरे यांनी धनादेश स्वरुपात अंधशाळेला देत  असल्याची घोषणा केली.
यावेळी सत्यम शिवम सुंदरम, शोखियों में घोला जाए, अजहु ना आये बालमा, ए भाय जरा देख के चलो, दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए, परदा है परदा, आजा शाम होने आयी, आके तेरी बाहोमे हर शाम लगे सिंदूरी, राफ्ता राफ्ता  देखो, होठो पे ऐेसी बात अशी हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील गाणी सादर करुन प्रेक्षकांना खुश करण्यात आले. प्रमुख गायकांसह स्वतः शरद ननावरे तसेच आशालता, डॉली, शैलजा, चेतना, मिहीर, नरेंद्र, अमर यांनीही चांगली गाणी गात रसिकांची वाहव्वा मिळवली.

– प्रताप सरनाईक ‘ॲक्शन मोड’वर


मीरा-भाईंदर, मीरा-भाईंदरच्या दळणवळणात क्रांती घडवणाऱ्या मेट्रो ९ च्या प्रवासाला गती मिळाली असली, तरी प्रवाशांना भेडसावणारी ‘कोंडी’ फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट मैदानात उतरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. काशिगाव मेट्रो स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी, अपूर्ण एन्ट्री-एक्झिट पॉईंट्स आणि पार्किंगच्या भीषण समस्येची दखल घेत सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्थानक परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ‘येत्या दोन महिन्यात प्रवाशांच्या अडचणी सुटल्याच पाहिजेत,’ असा सज्जड दम भरत एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाला २ महिन्याचे अल्टीमेटम दिले आहे.
पाहणी दरम्यान समोर आले की, तांत्रिक अडचणी आणि काही जागा मालकांच्या आडकाठीमुळे ४ पैकी २ एन्ट्री-एक्झिट पॉईंट्सचे काम प्रलंबित आहे. बिल्डर आणि ७/११ कंपनी मालकाच्या जागेच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे हे काम रखडल्याचे समोर येताच सरनाईक यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या सोयीसाठी आता कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. विशेषतः ७/११ कंपनीच्या जागेबाबत त्यांनी मोठे विधान केले असून, केवळ १३३ मीटरच नव्हे तर संपूर्ण भूखंड एमएमआरडीएला देऊन तिथे भव्य *’पार्किंग प्लाझा’ उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.काशिगाव मेट्रो स्थानकालगत ओसवाल बिल्डरच्या जमिनीच्या वादामुळे थांबलेले काम तातडीने सुरू करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. या कामात अडथळा आणणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच ७/११ कंपनीच्या मालकी जागेवरील १३३ मीटर जागा मेट्रोच्या एन्ट्री-एक्झिट पॉईंट्ससाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, शहराच्या हितासाठी त्यांनी केवळ १३३ मीटर जागा न देता, तो संपूर्ण भूखंडच ‘पार्किंग प्लाझा’साठी एमएमआरडीएला हस्तांतरित करावा, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे. जर ७/११ कंपनीने हा भूखंड दिला, तर त्या ठिकाणी सुमारे १५०० ते २००० खाजगी वाहनांची सोय होईल असा प्रशस्त पार्किंग प्लाझा उभारता येईल. “शहरातील जनतेने त्यांना दोन वेळा आमदार म्हणून निवडून दिले आहे, आता त्यांनी जनतेच्या सोयीसाठी ही जागा द्यावी,” असे आवाहन करत मंत्री सरनाईक यांनी चेंडू ७/११ कंपनीच्या कोर्टात टाकला आहे. मेट्रो स्थानकापर्यंत येणाऱ्या नागरिकांना स्वत:ची गाडी पार्क करून निश्चिंतपणे प्रवास करता यावा, अशी व्यवस्था पुढील ६० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना मंत्री सरनाईक म्हणतात कि, “मेट्रो ही जनतेच्या सोयीसाठी आहे, त्रासासाठी नाही! काशिगाव स्थानकाबाहेर प्रवाशांना होणारा मनस्ताप मी सहन करणार नाही. जागा हस्तांतरण आणि तांत्रिक नावाखाली कामात दिरंगाई करणाऱ्यांना माझा स्पष्ट इशारा आहे—येत्या २ महिन्यांत एन्ट्री-एक्झिटचे दरवाजे उघडा आणि पार्किंगचा प्रश्न मार्गी लावा. ७/११ कंपनीच्या मालकाला माझी विनंती आहे की, ज्या जनतेने आपल्याला दोनदा निवडून दिले, त्या सामान्यांच्या सोयीसाठी आपला भूखंड एमएमआरडीएला द्यावा. रेडीरेकनर दराने मोबदला घ्या, पण तिथे भव्य पार्किंग प्लाझा उभारून शहराला कोंडीमुक्त करण्यासाठी सहकार्य करा. यात कुचराई खपवून घेत

कल्याण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन दोन वर्ष होत आले. त्याआधी सुमारे आठ वर्ष त्यांनी मुखमंत्री म्हणून काम केलेले आहे. या काळात वारंवार पाठपुरावा करूनही कामगारांचे प्रश्न सुटलेले नाही. कामगार प्रश्नांना सरकार गांभीर्याने घेत नाही. त्यावर चर्चा करायला सरकारला वेळ नाही. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची देखील पूर्तता होत नाही. त्यामुळे राज्यातील कामगारांच्या मनात प्रचंड अस्वस्थता व संताप असून तो व्यक्त करण्यासाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश च्या नेतृत्वाखाली १६ एप्रिल रोजी कामगार आयुक्त कार्यालय बांद्रा पूर्व या ठिकाणी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला असून किमान पाच हजार कामगार सहभागी होतील आणि आपली नाराजी व्यक्त करणार आहे.
महाराष्ट्र सरकारचे उद्योग, ऊर्जा, कृषी, पाणी, महिला, बाल, युवा, खेळाडू, शिक्षण, आरोग्य, सहकार आदी सर्व विषयांचे धोरण आहे. मात्र कामगार विषयक धोरण नाही. महाराष्ट्र सरकार एक ट्रीलीयान अर्थव्यवस्था निर्माण व्हावी हे लक्ष घेहून काम करत आहे. मात्र अशा प्रगत अर्थव्यवस्थेत कामगारांचे स्थान काय असणार हे मात्र निश्चित करण्यात आलेले नाही. वर्षानुवर्ष कामगारांनी केवळ किमान वेतन आणि त्यापेक्षा कमी वेतनातच काम करावे असे सरकारला अपेक्षित आहे का? कामगारांना त्यांचे किमान वेतन, बोनस, उपदान, भविष्य निर्वाह निधी कामगार विमा कायदेशीर हक्क मिळणार का ? या बाबत राज्यातील कंत्राटी, बांधकाम, घरेलू, आशा, अंगणवाडी, फेरीवाले, बिडी कामगार, रिक्षा-टॅक्सी चालक, ईपीएस ९५ व अन्य पेन्शन धारक, वीज, नगर पालिका यासह विविध उद्योगातील कामगारांचे प्रश्न सरकारकडे प्रलंबित असून त्याबाबत सातत्याने पाठ पुरावा करूनही ते सोडवत नसल्याने याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी मोर्चात सहभागी होणार आहेत.
या मोर्चापूर्वी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना राज्यातील किमान २२ संघटनांच्या प्रलंबित प्रश्नांची निवेदन सादर केलेली आहेत. या सर्व प्रश्नांवर सरकारने प्रत्यक्ष चर्चा करावी आणि ते प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *