महा DBT पोर्टलवरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा

सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे महाविद्यालयांना निर्देश
ठाणे: महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टलद्वारे विविध शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, सद्यस्थितीत हे पोर्टल MahaDBT १.० वरून MahaDBT २.० मध्ये परावर्तित (Migration) होत आहे. या पार्श्वभूमीवर सन २०१८-१९ ते २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे निर्देश समाज कल्याण विभाग, ठाणेचे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिले आहेत.
सध्या महाविद्यालय स्तरावर एकूण ३१६२ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयांनी अर्जांची वेळेत पडताळणी व मंजुरी न केल्यास पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाDBT पोर्टल सन २०१८-१९ पासून कार्यरत असून शासनाच्या योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि कोणताही विद्यार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे ही संबंधित महाविद्यालयांची जबाबदारी असल्याचे इंगळे यांनी नमूद केले.
तरी सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्जांची तात्काळ तपासणी करून मंजुरी व आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. या प्रकरणी दिरंगाई झाल्यास संबंधित प्राचार्य आणि महाविद्यालय प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिला आहे.
००००००००
००००००

मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६
मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.), मुंबई येथे सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६ मध्ये पुरुष, महिला आणि व्यावसायिक गटातील उपांत्य फेरीचे सामने झाले. शिवाजी पार्क परिसरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंतिम फेरीत पुरुषांमध्ये शिर्सेकर्स महात्मा गांधी वि. श्री समर्थ व्यायाम मंदिर, महिलांमध्ये सरस्वती कन्या संघ वि. शिर्सेकर्स महात्मा गांधी तर व्यावासायील पुरुष गटात सेंट्रल रेल्वे वि. मुंबई पोलीस असे सामने रंगणार आहेत.
पुरुष गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधीने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा १३-१० (मध्यंतर १३-५) असा एक डाव व ३ गुणांनी मोठा पराभव केला. या सामन्यात शिर्सेकर्स महात्माच्या रामचंद्र झोरे (२.१०, २.२० मि. संरक्षण), सुजल जयगाडे (३ मि. संरक्षण व १ गुण), धीरज भावे (२, १.२० मि. संरक्षण), अनिकेत पोटे (नाबाद १.४० संरक्षण व २ गुण), निहार दुबळे (४ गुण) अर्जुन आणि वसे अनीवसे (३ गुण) यांनी संघाला विजयाला गवसणी घातली तर पराभूत विद्यार्थीच्या शुभम शिंदे (२.२० मि. संरक्षण ), प्रतीक घाणेकर  (१, १.१० मि. संरक्षण २ गुण ) व पवन नाचणकर १.२० संरक्षण) यांनी केलेली कामगिरी विजयासाठी खूपच अपुरी ठरली.
पुरुष गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिर ने सरस्वती स्पोर्ट्स क्लब चा (१९-१०) ( मध्यंतर ९-६ गुण) असा ९ गुणांनी पराभव केला. या सामन्यात श्री समर्थच्या अक्षय खापरे (२.१० मि. संरक्षण व ७ गुण), हितेश आंग्रे (१.४०, २.४० मि. संरक्षण व ३ गुण), सुरज खाके (१.१०, नाबाद १ मि. संरक्षण व २ गुण) यश बोरकर (१.४०मि. संरक्षण व १ गुण) व वेदांत देसाई (१.५० मि. संरक्षण व २ गुण) यांनी विजय निश्चित केला. तर पराभूत सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या रोहन टेमकर  (२.२०, १.३०मि. संरक्षण), करण गारोळे  (१.४०, २.१०मि. संरक्षण व १ गुण) व चैतन्य धुळप  (२. मि. संरक्षण व २ गुण) विनय परीट (१.२०, १.२० मि. संरक्षण) यांनी दिलेली कडवी लढत अपयशी ठरली.
महिला गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सरस्वती कन्या संघाने अ. भी. गोरेगावकरचा ११-८ (मध्यंतर ५-२) असा ३ गुणांनी चुरशीच्या सामन्यात पराभव केला. या सामन्यात सरस्वतीच्या सेजल यादव (४, २.२० मि. संरक्षण व ३ गुण), जानवी लोंढे (नाबाद २.१०, ४.५० मि. संरक्षण व ४ गुण), खुशबू सुतार  (२.५०, १.४० मि. संरक्षण ३ गुण) यांनी संघाला दणक्यात अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. तर पराभूत अ. भी. गोरेगावकरच्या कृतिका वाघमारे (२.४०, १.३० मि. संरक्षण व २ गुण), रिया बद्रिके (२.२०मि. संरक्षण) व सलोनी पवार (३ मि. संरक्षण ) सिया बद्रिके (१, १.२० मि. संरक्षण) यांनी दिलेली कडवी लढत अपयशी ठरली
महिला गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने श्री सह्याद्री संघाचा १३-९ (मध्यंतर १३-४) असा एक डाव ४ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात शिर्सेकर महात्मा गांधीच्याच्या पाष्टे सृष्टी  (३.२० मि. संरक्षण), नेहा हळदणकर  (नाबाद २.२० मि. संरक्षण ), गायकवाड दिव्या (१.२०, १.५० मि. संरक्षण व १ गुण) व मिताली बारसकर (४ गुण) यांच्या कामगिरीच्या जोरावर संघाने अंतिम फेरीत धडक दिली. तर पराभूत श्री सह्याद्रीच्या आर्या भाटकर (१ मि. संरक्षण व ४ गुण), तन्वी थेराडे (२.२० मि. संरक्षण ३ गुण) लावण्या नाकती (१.२०) यांनी दिलेली लढत अपयशी ठरली.
व्यावसायिक गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट्रल रेल्वेने स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा १९-२ (मध्यंतर १९-२) असा एक डाव व १७ गुणांनी पराभव केला. या सामन्यात सेंट्रल रेल्वे च्या दिलीप खांडवी  (४ मि. संरक्षण ), शुभम थोरात (३.१०मि. संरक्षण), आकाश तोगरे (५ गुण) व रामजी कश्यप व सौरभ घाडगे  (प्रत्येकी ३ गुण) यांनी संघाला विजयाचीची दारे उघडून दिली तर पराभूत स्पेशल प्रोटेक्शन युनिट च्या श्रीधर देसाई  (१.४०, १ मि. संरक्षण), चेतन बावणे  (१, १ मि. संरक्षण) यांनी दिलेली लढत अपयशी ठरली.
व्यवसायिक गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई पोलीस या संघाने महावितरण कंपनीचा १३-४ (मध्यंतर १३-४) असा एक डाव व ९ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात मुंबई पोलीस च्या वेदांत देसाई (२.३० मि. संरक्षण व १गुण), प्रदीप जाधव (२.२० मि. संरक्षण), अक्षय खापरे (२.१०मि. संरक्षण व २ गुण) व सोहेल कलावंत (५ गुण) सुजित पावल (१.५० मि. संरक्षण) यांनी संघाला विजय मिळवून दिले. तर पराभूत महावितरण कंपनीच्या प्रतीक वाईकर (१.४० मि. संरक्षण व २ गुण), संभाजी जाधव (१.५० मि. संरक्षण) व विराज कोटमकर  (१ मि. संरक्षण) यांनी दिलेली लढत अपयशी ठरली.
०००००००००
००००००००

चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांगांना स्मार्ट चष्मे, व्हीलचेअर, शिलाई मशीन व लॅपटॉप वाटप
अशोक गायकवाड
मुंबई : विकसित भारत म्हणजे आर्थिक दृष्ट्या संपन्न भारत घडवणे इतकेच अभिप्रेत नाही. तर विकसित भारत घडवण्यासाठी दिव्यांग लोकांना देखील विकास कार्यात समान भागीदार बनवावे लागेल. विकसित राष्ट्र घडविण्यासाठी संवेदनशील राष्ट्र बनवावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. हेतू चॅरिटेबल ट्रस्ट व डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेस ऑथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मालाड मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग महिलांना शिलाई मशीन, दृष्टिहीन व्यक्तींना एआय – स्मार्ट चष्मे, व्हिलचेयर व दिव्यांग स्नातक युवकांना लॅपटॉप वितरित करण्यात आले. शासन व सामाजिक संस्था एकत्र येऊन कार्य करतात तेंव्हा दिव्यांग सक्षमीकरणाचे कार्य यशस्वी होते असे सांगून राज्यपालांनी हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमात १०० दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर, ५० महिलांना शिलाई मशीन, १०० दृष्टिहीन व्यक्तींना एआय स्मार्ट चष्मे व ३ दिव्यांग युवकांना लॅपटॉप देण्यात आले. कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. श्याम चांडक व न्या. मकरंद कर्णिक, न्या. ( सेवानिवृत्त) के के तातेड, हेतु चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखबचंद जैन, उद्योजक प्रवीण कोठारी, देवेंद्र जैन, नरेंद्र राठी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.जी. तापडिया आदी उपस्थित होते.

अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा २०२६
मुंबई, ३० मे: हरियाणाच्या हर्षल राणा आणि दिल्लीच्या देवश्री अरोराने अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत अनुक्रमे १७ वर्षांखालील मुले आणि मुली गटाचे विजेतेपद पटकावले. वांद्रे पश्चिम येथील ऑटर्स क्लबच्या स्क्वॉश कोर्टमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत शनिवारी ज्युनियर राष्ट्रीय गतविजेता हर्षलने महाराष्ट्राच्या अगस्त्य राजपूतवर चुरशीच्या लढतीत ११-६, ६-११, ११-१, ९-११, ११-९ असा विजय मिळवला. मुलींच्या फायनलमध्ये देवश्रीने महाराष्ट्राच्या वसुंधरा नांगरेवर ११-४, ६-११, ११-७, ९-११, ११-८ अशी मात केली.
१५ वर्षांखालील मुली आणि मुले गटात आशी शाह आणि फरीद अंद्राबी, १३ वर्षांखालील मुली गटात अक्षरा माखिजा आणि रिदान गुप्ता तसेच ११ वर्षांखालील मुली गटात समीक्षा सुगुमर आणि वेदांत शिंदेने विजेतेपदाला गवसणी घातली.
निकाल (अंतिम फेरी) : ११ वर्षांखालील मुली: समीक्षा सुगुमर विजयी वि. गौरवी अजमेरा १२-१०, ११-५, ११-७. मुले: वेदांत शिंदे विजयी वि. अगस्त्य उप्पल ११-६, ११-४, ११-७.
१३ वर्षांखालील मुली: अक्षरा माखिजा विजयी वि. श्रिया माहेश्वरी ११-७, ९-११, ११-४, १५-१३. मुले: रिदान गुप्ता विजयी वि. झेन अली ११-३, ११-७, ११-६.
१५ वर्षांखालील मुली: आशी शाह विजयी वि. नंदिकाश्री कलावनन ११-९, ११-२, ११-९. मुले: फरीद अंद्राबी बीटी विनय शिंदे १४-१२, ११-३, ११-६.
१७ वर्षांखालील मुली: देवश्री अरोरा विजयी वि. वसुंधरा नांगरे ११-४, ६-११, ११-७, ९-११, ११-८. मुले: हर्षल राणा विजयी अगस्त्य राजपूत ११-६, ६-११, ११-१, ९-११, ११-९.

घराची तोडफोड, जीवघेणा हल्ला
दोन आरोपी अटकेत
कल्याण : म्हारळ गावातील एका कुटुंबाच्या घरात घुसून तोडफोड, महिलेशी गैरवर्तन आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सात आरोपी अद्याप फरार आहेत.
टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेचा राग आरोपींनी मनात धरला होता. याच जुन्या वादातून २९ मे रोजी सायंकाळी सुमारे ७.२५ वाजता आरोपी आपल्या साथीदारांसह फिर्यादीच्या घरी पोहोचले.
आरोपींनी जबरदस्तीने घरात प्रवेश करून लोखंडी रॉडच्या साहाय्याने घरातील वस्तूंची तोडफोड केली. यावेळी फिर्यादीच्या बहिणीसोबत गैरवर्तन करत तिचा  विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. याला विरोध केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीवर हल्ला चढविला.
पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी हरेश प्रधान उर्फ दैत्या आणि त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व चाकूच्या सहाय्याने आशिष खांडेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. फिर्यादीने बचाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टिटवाळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी हरेश प्रधान उर्फ दैत्या आणि करण अमर राजपूत यांना अटक केली. दोन्ही आरोपींना ३० मे रोजी पहाटे ताब्यात घेण्यात आले. पोलिस तपासात मुख्य आरोपी हरेश प्रधान याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. सध्या फरार असलेल्या सात आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे म्हारळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुकुंद रांजाणे
माथेरान : माथेरान नगरपरिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या पेमास्टर उद्यानात विद्यमान नगरसेविका लता ढेबे यांच्या माध्यमातून  स्वखर्चाने विविध प्रकारच्या फुलांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.माथेरान मधील सर्वात उंच ठिकाणी हे उद्यान असून काही वर्षांपासून इथे फुलांची झाडे नाहीत. अनेकदा नगरपरिषदेच्या कार्यालयात रोपे पुरविण्याबाबतीत कळविण्यात आलेले असताना अद्यापही काहीच हालचाली दिसत नाहीत. अखेरीस नगरसेविका लता ढेबे यांनी गुलाब, जास्वंद, पिंपळ, बेल अशाप्रकारे विविध रोपे आणून स्वतः रोपण केले आहे. या उद्यानात पर्यटक विश्रांतीसाठी येत असतात. त्यासाठी हे उद्यान कायमस्वरूपी विविध फुलांच्या सुगंधांनी बहरलेले असावे जेणेकरून पर्यटकांना आकर्षित करू शकेल.यासाठी संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

आमदार निलेश राणे यांचा थेट आरोप..! दोडामार्ग-गांजाचे ग्रीन कॉरिडोर…!
सिंधुदुर्ग : (राजन चव्हाण )– जिल्ह्यातील अनैतिक धंदे वाढण्यास जिल्हा पोलीस अधिक्षक मोहन दहीकर हेच जबाबदार असून अशा भ्रष्ट,निष्क्रिय अधिकाऱ्याची जिल्ह्यातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी जाहीर मागणी शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी आज येथे एका भरगच्च पत्रकार परिषदेत केली.
अगदी अलिकडेच राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत जिल्ह्यातील मटका,जुगार, बेकायदा दारू धंदे, बनावट दारू वाहतूक, अमंली पदार्थांची वाहतूक आदी सर्व प्रकारचे अनैतिक धंदे फोफावण्यास सिंधुदुर्गचे पोलीस अधिक्षक मोहन दहीकर हेच  जबाबदार असून त्यांच्याच आशीर्वादाने  हे सर्व सुरू आहे असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील पोलीस दलात आणि अनैतिक धंदेवाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
आमदार निलेश राणे हे आज सकाळी ११ वा.जिल्हा मुख्यालयातील पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेणार असे काल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र एकच चर्चेचा विषय होता आणि तो म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेत  जिल्हा पोलीस यंत्रणेवर विशेष करून पोलीस अधिकक्षकांवर राणे  कोणता ‘बॉम्ब’ टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
जिल्हा पोलीस अधिक्षक दहीकर यांच्या गेल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाच आहे  शिवाय जिल्ह्यातील अनैतिक धंदेही मोठ्या प्रमाणावर वाढले आणि पोलीस खाते भ्रष्टाचाराने बरबटले असा थेट आरोप राणे यांनी केला. जिल्ह्यातील अनैतिक धंदेवाल्यांकडून दरमहा किमान सव्वा दोन ते अडीच कोटी रुपये इतका किमान ‘हप्ता’ जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला जातो असा खळबळजनक आरोपही राणे यांनी यावेळी केला. हा आकडा जास्तही असू शकतो असे सांगून राणे  म्हणाले, बीट हवलदार, संबंधित पोलीस ठाणे, ‘एलसीबी’ आणि पोलीस अधिक्षक अशी ही थेट साखळी असून याच माध्यमातून हा हप्ता दरमहा गोळा केला जातो.
लवकरच आपण जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, गृह खाते सांभाळणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या नजरेस आणणार असल्याचे सांगून असा भ्रष्ट, निष्क्रिय, बेजबाबदार अधिकारी पोलीस सेवेतही असता नये असे आपले मत असल्याचे राणे म्हणाले.
राणे यांनी दहीकर यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळातील पोलीस यंत्रणेच्या गैरकारभराचे अनेक दाखले देत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून अनैतिक धंदेवाले, गुन्हेगार, यांना आता पोलिसांचा धाकच उरला नाही असा आरोप केला.
याच कालावधीत जिल्ह्यात सुमारे ११०० ते १२०० गुन्ह्यांची नोंद झाली मात्र त्यापैकी २० टक्केच गुन्ह्यांमध्ये आरोपी दोषी ठरले. ‘दोषसिद्धी’चा हा दर लक्षात घेतला तर ८० टक्के गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडून भ्रष्ट मार्गाने तडजोडी केल्या जात असल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला.
गोव्यातून मुंबईकडे व राज्याच्या अन्य भागात होणाऱ्या अनधिकृत दारू वाहतुकी विरुद्ध सिंधुदुर्ग पोलिसांनी किती कारवाई केली याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती देण्यात टाळाटाळ करण्यात आली मात्र गेल्या दीड वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात किती दारू पकडली आणि त्याची किंमत काय याची आकडेवारीच राणे यांनी जाहीर करून पोलिसांच्या आशीर्वादानेच ही दारू सिंधुदुर्गातून पुढे गेली असा आरोप राणे यांनी केला.
गोव्यात जवळपास दररोज गांजा नेमका कुठून येतो हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता मात्र या प्रश्नाचे धक्कादायक उत्तर आज राणे यांनीच दिले त्यांच्या म्हणण्यानुसार दोडामार तालुक्यात रबर लागवडीच्या नावाखाल शेकडो हेक्टर जमिनीवर गांजाची बेकायदा शेती केली जात आहे. हे पोलिसांना दिसत नाही का..? त्यांनी काय कारवाई केली याचे उत्तर मिळाले पाहिजे अशी मागणी राणे यांनी केली  दरम्यान दहीकर हे गेले आठ दिवस प्रशिक्षणासाठी बाहेर असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

०००००००
कल्याण : सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या, तक्रारी यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील  आयुक्त महोदयांच्या दालनात  लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते.
तथापि महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक -२०२६ चा कार्यक्रम जाहीर झाला असून १८ मेपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे   सोमवार १ जून रोजी कल्याण महानगरपालिकेत संपन्न होणारा लोकशाही दिन, ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची वार्षिक निवडणूक- २०२६ची आचारसंहिता शिथिल होईपर्यंत महापालिकेत होणार नाही. याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी असे महानगरपालिका प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच नवी मुंबई महानगरपालिकेचा १०० कोटी मालमत्ता कर वसूल
नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुरू असलेल्या मालमत्ता करवसूली मोहीमेस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२६ ते ३० मे २०२६ या दोन महिन्यांमध्ये १०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर वसूल झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून प्रथमच आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात  १०० कोटींपेक्षा जास्त वसूली झाली आहे.
३० मे, दुपारी १२ वाजेपर्यंत मालमत्ता करापोटी रु. १०१ कोटी १० लक्ष इतकी कर रक्कम जमा झालेली असून त्यापैकी ऑनलाइन माध्यमातून रु. ८० कोटी, बँक व्यवहार माध्यमातून रू. १९ कोटी तसेच प्रत्यक्ष करभरणा करणेच्या ऑफलाईन माध्यमातून रु. २ कोटी इतका कर जमा झालेला आहे. यामध्ये नवी मुंबईकरांनी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या क्यू आर कोड, यूपीआय०००००००००
Heading – ऑनलाइन करभरणा सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद०००००००००
Heading – ऑनलाइन करभरणा सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Slug – आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच नवी मुंबई महानगरपालिकेचा १०० कोटी मालमत्ता कर वसूल
नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुरू असलेल्या मालमत्ता करवसूली मोहीमेस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२६ ते ३० मे २०२६ या दोन महिन्यांमध्ये १०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर वसूल झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून प्रथमच आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात  १०० कोटींपेक्षा जास्त वसूली झाली आहे.
