Month: June 2024

मोबाईल स्कूल उपक्रमातील ४७० मुलांचा शाळा प्रवेश-महेन्द्र गायकवाड

ठाणे : रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत फिरते-पथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना राबविली होती. या उपक्रमांतर्गत ४७० मुलांना शाळा प्रवेशपत्र देण्यात आल्याची माहिती…

मर्जिया पठाण यांचा पाण्यासाठी ‘तिरडी मोर्चा’

ठामपा कार्यालयाच्या दारात फोडली मडकी ठाणे : विविध कारणे पुढे करून सातत्याने मुंब्रा- कौसावासियांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली…

निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या उपस्थितीत  १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम संपन्न

रायगड : निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या उपस्थितीत शुक्रवारी,(दि.२१) जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आणि नेहरु युवा केंद्र व प्रिझम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त…

नमुंमपा वाशी रूग्णालयामधील आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाबाबत समाधानकारक-दिप्ती गौर मुखर्जी

 अशोक गायकवाड नवी मुंबई :नमुंमपा वाशी रूग्णालयामधील आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाबाबत समाधानकारक असल्याचे मत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती गौर मुखर्जी यांनी व्यक्त केले. आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाची पाहणी करण्याकरिता आज राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.दिप्ती गौर मुखर्जी आणि संचालक एलपीएल विक्रम पगारीया यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयास भेट दिली. याप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेश म्हात्रे उपस्थित होते. सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या अंतर्गत आभा ॲपव्दारे रुग्णांची आभा नोंदणी करणे, त्यांचे टोकन नंबर तयार करणे व त्याव्दारे आभा नोंदणी कक्षातून त्वरित केसपेपर मिळविणे अशा कामांबाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन आदी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपस्थितांना दिली तसेच नजिकच्या काळात रुग्णालयविषयक सर्व कामकाजाचे संगणकीकरण करण्यात येत असल्याचेही नमूद केले. आभा ॲपव्दारे नोंदणीकरण झालेल्या रुग्णांना लांबलचक रांगा टाळून त्वरित केसपेपर मिळत असल्यामुळे रुग्णांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच आभा नंबर हा युनिक असल्यामुळे संपूर्ण देशात आभा ॲपचा वापर होत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची सर्व माहिती जसे की यापूर्वीचा आजार, त्यावर झालेला उपचार, तपासण्या, औषधे अशी सर्व प्रकारची माहिती रुग्णाच्या सहमतीने उपलब्ध असणार आहे. त्यामुळे रुग्णांना चांगल्या व दर्जेदार रुग्णसेवा कमी कालावधीत देता येणे शक्य होणार आहे. आभा ॲपचा वापर होत असलेल्या खाजगी रुग्णालये, प्रयोगशाळा येथे देखील रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.दिप्ती गौर मुखर्जी यांनी सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन हे कामकाज प्रभावीपणे होत असल्याचे नमूद केले. या योजनेचे पुढील टप्प्यातील कामकाज करणेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले व राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत नमुंमपाला याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. या भेटी दरम्यान कोपरखैरणे येथे जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्तरित्या बंद करून त्याठिकाणी बनविण्यात आलेल्या निसर्गेद्यानाला, तेथील मियावाकी जंगल परिसराला तसेच त्या जवळील टाकाऊतून टिकाऊ संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आकांक्षी शौचालयाचीही पाहणी करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरणशील नाविन्यपूर्ण कामांची प्रशंसा केली.

निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेने ठाण्यात सुरु केल्या २१ मोफत अभ्यासिका !

ठाणे : निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने ठाण्यात २१ मोफत अभ्यासिका मोफत अभ्यासिका सुरु केला आहे याद्वारे गरिब गरुजु मुलांच्या स्वप्नांना जिजाऊने दिला आधार देऊन एक स्तुत्य…

‘वावीकर आय इन्स्टिट्यूट’मध्ये चष्म्याचा नंबर काढण्याचे अत्याधुनिक मशीन दाखल

प्रसिध्द अभिनेते श्रेयस तळपदे ब्रँड ॲम्बेसेडर ठाणे : डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ठाण्यातील वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त मशिन दाखल झाले आहे. या मशिनच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करुन चष्म्याचा नंबर काढला जाणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉ. चंद्रशेखर वावीकर यांनी दिली आहे. प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे हे वावीकर आय इन्स्टिट्यूटचे आता ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. माजिवडा सर्व्हिस रोड येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक मशीन दाखल झाले असून त्याची माहिती एका पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली. यावेळी ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, डॉ वैशाली वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्ट संस्थेच्या अध्यक्षा मीरा कोरडे, ठाणेवैभव चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आदी उपस्थित होते. काही वर्षांपूर्वी माझ्या डोळ्याला जखम झाली होती त्यावेळी वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेतले. माझे सासरेही येथेच डोळ्यांवर उपचार घेतात. त्यामुळे इन्स्टिट्यूटशी कौटुंबिक नाते असल्याचे अभिनेता श्रेयस तळपदे यांनी सांगितले. वावीकर आय इन्स्टिट्यूटने ठाण्यातच नव्हे तर आशियामध्ये नेहमीच पहिल्यांदा नवनवीन तंत्रज्ञान आणल्याचे सांगत इन्स्टिट्यूट ग्रामीण भागात आपल्या मोबाईल आय व्हॅन च्या साहाय्याने करत असलेल्या सेवा कार्याचेही श्रेयस तळपदे यांनी कौतुक केले.स्मार्टसाईट यंत्राद्वारे शस्त्रक्रिया करणारे हे नवीन मशिन अत्याधुनिक आहे. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार या तंत्रज्ञानाचा वापर होतो. पूर्वी पारंपरिक लॅसिक सर्जरी केली जायची आता या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लॅसिक सर्जरी ला एक नवीन पर्याय तयार झाला आहे जो अधिक अचूक आणि सुरक्षित परिणाम रुग्णांना देणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आतापर्यंत १४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतरच आज उद्घाटन करत असल्याची माहिती डॉ चंद्रशेखर वावीकर यांनी दिली.

माथेरानमध्ये नव्या एटीएममुळे पर्यटकांना दिलासा

माथेरान : माथेरान मध्ये आज माथेरान नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून 85 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील स्थानिक व पर्यटकांना एक वेगळी भेट देताना स्वतःचे एटीएम सुरू केले आहे यामुळे पर्यटकांना…

 पेपर फुटीला आळा घालण्यासाठी दक्षता कक्ष स्थापन करा

पदवीधर निवडणुकीत मविआचे ऐक्य मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि सरकारी नोकरभरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांना पायबंद बसावा तसेच या प्रकरणांचा तपास जलदगतीने होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे विशेष दक्षता आणि तपास कक्ष स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲड. अनिल परब यांनी केली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तयारी सदंर्भात रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची चेंबूर येथे बैठक पार पडली.बैठकीला काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा व उत्तर- मध्य मुंबईच्या खासदार प्रा. वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. यावेळी ॲड. अनिल परब म्हणाले की, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी आणि पदवीधरांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. वैद्यकीयची नीट, प्राध्यापकासाठीची नेट, महसूल विभागाची तलाठी, पीएचडीची सीईटी, इयत्ता १२ वी बोर्ड आदी परीक्षांचे पेपर फुटत आहेत. पेपर फुटीमुळे परिक्षार्थींचे शैक्षणिक जीवन उध्वस्त होत आहे. पदवीधरांचे प्रतिनिधी असलेल्या विधान परिषदेच्या आमदारांसमोरचा हा ज्वलंत विषय राहिला पाहिजे. दक्षता कक्ष स्थापन करुन त्याचे संयोजन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे दिल्यास या प्रकरणांना आळा बसेल, असा दावा त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकांना सामोरे जात आहे. काँग्रेस कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. या निवडणुकीतही मविआचे ऐक्य दिसेल. मविआ उमेदवार ॲड. अनिल परब मुंबई पदवीधर मतदारसंघातून सहज विजयी होईल, असा विश्वास काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी बैठकीत व्यक्त केला. विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढवत आहे. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक अशा दोन जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) लढवत आहे. तर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा दोन जागा काँग्रेस लढवत आहे. मुंबई पदवीधरचे उमेदवार ॲड. अनिल परब यांच्या वचननाम्याचे शिवसेना नेते व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिक्षणतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन झाले. २६ जून रोजी मतदानअसून गेली ३० वर्षे मुंबई पदवीधरमधून शिवसेना सातत्याने मोठ्या मताधिक्क्याने विजयी होत आलेली आहे.

हज यात्रेकरूंच्या ९६८ सेवेकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा-शानू पठाण

ठाणे :  हज यात्रा करण्यासाठी मक्का येथे जाणाऱ्या भाविकांना सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेवेकऱ्यांची गरज भासते. या सेवेकऱ्यांना चांगले मानधन मिळत असल्याने ठराविक कालावधीसाठी गोरगरीब बेरोजगार तरूण मक्केत जात असतात. मात्र,…

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत – सुनिल जाधव

अशोक गायकवाड रायगड : पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास इतर मागासवर्ग विमुक्त व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु केली असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग सुनिल जाधव यांनी केले आहे. बारावी उत्तीर्ण केलेल्या व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत होणार आहे. इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश घेतलेल्या परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्ग व विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भोजनभत्ता, निवासभत्ता व निर्वाहभत्ता उपलब्ध करुन दिला जात आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. मोठया शहरातील भोजनभत्ता ३२ हजार, निवास भत्ता २० हजार, उदरनिर्वाह भत्ता ८ हजार मिळतो तर जिल्हा पातळीवर भोजन भत्ता २५ हजार निवास भत्ता १२ हजार उदरनिर्वाह ६ हजार रुपये मदत दिली जाते. पात्र विद्यार्थ्यांना काय मिळणार :- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वार्षिक ६० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. पात्र विद्यार्थ्यांना भोजनभत्ता, गृहनिर्माण भत्ता, राहणीमान भत्ता अशा विविध स्तरावरील भत्ते दिले जातात. या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून उच्च शिक्षणासाठी मदत होत असते. या लागणारी कागदपत्रे :-विद्यार्थी ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एसबीसी, प्रवर्गातील असावा, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असणे आवश्यक आहे, अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे असावीत. अर्ज सादर करण्याकरीताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्ष-अर्ज स्विकारण्याची तारीख २० जून २०२४, अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक-१५ जुलै २०२५, निवड यादी जाहीर करण्याचा दिनांक ०१ ऑगस्ट २०२४. उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष- अर्ज स्विकारण्याची तारीख ०५ ऑगस्ट २०२४, अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक-२० ऑगस्ट २०२४,, निवड यादी जाहीर करण्याचा दिनांक ०२ सप्टेंबर २०२४. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, जि.रायगड या कार्यालयात अर्ज कसा करावा व कोठे करावा या संबंधी माहिती दिली जाईल.