Category: पालघर

palghar news

ठाणे ग्रामीण काँग्रेसच्यावतीने इंधन दरवाढ व टंचाई विरुद्ध तीव्र धरणे आंदोलन

    अंबरनाथ : शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी दरवाढ व टंचाई विरोधात पेट्रोल पंपासमोर तीव्र धरणे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या…

रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त १ जूनला पनवेलमध्ये भव्य सांगीतिक कार्यक्रम

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती”, “श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ” तसेच नादब्रह्म साधना मंडळ खारघर…

जेएनपीए ते सफाळे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मार्ग कार्यान्वित

पालघर : भारत सरकारच्या डेडेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या मालवाहतुकीसाठी विशेषत्वाने राखीव लोहमार्गाचा पहिला टप्पा २५ मे रोजी कार्यान्वित करण्यात आला. जेएनपीए ते सफाळे असा टप्पा…

१ जून ते ३१ जुलैदरम्यान यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारणा अध्यादेश २०२१ च्या अनुषंगाने राज्याच्या सागरी क्षेत्रात यावर्षी १ जून ते ३१…

कल्याण मुरबाड मार्गावर भीषण अपघात

कल्याण मुरबाड मार्गावर भीषण अपघात इकोची सिमेंट मिक्सरला धडक, भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू कल्याण : कल्याण मुरबाड मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना सोमवारी घडली. एक सिमेंट मिक्सर आणि काळी-पिवळी इको टॅक्सी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रायते पुलावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको गाडीचा सकाळी ८.३० च्या सुमारास अपघात झाला. गाडीतील सर्व ११ प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामध्ये ८ पुरुष व ३ महिलांचा समावेश असून मृतदेह गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आली. प्रवाशांनी भरलेली इको कार मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या कारमध्ये एकूण 1२ प्रवासी होते, त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम स्थानिकांनी अत्यंत जड अंतःकरणाने केले. टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? चालकाचा ताबा सुटला की वेगाचा अतिरेक नडला? हे अद्याप समजू शकलेले नाही. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता. या मृतांमध्ये प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने, वय २1 वर्ष, देवगाव मुरबाड, भूषण घोरपडे, वय ४९ वर्ष, अंधेरी मुंबई. तहसीलदार कार्यालय मुरबाड या कार्यालयात महसूल सहाय्यक, जिजा गोविंदा केंबारी, वय ५० वर्ष, टेंभरे मुरबाड, अनंता पवार, साखरे मुरबाड, दीपक गवळी, राहणार कल्याण, गणपत जैनू मधे, वय ३२ वर्ष, देवराळवाडी मुरबाड, स्नेहा मोहपे, वय अंदाजे २२ वर्ष, मानसी मोहपे, वय अंदाजे २० वर्ष, प्रथमेश मोहपे, वय अंदाजे 1७ वर्ष हे तिघेही एकाच कुटुंबातील  नारायणगाव मुरबाड येथील आहेत. तर अन्य दोन व्यक्तींची ओळख पटवणे सुरू आहे. कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावर सकाळी रायते परिसरात झालेल्या अपघतात प्राथमिक माहिती नुसार नऊ प्रवासी मृत्यूमुखी झाले आहेत. या अपघातातील इको संर्वगातील वाहनाची सर्व कागदपत्रे वैध्य आहेत, आरटीओ इनस्पेक्टर यांनी घटनास्थळी पोहचत माहिती घेऊन याबाबत सविस्तर अवहाल तयार करणार आहोत. अनधिकृत प्रवासी वाहतूक, अवजड वाहनांची वर्दळ बाबत आरोप असल्याच्या बाबत अवैध वाहतूक संदर्भात आरटीओकडून कारवाई केली जाते अशी प्रतिक्रिया कल्याण उप प्रादेशिक अधिकारी अशुतोष बारकुल यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तर रायते येथील महामार्गावर झालेल्या भीषण अपघाता संदर्भात, रायते येथील ग्रामस्थ संतोष सुरोशी यांनी प्रतिक्रिया दिली की, रायते, पिंपळोली ग्रामस्थांनी रस्त्या संदर्भात निवेदन देखील दिले होते. रस्त्याचे काम अर्धवट असून, दिशा दर्शक फलक लावले नाहीत, वाहतूक सुरु करू नका असे असून देखील मिक्सर अवजड वाहनांची होणारी वाहतूक पाहता आरटीओचे नियंत्रण नाही यामुळेच आजच्या या भीषण अपघातात निष्पाप लोकांचे बळी गेले असल्याचा आरोप करत  शासनाचा  धिक्कार करतो अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष सुरोशी यांनी दिली. तर एनएच ६१ महामार्गावर रायते येथे इको आणि मिक्सर या वाहनांच्या अपघाततील इको मधील प्रवाशांचे मृतदेह गोवेली शासकीय रूग्णालयात आणले असून ११ मृतदेह असल्याची प्रतिक्रिया कल्याण ग्रामीण डीवायएसपी अनिल लाड यांनी दिली.

कृषी विभागाच्या योजनात शेतकरी, शासनालाही ‘चुना’?

कृषी विभागाच्या योजनात शेतकरी, शासनालाही ‘चुना’? योगेश चांदेकर पालघरः शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कृषी खात्याची असते; परंतु राज्यात कृषी विभागातच सर्वाधिक गैरव्यहार होतात. योजनांचा निधी खर्च;परंतु कामेच नाहीत, कामे हाती घेतली, तर…

नारायण राणेंच्या रूपाने आम्हाला दमदार नेतृत्व लाभले — मुख्यमंत्री फडणवीस

वाढदिवस सोहोळा थाटामाटात संपन्न कणकवली (प्रतिनिधी)- माझ्या संसदीय कामकाजाची सुरुवात राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली हे मी माझं भाग्य समजतो. विधानसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून राणे यांनी केलेली भाषणे ऐकण्याची, बघण्याची संधी मला प्राप्त झाली. अर्थसंकल्पावरील त्यांची भाषणे तर नक्कीच अभ्यासू होती. तरी यापुढेही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत राहावे अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार नारायण राणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.   माजी मुख्यमंत्री, भाजपाचे खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस सोहोळा qqq अतिशय थाटामाटात आणि दिमाखात पार पडला.  राज्यातील महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार  प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, दीपक केसरकर महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते राज्याच्या विविध भागातून आलेले त्यांचे मित्र, चाहते या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना राणे  अतिशय भाऊक  झाले होते.’आपण पद मिळवण्यासाठी कधी काम केले नाही, मेहनत आणि निर्धार यामुळेच आपण समाजकारणात आणि राजकारणात यशाच्या शिखरावर पोहोचलो’ असे उदगार त्यांनी सत्काराला उत्तर देतांना काढले शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच आपण हे यश मिळवू  शकलो असे म्हणत त्यांनी ठाकरे यांच्या प्रति आपले ऋण व्यक्त केले. राणीसाहेबांच्या हृदयातच कोकण आहे आणि म्हणूनच त्यांनी कोकणच्या  विकासाला दिशा देण्याचे  काम केले  अशा शब्दात फडणवीस यांनी राणे यांचे कौतुक केले. विधिमंडळातील त्यांच्या कामकाजाचा गौरव करताना फडणवीस म्हणाले, अर्थसंकल्पावर ज्यावेळी राणेसाहेब भाषण करायचे त्यावेळी कोणीतरी अर्थतज्ञ बोलतोय असा  भास व्हायचा अशा शब्दात त्यांनी राणे यांचे कौतुक केले. ‘त्यांचा दरारा आपण विधानसभेत बघितला आहे एवढेच नव्हे तर विरोधी पक्षनेता म्हणून ते सरकारला पळता भुई थोडी करायचे हेही आपण पाहिले आहे. एक दिलदार, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व. कामात गुणवत्ता या गुणांसोबतच हजारो लोकांचे जीवनमान त्यांनी बदलून टाकले असे गौरवपूर्ण उदगारही त्यांनी यावेळी काढले.  त्यांचे दोन्ही पुत्र नितेश आणि निलेश हे त्यांचा वारसा समर्थपणे चालवतील असा विश्वास  फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनीही राणे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी केलेली भाषणे वाचा आणि अभ्यासा, असा सल्ला नव्या आमदारांना देत गडकरी म्हणाले,संसदीय इतिहासातला एक आदर्श विरोधी पक्ष नेता म्हणून राणे यांचा उल्लेख करावा लागेल अशा शब्दात गडकरी यांनी राणे यांचा  गौरव केला. सत्ताधाऱ्यांना कैचीत पकडण्याची शैली हे राणे यांच्या कडूनच  शिकावे  असा मोलाचा सल्लाही गडकरी यांनी  नव्या आमदारांना दिला. वाढदिवसाची भेट…! राणे हे शब्दाचे पक्के आहेत, तसा मी सुद्धा आहे असे म्हणत येत्या  मे महिन्यापूर्वी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होईल तसेच रत्नागिरी- कोल्हापूर हा  मार्गही पूर्ण होईल असे गडकरी यांनी जाहीर करत राणे यांना वाढदिवसाची भेट दिली. गेली अनेक वर्ष रखडलेल्या या महामार्गामुळे मी एवढी बदनामी सहन केली आहे की आता उदघाटन  करायला मी येणार नाही. मात्र काम पूर्ण होणार आहे असे त्यांनी जाहीर केले.  ‘कोकणातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम दादांनी केले. भाजपात प्रवेश केल्यानंतर कोकणात भाजपाचे बळ वाढले असे उदगार  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काढले. रायगड जिल्ह्यात ‘राणे पॅटर्न’ राबवण्यासाठी राणेसाहेबांनी मला टिप्स द्याव्यात अशा शब्दात तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ००००००००