३० मे, दुपारी १२ वाजेपर्यंत मालमत्ता करापोटी रु. १०१ कोटी १० लक्ष इतकी कर रक्कम जमा झालेली असून त्यापैकी ऑनलाइन माध्यमातून रु. ८० कोटी, बँक व्यवहार माध्यमातून रू. १९ कोटी तसेच प्रत्यक्ष करभरणा करणेच्या ऑफलाईन माध्यमातून रु. २ कोटी इतका कर जमा झालेला आहे. यामध्ये नवी मुंबईकरांनी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या क्यू आर कोड, यूपीआय, नेट बँकिंग, डेबिट / क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग तसेच विविध ऑनलाइन पर्यायांना मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसून आले आहे.
यामध्ये निवासी मालमत्तांमधून रु. २९.५२ कोटी, अनिवासी मालमत्तांमधून रु. २४.८५ कोटी आणि औद्योगिक मालमत्तांमधून रु. ४१.२१ कोटी इतका कर जमा झालेला आहे. एकूण ३,५४,७३७ करदात्यांपैकी आत्तापर्यंत ५६,१६६ इतक्या नागरिकांनी महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे.
महानगरपालिकेकडून नागरिकांना ऑनलाइन माध्यमातूनही मालमत्ता कर बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून व व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट ८२९१९२०५०४ या क्रमांकावरूनही मालमत्ता कर बिल ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून घेता येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे बिल मिळविण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या ८२९१९२०५०४ या अधिकृत क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवून पुढील सूचनांनुसार मालमत्ता क्रमांक नोंदवायचा आहे. त्यानंतर संबंधित मालमत्ता कर बिल लगेचच मोबाईलवर उपलब्ध होईल.
तसेच नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्तेशी मोबाईल क्रमांक लिंक करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे कर भरण्याबाबत सूचना, बिल तसेच इतर महत्त्वाची माहिती थेट मोबाईलवर प्राप्त होण्यास मदत होत आहे. तरी नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरून अतिरिक्त २ टक्के अधिभार टाळावा तसेच ऑनलाइन व डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Slug – आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच नवी मुंबई महानगरपालिकेचा १०० कोटी मालमत्ता कर वसूल
नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुरू असलेल्या मालमत्ता करवसूली मोहीमेस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२६ ते ३० मे २०२६ या दोन महिन्यांमध्ये १०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर वसूल झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून प्रथमच आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात  १०० कोटींपेक्षा जास्त वसूली झाली आहे.
३० मे, दुपारी १२ वाजेपर्यंत मालमत्ता करापोटी रु. १०१ कोटी १० लक्ष इतकी कर रक्कम जमा झालेली असून त्यापैकी ऑनलाइन माध्यमातून रु. ८० कोटी, बँक व्यवहार माध्यमातून रू. १९ कोटी तसेच प्रत्यक्ष करभरणा करणेच्या ऑफलाईन माध्यमातून रु. २ कोटी इतका कर जमा झालेला आहे. यामध्ये नवी मुंबईकरांनी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या क्यू आर कोड, यूपीआय, नेट बँकिंग, डेबिट / क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग तसेच विविध ऑनलाइन पर्यायांना मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसून आले आहे.
यामध्ये निवासी मालमत्तांमधून रु. २९.५२ कोटी, अनिवासी मालमत्तांमधून रु. २४.८५ कोटी आणि औद्योगिक मालमत्तांमधून रु. ४१.२१ कोटी इतका कर जमा झालेला आहे. एकूण ३,५४,७३७ करदात्यांपैकी आत्तापर्यंत ५६,१६६ इतक्या नागरिकांनी महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे.
महानगरपालिकेकडून नागरिकांना ऑनलाइन माध्यमातूनही मालमत्ता कर बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून व व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट ८२९१९२०५०४ या क्रमांकावरूनही मालमत्ता कर बिल ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून घेता येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे बिल मिळविण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या ८२९१९२०५०४ या अधिकृत क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवून पुढील सूचनांनुसार मालमत्ता क्रमांक नोंदवायचा आहे. त्यानंतर संबंधित मालमत्ता कर बिल लगेचच मोबाईलवर उपलब्ध होईल.
