Category: ठाणे

Thane news

 बिबट्यांना जेरबंद करणारे शेकडो पिंजरे भंगारात पडून

वनविभागाचा भोंगळ कारभार    शहापूरात धक्कादायक वास्तव उजेडात अविनाश उबाळे ठाणे – शहापूर उपवनसंरक्षकांच्या कार्यक्षेत्रातील डोळखांब वनपरीक्षेत्र हद्दीतील कळभोंडे लाद्याचीवाडी येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात कृष्णा भागा आगीवले या १० वर्षीय बालकाचा…

ठाणे–आदमापूर एस.टी. बस सेवेचा शुभारंभ

  ठाणे: महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून ठाणे ते आदमापूर (गारगोटी आगार) या मार्गावर थेट एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. वंदना एस.टी. डेपो, ठाणे येथून सकाळी…

नौपाडा विभागात ‘लाडकी सुन’ अभियानाला वेग

  ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य समन्वयक व शिवसेना महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णु नाकती…

– ‘मिशन भरारी’तून विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यासदौरा

 अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल-’रणजित यादव अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या अभ्यासदौऱ्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. हा शुभेच्छा समारंभ २७ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.मिशन भरारी’ हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवे दालन उघडणारा आहे. या अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार असून त्यांच्या आत्मविश्वासात निश्चितच वाढ होईल. सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक सहलीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, तुमची ही भरारी भविष्यात मोठ्या यशाकडे नेणारी ठरो,असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नवे क्षितिज मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ‘मिशन भरारी’ या उपक्रमाचे औपचारिक अनावरण प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून २६ जानेवारीला करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हास्तरावर निवड झालेल्या ५९ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी २७ एप्रिल ते १ मे या कालावधीत देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.हा अभ्यासदौरा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे मार्गदर्शनातून राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक /वैज्ञानिक संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घ्यावे, तसेच मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या अभ्यासदौऱ्याची आखणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाकडून सातत्याने अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात असून ‘मिशन भरारी’ हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे.या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी मिळणार असून तिरुअनंतपुरम व कन्याकुमारी येथील विविध वैज्ञानिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. विक्रम साराभाई अवकाश केंद्र, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन, केरळ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्युझियम व प्रियदर्शिनी प्लॅनेटेरियम यांसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. तसेच स्वामी विवेकानंद स्मारक, थिरुवल्लुवर पुतळा व इतर पर्यटन स्थळांनाही भेट दिली जाणार आहे.या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा आहे. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन, अवकाश विज्ञान व आधुनिक प्रयोगशाळांचा प्रत्यक्ष अनुभव मिळून त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली.या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे तसेच विविध मान्यवर व अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.‘मिशन भरारी’ अंतर्गत सन २०२५-२६ या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून एकूण ५९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात अंबरनाथ तालुक्यातून १६ विद्यार्थी (मराठी माध्यम १२ व उर्दू माध्यम ४), भिवंडी तालुक्यातून १२ विद्यार्थी (मराठी माध्यम ११ व उर्दू माध्यम १), कल्याण तालुक्यातून १० विद्यार्थी (सर्व मराठी माध्यम), मुरबाड तालुक्यातून १० विद्यार्थी (सर्व मराठी माध्यम) तसेच शहापूर तालुक्यातून ११ विद्यार्थी (सर्व मराठी माध्यम) यांचा समावेश आहे. एकूण निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५४ विद्यार्थी मराठी माध्यमातील (२५ मुले व २९ मुली) तर ५ विद्यार्थी उर्दू माध्यमातील (२ मुले व ३ मुली) आहेत. अशा प्रकारे एकूण २७ मुले व ३२ मुलींचा समावेश असलेला ५९ विद्यार्थ्यांचा गट या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी सहभागी होणार आहे.

जन्म-मृत्यूची १०० टक्के नोंदणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

ठाणे : जिल्ह्यामध्ये जन्म-मृत्यूच्या घटनांची १०० टक्के नोंदणी व्हावी आणि प्रत्येक नागरिकाला विहित वेळेत प्रमाणपत्र मिळावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जन्म-मृत्यू नोंदणी व जीवनविषयक आकडेवारी संबंधी जिल्हास्तरीय समितीची महत्त्वाची आढावा बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जि.प. ठाण्याचे सहा.गटविकास अधिकारी पंडित राठोड, कल्याण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत गजाकोस, सांख्यिकी अधिकारी सुप्रिया दरेकर, पं. स. भिवंडीचे सहा.गटविकास अधिकारी विनायक लोहकरे, पं. स. शहापूरचे सहा.गटविकास अधिकारी  सुदाम इंगळे, पं. स. अंबरनाथच्या सहा.गटविकास अधिकारी निता खोटरे उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने केंद्र शासनाने विकसित केलेल्या ‘Revamped CRS Portal’ या नवीन संगणक प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला असून, २४ जून २०२४ पासून ही सुधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जन्माची नोंदणी अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार, कोणत्याही घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधितांना विनामूल्य प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे निबंधकांवर बंधनकारक आहे. बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च २०२6 या कालावधीत ठाणे जिल्ह्यात ९०.०५ टक्के जन्माच्या आणि ७४.०७ टक्के मृत्यूच्या नोंदी विहित वेळेत पूर्ण झाल्या आहेत. ग्रामीण भागातील उर्वरित नोंदींचा वेग वाढवण्यासाठी आणि शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गाव स्तरावरील समित्यांनी आपापसात समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले. बैठकीत प्रलंबित आणि अवैध नोंदणीबाबतही कडक भूमिका घेण्यात आली. १ ऑक्टोबर २०२3 ते 3१ डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अवैध नोंदी रद्द करण्याची प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सुरू असून, अशा नोंदी बाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या नोंदी एक वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपजिल्हा दंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगत, जुन्या नोंदींचे डिजिटायझेशन करण्याच्या प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला. दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून मिळणाऱ्या माहितीबाबत काही त्रुटी आढळल्याने, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना गांभीर्याने काम करण्याचे आदेश देण्यात आले असून, अहवाल वेळेवर न पाठवणाऱ्या विभागांवर पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हा निबंधकांनी दिले आहेत. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील नागरी नोंदणी पद्धत अधिक पारदर्शक आणि गतिमान होईल.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत भात व हिरवळीच्या खताच्या बियाण्यास अनुदान

 टोकण यंत्रासाठीही ९०% अनुदान; शेतकऱ्यांना दिलासा ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कृषि विभागामार्फत सन २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात येत आहे. भात पिकाचे उत्पादन वाढविणे, जमिनीची सुपिकता सुधारणा करणे तसेच मजूर टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने सुधारित भात बियाण्यास ५० टक्के व हिरवळीच्या खताच्या बियाण्यास ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना तूर व भात पिकासाठी कर्जत-३, कर्जत-७, जया, रत्नागिरी-८ तसेच एमटीयू-१०१० या सुधारित व अधिक उत्पादनक्षम जातींचे बियाणे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या जाती हवामानास अनुकूल असून चांगले उत्पादन देणाऱ्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि सेंद्रिय घटकांची वाढ करण्यासाठी धैंचा या हिरवळीच्या खताचे बियाणे प्रति शेतकरी प्रति एकर २० किलो प्रमाणात ९० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. धैंचा पिकामुळे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून पुढील पिकासाठी पोषक वातावरण निर्माण होते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित पंचायत समितीच्या कृषि विभागाकडे तात्काळ नाव नोंदणी करावी. अर्जासोबत ७/१२ किंवा ८-अ उतारा, आधार कार्ड तसेच आधारसंलग्न बँक पासबुक यांच्या छायांकित प्रती सादर करणे बंधनकारक राहील. दरम्यान, शेतीमधील वाढत्या मजूर टंचाईचा विचार करून भात पिकाची टोकण यंत्राद्वारे (Dibbler) पेरणी करण्यासाठी यावर्षीपासून ९० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. SRT पद्धतीने भात लागवड करण्यासाठी किमान ५ टोकण यंत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त ५ टोकण यंत्र खरेदीसाठी अनुदान देय राहील. या पद्धतीमुळे वेळ, खर्च व मजुरीची बचत होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद ठाणेच्या अधिकृत https://zpthaneschemes.com संकेतस्थळावर दि. १५ मे २०२६ पर्यंत नाव नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करावा आणि उत्पन्नात वाढ साधावी. सुधारित बियाणे व यंत्रांच्या वापरामुळे शेती अधिक फायदेशीर होऊ शकते,  असे कृषि विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी सांगितले. ०००००००  

ठाण्यात एस टीची शिवशाही एसी बस भीषण आगीत जळून खाक.

ठाणे : ठाणे स्टेशन जवळील सॅटीस उड्डाणपुलावर दुपारी १:२८ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची शिवशाही एसी बस क्रमांक- MH ०९ EM ९९४२, (चालक श्री. संतोष किसन गवळी, वाहक – मिलिंद सोनावणे, मार्ग – स्वारगेट ते वसई.) या बसला ठाणे रेल्वे स्टेशन बस स्थानक येथून वसईला जाताना सॅटिस ब्रिजवरती आग लागली होती.  प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी, ठाणे नगर पोलीस कर्मचारी, ठाणे नगर वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह, १-रेस्क्यू वाहनासह, १- वॉटर टँकर वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १-पिकअप वाहनासह व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर आग लागलेली बस ही वसई बस डेपोची असून बस मध्ये  स्वारगेट वरून वसईला जाणारे १० प्रवासी व ठाणे येथून ४ प्रवासी असे एकूण १४ प्रवासी प्रवास करत होते. सदर बसला आग लागताच सर्व प्रवासी व बसचे चालक व वाहक सुरक्षित बसच्या बाहेर आले त्यामुळे अनर्थ टळला परंतू शिवशाही बस पूर्णतः जळून नुकसान झाले आहे. सदर आग लागलेल्या बस मधील डिझेल व ऑइल रस्त्यावरती पसरले होते त्यावरती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने माती पसरविण्यात आली.  

हिवताप टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे

ठाणे: २५ एप्रिल हा दिवस ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जागतिक हिवताप (मलेरिया) दिन म्हणून राबविला जातो. या दिनी महापालिकेच्या फायलेरिया विभागाच्यावतीने महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी हिवताप टाळण्यासाठी प्रत्येक…

 ठामपा आस्थापनेवर भरती प्रक्रियेमध्ये कोविड कालावधीत काम करणाऱ्यांना प्राधान्य द्या

  उपमहापौर कृष्णा पाटील यांचा प्रस्ताव अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेच्या भरती प्रक्रियेमध्ये  कोव्हिड  -१९ कालावधीत काम करणारे कर्मचारी व इतर विभागात ठोक पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणीरुपी प्रस्तावाची सूचना उपमहापौर कृष्णा पाटील यांनी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत  मांडणार असून भाजपा गटनेते मुकेश मोकाशी यांनी त्याला अनुमोदन दिले आहे. ठाणे महापालिकेमध्ये सध्या विविध संवर्गाची सरळसेवेने भरती करण्याची प्रक्रीया चालू असून, त्या अनुषंगाने प्रशासनाकडून कार्यवाही सुरु आहे. परंतू सदर सरळसेवा भरती करतांना, ठाणे महानगरपालिकेत कोव्हीड-१९ कालावधीत काम करणारे कर्मचारी व इतर विभागामध्ये ठोक पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करणे जरुरीचे आहे.ठाणे महानगरपालिकेत कोव्हीड-१९ कालावधीत जाहिरातीन्वये विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती केली होती. तसेच काही विभागामध्ये अत्यावश्यक बाब म्हणून ठोक पगारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. परंतू सद्या ठाणे महापालिकेत चालू असलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना प्राधान्यक्रम न दिल्यामुळे त्यांचेवर अन्याय करण्यासारखे होईल अशी भावना उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केली आहे. सन २०२२ मध्ये कोव्हीड-१९ च्या कालावधीत ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती, त्यांना महापालिकेच्या आस्थापनेवर घेण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात यावा अशा प्रकारची चर्चा होऊन, त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी प्रशासनास सूचना केल्याचे कृष्णा पाटील यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात नमूद केले असून ठाणे महानगरपालिकेच्या सरळसेवा भरती प्रक्रीयेमध्ये कोव्हीड-१९ कालावधीत काम करणारे कर्मचारी वर्ग व इतर विभागात ठोक पगारावर काम करणारे कर्मचारी या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन, त्यांचा प्राधान्याने विचार करण्याची मागणी उपमहापौर कृष्ण पाटील यांनी केली आहे. सदर प्रस्तावाची सूचना आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेऊन, चर्चा करुन, त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची विनंतीही कृष्णा पाटील यांनी केली आहे.