रुग्णवाहिका एकाच जाग्यावर दीड तास बंद , रुग्णाच्या जीविताशी खेळ

रुग्णवाहिका एकाच जाग्यावर दीड तास बंद , रुग्णाच्या जीविताशी खेळ पालघर विभागात १०८ रुग्णवाहिन्यांबाबत गंभीर तक्रारी योगेश चांदेकर पालघरः राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवांची अवस्था सध्या अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यात सध्या १०८ च्या २९ रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी त्या रुग्णवाहिकांची स्थिती अतीशय दयनीय आहे त्यामुळे अनेक रुग्णवाहिका तांत्रिक बिघाडामुळे मध्येच बंद पडतात. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत डहाणू तालुक्यातील वरोर येथे अशीच एक रुग्णवाहिका क्रमांक MH१४ CL.०६८४ रस्त्यात दीड तास बंद पडली होती; परंतु पर्यायी व्यवस्था वेळेत न केल्याने रुग्णाचे हाल झाले. राज्यात ग्रामीण तसेच दुर्गम भागात आणि महामार्गावर रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने १०८ सेवा सुरू केली. ग्रामीण व दुर्गम भागामध्ये ही सेवा हीच जीवनरेषा मानली जाते; परंतु गेल्या अनेक वर्षापासून १०८ रुग्णसेवेबाबत अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे या रुग्णवाहिका कुठेही बंद पडतात. काही वाहनांची देखभाल वेळेवर न झाल्याने त्या बंद अवस्थेत आहेत, तर काही वापरण्यास अयोग्य ठरत आहेत. त्यामुळे रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त आणि ऑक्सिजन का नाही? पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. राज्य आणि केंद्र सरकार आदिवासी विभागातील रुग्णसेवेसाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करीत असले, तरी प्रत्यक्षात मात्र आदिवासी विभागातील रुग्णसेवेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. गेल्या आठवड्यातच याबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते, तर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत पालघर जिल्ह्यातील रुग्णसेवेचा पंचनामा केला होता. या पार्श्वभूमीवर आज पालघर येथे अनुसया मंगल्या भोईर यांना तातडीने रक्ताची तसेच ऑक्सिजनची गरज होती; परंतु पालघर येथे या सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने या महिलेला डहाणू येथे पाठवण्यात आले. जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त आणि ऑक्सिजन का उपलब्ध होऊ शकला नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून, जिल्ह्याच्या ठिकाणाहून तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयाला रेफर करण्याचा अजब प्रकार पालघरमध्ये झाला. रुग्णवाहिकेसोबत डॉक्टरही नाही रक्त आणि ऑक्सिजन पालघरला उपलब्ध न झाल्याने १०८ रुग्णसेवेच्या रुग्णवाहिकेतून या वयोवृद्ध महिलेला डहाणूला पाठवण्यात आले; परंतु पालघरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच ही रुग्णवाहिका बंद पडली. ती सुरू करण्याचा प्रयत्न करूनही त्यात अपयश आले. पर्यायी रुग्णवाहिकेची मागणी करूनही ती दीड तासापर्यंत उपलब्ध होऊ शकली नव्हती. रक्त आणि ऑक्सिजनची तातडीची गरज असतानाही या महिलेला उपचारासाठी तसेच थांबून राहावे लागले. विशेष म्हणजे तातडीच्या आणि गुंतागुंतीच्या वेळी अशा रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर देणे आवश्यक असतानाही या रुग्ण महिलेसोबत डॉक्टर दिलेला नव्हता. त्यामुळे पालघरचा आरोग्य विभाग किती निष्क्रिय आहे आणि किती बेपर्वाईने काम करतो हे यातून दिसून आले. आरोग्य विभागाकडून हेळसांड रुग्णवाहिका चालकाने पर्यायी रुग्णसेवेसाठी प्रयत्न केला; परंतु त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पालघर जिल्ह्यातील आरोग्यव्यस्थेची स्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय आदीमध्ये डॉक्टरांची कमतरता असते. वेळेवर ‘ऑन कॉल’ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे एका गर्भवती महिलेला उपचारासाठी कसे दोन-तीन तास फिरावे लागले आणि शेवटी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला, हे गेल्याच महिन्यात उघडकीस आले होते. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी या प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल आरोग्य उपसंचालकाकडे पाठवला असला, तरी अद्याप त्यावर कार्यवाही झाली नसताना आता पुन्हा रुग्णसेवेच्या हेळसांडीचा प्रकार उघडकीस आला आहे. मुले, महिला, वयोवृद्धांना फटका आदिवासी, दुर्गम भागामध्ये रुग्णसेवा तातडीने पोहोचणे आवश्यक आहे; परंतु अशाच भागामध्ये रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याने गंभीर रुग्णांना जीव गमावा लागण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. विशेषतः गर्भवती महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसला आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी त्यावर अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. आरोग्य विभागाने तातडीने रुग्णवाहिकाची दुरुस्ती, आरोग्य विभागात पुरेसे मनुष्यबळ आणि आरोग्य केंद्राची उभारणी करण्याची आवश्यकता आहे. आ. वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या पालघर जिल्ह्यातील  डहाणू व अन्य ठिकाणच्या आरोग्य संदर्भातील तक्रारीची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गांभीर्याने दखल घेतली असल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात मात्र अजून आरोग्य विभाग पुरेसा हललेला दिसत नाही, हे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. १०८ रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे महिलेला एक ते दीड तास उपचारा अभावी ताटकळत रहावे लागले ही बाब गंभीर आहे याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. रुग्णवाहिकेमधील महिलेवर योग्य उपचार करावे याबाबत डहाणू उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना सूचना केल्या आहेत. १०८ रुग्णवाहिकेच्या दयनीय अवस्थेबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत वरीष्ठ कार्यालयाला अनेकदा अहवालही पाठवले आहेत डॉ.रामदास मराड, जिल्हाशल्य चिकित्सक पालघर

हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त महिला मेळावा

योगेश चांदेकर पालघर- डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील पांचाळ समाज सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.  महिला ही अबला नसून ती माता लक्ष्मी, सरस्वती, जगदंबा, दुर्गा, चंडिका, रणचंडी चे रूप आहे.  महिला सक्षमीकरण महिलांचा सन्मान, समान हक्क, त्यांचा अधिकार आहे. आई , बहीण, सून, मैत्रीण, पत्नी, अशा विविध भूमिका ती निभावत असते, आणि आपल्या कुटुंबाला तसेच समाजाला आधार देत असते, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र गावित यांनी केले. या महिला मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, राज्यमंत्री मनीषा ताई निमकर, वैदही वाढाण, सहसंपर्क प्रमुख केदार काळे, तालुका प्रमुख रवी चौधरी, संजय चौधरी, शिवसेना युवा प्रमुख साइराज पाटील, पालघर शहर प्रमुख राहुल घरत, शहर महिला संघटिका दीपा पमाळे, भारती सावे, नीलम म्हात्रे, सर्व शिवसेना पदाधिकारी, युवा सेने पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

जव्हार येथे उत्साहात “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन

जव्हार येथे उत्साहात “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन योगेश चांदेकर पालघर- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३२ व्या मन की बात कार्यक्रमाचे आज जव्हार येथे उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक श्रवण करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  माधवी  नाईक, जिल्हाअध्यक्ष भरत राजपूत, पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सवरा, भाजपचे ज्येष्ठ नेते  बाबाजी काठोले, विक्रमगड विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिश्चंद्र भोये तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संवादातून देशाच्या प्रगतीचा वेग, सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कथा आणि राष्ट्रनिर्मितीची नवी दिशा यांचा सखोल आढावा घेण्याची संधी मिळाली. प्रत्येक वेळेसारखेच, या कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली.