Month: May 2024

रिया गायकवाडचा अटकेपार झेंडा

अमेरिकेच्या बफेलो विद्यापीठात ऑनर्स स्टुडेंट कॉन्सीलच्या अध्यक्षपदी मुंबई (प्रतिनिधी):- लातुरचे माजी खा. अ‍ॅड. सुनिल गायकवाड यांची पुतणी रिया विजयकुमार गायकवाड हिची अमेरिकेच्या बॅफेलो विद्यापीठाच्या ‘ऑनर्स स्टुडेंट’ कौन्सीलच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी तिची अध्यक्षपदी निवड झाली आहे. रिया ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (बायोमेडिकल इंजिनिअरिंग) प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. सातसमुद्रापार तिने हे यश मिळविल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मा.खा. सुनिल गायकवाड, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिलकुमारजी बी. गायकवाड, विक्रांद टाइम्स व अग्रसेन टाइम्स परिवार, मुख्य संपादक अरुणकुमार एस. मुंदडा, लेखक मिलिंद काटे, ज्येष्ठ पत्रकार गुलाब भावसार, भागा वरखडे, राजीव मंडलिक, अण्णा सोमवंशी, चांद शेख, निलेश वाणी आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या यशाने गायकवाड कुटुंबीयाच्या मानात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

केजरीवालांच्या जामीनावर आज फैसला

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभेच्या निवडणूकीला कलाटणी देणारा निकाल आज सर्व्वोच्च न्यायालय सुनावणार आहे. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनअर्जावर सर्व्वोच्च न्यायालयाची आज सुनावणी होणार…

रोमहर्षक लढतीत अंबरनाथ रायझिंगने मारली बाजी

१२ वी ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा ठाणे : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने  गतविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) संघाचा ३ धावांनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.  विजयासाठी  १२५ धावांचा पाठलाग करणाऱ्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाला १२२ धावांवर रोखत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने पहिल्यांदाच विजेतेपदाच्या करंडकावर नाव कोरत ९९,९९९ रुपयांचे रोख बक्षीस मिळवले. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगीरी करणाऱ्या अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबच्या सामन्यातील आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. उपविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाला ५५,५५५ रुपयांवर समाधान मानावे लागले. अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करून मोठे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली होती. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यावरअपेक्षेप्रमाणे फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या अंबरनाथ क्रिकेट क्लबला पहिला धक्का पहिल्याच चेंडूवर मिळाला. अंजदीप लाडने सलामीची जोडी फोडत धावांचे खातेही न उघडलेल्या अंबरनाथ क्रिकेट क्लब ब संघाला अडचणीत आणले. पण या धक्क्यानंतर श्रीराज घरतने नाबाद ५० आणि परीक्षित वळसंगकरने २० धावा करत संघाला शतकी धावसंख्या उभारून दिली. अमित पांडे, धृमील मटकर, अमन खानने प्रत्येकी दोन आणि अंजदीप लाड, हेमंत बुचडे आणि अर्जुन शेट्टीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. माफक आव्हानाला सामोरे जाताना अमन खानने २२ धावांची खेळी करत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पण त्यानंतर थोड्या थोड्या क्रमाने फलंदाज बाद झाल्याने एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाची मधली फळी दडपणाखाली आली. या नाजूक परिस्थितीत विकी पाटीलने ३१ आणि आशय सरदेसाईने १८ धावा करत संघाला विजयाची आस दाखवली. पण हे दोघे बाद झाल्यावर जेत्या संघाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना डोके वर काढण्याची संधी मिळू दिली नाही. फलंदाजाना दबावाखाली ठेवताना परिक्षीत वळसंगकर आणि कर्णधार प्रथमेश महालेने प्रत्येकी तीन बळी मिळवले. दशरथ चव्हाणने दोन आणि सौद मंसूरीने एक फलंदाज बाद केला. संक्षिप्त धावफलक : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : १९.४ शतकात सर्वबाद १२५ ( श्रीराज घरत नाबाद ५०, परिक्षीत वळसंगकर २०, अमित पांडेय ४-३३-२, अमन खान २-१६-२, धृमील मटकर ४-२४-२  हेमंत बुचडे ४-१४-१, अंजदीप लाड २-१८-१, अर्जुन शेट्टी २.४- १५-१) विजयी विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) : २० षटकात ९ बाद १२२ ( विकी पाटील ३१, अमन खान २२, आशय सरदेसाई १८, परिक्षीत वळसंगकर ४-१-१५-३, प्रथमेश महाले ४-२३-३, दशरथ चव्हाण ४-२६-२, सौद मंसुरी १-९-१ ). सर्वोत्तम खेळाडू फलंदाज : आदित्य रावत ( बॉईज क्रिकेट क्लब, १८१ धावा). गोलंदाज : धृमील मटकर (अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब, ९ बळी). क्षेत्ररक्षक : अतुल सिंग ( एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब), ५ झेल).

ईव्हीएम माझ्या बापाची ! भाजपा नेत्याच्या मुलाचा मतदान केंद्रात धुमाकूळ

फेसबुक लाईव्ह करत केले बोगस मतदान भाजपाला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात जाऊन धमकावले पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या अहमदाबाद : गुजरातमधील दाहोद लोकसभा मतदार संघात लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगत भाजपा नेत्याच्या मुलाने…

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

महिला गटात चार व व पुरुष गटात चार संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश ठाणे : श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी  महिला गटात प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे), स्वराज्य स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), कर्नाळा क्रीडा (रायगड) व शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर)या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर पुरुष गटात मिडलाईन कर्जत (ठाणे), विजय काल्हेर (ठाणे), शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे) व स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) ह्या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला गटातील पहिल्या उप-उपांत्य लढतीत मुंबई उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाने धुळ्याच्या शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाचा अटीतटीच्या लढतीत ३३-३१ असा २ गुणांनी पराभव करून  उपांत्य फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाच्या याशिक पुजारीने उकृष्ट चढाया करीत आपल्या संघाला मध्यन्तराला १९-१० अशी ९ गुणांची आघाडी मिळवून दिली. तिला समृद्धी मोहितेने पक्कडीत सुरेख साथ दिली. मध्यन्तरानंतर   शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाच्या विद्या दोलताडे व ज्योती उफळे यांनी चतुरस्त्र खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवण्यात यश मिळवले. परंतु शेवटच्या दोन मिनिटात  राज्य स्पोर्ट्स क्लब संघाने अतिशय परिपक्व खेळाचे प्रदर्शन करीत सामना आपल्या बाजूने झुकवला . महिला गटातील दुसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या लढतीत पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने ठाण्याच्या आर एफ नाईक  संघाचा ४९-१८ असा ३१ गुणांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ह्या सामन्यात  प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघानेसुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत मध्यन्तराला २३-८ अशी १५ गुणांची घेतली ती अंकिता पिसाळ व हर्षी शेट्टी यांच्या उत्कुष्ट खेळामुळे.  मध्यन्तरानंतरही   प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने सामन्याची पक्कड घट्ट ठेवीत सामना ३१ गुणांनी जिंकला . महिला गटातील तिसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात ताकदवर अश्या मुंबई शहरच्या शिवशक्ती महिला संघाने ठाण्याच्या होतकरू मित्र मंडळाचा २८-२० असा ८ गुणांनी पराभव करीत गेल्या अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवीत श्री मावळी मंडळ स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. ह्या सामन्यात दोन्ही तुल्यबळ संघानी सुरुवातीपासूनच अतिशय सुंदर खेळाचे प्रदर्शन करीत सामन्यात रंगत आणली. मध्यन्तराला शिवशक्ती महिला संघाने प्रतीक्षा तांडेल व समृद्धी भागात यांच्या अष्टपैलू खेळामुळे १४-११ अशी ३ गुणांची नाममात्र आघाडी घेतली.  होतकरू मित्र मंडळाच्या   प्राजक्ता पुजारी व चैताली बोराडे यांनी खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. परंतु या दोघी आपल्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत. पुरुष गटातील उप-उपांत्य फेरीच्या लढतीत ठाण्याच्या मिडलाईन कर्जत संघाने वाशिंदच्या जय बजरंग क्रीडा मंडळाचा २४-२० असा ४ गुणांनी पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुरुवातीपासून सामना अतिशय दोलायमान असा झाला व गुणसंख्येचे पारडे दोन्ही संघाकडे फिरत होते. मिडलाईन कर्जत संघाच्या पवन अडेच्या  उत्कुष्ट चढाया, वैभव पाटील व वैभव मोरे ह्यांच्या सुंदर पक्कडीमुळेमध्यंतराला मिडलाईन कर्जत संघाने  १२-१० अशी २ गुणांची नाममात्र आघाडी घेतली.  मध्यन्तरानंतर दोन्ही संघानी अतिशय सावध खेळ करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न करीत होते. जय बजरंग क्रीडा मंडळाच्या दर्शन पवार व आशिष पाटील यांनी आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. परंतु आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. उत्कुष्ट चढाईपट्टू (पुरुष) : आर्यवर्धन नवले (ओवळी क्रीडा मंडळ,मुंबई उपनगर), उत्कुष्ट पक्कड (पुरुष)  : वैभव मोरे (मिडलाईन कर्जत, ठाणे), उत्कुष्ट चढाईपट्टू (महिला)  : विद्या दोलताडे (शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब, धुळे), उत्कुष्ट पक्कड (महिला )  : समृद्धी मोहिते (स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, मुंबई उपनगर) शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे) X  बंड्या मारुती सेवा मंडळ (मुंबई शहर)  ४१ X २७ स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) X ओवळी क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर)  ३७ X२२ विजय काल्हेर (ठाणे)  X  श्री विठ्ठल क्रीडा मंडळ (ठाणे) ४४ X ३९

२६ मित्रपक्षांची ही खिचडी निष्ठावंतांची – भास्कर बैरीशेट्टी

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात २६ मित्रपक्षांच्या आघाडीचा खिचडी म्हणून उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजिवडा विधानसभा उपशहरप्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी, ही खिचडी निष्ठावंतांची असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या भाषणामध्ये इंडिया अलायन्सचा उल्लेख २६ मित्र पक्षांच्या आघाडीचा खिचडी म्हणून केला होता. आमची ही खिचडी निष्ठावंतांची आहे.हे लक्षात ठेवा. ही आमची खिचडी एनडीए बरोबर असलेल्या महायुतीतील तीन पक्षांच्या बिर्याणीपेक्षा कितीतरी पटीने स्वच्छ, चवदार व पारदर्शक आहे. भारतातील नागरिकांना बिर्याणीपेक्षा खिचडी अधिक आवडते कारण ती पचविणे सोपे असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासारख्या अनुभवी वक्त्याने कोणतेही वक्तव्य करताना थोडे तरी भान बाळगावे, असा सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजिवडा विधानसभा उपशहरप्रमुख भास्कर  बैरीशेट्टी यांनी दिला आहे.

नालेसफाईच्या कामांना नवी मुंबईत वेग

अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शहर अभियंता संजय देसाई यांची संयुक्त पाहणी नवी मुंबई : पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विशेष आढावा बैठक घेत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मागील आठवडयात दिले असून त्या अनुषंगाने सर्वच विभागांमार्फत सुरु असलेल्या कामांना वेग आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पूर्वेकडील डोंगररांगांपासून पश्चिमेकडील खाडीला मिळणारे नैसर्गिक नाले असून ते पावसाळी पाणी विनाअडथळा वाहून जाण्यासाठी साफ असावेत यादृष्टीने त्या नाल्यांसह शहराच्या अंतर्गत असलेल्या मोठया नाल्यांचीही पावसाळापूर्व सफाई सुरु आहे. नमुंमपा क्षेत्रात 77 लहान – मोठे नैसर्गिक नाले असून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत त्यांच्या सुरु असलेल्या सफाई कामांची अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार आणि शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी संयुक्तपणे पाहणी करत या कामांना वेग देण्याच्या व खोल सफाई करण्याच्या सूचना केल्या. याशिवाय सायन-पनवेल महामार्गावर तीन नाल्यांची अभियांत्रिकी विभागामार्फत सफाई करण्यात येत आहे. नाल्यांमधून जेसीबीव्दारे काढला जाणारा गाळ तसेच काही नाल्यांच्या प्रवाहात व काठांवर असणारी मनुष्यबळ लावून साफ केली जाणारी झाडे झुडपे आणि कचरा काठांवर ठेवला जात असून हा गाळ काहीसा सुकून वाहतूक करण्यायोग्य झाल्यानंतर तत्परतेने त्या ठिकाणाहून हलविण्याची खबरदारी घ्यावी असे निर्देश देत याबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे निर्देशित करण्यात आले. या पाहणीमध्ये वाशीतील से-17 नाला, से.12 नाला, से.29 नाला तसेच से.12 व से.8 येथील धारण तलाव त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथील आलोक नाला, से.2 नाला, घणसोली-कोपरखैरणे नाला या नाले स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. नाल्यांची साफसफाई, धारण तलावांचे फ्लॅप गेट्स, पंपिंग मशिनरी, स्ट्रेन्चेस अशा विविध कामांची त्यांनी बारकाईने पाहणी केली. आयुक्त महोदयांनी पावसाळापूर्व कामांसाठी 15 मे ही डेडलाईन दिली असून विहित वेळेत काम पूर्ण करण्याचे संबंधित विभागांनी नियोजन करावे व विशेषत्वाने नैसर्गिक नाले सफाईच्या कामांना वेग दयावा असे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी निर्देशित केले आहे. या पाहणी प्रसंगी संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांना वार्षिक परतावा भरण्याची मुदत ३१ मे पर्यंत – नितीन मोहिते

अशोक गायकवाड रायगड : उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांना वार्षिक परतावा भरण्याची मुदत दि.३१ मे पर्यंत आहे याची उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांनी नोंद घ्यावी असे सहायक आयुक्त, अन्न व औषध…

मतदानाच्या प्रचारासाठी नवी मुंबईत फिरताहेत लक्षवेधी ग्रीन मॅस्कॉट्स 

नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने स्वीप कार्यक्रमांतर्गत महापालिका  आयुक्त्‍ डॉ. कैलास शिेदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध प्रसार माध्यमांचा वापर केला जात आहे. यामध्ये मतदान यंत्राचे मुखवटे अर्थात शुभंकर (मॅस्कॉट्स) तयार करण्यात आले असून हे चार मॅस्कॉट्स संपूर्ण महापालिका क्षेत्रात फिरुन 20 मे रोजी होणाऱ्या ठाणे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी जनजागृती करत आहेत. हिरव्या फ्लुरोसन्ट रंगात चटकन नजरेत भरणारे हे मोठया आकाराचे चार मॅस्कॉट्स लक्षवेधी असून या मॅस्कॉटच्या पुढील भागावर मतदान यंत्राची प्रतिकृती आहे. त्याचप्रमाणे पाठीवरील मागील भागात मतदान करण्याविषयी आवाहन करणारा फलक प्रदर्शित करण्यात आला असून त्यावर वोटर हेल्पलाईन ॲपचा क्यूआर कोड नमूद करण्यात आलेला आहे. हे मॅस्कॉट्स नागरिकांमध्ये व त्यातही मुलांमध्ये लोकप्रिय होत असून अनेकजण या मॅस्कॉटसोबत सेल्फी छायाचित्र काढून आपापल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन प्रदर्शित करीत आहेत. महापालिका निवडणुक विभागाचे उप आयुक्त्‍ श्री. शरद पवार यांच्या नियंत्रणाखाली या मॅस्कॉट्समार्फत मतदान जनजागृती प्रचार वेळापत्रक तयार करण्यात आले असून प्रत्येक मॅस्कॉटला विभाग नेमून देण्यात आलेला आहे. संबंधित विभागांचे सहा. आयुक्त्‍ तथा विभाग अधिकारी यांचे मॅस्कॉट्सव्दारे जनजागृती कार्यावर लक्ष असणार आहे. पथनाटयांप्रमाणेच लक्ष वेधून घेणाऱ्या मॅस्कॉट्सव्दारे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या स्वीप उपक्रमास नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे.

तलावपाळी येथील बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे शहरात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून मंगळवारी  तलावपाळी परिसरातील बसस्थानकांवरील प्रवाशांमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली. ‘मतदान जनजागृती’ विषयक माझं मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या घोषणा सर्व प्रवाशांनी मोठ्या आवाजात सामूहिकपणे दिल्या. २५ ठाणे- लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ प्रयत्नशील आहे. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती. उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप’ अंतर्गत सदर मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. मी मतदान करणारंच…. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा. या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले. तसेच बसस्थानकात स्वीप पथकाने सर्व प्रवासी नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून देत मतदानाची शपथ दिली. ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देखील यावेळी देण्यात आली. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन तलावपाळी बसस्थानकातील सर्व प्रवासी नागरिकांना करण्यात आले.