Month: April 2024

मुंबई कोस्टलचे ‘मिशन महाकाय’ यशस्वी !

मुंबई : कधी सागरांच्या लाटांचा तडाका तरी कधी धरणीमातेंनी घेतलेली सत्वपरिक्षा अशा अग्निदिव्यातून पुर्णत्वाच्या दिशेने निघालेला मुंबई कोस्टल रोडवरील सर्वात महत्वाचे आणि एतिहासिक असे मिशन महाकाय अखेर शुक्रवारी २६ एप्रिलच्या पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी यशस्वी झाले.…

सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या; उमदेवारांना मात्र दिला दिलासा

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने ईव्हिएमच्या विरोधात सर्व याचिका आज फेटाळून लावल्या. ईव्हिएमव्दारे मतमोजणी न करता व्हिव्हिपॅट मधील मतपावत्यांची शंभर टक्के मोजणी करा ही याचिकाकर्त्यांची मुख्यमागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत…

एमए शिकलेल्या युवकाचा ईव्हीएमवर कुऱ्हाडीचा घाव

नांदेड : नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रात एमए शिकलेल्या एका युवकाने एन मतदान सुरु असताना व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडल्या. भानुदास एडके असे या व्यक्तीचे नाव…

ईव्हिएमवर ठाण्यात साप तर नांदेडमध्ये कुऱ्हाड !

ठाणे : शुक्रवारचा दिवस ईव्हिएमचा होता. एकीकडे सुप्रीम कोर्ट ईव्हिएमवर विश्वास दाखवित असतानाच आज नांदेडमध्ये एका एमए झालेल्या युवकाने मतदान सुर असताना कुऱ्हाडीचे घाव घालून ईव्हीएमचे दोन तुकडे केले तर…

राज्यात हिवताप रुग्णांच्या मृत्यूमध्ये घट

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह राज्यातील हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून हिवतापामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे. राज्य सरकार हिवतापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवीत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. या मोहिमेला मागील काही वर्षांपासून यश मिळताना दिसत आहे. यामुळे हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याची माहिती आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्यात २०२१ मध्ये हिवतापाने १४ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र २०२२ मध्ये हिवतापामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २६ वर पोहोचली. यात २०२३ मध्ये घट होऊन ती १९ वर आली. २०२४ मध्ये आतापर्यंत हिवतापाचे २ हजार ६५० रुग्ण सापडले असून, एकाही मृत्यू दगावलेला नाही. ॲनोफिलिस डासामुळे हिवतापाचा प्रसार ॲनोफिलिस डास चावल्याने हिवतापाचा प्रादुर्भाव होतो. हिवतापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून सोसायटी व इमारतीमधील पाण्याच्या टाक्यांच्या परिसरातील डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांमध्ये जागरूकता करण्यात येत आहे.

पाणपोईसाठी बाजारात रांजणच मिळेना

ठाणे : वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची तहान भागविण्यासाठी ठाणे पालिकेने पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने शहरात १५० तात्पुरत्या पाणपोई उभारण्याचे नियोजन आखले आहे. त्यापैकी तीन पाणपोई उभारल्या आहेत; मात्र इतर ठिकाणी पाणपोई उभारण्यासाठी आवश्यक असलेले रांजणच बाजारात उपलब्ध नसल्यामुळे पाणपोई उभारायची कशी, असा पेच पालिका प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. दिवसेंदिवस ठाणे शहराच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. त्यात शहरातील उष्णतेचा पार ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तर रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे याची दक्षता घेत ठाणे पालिकेने नागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून १५० ठिकाणी पाणपोई सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. त्यापैकी ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा-आईस फॅक्टरी, तीन हात नाका – सिग्नल शाळेसमोर या तीन ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू केली आहे. पाणपोईसाठी आणखी २५ ठिकाणांची निवड पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने केली आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांबरोबर पालिकेने चर्चा सुरू केली आहे. या संस्थांही पाणपोई उभारणीसाठी पुढे येत आहेत. बाजारात छोटी मडकी उपलब्ध आहेत; मात्र पाणपोईसाठी १०० ते ७५ लिटरच्या रांजणची आवश्यकता आहे, ते बाजारात उपलब्ध होत नसल्याने पालिकेपुढे पाणपोई उभारणीचा पेच निर्माण झाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. पाणपोई आहे; पण पाणीच नाही सध्याच्या घडीला ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा-आईस फॅक्टरी, तीन हात नाका – सिग्नल शाळेसमोर या तीन ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू केली आहे. त्यात दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संस्थांमार्फत करण्यात येत आहे. अशातच ठाणे स्थानकात १०० लिटरचे रांजण ठेवून पाणपाई उभारण्यात आली आहे; मात्र त्यात पाणीच उपलब्ध नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेमार्फत जनजागृती तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासन, ठाणे महापालिका, काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायर्नमेंट ॲण्ड वॉटर या संस्थेने एकत्रितपणे सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी उष्माघात, लक्षणे, घ्यायची काळजी यांची माहिती देणारे फलक, डिजिटल बोर्ड लावले आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून सर्व गृहसंकुलांपर्यंत ही माहिती पोहोचवली जात आहे.

उल्हासनगर महापालिकेचे माझी वसुंधरा अभियान

उल्हासनगर : महापालिका पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांचे शिक्षक यांना पर्यावरण दुत म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली. उल्हासनगर महापालिका पर्यावरण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर व प्रदुषणमुक्त व्हावे, यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी दिली. महापालिका महासभा सभागृहामध्ये शुक्रवारी महापालिका शाळांतील शिक्षक प्रतिनिधी यांचेकरीता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. प्रशिक्षणानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील विविध कृतीमधुन पर्यावरणाविषयी जनजागृतीचे धडे देणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पालक, पालकांमार्फत त्यांचे आप्तेष्ट शेजारी आदींना जनजागृती होण्यास मदत होणार आहे. असे आयुक्त अजीज शेख म्हणाले. शिक्षक हे पर्यावरण दुत म्हणून महत्वाचा घटक असुन प्रशिक्षण कार्यक्रमा नंतर ३७ शिक्षकांना पर्यावरण दूत म्हणून घोषित करुन प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे. पर्यावरण प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉ. सिमा कांबळे, प्राचार्य डी.डी. विपुते आदींनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन पर्यावरण विभागामार्फत इन्फिनिटी रिलेशन्स या संस्थेमार्फत करण्यात आले होते. तथापि, सदर कार्यक्रमासाठी पर्यावरण विभागप्रमुख विशाखा सावंत, जनसंपर्क अधिकारी, छाया डांगळे आदीजन उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील तिन्ही लोकसभांच्या उमेदवारीसाठी १३४ उमेदवारी अर्ज वाटप

दोघांची उमेदवारी दाखल ! ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभेच्या उमेदवारी (नामनिर्देशन) अर्जाचे  तेथील कार्यालयांमधून वाटप केले जात आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ठाणे लोकसभेसाठी ४३ अर्ज, तर कल्याणसाठी ३७,आणि भिवंडी लोकसभेच्या उमेदवारीसाठी ५४ अर्ज आदी मिळून आजच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याभरातून १३४ उमेदवारी अर्जांचे वितरण ठिकठिकाणच्या निवडणूक कार्यालयातून झाले आहे. इच्छुकांकडून अर्ज घेऊन जाण्याची संख्या अधिक असूनही त्यापैकी आज फक्त् दोन जणांचे उमेदवारी अर्ज कल्याणला जमा करण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यालयांसह इच्छुक अपक्षांनी आजच्या पहिल्या दिवशी मात्र उमेदवारी अर्ज घेऊन जाण्याची भूमिका पार पाडली आहे. तर कल्याणमध्ये दाेघांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) या पक्षाकडून सुशिला कांबळे यांच्यासह राईट टू रिकॉल पार्टीचे अमित उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लाेकसभेच्या निवडणुकसाठी आज दाखल झाला, असे निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी सांगितले. यासह आज दिवसभरात या कल्याण लाेकसभेसाठी दिवसभरात ३७ उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात ओले आहेत. यामध्ये अपक्षांकडून १६ अर्ज घेण्यात आले आहेत. तर शिवसेना, बहुजन समाज पार्टीने (आंबेडकर), पिपल्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रत्येकी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर बहुजन समाज पार्टीच्या प्रतिनिधीने तीन आण दलित पँथरच्या प्रतिनिधीने दाेन उमेदवारी अर्ज घेतले आहेत. याशिवाय लोकराज्य पार्टी, राईट टू रिकाॅल पार्टी, राष्ट्रीय किसान बहुजन एसपार्टी आणि बहुजन मुक्ती पार्टी आदी पक्षांच्या प्रतिनधीने प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज घेतल्याची नाेंद भिवंडी लाेकसभेच्या उमेदवारीसाठी आज सर्वाधिक म्हणजे ५४ उमेदवारी अर्ज गेले आहेत. यामध्ये भाजपाकडून तीन अर्ज नेण्यात आलेले आहेत. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सात अर्ज, धनवान भारत पार्टीने एक अर्ज, सायुंकत भारत पक्षाकडून एक, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीने चार, राष्र्टवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाकडून पाच अर्ज नेण्यात आलेले आहे. याप्रमाणेच पिल्पलस पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी तीन, किसान पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी प्रत्येकी एक अर्ज, लोकराज्य पार्टीकडून दाेन तर अपक्षांकडून २६ अर्ज नेण्यात आले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ४३ उमेदवारी अर्ज संबंधिताना वितरीत करण्यात आले, असे ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी सांगितले. यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चार उमेदवारी अर्ज आज घेतले आहे. तर पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकने तीन अर्ज घेतले. याप्रमाणेच बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, संयुक्त भारत पक्ष, रिपब्लिकन बहुजन सेना, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, भारतीय जवान किसन पार्टी आदी पक्षांच्या इच्छुकांनी प्रत्येकी दाेन उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तर भारतीय राजनिती विकास पार्टी, आम आदमी पार्टी, भूमिपूत्र पार्टी, बहुजन शक्ती, हिंदुस्थान मानव पक्ष आदी पक्षांच्या इच्छुकांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज घेतलला आहे. या छाेट्यामाेठ्या राजकीय पक्षांप्रमाणेच अपक्ष उमेदवारांनी तब्बल १९ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

‘दोस्तीका’ गठबंधनाची स्टिकर्स झळकली

टीम ओमी कलानी-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर – ओमी कलानी यांनी महायुतीतील कल्याण लोकसभेचे शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बिनशर्त पाठींबा दिला आहे. दोस्तीच्या या पाठिंब्यामुळे शिवसेना वगळून महायुतीतील घटक पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच, उल्हासनगरातील टीम ओमी कलानी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दोस्तीका गठबंधनाची स्टिकर्स झळकली आहेत. या स्टिकर्सचे अनावरण करतानाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटल्याची प्रतिक्रिया डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तीन चार दिवसांपूर्वी कलानी महलवर झालेल्या टीम ओमी कलानीच्या कार्यकर्ता मेळाव्यात दोस्तीच्या भावनेतून महाविकास आघाडीचा भाग असलेल्या कलानी परिवाराने डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला. तेंव्हा ओमी कलानी हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस असल्याची शाबासकी डॉ. शिंदे यांनी दिली होती.याच मेळाव्यात डम्पिंग ग्राउंड, भूमिगत वाहनतळ, दफनभूमी, धोकादायक इमारत, उत्तर भारतीय भवन, म्हारळ गाव ते वडोल गाव उन्नत महामार्ग अश्या सहा समस्या सोडविण्या संबंधी गॅरंटीची मागणी टीओकेकडून मनोज लासी यांनी केली. पेट्रोल पंपावर बॅनर लावून जे गॅरंटी देतात त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, आमचा विश्वास फक्त खासदार श्रीकांत शिंदेंवर असल्याची टिका मोदी यांचे नाव न घेता टीका टीओके प्रवक्ता कमलेश निकम यांनी केली होती. याबाबतची नाराजी महायुतीतील भाजप, रिपाई आठवले गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी व्यक्त करीत महायुतीच्या जव्हार हॉटेल येथे पार पडलेल्या समन्वय बैठकीत टिओकेचा बॉयकॉट केला होता. यावरून मास मीडियावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री, टीओकेचे कमलेश निकम, मनोज लासी आमनेसामने आले होते. दरम्यान टीओकेच्या मेळाव्याला काही दिवस झाले असतानाच टीम ओमी कलानी-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दोस्तीका गठबंधनाची 5 हजार स्टिकर्स झळकली आहेत. कारच्या मागील काचेवर ही स्टिकर्स चिकटवण्यात येणार आहेत. त्यावर डॉ. श्रीकांत शिंदे,ओमी कलानी या दोघांची फोटो असून धनुष्यबाण ही निशाणी दिसत आहे. डॉ. शिंदे यांनी या स्टिकर्सचे अनावरण त्यांच्या डोंबिवली निवासस्थाना समोर केले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, टीओकेचे कमलेश निकम, मनोज लासी, नरेंद्रकुमारी ठाकूर, अजित माखिजानी, संतोष पांडे, अवि पंजाबी, सुंदर मुदलियार आदी उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६१३ योजनांची कामे पूर्ण – डॉ.  भरत बास्टेवाड

अलिबाग :जल जीवन मिशन अंतर्गत ६१३ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पुढील महिनाभरात ४९ योजनांची कामे पूर्ण होतील. सुरू असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ठेकेदार अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी व्यक्त केले आहे. रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ४९६ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी ६१३ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४० योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन, घराघरात नळ कनेक्शन दिल्याने ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला आहे. जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत. या योजनेच्या माध्यमातून १५ तालुक्यांमध्ये १ हजार ४९६ योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील ६१३ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून, योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.