मुंबई : “निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. मुंबई आणि महाराष्ट्रात जर आपण नीट पाहिले तर मतांची टक्केवारी सारखीच आहे, फक्त जागा कमी जास्त झाल्या आहेत. २ लाख मते आम्हाला जास्त मिळाली होती. पण तरीही यश-अपयश ही आमची सामुहिक जबाबदारी आहे असे आम्ही समजतो. अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
आम्ही टीम म्हणून काम केलं आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी राज्यात चांगले काम केले आहे. यापुढे आम्ही एकत्रच काम करत राहू,” अशा शब्दांत शिंदे यांनी फडणवीसांची पाठराखण केली.
