Month: June 2024

जितेश कदमची अपयशी झुंज

एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या सहकार्याने एम सी एफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली ( पश्चिम ) येथे सुरु एम सी एफ ९ व्या राज्य मानांकन कॅरम…

डोंबिवलीतील पदवीधरांचा कोकण पदवीधर मतदानावर बहिष्कार

डोंबिवली :  येथील के.व्ही. पेंढरकर हे कॉलेज विनाअनुदानित करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. याविरोधात कॉलेजमधील शिक्षक व माजी विद्यार्थी गेल्या आठवड्याभरापासून साखळी उपोषणास बसले आहेत. याकडे शासन लक्ष देत नसल्याने येत्या…

‘पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही’

मनसेचा सरकारला इशारा डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना पत्र पाठविले होते. या पत्राला देसाई यांनी समाधानकारक उत्तर दिलेली नाही. कॉलेजला स्वायत्तता मिळाली असली तरी व्यवस्थापन अनुदानित कॉलेज बंद करु शकत नाही. व्यवस्थापनाची ही कृती शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर अन्याय करणारी आहे. तसेच विद्यापीठ कायदा आणि सरकारी नियमांचे उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणी शिक्षण मंत्र्याकडे दाद मागणार अन्यता मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा गांगुर्डे यांनी देसाई यांना दिला आहे. डोंबिवलीतील के.व्ही.पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना ते ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. त्याविरोधात 14 जून पासून कॉलेज समोर शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचे साखळी उपाेषण सुरु आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश संघटक संतोष गांगुर्डे यांनी सोमवारी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांसह शिष्टमंडळ उपस्थित होते. एक तासांच्या प्रदीर्घ चर्चेअंती देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर काय ते बाेलू असे सांगितले. गांगुर्डे यांनी मराठी विभाग का बंद केला आहे. कॉलेजमध्ये बाऊन्सर ची गरज काय ? प्राध्यापकासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एका खोलीत काम ने देता बसवून का ठेवले जात आहे. या प्रकरणी जाब विचारला. चर्चेअंती संस्थाचालकांकडून मनविसे शिष्टमंडळाला कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे शासन दरबारी जाब विचारुन मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा ईशारा मनविसेने दिला. याबाबत शिष्ठमंडळाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्याही समस्या जाणून मनविसे पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत असे आश्वासन दिले.

हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी ‘ऑप्टा’ उपक्रम

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचा पुढाकार मुंबई : भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत २० ते २५ टक्के अधिक आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीची प्रक्रिया असलेल्या अंजायनाला नियंत्रित केल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘दी असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ने (एपीआय) अंजायनाला रोखण्यासाठी ‘ऑप्टा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत हृदयाशी संबंधित त्रास होत असल्याची तक्रारी असलेल्या रुग्णावर अंजायनावरील प्राथमिक उपचार करण्याचे डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. छातीत दुखणे, चालायला त्रास होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, शरीराच्या विविध भागात दुखणे अशा त्रासांकडे नागरिक व डॉक्टर दुर्लक्ष करतात. ही लक्षणे हृदयविकारापूर्वी असलेल्या अंजायनाची असतात. त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याची परिणीती हृदयविकाराच्या झटक्यामध्ये होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित धोके कमी करण्यासाठी आणि रुग्णांना अधिक चांगले आरोग्य मिळावे यासाठी अंजायनाचे लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी ‘एपीआय’ने प्रथमच अंजायना सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ‘ऑप्टिमल ट्रीटमेंट ऑफ अंजायना (ऑप्टा) : द नीड ऑफ दि अवर’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यात आजाराचे वेळीच निदान होण्यासाठीचा कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती एपीआयचे महासचिव डॉ. अगम व्होरा यांनी दिली. अंजायनाची समस्या लवकरात लवकर ओळखून त्यावर उपचार सुरू करणे, हृदयविकार बळावण्याची प्रक्रिया संथ करणे, हृदयविकाराचा धोका कमी करणे तसेच औषधावर होणारा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी ‘ऑप्टा’ हा महत्त्वाचा उपक्रम आहे. ऑप्टा पडताळणी सूची, ऑप्टा प्रश्नावली आणि ऑप्टा दृष्टीकोन अशा तीन प्रक्रिया ‘एपीआय’ने विकसित केल्या आहेत. त्याच्या योग्य अंमलबजावणीने अंजायना व पर्याययाने हृदयविकाराचा झटका रोखणे शक्य होणार असल्याचे एपीआयचे अध्यक्ष डॉ. मिलिंद नाडकर यांनी सांगितले. दुर्लक्षित असणाऱ्या अंजायनाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि देशातील डॉक्टर आणि हृदयविकार तज्ज्ञांच्या माध्यमातून हा उपक्रम अधिक सक्षमपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हृदयविकाराच्या आजारांशी संबंधित मृत्यूंच्या बाबतीत भारत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. दरवर्षी हृदयविकाराने मृत्यू होणाचे प्रमाण पुरुष व स्त्रियांमध्ये अनुक्रमे २०.३ टक्‍के आणि १६.९ टक्‍के इतके आहे. त्यामुळेच अंजायनाकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. भारतीयांमध्ये बरेचदा अंजायनाच्या सर्वसाधारण लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे दिसून येतात. ज्यांच्यामुळे अचूक निदान करण्यामध्ये अडथळे येऊन डॉक्टरांकडून लक्षणांपासून आराम मिळण्यासाठीची औषधे दिली जातात. त्यामुळे हा धोका अधिकच वाढत आहे. हा धोका कमी करण्यासाठी ‘ऑप्टा’ उपक्रमांतर्गत माहिती घेत रुग्णांना सर्वात प्रथम ॲस्पिरीन हे औषध देणे कधीही सोयीस्कर असल्याचे ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. व्ही. टी. शाह यांनी सांगितले.

कल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीचा विळखा

दोन्ही मार्गिकांमधून एकाच दिशेने वाहने सोडण्याचा प्रकार कल्याण: कल्याण शिळफाटा रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस दररोज संध्याकाळी दोन्ही मार्गिकांमधून एकाच दिशेने वाहने सोडतात. या कालावधीत समोरून दोन्ही मार्गिकांमधून येणारी वाहने काही अंतरावर वाहतूक पोलिसांकडून किमान १५ मिनिटे रोखून धरली जातात. वाहतूक पोलिसांच्या या मनमानी नियोजनामुळे काही दिवसांपासून शिळफाटा रस्त्यावर पुन्हा वाहन कोंडी होऊ लागली आहे. शिळफाटा रस्त्यावर वाहने धावण्याचा वेग सर्वाधिक आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहने धावती असली की वाहन कोंडी होत नाही. वाहतूक नियोजनाच्या नावाने कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस काटई नाका, खिडकाळी, देसई हद्दीत संध्याकाळच्या वेळेत कल्याणकडून शिळफाटा दिशेने येणारी वाहने रोखून धरतात. त्याचवेळी शिळफाटा दिशेने जाणारी वाहने दोन्ही मार्गांमधून एकाच वेळी सोडतात. या वाहनांची रांग संंपली की मग कल्याणकडे येणारी रोखून धरलेली वाहने दोन्ही मार्गिकांमधून सोडली जातात. किमान पंधरा मिनिटे वाहने रोखून धरण्याच्या या प्रकरामुळे शिळफाटा रस्त्यावर दररोज वाहन कोंडी होऊ लागली आहे. वाहतूक नियोजनाच्या या अजब नियोजनामुळे प्रवासी त्रस्त आहेत. शिळफाटा रस्त्यावरून दोन्ही बाजुने सतत वाहने धावत असली तर वाहन कोंडी या रस्त्यावर होत नाही. वाहने एकाच जागी रोखून धरण्याच्या प्रकारामुळे खिडकाळी, काटई, निळजे, मानपाडा, शिळफाटा रस्त्याचे पोहच रस्त्यांवरील वाहने अडकून पडतात. संध्याकाळच्या वेळेत नोकरदार, शाळकरी विद्यार्थी घरी परतत असतात. त्यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो. मुंबई, नवी मुंबईतून यापूर्वी खासगी वाहनाने शिळफाटा रस्त्यावरून घरी सात ते साडे सात वाजता पोहचणारा प्रवासी आता साठे ते नऊ वाजता पोहचत आहे. साडे सहा वाजता घरी पोहचणारे विद्यार्थी शाळेच्या बस वाहन कोंडीत अडकत असल्याने सात ते साडे सात वाजता घरी पोहचत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. वाहतूक पोलिसांनी वाहने रोखून धरण्याची पध्दत बंद करून शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक धावती ठेवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. अधिक माहितीसाठी कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचीन सांडभोर यांना संपर्क केला, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मोबदला नाही कल्याण शिळफाटा रस्त्यालगतच्या ११ गावांमधील रस्ते बाधित शेतकऱ्यांंना शासनाने गे्ल्या तीन महिन्यापूर्वी सुमारे ३५० कोटीचा मोबदला जाहीर केला आहे. हा मोबदला अद्याप शेतकऱ्यांंना वाटप करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी मोबदला मिळाल्याशिवाय शिळफाटा रस्ता रुंदीकरणासाठी जमीन न देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे काटई, निळजे, मानपाडा, कोळे गाव हद्दीतील रस्तारूंदीकरण अद्याप रखडले आहेत. लोकसभेची आचारसंंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने रस्ते बाधितांना भरपाईची रक्कम जाहीर केली होती. आता आचारसंहिता संपली आहे ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांना वितरित करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कल्याण परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी श्री. चंद्रमणि मिश्रा

पालघर : महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून श्री. चंद्रमणि मिश्रा यांनी पदोन्नतीवर सोमवारी (दि. २४) कार्यभार स्वीकारला. याआधीचे मुख्य अभियंता श्री. धनंजय औंढेकर यांची मुंबईतील बांद्रा येथील मुख्य कार्यालयात…

सुधाकर घारेंच्या गावभेट दौऱ्यामुळे राष्ट्रवादीत प्रक्षप्रवेशाचा ओघ वाढला

कर्जत : २३ जून रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. सुधाकर घारेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दिवसेंदिवस अधिक बळकट होत चालला आहे. गेल्या अनेक…

कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी निरंजन डावखरेंचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’

ठाणे : कोकणातील पदवीधर तरुण व स्पर्धा परीक्षार्थींना नोकरीची संधी, पर्यटन व्यवसायाला पाठबळ आणि कोकणाच्या सर्वांगीण विकासाची खात्री देणारे `व्हिजन डॉक्युमेंट’ आमदार निरंजन डावखरे यांनी जाहीर केले आहे. तसेच कोकणाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपासह महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची या मतदारसंघात दुसरी टर्म झाली असून, ते आता हॅट्रिकसाठी सज्ज झाले आहेत. आगामी सहा वर्षाच्या काळात कोकणातील पाचही जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या विकासकामांचे `व्हिजन डॉक्युमेंट’ जाहीर केले आहे. या `व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये `मिशन एज्युकेशन’नुसार विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाची पावले ओळखून नवीन शैक्षणिक धोरण आखले आहे. त्यानुसार बदलत्या काळानुसार हायस्पीड इंटरनेट, डेटा व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनी आणलेल्या क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला नवीन शैक्षणिक धोरणाचे प्रशिक्षण देण्यासाठी समन्वय, नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळेत डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससाठी अखंड विजेची सुविधा, शासकीय योजना आणि `मेडा’च्या योजनांसाठी समन्वय साधून कोकणातील पाचही जिल्ह्यातील शाळा पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने ग्रीन स्कूल, कोकणातील प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण आदी `व्हिजन’मध्ये मांडण्यात आले आहे. एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय मार्गदर्शन केंद्र स्थापन करून त्यात ग्रंथपाल व इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार, पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती गती देणार, राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्‍नशील राहणार आहोत, अशी ग्वाही `व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये देण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा केंद्राची स्थापना झाल्यानंतर तालुका स्तरावर सुविधा, पदवीधर शिक्षकांसाठी सेवा व पदोन्नती, पदवीधर शिक्षकांचे वेतनविषयक प्रश्न, पदवीधर शिक्षकांच्या विविध समस्या, कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एकात्मिक मध धोरण, मच्छिमारांसाठी मत्स्योद्योग धोरण, फळांवरील प्रक्रिया उद्योगाला वेग, पुष्पशेतीच्या प्रगतीसाठी पुढाकार आदींबरोबर कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ सुरू करण्याचा संकल्प आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे.

पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाकरिता पर्यायी कागदपत्रे ग्राह्य-अमोल यादव

अशोक गायकवाड नवी मुंबई : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक दि. २६ जून, २०२४ रोजी होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारकर्त्यानी त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाही अशा मतदारांनी त्यांची ओळख पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करता येईल, अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. विधानपरिषदेची द्विवार्षिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीकरिता मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त खालील नमूद पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत. आधारकार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), राज्य/केंद्र सरकारद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र उपक्रम, स्थानिक संस्था किंवा इतर खाजगी औद्योगिक घरे, खासदार/आमदार/एमएलसी यांना अधिकृत ओळखपत्रे जारी केली जातात. ज्या शैक्षणिक संस्थांनी दिलेले सेवा ओळखपत्र संबंधित शिक्षक/पदवीधर मतदार संघात काम केले जाऊ शकते. विद्यापीठाने जारी केलेले पदवी/डिप्लोमाचे प्रमाणपत्र, मूळ स्वरूपात, सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले शारीरिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र, वर युनिक डिसॅबिलिटी आयडी कार्ड अशी कागदपत्रे पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील. दिनांक २६ जून,२०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत होणाऱ्या मतदानाच्या दिवशी पदवीधर/शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदान करावे, असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील १२४ मतदान केंद्रांवर मतदान

ठाणे : विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार लसंघासाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १२४ मतदान केंद्रावर सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेल्या जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजाववा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील मतदान केंद्राची यादी सोबत जोडली आहे.