 ठाण्यात महिला आरक्षण विधेयकावरून भाजपवर काँग्रेसचा हल्लाबोल

भाजपच्या विरोधात काँग्रेस “पोलखोल मोहीम” राबवणार ठाणे (सिद्धेश शिगवण):- सध्या देशभरात महिला आरक्षणाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजत असल्याचं पाहायला मिळतंय. महिला आरक्षण मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस सातत्याने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहे. याच अनुषंगाने आज ठाण्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य आरिफ नसीम खान यांनी  पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टी सरकारवर जोरदार टीका केली. आरिफ नसीम खान यांनी आरोप केला की, महिलांसंदर्भातील विधेयक नामंजूर करण्यात भाजपचाच हात असून “खोटं बोला, रेटून बोला” अशी भूमिका केंद्रातील सरकारची असल्याचे ते म्हणाले. महिलांना आरक्षण देण्याच्या नावाखाली डिलिमिटेशनचा अडसर निर्माण करून भाजपने महिलांचा विश्वासघात केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच, महिलांसाठी विशेष अधिवेशन आयोजित करूनही प्रत्यक्षात महिलांचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला. “हे महिला आरक्षण विधेयक नसून कायदा संशोधन विधेयक आहे,” असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, 2023 मध्ये 33 टक्के महिला आरक्षणाला काँग्रेस सहमत होती; मात्र या प्रक्रियेमुळे संविधान आणि लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांनी याला विरोध केला. “2023 च्या 33 टक्के आरक्षणाला मोदी सरकारने थेट सहमती द्यावी. मात्र आरक्षणाच्या नावाखाली संविधानाची गळचेपी आम्ही सहन करणार नाही,” असेही खान यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे आरोप केला की, कायदा संशोधनाच्या माध्यमातून “चोर दरवाज्याने” संविधानात बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यामुळे देशातील समतोल आणि प्रगतिशील विचारसरणी धोक्यात येईल. यावेळी त्यांनी नमूद केले की, 2023 मध्ये सोनिया गांधी यांच्या मागणीमुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे आला होता, तर राहुल गांधी यांनीही जातीनिहाय जनगणनेसाठी सातत्याने भूमिका मांडली आहे. “महिला आणि मागासवर्गीय समाजांना काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. मात्र या निर्णयाच्या नावाखाली संविधानाची हत्या आम्ही होऊ देणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी भाजपवर दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप केला. भाजपवर टीका करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “भाजपमध्ये महिला राज्याध्यक्ष का होत नाहीत?” तसेच, महिला सक्षमीकरणाचा दावा करणाऱ्या पक्षाच्या काही नेत्यांवर महिलांवरील अत्याचाराचे आरोप असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, काँग्रेस पक्ष लवकरच भाजपच्या धोरणांविरोधात “पोलखोल मोहीम” राबवणार असल्याची माहितीही आरिफ नसीम खान यांनी दिली. 000000000