तसेच नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्तेशी मोबाईल क्रमांक लिंक करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे कर भरण्याबाबत सूचना, बिल तसेच इतर महत्त्वाची माहिती थेट मोबाईलवर प्राप्त होण्यास मदत होत आहे. तरी नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरून अतिरिक्त २ टक्के अधिभार टाळावा तसेच ऑनलाइन व डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात येत आहे.
, नेट बँकिंग, डेबिट / क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग तसेच विविध ऑनलाइन पर्यायांना मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसून आले आहे.
यामध्ये निवासी मालमत्तांमधून रु. २९.५२ कोटी, अनिवासी मालमत्तांमधून रु. २४.८५ कोटी आणि औद्योगिक मालमत्तांमधून रु. ४१.२१ कोटी इतका कर जमा झालेला आहे. एकूण ३,५४,७३७ करदात्यांपैकी आत्तापर्यंत ५६,१६६ इतक्या नागरिकांनी महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे.
महानगरपालिकेकडून नागरिकांना ऑनलाइन माध्यमातूनही मालमत्ता कर बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून व व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट ८२९१९२०५०४ या क्रमांकावरूनही मालमत्ता कर बिल ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून घेता येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे बिल मिळविण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या ८२९१९२०५०४ या अधिकृत क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवून पुढील सूचनांनुसार मालमत्ता क्रमांक नोंदवायचा आहे. त्यानंतर संबंधित मालमत्ता कर बिल लगेचच मोबाईलवर उपलब्ध होईल.
तसेच नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्तेशी मोबाईल क्रमांक लिंक करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे कर भरण्याबाबत सूचना, बिल तसेच इतर महत्त्वाची माहिती थेट मोबाईलवर प्राप्त होण्यास मदत होत आहे. तरी नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरून अतिरिक्त २ टक्के अधिभार टाळावा तसेच ऑनलाइन व डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात येत आहे.

 कल्याण-डोंबिवलीत रात्रीच्या सर्वाधिक ३०.४ सेल्सिअस तापमानाची नोंद
कल्याण डोंबिवलीसह मुंबई एमएमआरमध्ये रात्रीचे १३ वर्षांतील विक्रमी तापमान
कल्याण : एकीकडे दिवसा सूर्यदेव अक्षरशः आग ओकत असताना दिवसाप्रमाणेच आता रात्रीच्या तापमानावरही त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे. मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये गेल्या १३ वर्षांतील रात्रीचे सर्वाधिक तापमान २९ मे २०२६ म्हणजेच काल नोंद झाले असून कल्याण डोंबिवली हे रात्रीच्या तापमान वाढीचे हॉट स्पॉट ठरल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे हा उष्णतेचा प्रभाव केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश  आणि उत्तर कोकण पट्ट्यात जाणवला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, अंबरनाथ, विरार, कर्जत आणि कर्जत परिसरात गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक उष्ण रात्रींपैकी काही रात्रींची यावर्षी नोंद झाली आहे. हवामान तज्ज्ञ अभिजीत मोडक यांच्या मते वातावरणातील वाढलेला आर्द्रतेचा स्तर, ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी वाहणारे वारे यामुळे दिवसभर साचलेली उष्णता वातावरणात सहजपणे विरून जात नाही. परिणामी रात्रीचे तापमान अपेक्षेप्रमाणे खाली येत नसल्याने नागरिकांना दिवसाप्रमाणे रात्रीही प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
उत्तर कोकणातील अनेक शहरांमध्ये किमान तापमान हे २९ अंशांच्या वर राहिले. कल्याण-डोंबिवली येथे सर्वाधिक ३०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल पनवेल-पलावा ३०.३ अंश, बिरवाडी ३०.२ अंश, अंबरनाथ-विरार ३०.१ अंश आणि ठाणे-नवी मुंबईमध्ये ३० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. हवामानाच्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वारे  सक्रिय होईपर्यंत अशाच प्रकारच्या उष्ण आणि दमट रात्रींचा अनुभव नागरिकांना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, आवश्यक तेवढाच बाहेरचा प्रवास करणे आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही अभिजीत मोडक यांनी सांगितले आहे.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *