Month: June 2024

कोकणच्या विकासासाठी निरंजन डावखरे यांना विजयी करा – आनंद परांजपे

ठाणे : कोकणच्या विकासासाठी पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते,  ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पदवीधर मतदारांना केले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील होऊ घातलेल्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार ॲड. निरंजन वसंतराव  डावखरे हे कोकण पदवीधर निवडणुकीत उभे आहेत. गेली १२ वर्ष विधानपरिषदेमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना उत्कृष्ट अशी कामगिरी ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांनी केली आहे. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचे शिक्षणाचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न असे कोकणातील विविध प्रश्न विधानपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी मांडले. ते सोडविण्याचा ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांनी प्रयत्न केला. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार ॲड. निरंजन वसंतराव डावखरे हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. २६ जून २०२४ रोजी मतदान आहे. माझी कोकणातील सर्व पदवीधरांना विनंती आहे की येत्या २६ जूनला न विसरता मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि ॲड निरंजन वसंतराव डावखरे यांच्या नावासमोरील एक सरळ उभी रेष काढून आपले अमूल्य मत त्यांना देऊयात आणि कोकणच्या विकासासाठी  पुन्हा एकदा ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांना विजयी करुन कोकण विकासाची हमी घेऊयात, असे आवाहन प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सर्व पदवीधर मतदाराना केले आहे. ०००००

पुढील काळातील वचन पूर्ण करण्यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’- निरंजन डावखरे

ठाणे : केलेली कामे पूर्णत्वास नेली असल्याचा अहवाल ‘कर्तवपथा’तुन मांडण्यात आला आहे तर पुढील काळातील वचन पूर्ण करण्यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ प्रकाशित करण्यात आल्याची माहिती, ठाणे शहरातील विविध शाळा कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाशी संवाद साधताना कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन डावखरें यांनी दिली. येणाऱ्या सहा वर्षाच्या काळासाठी महत्वाकांक्षी व्सिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. या व्हिजन डाॅक्युमेंटमध्ये मिशन एज्युकेशन नुसार विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाची पावले ओळखून नवीन शैक्षणिक धोरण आखले आहे. हायस्पीड इंटरनेट, डेटा व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनो आणलेल्या क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला लाभ मिळावा यासाठी समन्वय साधण्यात येणार आहे. जिल्हानिहाय व तालुकानिहाय प्रत्येक शाळेत डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससाठी अखंड विजेची सुविधा प्राप्त करुन देणार, कोकणातील पाचही जिल्ह्यातील शाळा पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने ग्रीन स्कूल करण्यात येईल. यासाठी शासकीय योजना आणि MEDHA च्या योजनांसाठी समन्वय साधून कोकणातील प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय मार्गदर्शन केंद्र यात ग्रंथपाल, इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार, अर्धवेळ ग्रंथपाल व प्रयोग शाळा सहाय्यकांना पूर्णवेळ सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती गती देणार, राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्‍नशील आहोत. हे व्हिजन डाॅक्युमेंट लागू करण्यासाठी येत्या २६ जुनला कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत निवडून देण्याची विनंती महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरातील विविध शाळा काॅलेज मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाशी संवाद साधताना केली. यावेळी नौपाडा येथील सरस्वती स्कूल, शिवसमर्थ विद्यामंदिर, चरई येथील मावळी मंडळ,, श्रीरंग विद्यालय, माजीवडा येथील ग्रामीण शिक्षण संस्था हायस्कूल, वर्तकनगर येथील थिराणी हायस्कूल, घोडबंदर रोड येथील लोढा वर्ल्ड हायस्कूल या शाळांतील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांच्या सभांना मोठ्यासंख्येने उपस्थित राहून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी माजी नगरसेवक सुनेश जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, समाजसेवक डॉ. राजेश मढवी, साहित्यिक नरेंद्र पाठक, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे अध्यक्ष सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. ०००००

मेधा पाटकर यांचे उपोषण थांबवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने

ठाणे : नर्मदा बचओ आंदोलांनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन पुन्हा सुरू करावे लागले आहे. आंदोलनाच्या नेत्या मा. मेधाताई पाटकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह दि, १५ जून २०२४ पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बेदखल झालेल्या प्रतिनिधींचे साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलक काही हजार लोक त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कावर ठाम असून त्यांना देशभरातून लाखो लोकांचे समर्थन मिळत आहे.मधा पाटकर यांचे उपोषण थांबवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. पुनर्वसना शिवाय डुब नाही. सरदार सरोवर धरणाची पाणीपातळी १२२ एमएसवर कायम ठेवा ही आमची प्रमुख मागणी आहे. सरदार सरोवर बाधित आदिवासी, शेतकरी, मजूर आणि नर्मदा खोऱ्यातील सर्व भूमिहीन समुदायांनी अहिंसक सत्याग्रही म्हणून संघर्ष केला आणि पुनर्वसनाचा हक्क, जीवन आणि उपजीविकेचा हक्क मिळवला. भूमिहीन, स्त्रिया, भूमीधारक, मत्स्य कामगार, आदिवासी, कुंभार इत्यादींचाही कायदेशीर आणि सामूहिक कृतीं मुळे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात उदारीकरण केलेल्या राज्य धोरणांमुळे समावेश झाला. कालांतराने सुमारे ५० हजार कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे. तथापि, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अजूनही काही शेकडा सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त कुटुंबे आहेत, तर मध्य प्रदेशात हजारो कुटुंबे आहेत, ज्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे.असे असूनही नर्मदा न्यायाधिकरणाच्या पुरस्काराचे, कायद्याचे आणि धोरणाचे उल्लंघन करून, निमाड, मध्य प्रदेशच्या मैदानी भागातील वरची गावे आणि एका टाऊनशीपसाठी बॅकवॉटरची पातळी बदलण्यात आली. पात्र कुटुंबांच्या यादीतून १५९४६ कुटुंबांना वगळण्यात आले. परंतु त्यांची घरे अधिग्रहित करण्यात आली. त्यांचे सर्व सामान उध्वस्त झाले. गुरेढोरे आणि माणसं मरणासन्न झाली !! अधिकाऱ्यांशी संघर्ष आणि संवादानंतर त्यांना काही मदतीची रक्कम मिळाली, पण अद्याप पूर्ण भरपाई मिळालेली नाही २०२४ चा पावसाळा दारात आलेला असताना पुढचे पाऊल म्हणून नर्मदा बचाव आंदोलन सत्याग्रहाची सुरुवात करत आहे. आंदोलनाच्या रास्त मागण्या खालीलप्रमाणे आहेत., केंद्रीय जल आयोगाने १९८४ मध्ये अंदाजित केलेली आणि २०२३ मध्ये ती बरोबर असल्याचे सिध्द झालेली बॅकवॉटरची पातळी ( जुनी ) स्वीकारा., बेकायदेशीरता आणि अनियमिततेमुळे घरे, शेते, गुरेढोरे, माणसे आणि सर्व मालमत्तेचे २०२३ मध्ये झालेल्या नुकसानाची बाजारमूल्याने भरपाई द्या., कायदे, धोरणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पूर्ण पालन करून सर्व प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करा., रिक्त पदांवर पुनर्वसन अधिकारी आणि तक्रार निवारण प्राधिकरण, मध्य प्रदेशच्या माननीय सदस्यांची लवकरात लवकर नियुक्ती करा., वरील कामे पूर्ण होईपर्यंत सरदार सरोवरची पाण्याची पातळी १२२ मीटर (क्रेस्ट लेव्हल) राखा, १७ मीटरचे दरवाजे उघडे ठेवा.वरील मागण्या घेऊन जिल्हाधिकारी  ह्यांना भेटून हे निवेदन मा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे ह्यांना निवेदन द्यावं. मागण्या मान्य करण्यासाठी खालील संस्था संघटने तर्फे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्देशने करण्यात आली.ह्या निर्दशनास जगदीश खैरालिया, राष्ट्रीय सरचिटणीस, श्रमिक जनता संघ, डॉ. संजय मंगला गोपाळ, राष्ट्रीय समन्वयक, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, राजेंद्र चव्हाण, ठाणे लोकसभा समन्वयक, भारत जोडो अभियान, नरेश भागवाने, महासचिव, बहुजन विकास संघ, लिलेश्र्वर बनसोडे, निमंत्रक, कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिति, निर्मला पवार,  भारतीय महिला फेडरेशन, सुब्रतो भट्टाचार्य स्वराज अभियान, ठाणे हर्षलता कदम, अध्यक्ष, समता विचार प्रसारक संस्था, नितीन देशपांडे उपाध्यक्ष, धर्मराज्य पक्ष ह्या संस्था संघटना सहभागी झाले होते. हे निर्देशन यशस्वी करण्यासाठी अजय भोसले, सुनिल दिवेकर, गणेश चव्हाण ह्यांनी मेहनत घेतली. 000000

रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने रविवारी ज्येष्ठ व विधवा महिलांसाठी मोफत छत्री वाटप – भास्कर बैरीशेट्टी

अनिल ठाणेकर   ठाणे : स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने  शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी २३ जून रोजी करण्यात आल्याची माहिती सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली आहे. पावसाळा सुरू होत आहे. पावसापाण्यात महिलांना संरक्षण मिळावे या हेतुने स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी यांच्यावतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी, २३ जून २०२४ रोजी,सायंकाळी ७ वाजता, जनसंपर्क कार्यालय, उपवन सोसायटी, शिवाई नगर शिवसेना शाखेजवळ, ठाणे (प) येथे करण्यात आले करण्यात आले आहे. छत्री वाटप कार्यक्रमध्ये जो उपस्थित राहील आणि कूपन आणेल त्यालाच छत्री मिळेल. छत्री वाटपाची कूपन जनसंपर्क कार्यालय येथून घेऊन जाणे. कूपन शिवाय छत्री दिली जाणार नाही. एका व्यक्तीला एकच कूपन दिले जाईल आणि एका व्यक्तीला एक कूपन एक छत्री दिली जाईल. एका कूपन व्यतिरिक्त दुसरे कूपन आणले तर छत्री मिळणार नाही. कार्यक्रमानंतर कूपन आणल्यास छत्री मिळणार नाही, याची नोंद घ्यावी, तरी या छत्रीवाटप कार्यक्रमास महिलांनी मोठ्यासंखेने उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक कार्यसम्राट माजी नगरसेविका सौ. रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी व सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी  यांनी केले आहे. ०००००

कोकण पदवीधर-शिक्षक मतदारांना २६ जूनला विशेष नैमित्तीक रजा मंजूर-अमोल यादव

अशोक गायकवाड   नवी मुंबई : कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावणेसाठी मतदानाच्या दिवशी दि. २६ जून, २०२४ रोजी पदवीधर-शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिनांक २४ मे २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार दि.२६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, मतमोजणी दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी होणार आहे. विधानपरिषद शिक्षक/ पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी पदवीधर/ शिक्षक निवडणूकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तीक रजा जाहीर करण्यात आली आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतिरिक्त असणार आहे. या रजे बाबतचा शासन निर्णय www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जाहीर करण्यात आलेल्या नैमित्तीक रजेचा लाभ घेऊन पदवीधर- शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदानाचा हक्क बजावाव असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे. 00000

फ्लाईंग शीख मिल्खा सिंग

भारतातीलच नव्हे तर जगातील महान धावपटूत ज्यांची गणना होते असे भारताचे महान धावपटू फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांची आज पुण्यतिथी. फ्लाईंग शीख अशी उपाधी मिळालेल्या मिल्खा सिंग यांचा जन्म २०…

१८ जून हा का आहे काळा दिवस?

१८ जून १९५१ रोजी पहिली घटना दुरुस्ती झाली. अनुच्छेद ३१ (ए) व (बी) मध्ये बदल करून, नवे परिशिष्ट-९ संविधानात घुसडण्यात आले. मूळ संविधानात हे परिशिष्ट नव्हते. या परिशिष्टात टाकलेले कायदे…

वेध डॉ. चंद्रशेखर टिळक केरळमध्ये दाखवलेले राजकीय अस्तित्व, ओरिसामध्ये विधानसभा आणि लोकसभेत मिळालेले घवघवीत यश, कर्नाटकमध्ये आटोक्यात राहिलेली पडझड आणि दाक्षिणात्य राज्यांमध्ये मतांच्या टक्केवारीत झालेली वाढ या सगळ्याचे प्रतिबब एनडीए…

एलन मस्क प्रकरणाचा अन्वयार्थ…

देशात लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत सर्वच विरोधी पक्ष हे येत्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष ईव्हीएम मशीन हॅक करून घोटाळा करणार असा आरोप करीत होते. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यावेळी भारतीय जनता…