Month: May 2024

…तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते

मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका धुळे : पाचशे रुपयांचे सिलेंडर अकराशे रुपये केले. आदिवासी शेतकऱ्यांना तुम्ही मारहाण केली. शेतकऱ्यांच्या सगळ्याच वस्तू मोदींनी महाग केल्या. मोदी है तो मुमकिन है लेकिन…

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या या कलाकाराने स्टेजवरुनच…

‘‘चंद्रकांत पाटील फक्त तेरे नाम’ भांग पाडून फिरत असतात’’

जरांगे पाटलांनी उडवली खिल्ली मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे राज्यातील कोट्यवधी मराठा बांधवांचे लक्ष लागले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांचे तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले…

मीरा भाईंदरची जनता विकास कामांना देणार साथ-राजन विचारे

मीरारोड- मीरा भाईंदरमध्ये गेल्या १० वर्षात खासदार म्हणून केलेल्या कामांची जनतेला कल्पना आहे. येथील जागरूक जनता यावेळी देखील आपली साथ देईल असे उद्धवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रचार फेरी दरम्यान…

राज ठाकरेंचा ठाण्यात आता  ‘लाव रे तो व्हिडीओचा पार्ट 2’

ठाणे : मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आता ‘लाव रे तो व्हिडीओ’ चा सिझन 2 ठाण्यात सुरू केले. फक्त त्यातील पात्र आता भाजपा नसून ठाकरे सेना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त…

मोदींनी सांगितली ‘राज की बात’

मुंबई : राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, त्यांनी यापूर्वीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही देशासाठी चांगले काम केले आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. आमच्या विचारांना तसेच आमच्या द्रष्टेपणाला ते पाठिंबा देतात. महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील, असे…

लोकसभेच्या ११ जागांसाठी आज मतदान

मुंबई: लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या सोमवारी १३ मे रोजी देशभरातली ९६ लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील ११ जागांचा समावेश आहे. रावसाहेब दानवे, अमोल कोल्हे, आढळराव पाटील, पंकजा मुंढे, चंद्रकांत…

उल्हासनगरात ‘कोणार्क एनव्हायरा’ कंपनीच्या कामगारांचे आंदोलन

उल्हासनगर : महापालिका कचरा उचलणे व सफाईचे काम करणाऱ्या कोणार्क एनव्हायरा कंपणीच्या कंत्राटी कामगारांनी आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. निवडणुक आचारसंहिता मध्ये आंदोलनास पोलिसांनी मनाई करून कर्मचारी व कंपनी प्रशासनात मध्यस्थी करून त्यांचा प्रश्न मिटविला आहे. उल्हासनगर कचरा मुक्त या संकल्पनेखाली शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिला असून वर्षाला १८ कोटींपेक्षा जास्त महापालिका कचरा उचलण्यावर खर्च करते. याशिवाय प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत सफाईचे खाजगीकरण करून साफसफाईचा ठेका कोणार्क कंपनीला दिला. त्यावर वर्षाला ११ कोटीचा खर्च होतो. कोणार्क ग्रीन एनव्हायरा कंपनीच्या कामगारांनी आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ अचानक महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. मात्र निवडणूक आचारसंहिता काळात आंदोलन नको. अशी भूमिका पोलिसांनी घेतल्यावर सर्व कामगारांनी महापालिकेहून मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून, तेथे ठिय्या दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थीची भूमिका वठवून कोणार्क कंपणीच्या प्रशासन सोबत चर्चा केली. अखेर कंपनी प्रशासनाने आरोग्य सुविधा देण्याचे मान्य केले आहे. महापालिकेतील लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी कामगारांच्या आंदोलना नंतर कंपनी प्रशासनाने आरोग्य सुविधा देण्याचे माण्य केल्याचे सांगून आंदोलन मागे घेतले. शहरातील कचरा उचलणे, साफसफाईचे खाजगीकरण, डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा सपाटीकरण करणे आदी कामावर कोट्यवधीचा खर्च महापालिका करूनही समस्या जैसे थे आहेत. डम्पिंग वरील आग कायम असून शहर कचरा मुक्त झाले नाही. तसेच प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील साफसफाईचे खाजगीकरण करूनही शहरात कचऱ्याचे साम्राज्य व दुर्गंधी कायम आहे.

ठाणे शहरात शाहू मार्केट परिसरात नाका कामगारांमध्ये मतदान जनजागृती

ठाणे : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू मार्केट नौपाडा परिसरात नाका कामगारा सोबत मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी परिसरातील कामगारांनी मतदान करुन आपला हक्क बजवावा, मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. आणि २० मे को सब काम छोडो मतदान करो अशा घोषणा देत मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. कोणत्याही मतदाराला त्यांच्या मतदानाच्या लोकशाही अधिकारापासून वंचित ठेवता कामा नये आणि त्यामुळे मतदानाचा दिवस सर्वांसाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे,” लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवहान सर्व उपस्थित कामगारांना  सहायक प्रकल्प अधिकारी तानाजी सोनवलकर यांनी केले. सदर मतदान जनजगृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या नाका कामगारांना मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा.या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले.

मत मागणाऱ्यांनो, लोकलमधून प्रवास करुन दाखवावा

मुंबई : गर्दीमुक्त प्रवास केव्हा नशिबी येणार, लोकलमधील प्रवाशी मृत्यू केव्हा थांबणार, लोकल वेळेवर केव्हा धावणार, असे सवाल सर्वसामान्य प्रवाशांतून राजकीय पक्षांना विचारले जात आहेत. तसेच निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांनी अगोदर लोकलच्या गर्दीतून प्रवास करून दाखवावा, त्यानंतर मते मागावीत, अशा प्रतिक्रिया मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशी व्यक्त करत आहेत. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने सीएसटीएम ते अंबरनाथ प्रवास केला. या प्रवासातून रेल्वे प्रवाशांच्या भावना जाणून घेतल्या. लोकल सेवा ही मुंबई शहराची जीवनवाहिनी आहे. हीच लोकल दिवसाला सरासरी ८ ते १० जणांचे जीवही घेत आहे. दररोज १० ते १२ प्रवाशी जखमी होतात. गेल्या काही वर्षांत ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. त्या तुलनेत लोकल सेवेत फारशा सुधारणा झाल्या नाहीत. वाढत्या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करावा लागतो. परिणामी, प्रवासी धावत्या लोकलच्या दरवाजातून पडणे, बाहेरील खांबाचा जोरदार फटका बसण्याच्या घटना घडत आहेत. मुंबईत २०२३ या वर्षात विविध रेल्वे अपघातांत २, ५९० प्रवाशांचा मृत्यू; तर २,४४१ प्रवासी जखमी झाले. याकडे कुणाचेच लक्ष नाही. सध्या दररोज मध्य रेल्वेवर १,८१० लोकल फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवर १,३९४ लोकल फेऱ्या धावतात. दोन्ही मार्गांवर ६० ते ७० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र, मेल-एक्स्प्रेसला महत्त्व देण्यात येत असल्याने सकाळी बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, कसारा आणि कर्जतवरून येणाऱ्या लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना दररोज लेटमार्क लागतो. लोकलचे वेळापत्रक विस्कळित होणे नित्याचीच बाब झाली असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मुंबईतील लोकलमधील गर्दी कमी करण्याकडे कुणाचेही लक्ष नाही. प्रवाशाचा मृत्यू होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. निवडणुका संपल्यानंतर एकही खासदार लोकसभेत लोकल प्रवाशांच्या समस्या मांडताना दिसत नाही. – अन्ना सावंत, प्रवाशी लोकल विलंबाने धावत असल्यामुळे लोकलमधील गर्दी वाढते. त्यामुळे काही प्रवासी लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करतात. त्यात अनेकांचा खाली पडून मृत्यू होतो. लोकल वक्तशीरपणे चालल्या पाहिजेत. – रोशन लिखार, प्रवासी प्रवासी सोयी-सुविधा केव्हा ? मुंबईतील असंख्य रेल्वेस्थानकांवर पिण्याचे शुद्ध पाणी, सरकते जिने, स्वच्छतागृहे, लिफ्ट यांसारख्या प्रवाशी सोयी-सुविधांची कमतरता आहे. यासोबत लोकलमध्ये गर्दुल्ले, मोबाईल, पर्स चोरांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यात अजूनही रेल्वेला पाहिजे तेवढे यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे प्रवासी सुविधायुक्त रेल्वेस्थानके केव्हा आकाराला येणार, असा सवाल मुंबईकरांचा आहे.