Month: May 2024

राज ठाकरे-मोदी एकाच मंचावर

मुंबई : लाव रे तो व्हिडीयोने २०१९ची निवडणूक मोदीविरुध्द प्रचाराने ढवळून काढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकाच व्यासपीठावर महायुतीच्या उमेदावारांच्या प्रचाराची सभा घेणार आहे. या सभेला…

गुरूवारी दिवा, मुंब्रात काही क्षेत्रात आठ तास पाणी बंद

ठाणे  : दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ, खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच, मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरूवार, ९ मे रोजी  सकाळी १० ते सायंकाळी ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद…

शिक्षक, पदवीधर मतदारासंघासाठी निवडणूका जाहीर

मुंबई  : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १०…

नामांतराविरोधी याचिका फेटाळली

संभाजीनगर  : छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव शहरांच्या नामांतरविरोधातील याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. नामांतरावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे, अशी प्रतिक्रीया…

ईव्हीएम ‘फिक्सिंग’साठी अंबादास दानवेंकडे मागितले तब्बल अडीच कोटी !

लष्करी जवान पोलिसांच्या अटकेत छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीतील ईव्हीएम मशिन फिक्सकरण्यासाठी एका लष्करी जवानांने ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केली…

नरेंद्र मोदींचा गुगली !

अदानी-अंबानींवरून राहुलला डीवचले नवी दिल्ली : महागाई, बेरोजगारी, सैन्यातील अग्नीवीरांची भरती आणि ‘मोहब्बत की दुकान’ वर जोर देत भाजपाप्रणीत आघाडीला चहोबाजूंनी घेरणाऱ्या राहुल गांधी आणि काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुगली टाकला. एरव्ही गौतम अदाणी…

जनतेची लूट व आरोग्याशी खेळ सुरूच  ऍ!

रमेश औताडे मुंबई : सरकारचे कायदे  असताना आज अनेक ठिकाणी मनमानी कारभार करत अवैध पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अधिवेशन काळात सरकारने याबाबत ठोस पावले…

श्री मावळी मंडळ राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धा

महिला गटात पालघरच्या श्री राम कबड्डी संघाचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश ठाणे, श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिला गटातील पहिल्या सामन्यात पालघरच्या श्री राम कबड्डी संघाने मुंबई उपनगरच्या नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी संघाचा ३७-२२ असा १५ गुणांनी पराभव करून उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिला गटात आरएफ नाईक (ठाणे), शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब (धुळे) , होतकरू मित्र मंडळ (ठाणे), स्वराज्य स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), श्री राम कबड्डी संघ (पालघर), शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर) या संघानी उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, पुरुष गटात जय बजरंग क्रीडा मंडळ वाशिंद (ठाणे), हुतात्मा शांताराम कालवार (ठाणे) ,नवरत्न मंडळ (मुंबई उपनगर), श्री विठ्ठल क्रीडा मंडळ (ठाणे), जय बजरंग रोहा (रायगड), श्री हनुमान सेवा (ठाणे), विजय काल्हेर (ठाणे) ह्या संघानी चवथ्या फेरीत प्रवेश केला. महिला गटातील पहिल्या सामन्यात पालघरच्या श्री राम कबड्डी संघाने मुंबई उपनगरच्या नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी संघाचा ३७-२२ असा १५ गुणांनी पराभव करून उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. सदर  सामना  मध्यंतरापर्यंत अतिशय चुरशीचा झाला.दोन्ही संघानी अतिशय भक्कम क्षेत्ररक्षण करीत विरुद्ध संघाला एक एक गुणांसाठी संघर्ष करायला लावला.  मध्यंतराला दोन्ही संघाचे १४-१४ असे  समसमान गुण होते. मध्यंतरानंतर मात्र  श्री राम कबड्डी संघाच्या ऐश्वर्या ढवन हिने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढवली व  नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी संघावर लोन दिला. तिला रिया पाटील व हनी सोलमट्ट हयांनी पक्कडीत सुंदर साथ दिली व संघासाठी विजय मिळवला. पराभूत संघाकडून रविना थोरात हिने एकाकी झुंज दिली. महिला गटातील दुसऱ्या सामन्यात  धुळ्याच्या शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाने ठाण्याच्या जय भारत स्पोर्ट्स क्लब संघाचा ४५-१५ असा ३० गुणांनी धुव्वा उडवत उप-उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ह्या सामन्यात  शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाने मध्यंतराला १७-०८ अशी ५ गुणांची आघाडी घेतली.  मध्यंतरानंतर शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाच्या विद्या व ज्योती यांनी आपला आक्रमक खेळ करीत जय भारत स्पोर्ट्स क्लब संघावर दोन लोण चढवले व सामना पूर्णपणे आपल्या संघाकडे झुकवला . पराभूत संघाकडून श्रेया गावंड हिने सुंदर खेळ केला. पुरुष गटातील सामन्यात ठाण्याच्या हुतात्मा शांताराम कालवार  संघाने अलहिदा डावात ठाण्याच्या आत्माराम क्रीडा मंडळाचा १ गुणांनी मात करून चवथ्या फेरीत प्रवेश केला.  हा सामना सुरवातीपासूनच अतिशय अटीतटीचा होता.  हुतात्मा शांताराम कालवार संघाच्या परेश म्हात्रे व आत्माराम क्रीडा मंडळाच्या अभिजित भोईर आपल्या संघासाठी प्रत्येक चढाईत गुण मिळवीत होते.  मध्यन्तराला हुतात्मा शांताराम कालवार संघाकडे १९-१४ अशी ५ गुणांची आघाडी होती. मध्यन्तरानंतर  आत्माराम क्रीडा मंडळाच्या  विवेक म्हात्रेने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढविली. व सामना २८-२८ असा समसमान गुणांवर संपवला. अलहिदा डावात  हुतात्मा शांताराम कालवार  संघाने आपल्या दुसऱ्या चढाईत दोन गुणांची कमाई केली व सामना १ गुणांनी जिंकला. पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या श्री विठ्ठल क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या अभिनव क्रीडा मंडळाचा ४२-३५ असा ७ गुणांनी पराभव केला. ह्या सामन्यात दोन्ही संघ सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत होते. श्री विठ्ठल क्रीडा मंडळाच्या अक्षय मखवनाने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढविली. त्याला शुभम देशमुखची पक्कडीत उत्तम साथ मिळाली. मध्यन्तराला श्री विठ्ठल क्रीडा मंडळाने १८-१६ अशी २ गुणांची आघाडी घेतली.  मध्यन्तरानंतर अभिनव क्रीडा मंडळाच्या सिद्धेश शेलारने अष्टपैलू खेळ करीत आपल्या संघासाठी गुण मिळविले. परंतु तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकाल नाही . ७ मे २०२४ दिवसाचे मानकरी : उत्कुष्ट चढाईपट्टू (पुरुष) : विघ्नेश चौधरी (विजय काल्हेर, ठाणे), उत्कुष्ट पक्कड (पुरुष)  : विराज पाटील (जय बजरंग रोहा, रायगड), उत्कुष्ट चढाईपट्टू (महिला)  : ऐश्वर्या ढवण (श्री राम कबड्डी संघ,पालघर), उत्कुष्ट पक्कड (महिला )  : रोशनी माने (आरएफ नाईक, ठाणे)

गुरूवारी दिवा आणि मुंब्रामध्ये काही क्षेत्रात आठ तास पाणी बंद राहणार

अनधिकृत नळ जोडणी खंडित करणे आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीची कामे होणार ठाणे : दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ, खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच, मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरूवार, ०९ मे रोजी  स. १० ते सायं. ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवर भोलेनाथ नगर गेट समोरील नाल्यातील ६६० मीमी व्यासाच्या जलवाहिनीवरील अनधिकृत नळ संयोजन खंडित करणे आणि कल्याण फाटा जलकुंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीवरील ३५० मी मी व्यासाच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करणे या कामांसाठी गुरूवार, ०९ मे रोजी  स. १० ते सायं. ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण फाटा येथून एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून होणारा पाणी पुरवठा या काळात खंडित राहणार आहे. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पुढील दोन दिवस या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणी साठा करून ठेवावा, तसेच, पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासात काँग्रेस सरकारचेच मोठे योगदान: प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईचा नावलौकिक आहे परंतु मागील १० वर्षात मुंबईच्या नावलौकिकाला काळिमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. मुंबईचे महत्व सातत्याने कमी करण्याचा प्रयत्न केला, मुंबईचे विमानतळ, मुंबईतील मोकळ्या जागा एकाच उद्योगपतीच्या घशात घातल्या जात आहेत. धारावीसह शहराच्या झोपडपट्टीतील गरिबांना बेघर करून अदानीला मोक्याच्या जागा दिल्या जात आहेत. मुंबई ही मुंबईकरांची आहे व मुंबईकरांचीच राहिली पाहिजे यासाठी मुंबई शहर अदानीला विकणाऱ्या भाजपा-शिंदे सरकारला धडा शिकवा, असे आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई शहराचा सर्वांगिण विकास करण्यात काँग्रेस सरकारचेच मोठे योगदान आहे हे कोणीही नाकरू शकत नाही. मुंबई शहराचा विकास व आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख ही काँग्रेसचे सरकार असतानाच झाली. मुंबईतील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व पर्यटन क्षेत्रांची भरभराट काँग्रेस सरकारच्या काळात झाली. मुंबई मेट्रो, वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्स, राजीव गांधी वांद्रे-वरळी सागरी सेतू, चेंबूर FCLR लिंक रोड, कोस्टल रोड, अटल सेतू या प्रकल्पांची आखणी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीचे सरकार आणि केंद्रातील डॉ. मनमोहनसिंह सरकार असताना करण्यात आली. मुंबईतील कायदा सुव्यवस्था जागतिक पातळीवरची राहिली आहे परंतु भाजपा सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदारच खुलेआम धमक्या देत आहेत, गोळीबार करत आहेत, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, फेसबुक लाईव्हमध्ये गोळीबार झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री मुंबईतील कायदा सुव्यवस्था हाताळण्यात सपशेल फेल झाले आहेत असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. धारावी व मुंबईतील महत्वाचे भूखंड सर्व नियम व अटी बाजूला ठेवून अदानी व भाजपाच्या मित्रांना दिले जात आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेचीही शिंदे-भाजपा सरकारने वाट लावली, मुंबई मेट्रोसाठी पर्यावरणाचा विचार न करता झाडांची कत्तल करण्यात आली. सरकारी धोरणे मुंबईकरांच्या हितासाठी नाही तर केवळ मुठभर धनदांडग्या लोकांसाठी आखली जात आहेत. मुंबई व महाराष्ट्राला भेदभावाची वागणूक दिली जात आहे. मुंबईकरांच्या हिताच्या आड येणाऱ्या महाभ्रष्टयुतीला लोकसभेच्या निवडणुकीत जागा दाखवा व इंडिया आघाडीला विजयी करा, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या. आज वांद्रे पूर्व भागात चेतना कॉलेजजवळ निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले, यावेळी माजी मंत्री व शिवसेना नेते अनिल परब उपस्थित होते. वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्लब ते भारत नगर आणि कुर्ला पूर्व भागात स्वदेशी चाळ ते तक्षशिला नगर जनसंवाद यात्रा काढण्यात आली. टिळकनगर येथील बुद्ध विहाराला भेट दिली व कुर्ला पूर्व भागातील शिवसेना शाखा क्रमांक १६९ येथे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले तसेच कुरेशी नगरमधील समाज बांधवांशी संवाद साधला.