Month: June 2024

ठाण्यात शुक्रवार, शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार

० तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी शटडाऊन ० वेगवेगळ्यावेळी पाणी पुरवठा बंद राहणार        ठाणे  : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील तातडीच्या दुरुस्ती कामांमुळे शुक्रवार, २१ जून रोजी स.११.०० वाजल्यापासून शनिवार, २२ जून रोजी…

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत !

मुंबई : महाराष्ट्रवासीयांना खुषखबर आहे. पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअतर्गत आता पाच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबतचे…

जरांगेंच्या विरोधात आम्हीही उमेदवार उभे करू : प्रकाश शेंडगे

नाशिक : मनोज  जरांगे जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसीही जरांगेच्या विरोधात उमेदवार उभा करतील, आमचं बहुमत आहे. ६० टक्के जाती या ओबीसी आहेत. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेतलं तर आम्ही ८० टक्के…

मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा लढवणार ?

छत्रपती संभाजीनगर :  सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127  जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे. ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे…

अजित पवार आणि शिंदेमुळेच भाजपा ७ जागा जिंकू शकला

अमोल मिटकरींचा अजब तर्क अकोला: भाजपला राज्यात मिळालेल्या लोकसभेच्या ९ जागा या केवळ अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेमूळेच मिळाल्याची अजब तर्क अमोल मिटकरींनी मांडला आहे. कालच राजकीय भाष्य करण्याआधी प्रदेशाध्यक्षांची…

लोकसभेला घासून नाही तर ठासून आलो- एकनाथ शिंदे

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. मग आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं?”, असा सवाल ठाकरे यांना करीत लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला असे प्रतिपादन…

‘भगवा’ छत्रपतींचाच, त्यावर कोणतेच चिन्ह नको- उद्धव ठाकरे

मुंबई : भगवा रंग हा शिवछत्रपतींचाच आहे, छत्रपतींच्या भगव्यावर कोणतेही चिन्हा छापू नका, चिन्ह छापून भगवा तुमचा होत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लगावत येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मशाल घरोघरी…

शालेय गणवेशाचे मंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते वाटप

मुंबई : महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि आर्थिक लाभ मिळावा यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येणारे शालेय गणवेशाचे शिलाईकाम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मविम) बचत गटांकडून  करून घेण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मविम बचत गटांकडून शिवणकाम केलेल्या शालेय गणवेशाचे वाटप महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते (ऑनलाइन) करण्यात आले. मंत्री कु.तटकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात प्रातिनिधीक स्वरूपात काही शाळांमध्ये मुलांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, मविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे(ऑनलाइन) सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही बचतगट  आणि शाळेतील विद्यार्थी शिक्षक (ऑनलाइन) उपस्थित होते. मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले, यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. यावर्षी ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेनुसार राज्यभरात एकाच रंगाचे गणवेश वाटप करण्यात येत आहेत. त्यामुळे एकसमानता पाहायला मिळते. यापुढे  गणवेश शिवणकाम करताना शालेय शिक्षण विभागाचे आणि मविमच्या तेजस्विनी या नावाचे स्टिकर लावता येतील का, याचाही विचार करावा, अशा सूचना करून बचत गटांच्या महिलांना रोजगार निर्मितीची संधी दिल्याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे  आभार मानले. महिलांना गणवेश शिवणकाम देण्यापूर्वी गावाचे स्कोप मापिंग करण्यात आले. महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती ड्रेस शिवतात, याची संख्या काढण्यात आली आहे त्यानुसार गणवेश संख्या देण्यात आली आहे. आता शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात गणवेशाचे  वाटपही सुरू झाले आहे. या निर्णयामुळे मुलांना गणवेश वेळेत मिळण्यास मदत होत आहे  आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला असल्याचे मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक- देवेंद्र फडणवीस

मुंबई : दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येवू न देता शिकविणे जिकिरीचे काम आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही या बाबीचे महत्व अधोरेखित केले आहे. राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा) प्रदीपकुमार डांगे, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत, तुषार महाजन, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना वाहतूक भत्ता देण्यात यावा. वाहतूक भत्ता न मिळालेल्या दोन शिक्षकांचा त्यामध्ये समावेश करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. टाटा सामाजिक संस्थेने प्रती विद्यार्थ्यांमागील शिक्षक व दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आवश्यक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देण्याचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षकांच्या अन्य विषयांबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. 00000

महाराष्ट्राला कौशल्य संपन्न बनवण्याची जय्यत तयारी सुरु!

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून आढावा बैठकीचे आयोजन   मुंबई : तालुकास्तरीय रोजगार मिळावे, नमो महारोजगार मेळावा २०२४ ची पूर्वतयारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातील आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया यासह विभागाच्या कामकाजाचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १८ जून रोजी मंत्रालयात आढावा घेतला. कौशल्य विकास विभागाची येत्या ३ महिन्यांची रूपरेषा ठरलेली असून, तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारासाठी महत्वाची पाऊले उचलण्यात येणार आहेत. तालुकास्तरीय रोजगार मेळाव्याचे स्वरूप, राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या एकूण मेळाव्याची संख्या, आगामी तीन महिन्यात घेण्यात येणाऱ्या मेळाव्याचे नियोजन, महास्वयं पोर्टलची सद्यस्थिती, सन २०२४-२५ मध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजनासाठीची पूर्व तयारी, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश, कोर्सेस वाढविण्याबाबत केलेले नियोजन इत्यादी गोष्टींबाबत महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य प्रबोधिनीचे नियोजन आणि सद्यस्थितीत सुरु असलेल्या बॅचेस तसेच भविष्यातील प्रवेश प्रक्रियेचे नियोजन याबाबतचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. या अकादमीमध्ये सध्या जर्मन भाषेचे प्रशिक्षण सुरु आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ठाण्यात सुरु झालेल्या स्वच्छ भारत अकॅडमीच्या माध्यमातून विविध विषयात कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याठिकाणी मिळणारे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना खात्रीशीर नोकरी आणि १८ ते ३५ हजार इतके वेतन मिळेल. येथील पहिल्या बॅचेस पूर्ण झाल्या असून, आता भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत. सदर अकॅडमी पाच महसुली विभागात कार्यान्वित करण्याबाबत देखील मंत्री लोढा यांनी निर्देश दिले आहेत. येत्या ३ महिन्यात १ हजार महाविद्यालयांमध्ये आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे, जेणेकरून शिक्षणासह कौशल्य विकासाला सुद्धा प्राधान्य दिले जाईल. तसेच ग्रामीण भागात कौशल्य विकासासाठी ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या जोडीला आता १००० ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये नव्या केंद्रांची स्थापना होणार आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाकडून राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांना मान्यता मिळण्याबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी कॅबिनेट मंत्री लोढा स्वतः लक्ष घालत आहेत. या कौशल्य विकास केंद्रांना मान्यता मिळण्याबाबत कठोर निकष असल्याने त्याबाबत काही महत्वाच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या आहेत. तसेच ऑगस्ट महिन्यात भारतातील सर्वात मोठा स्टार्टअप कन्व्हेन्शन मुंबईमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात संपूर्ण भारतातील स्टार्टअप्सना आमंत्रित करण्यात येणार आहे. याबाबत असलेल्या तयारीची देखील मंत्री लोढा यांनी माहिती घेतली. २ जुलै रोजी कौशल्य दिंडीचे आयोजन करणे, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, सुकाणू समिती स्थापनेबाबतची सद्यःस्थिती याबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आढावा घेतला. या व्यतिरकीत कौशल्य रोजगार विभागांतर्गत २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संस्थांमध्ये योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, अशा सूचना मंत्री लोढा यांनी दिल्या आहेत. या कार्यक्रमात सर्व ITI मिळून सुमारे २ लाख विद्यार्थी योग दिवसात सहभागी होतील.