Month: April 2024

सांगा हे पैशे कुणाचे ?

मुंबई : महाराष्ट्रात आदर्श लोकसभा लागू होताच निवडणूक आयोगाकडून त्याची कडक अंमबाजवाणी सुरु आहे.  निवडणूकीच्या काळात पन्नास हजार रुपायांहून अधिकची कॅश सोबत बाळगण्यास बंदी आहे. आणि ती सोबत असेल तर त्याबाबतची संबधित कागदपत्र सोबत असणे…

महायुतीत जागावाटपाचा तीढा कायम

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली असली तरी अजुनही महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीच्या पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा अद्याप ही बाकी आहे. दक्षिण मुंबईतून…

गद्दारांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये- आदित्य ठाकरे

कोल्हापूर : “आमच्यावर जे खोटे आरोप करतात त्यांच्याकडे कुणी लक्ष देण्याची गरज नाही. खोटारड्यांकडे लक्ष देऊ नका. एका प्रश्नाचं उत्तर मला घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी द्यावं, आमच्याकडून फुटून गेल्यानंतर गद्दार गँगमध्ये एकजण गेला.…

ठाण्यात कोण ? सस्पेंस कायम

ठाणे: एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबतचा सस्पेंस रविवारीही कायम राहीलाय. अवघ्या २२ दिवसावर मतदान येऊन ठेपलेय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे यांनी…

भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर

राज्यात ठाकरे, पवारांसाठी सहानुभूतीची लाट मुंबई: आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज महायुतीलाच घरचा आहेर दिला.आहे. निवडणूक एन टप्यात असतानाच राज्यात उध्दव ठाकरे आणि शरद पवार…

पावसाळ्यापूर्वी रखडलेली कामे पूर्ण करण्याचे निर्देश

उल्हासनगर महापालिका आयुक्त आणि ठेकेदारात बैठक उल्हासनगर – महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी महापालिका ठेकेदारांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या एकून घेतल्या. तसेच पावसाळ्यापूर्वी अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश देऊन यापुढे रस्ते न खोदण्याच्या सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शुक्रवारी महापालिका सभागृहात कंत्राटदार व ठेकेदार असोसिएशनची बैठक बोलाविली होती. पावसाळा तोंडावर आला असून त्यापूर्वी शहरातील विकास कामे पूर्ण करा. असा सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला केले. तसेच त्यांच्या समस्या एकून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. महापालिका बांधकाम विभागामार्फत रस्त्याची तर पाणीपुरवठा विभागामार्फत मलनिस्सारण योजनेची कामे सुरू आहेत. दोन्ही विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवून कामे केल्यास समस्या निर्माण होणार नाही. असा सल्ला महापालिका अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना आयुक्त शेख यांनी दिला. पावसाळ्यापूर्वीची कामे वेळेत करण्यात यावीत, तसेच नवीन खोदकाम करण्यात येवू नये, रस्त्यावर धूळ होणार नाही. याची खबरदारी घ्यावी, नागरिकांना वाहतूक कोंडीची त्रास होणार नाही. यासह दक्षता व सुरक्षा विषयक साधनांचा वापर करावा. अशा सूचना यावेळी आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. महापालिका ठेकेदाराच्या बैठकीत आयुक्त अजीज शेख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे यांनी ठेकेदारांच्या समस्यांबाबत आढावा घेतला. यावेळी उपायुक्त किशोर गवस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तरुण शेवकानी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, ठेकेदार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लडाख, सोनु खटवाणी, शशी जगत्यांनी, प्रभु चंद्राणी यांच्यासह अन्य ठेकेदार उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार असेही आयुक म्हणाले.

सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी उत्तम समन्वय साधून

लोकसभा निवडणूका शांततेत पार पडतील या दृष्टीने काम करा.. ठाणे : देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून शेवटच्या पाचव्या टप्यातील निवडणुका येत्या 20 मे 2024 रोजी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी, 24-कल्याण, 25-ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुका नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे, सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय साधावा, असे निर्देश ठाण्यात दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी आज बैठकीत दिले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. अशोक  शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृह, नियोजन भवन येथे निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस 23 भिवंडी मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन मांझी, 24 कल्याण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक श्री. चंद्र प्रकाश मीना व श्री.राहील गुप्ता उपस्थित होते. तसेच पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) डॉ. धोंडोपंत स्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी 23-भिवंडी संजय जाधव, 24-कल्याण सुषमा सातपुते, 25-ठाणे मनिषा जायभाये, नोडल अधिकारी कायदा व सुव्यवस्था दीपक क्षीरसागर, नोडल अधिकारी आदर्श आचारसंहिता विजयसिंह देशमुख तसेच आयकर विभाग,  पोलीस विभाग- ठाणे नवी मुंबई, मिरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालय, केंद्रीय वस्तू व सेवाकर, महसूल, गुप्तचर संचालनालय, सीमा शुल्क व केंद्रीय उत्पादन शुल्क, अंमली पदार्थ नियंत्रक ब्युरो, अंमलबजावणी संचालनालय, राज्य उत्पादन शुल्क, वस्तू व सेवाकर, राज्य परिवहन विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक ठाणे, खर्च संनियंत्रण समिती 23-भिवंडी, 24-कल्याण, 25-ठाणे आदी सर्व विभागांचे जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व  विभागांच्या जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडून सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा चारही निरीक्षकांनी घेतला. लोकसभा निवडणूक 2024 या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कशा प्रकारे कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले. तसेच मुंबईची जीवनवाहिनी ही लोकल सेवा असून ठाणे, कल्याण, उल्हासनगर या परिसरात अनेक रेल्वे स्टेशन्स आहेत या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कॅशची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करीत रेल्वे स्टेशनवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.  मतदानाचे शेवटचे चार दिवस हे  अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीएफची कुमक वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले. 137 भिवंडी, 146 ओवळा, 150 ऐरोली हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असून या ठिकाणच्या नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सर्व विभागांचे अधिकारी हे आपापले काम करीत असताना जर एखादी बाब आपल्या अखत्यारित नसेल पण जर त्या ठिकाणी काही आढळून आल्यास ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने कळविण्यात यावे. आपण सर्वजण करीत असलेले निवडणुकीचे काम हे टीम वर्क आहे. त्यामुळे व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत प्रत्येकांने काम करावयाचे आहे, असेही केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी नमूद केले. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व खर्च निरीक्षकांचे स्वागत केले. प्रास्ताविक खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी सत्यवान उबाळे यांनी केले. सूत्रसंचलन मुख्य वित्त व लेखा अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी केले. बैठकीच्या शेवटी एकत्रित मीडिया कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण नोडल अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी उपस्थित केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक आणि उपस्थित नोडल अधिकाऱ्यांचे आभार मानले.

‘निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करा’

अशोक गायकवाड कर्जत : मावळ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे व कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रबोधन करणे व निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करा, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाही बळकटीसाठी समाजातील सर्व स्तरातील जनतेचा सहभाग आवश्यक आहे .संपूर्ण भारत देशात सध्या लोकशाहीचा उत्सव निवडणुकीच्या माध्यमातून साजरा होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रबोधन करणे व निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करणे या दृष्टीने स्वीप (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्राम) कार्यक्रमांतर्गत सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी ३३ मावळ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे व कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघ १८९ कर्जत मधील नेरळ तलाठी कार्यालयापासून नेरळ बाजार पेठ मध्ये भव्य प्रभात फेरी (रॅलीचे) आयोजन करण्यात आले होते.तसेचं नेरळ येथील धारप सभागृहात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वीप अंमलबजावणी अंतर्गत ३३ मावळ लोकसभा मतदारसंघामधील १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील कर्जत,नेरळ, चिंचवली,कडाव, कशेळे, कळंब पाथरज या महसुली मंडळात शहरी व ग्रामीण भागात आदिवासी वाडी वस्तीवर मतदार जनजागृती साठी प्रत्यक्ष दिव्यांग मतदार व ८५ अधिक वयोमान असणाऱ्या मतदारांच्या गृहभेटी घेऊन त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच सायकल रॅली व विविध रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करून मतदान विषयी मतदारास प्रोत्साहन देण्याकरता विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत नेरळ येथे काढण्यात आलेली प्रभात फेरी( रॅली) मध्ये कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, नेरळ पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे , मंडळ अधिकारी नेरळ संतोष जांभळे , कळंब मंडळ अधिकारी अरुण विशे, चिंचवली मंडळ अधिकारी वैशाली पाटील, विकास गायकवाड अनिल कांबळे, उमेश कुमार भोरे, वैशाली मांटे माधुरी चौधरी तलाठी , नेरळ ग्रामसेवक कार्ले , अंगणवाडी सेविका ,अशोक भगत, दिपक पेरणे ,शासकीय कर्मचारी, महिला बचत गटातील महिला व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृतीच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

भाईंदर : परदेशात नोकरी देण्याचा बहाण्याने विविध राज्यांतील लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भाईंदर पूर्व येथील नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील एक इमारतीत ईगल प्लेसमेंट सर्व्हिसेस यांचे कार्यालय होते. या कार्यालयाकडून परदेशात नोकरी देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले. त्याला भुलून विविध राज्यातील गरजूंनी कंपनीशी संपर्क साधला. या प्रत्येकाकडून ७० ते ८० हजार रुपये उकळण्यात आले. या सर्वांना विमानाची तिकिटे आणि व्हिसाही देण्यात आला. त्यांचा पासपोर्ट मात्र काढून घेण्यात आला. पासपोर्ट विमानतळावर देण्यात येईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र विमानतळावर गेल्यावर तिकीट रद्द झाले असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व फोन बंद व कार्यालयाला कुलूप असल्याचे दिसून आले. आपण फसविले गेल्याचे समजल्यावर शंभरहून अधिक लोकांनी तक्रार केल्यानंतर नवघर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका वास्तूंच्या सुरक्षा आणि सौंदर्यासाठी कायापालट मोहीम

ठाणे : नागरिकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वागळे प्रभाग समिती कार्यालयात घेतला. त्यावेळी, नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची नवीन इमारत आणि कोपरी उप समिती प्रभाग कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती या दोन्ही गोष्टी प्राधान्याने हाती घेण्यात याव्यात. त्याचा प्रस्ताव जलद गतीने सादर करून आचारसंहिता पूर्ण झाल्यावर त्याच्या मंजुरीची, निधीसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी. नागरिकांना चांगले प्रशासकीय कार्यालय मिळणे आवश्यक असल्याचेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.तसेच, महापालिकेच्या ज्या वास्तू जुन्या झाल्या आहेत त्यांचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक आहे. म्हणूनच, नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी. इमारतीची दुरुस्ती, अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी, प्रवेश आणि निकास मार्गिका, पार्किंग, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा यांच्या बद्दलचा सविस्तर आराखडा येत्या महिनाभरात बांधकाम विभागाने तयार करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. नागरिकांना महापालिकेच्या वास्तूंमध्ये यावेसे वाटले पाहिजे, असेही ते म्हणाले. कोपरी आणि नौपाडा क्षेत्रातील सी वन या अतिधोकादायक वर्गवारीतील २६ इमारती अजूनही व्याप्त आहेत. त्यात, १७८ कुटुंबे आणि ६७ दुकाने आहेत. यांचे निष्कासन करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात यावा. त्याची गांभीर्याने अंमलबजावणी केली जावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले. तत्पूर्वी, परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहायक आयुक्त सोपान भाईक यांनी कोपरी – नौपाडा प्रभाग समिती क्षेत्राबद्दल सादरीकरण केले. तसेच, उपनगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे, विनोद पवार, शुभांगी केसवानी यांनी विविध प्रकल्प, पाणी पुरवठा, वीज व्यवस्था यांचा आढावा घेतला. या बैठकीला, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे आदी प्रमुख अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.