Month: June 2024

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन!

अंबरनाथ :अंबरनाथमध्ये शिवसेनेत असलेली गटबाजी वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्समधून पुन्हा एकदा समोर आली आहे. या गटबाजीकरून काही दिवसांपूर्वी स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून दोन्ही गटांचे कान टोचले होते. मात्र त्यानंतरही काहीही सुधारणा झाल्याचं दिसून येत नाही. अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये दोन्ही गटाने एकमेकांचे फोटो टाळून उघडपणे आपली नाराजी दाखवून दिली आहे. अंबरनाथ शहरात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे दोन गट असून आजवर अनेकदा या गटबाजीचे उघडपणे प्रदर्शन झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही याच गटबाजीमुळे सर्वाधिक विकासकामे करूनही अंबरनाथ शहरातून शिवसेनेला अवघ्या ३५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः अंबरनाथ शहरात येऊन पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. मात्र याला आठवडाही उलटला नसताना पुन्हा एकदा वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्समधून गटबाजी समोर आली आहे. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अगदी बाजूबाजूला दोन्ही गटांनी बॅनर्स लावले असून त्यावर एकमेकांचे फोटो मात्र टाकलेले नाहीत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा या गटबाजीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता ३ महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत या गटबाजीचा पक्षाला फटका बसू नये, यासाठी वरिष्ठांनी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. – लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे अंबरनाथमध्ये येणार असल्याची कल्पना असताना देखील बैठकीच्या ठिकाणी शहराध्यक्षांचा फोटो एका गटाने डावळला होता. त्यावरून समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. – आढावा बैठकीत फोटो वरून वाद निर्माण झालेला असताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली होती तसेच पदाधिकाऱ्यांना देखील सज्जड दम देण्यात आला होता. – वाळेकर गट आणि आमदार किनीकर गट यांच्यात आता मोठ्या प्रमाणात वाद वाढले असून आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे पडसाद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 0000

कल्याण पूर्वेतील दावडी गावातील बेकायदा इमारतीवर हातोडा

भर पावसात भुईसपाट करण्याची कारवाई   कल्याण : कल्याण पूर्वेतील दावडी गावात महापालिकेच्या विकास आराखड्यामधील रस्त्यामध्ये उभारण्यात आलेली एक चार माळ्याची बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची कारवाई आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी मंगळवारपासून सुरू केली आहे. या इमारतीवर आत्ताच कारवाई केली नाहीतर माफिया ही इमारत सात माळ्याची करून तिचा निवासी वापर सुरू करू शकतात. त्यामुळे ही इमारत पाऊस सुरू असला तरी भुईसपाट करण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली. दावडीतून पालिकेचा विकास आराखड्यातील रस्ता गेला आहे हे माहिती असूनही भूमाफिया शेजूळ यांनी दावडी येथे चार माळ्याची बेकायदा इमारत उभी केली. शेजूळ यांनी विकास आराखड्यात बेकायदा इमारत उभारली असल्याच्या तक्रारी आय प्रभागाच्या साहाय्य्क आयुक्त मुंबरकर यांच्याकडे आल्या होत्या. मुंबरकर यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे, उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली माफिया शेजूळ यांना इमारतीची बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची नोटिस बजावली. विहित मुदतीत ते कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी शेजूळ यांची इमारत अनधिकृत असल्याचे घोषित केले. या बेकायदा इमारतीमधून घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी भर पावसात ही इमारत भुईसपाट करण्याचे काम मंगळवारपासून सुरू केले आहे. या इमारतीचे स्लॅब क्रॅकरने तोडल्यानंतर या इमारतीचे सिमेंटचे खांब पोकलेनच्या साहाय्याने तोडण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले. या कारवाईने दावडी भागातील भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आय प्रभागात गेल्या वर्षभरात भुईसपाट करण्यात येणारी ही सहावी बेकायदा इमारत आहे. दावडी गावात विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये बेकायदा इमारत उभारल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्त, उपायुक्तांच्या आदेशाने ही इमारत जमीनदोस्त केली जात आहे. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण. 0000

पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करावे –  पी. वेलरासू

ठाणे : अशोक गायकवाड विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आज पहिले प्रशिक्षण विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शीपणे होण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी यावेळी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. या मतदारसंघात २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै २०२४ रोजी नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात आज मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे, पालघर जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर तावडे, नगर परिषद प्रशासनाचे संचालक मनोज रानडे, उपायुक्त तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, कोकण विभागाचे उपआयुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, रेवती गायकर, सत्यम गांधी आदी यावेळी उपस्थित होते. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मतमोजणीचे हे पहिले प्रशिक्षण होते. यावेळी गायकवाड यांनी मतमोजणीसाठी करावयाची तयारी, मतपत्रिका कशा मोजाव्यात, त्यांची वैध-अवैधता कशी तपासावी, वैध मतांचा कोटा कशा प्रकारे तपासावे, किती फेऱ्या होणार आदी माहिती दिली. तसेच रानडे यांनीही मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणकोणती काळजी घ्यावी, डेटा कसा भरावा आदींची माहिती दिली. वेलरासू यांनीही मार्गदर्शन करून म्हणाले की, यंदा कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली आहे. तसेच यंदा मतदानाची वेळ वाढविण्यात आल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. या निवडणुकीत १३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे. सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीची प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया वेगळी असणार आहे. पसंतीक्रमानुसार मतदान होणार असल्याने मोजणी प्रक्रियेची व्यवस्थित तयारी करावी व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व बिनचूक होण्यासाठी प्रयत्न करावे. कोकण पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी सांगितले. तहसीलदार आसावरी संसारे यांनी सूत्रसंचालन केले. 0000

 स्वच्छता कार्यात लोकसहभाग वाढीवर भर देण्यासोबतच शहर स्वच्छतेकडे

अधिक बारकाईने लक्ष देण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश   नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ ला सामोरे जाताना स्वच्छता विषयक विविध उपक्रमांमध्ये व दैनंदिन बाबींमध्ये अधिक व्यापक…

 डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी दिला भाजपचा राजीनामा;

कॉँग्रेस पक्षात घेतला प्रवेश ;   मुंबई : मुंबई विद्यापीठात बायोलॉजिकल विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी आझाद मैदान, मुंबई येथील राजीव गांधी काॅंग्रेस भवन येथे मुंबई विभागीय काॅंग्रेस अध्यक्षा, खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार वर्षाताई गायकवाड यांनी डॉ. उज्ज्वला जाधव यांना काॅंग्रेस पक्षात प्रवेश देतांना त्यांच्या हाती काॅंग्रेस पक्षाचा झेंडा दिला आणि पक्षाच्या मजबुतीसाठी डॉ. उज्ज्वला जाधव या उत्तम काम करतील असा विश्वास व्यक्त केला. काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी एक भला मोठा पुष्पहार मुंबई काॅंग्रेस अध्यक्षा खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड आणि डॉ. उज्ज्वला जाधव यांना घालून आनंद व्यक्त केला. डॉ उज्ज्वला जाधव या २०१४ पासून भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी डॉ उज्ज्वला जाधव यांनी  भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष लल्लुसिंग आर्य, प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. डॉ उज्ज्वला जाधव यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला तेंव्हा माजी आमदार अशोक जाधव, विविध पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असतांना भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले भारताचे संविधान बदलण्याची भाषा वारंवार करीत होते. यासाठी चारशे पार चा नारा दिला जात होता. मी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निष्ठावंत कार्यकर्ती असून भारतीय संविधानाशी एकनिष्ठ असल्याने मला ही भारतीय जनता पार्टीची भूमिका पटत नव्हती म्हणून मी भारतीय जनता पक्ष सोडण्याच्या निष्कर्षाप्रत आले होते. काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, मुंबई काॅंग्रेस अध्यक्षा खासदार प्रा वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री नसीम खान आदींची भेट घेऊन चर्चा केली आणि अखेर आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच त्यांच्या प्रचंड यशस्वी झालेल्या भारत जोडो व भारत न्याय यात्रेने प्रभावित होऊन प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश घेतला, असे डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले. प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी लवकरच डॉ. उज्ज्वला जाधव यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा सुनिल तटकरे यांनी घेतला आढावा

महायुतीमध्ये ज्या मतदारसंघात उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही – सुनिल तटकरे शिर्डी : आपल्याला महायुतीत सर्वच ठिकाणी उमेदवारी मिळेल असे नाही मात्र ज्याठिकाणी उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शिर्डी येथे दिला. आज राज्यव्यापी दौऱ्याचा दुसरा दिवस असून सकाळी साईबाबांचे दर्शन घेऊन शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनिल तटकरे यांनी घेतला. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ता जागरुक असला पाहिजे.आगामी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जायचे आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला आपल्याला उत्तर देण्याचे काम करायचे आहे असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या जिल्हयाने अजितदादांना नेहमीच पाठबळ दिले आहे. हे भरभक्कम  पाठबळ कायम मिळण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. लोकसभा निवडणूकीत आणि आताही अजितदादांना सर्वाधिक टार्गेट करण्यात येत आहे. हे आपला मित्रपक्ष करत नाहीय तर आपल्यावर सतत लक्ष ठेवून असलेले विरोधातील काहीजण ही बदनामीची मोहिम राबवत आहेत त्यांना सडेतोड उत्तर दयायचे आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. जनसामान्यांचे पाठबळ कसे मिळेल अशी भूमिका घेतली तर पक्षसंघटना अजून मजबूत होणार आहे.जनसामान्यांचे प्रश्न घेऊन तुम्हाला संघटनेने दिलेल्या पदाचा उपयोग कसा करता येईल यावर काम करा असा सल्लाही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आपले विचार मांडले. शिर्डी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक शिर्डी येथे आज पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, उत्तर शिर्डी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, प्रदेश सचिव संग्राम कोतेपाटील, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

उत्तर, पश्चिम भारतात परिवर्तनाचे वारे का?

मागोवा भागा वरखडे नेहमी उत्तम यश मिळवून देणाऱ्या उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाजपच्या ६७ जागा कमी होणे हा निवडणुकांना कलाटणी देणारा मुद्दा भाजपसाठी चिंतनाचा विषय ठरला.…

प्रभू रामचंद्र आणि हनुमंताने फिरविली पाठ; अहंकाराच्या उडाल्या ठिकऱ्या !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशातील सुमारे शंभर कोटी मतदारांनी हातात घेतलेल्या या निवडणुकीत अनेकांचे ‘हिशेब’ चुकते केले. धर्माचा आणि प्रभू रामचंद्र तसेच महावीर हनुमंताच्या नावाने बाजार मांडणाऱ्यांकडे…

गरज नव्या शैक्षणिक धोरणाची…

महाराष्ट्रात पोलिस शिपायांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ हजार ४७१ जागांसाठी राज्यभरातून १७ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. त्यात अनेक उच्चशिक्षितहीस असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण…