Month: June 2024

कोकणात पावसामुळे बळीराजा सुखावला

रत्नागिरी : हवामान खात्याने वर्तवल्यानुसार पावसाने कोकणात जोर धरल्यामुले बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. कणकवली, कुडाळ सावंतवाडीसह जिल्ह्याच्या इतरही भागात पाऊस सुरू असून काही…

मुंबई-गोवा हायवेची पावसात दैना

रायगड : पहिल्याच पावसाने मुंबई–गोवा हायवेची दैना उडाली आहे. हायवेवर चिखल झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ऐन पावसाळयात मुंबई-गोवा हायवेची ही अवस्था झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे याचं मुंबई-गोवा हायवेच्या कामासाठी गेल्या…

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीवर टांगती तलवार?

काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांपासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर राज्यातील तणावाची परिस्थिती पहाता विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे कंबरडे मोडणारे माजी डीजीपी कुलदीप खुदा यांनीही…

अजित पवारांमुळे भाजपाला फायदा !

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा अजब तर्क मुंबई : भाजापाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळेच पराभव झाल्याची तर्कसंगत मांडणी करण्यात आली होती. पण भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी आज अजब तर्क देत ऑर्गनायझरलाच खोटे ठरवले.…

जरांगेचे उपोषण स्थगित

“आता यानंतर उपोषण नाही, आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार”- मनोज जरांगे जालना : मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटीत उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या विनंतीवरून उपोषण एक…

पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. भरत बास्टेवाड*

अशोक गायकवाड अलिबाग :जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे,…

‘मी एक मास्तर’ पुस्तक प्रकाशन सोहळा

मुंबई : रविवार, दिनांक ९ जून रोजी लोणावळ्यातील गुरुकुल विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवर्य दीपक चैतन्य गंगोळी लिखित “मी एक मास्तर” ह्या शिक्षण क्षेत्राशी निगडित अशा पुस्तकाचे प्रकाशन पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या…

 ठाण्यात हरित कचऱ्याची डोकेदुखी

 रस्त्यावर जागोजागी छाटलेले वृक्ष पडून ठाणे : शहरात गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे अनेक वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. तर काही ठिकाणी ठाणे महापालिकेने वृक्षांची छाटणी केली. परंतु छाटणी केलेल्या…

 रानभाज्या बाजारात दाखल

 जांभूळ, करवंदांसह, रानभाज्यामुळे आदिवासी महिलांना मिळतोय रोजगार बदलापूरः बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरातील बाजारपेठांमध्ये रानभाज्या आणि रानमेवा दाखल झाला आहे. बदलापूर शहराची बाजारपेठ, शहराच्या वेशीवरील एरंजाड, सोनिवली परिसरासह कल्याण अहमनदगर राष्ट्रीय महामार्गावर आदिवासी महिलांकडून रानभाज्यांची विक्री केली जात आहे. कोणत्याही मशागतीशिवाय उगवणाऱ्या या रानभाज्या पौष्टीक आणि आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी असतात. त्यामुळे जून महिन्यात या रानभाज्यांना पसंती मिळते. त्यामुळे आदिवासी कुटुंबाना आणि विशेषतः महिलांना हक्काचा रोजगार मिळतो आहे. ग्रामीण भागात दैनंदिन आहारात रानभाज्यांचे मोठे महत्व आहे. आदिवासी बांधव आपल्या जुन्या जाणत्या बांधवांनी दिलेल्या माहितीच्या जोरावर रानातून या भाजा निवडून आणतात. गेल्या काही वर्षात शहरी भागातही या रानभाज्यांना महत्व प्राप्त होताना दिसते आहे. मे महिन्यात पडणाऱ्या अवकाळी पावसानंतर या रानभाज्या रानात बहरू लागतात. आदिवासी बांधव त्या निवडून बाजारात विक्रीसाठी आणतात. कोणत्या लागवड आणि मशागतीशिवाय या रानभाज्या वाढतात. त्यामुळे त्यांच्यात अनेक औषधी गुण असतात. जुनच्या पहिल्या आठवड्यापासून बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या भागात या रानभाज्यांची आवक वाढल्याचे दिसून आले आहे. बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर आदिवासी महिला या रानभाज्या घेऊन बसलेल्या दिसतात. त्यासोबतच महत्वाचे चौक, बदलापुरच्या वेशीवर एरंजाड, सोनिवली, कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग, बदलापूर बारवीमार्गे मुरबाड रस्त्यावर आणि मुरबाडमध्येही या रानभाज्यांची विक्री करताना आदिवासी महिला दिसत आहेत. शेवळी, टाकळा, कुळू, कुड्याची फुले, चायवळ, तेलपट, मोहदुडी आणि लोतं या भाजा सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १० रूपये जुडीपासून ४० रूपयांपर्यंत या भाज्यांची विक्री केली जाते आहे. ग्राहकही या भाजांना पसंती देत आहेत. संवादामुळे नवग्राहक दूरच आदिवासी महिला रानभाज्या विक्री करताना त्याची पुरेशी माहिती देऊ शकत नसल्याने नवग्राहक या भाज्यांकडे वळताना दिसत नाही. या रानभाज्या विक्रीच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्याची माहिती जुन्या पिढीकडे अधिक आहे. त्याचीही योग्य माहिती दिल्यास नवी पिढीही या भाज्यांकडे वळेल. जांभुळासाठीही ग्राहकांची गर्दी सध्या बदलापुरच्या जांभळानेही बाजारात गर्दी केली आहे. १६० ते २०० रूपये प्रति किलो दराने आदिवासी बांधव या जांभळांची विक्री करत आहेत. बदलापुरच्या जांभळांना भौगोलिक मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. बारवी पर्यटनासाठी येणारे पर्यटक आवडीने या जांभळांना पसंती देत आहेत. सोबत करवंदांनाही पसंती मिळते आहे.

 पावसाच्या पाण्याच्या साठवणीसाठी प्रकल्प;

२.२ लाख घन मीटरपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा होणार पुनर्भरणा रायगड जिल्ह्यातील उपक्रम पनवेल (प्रतिनिधी)  टाटा स्टीलने जागतिक पर्यावरण दिनी रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये पावसाच्या पाण्याच्या साठवणीच्या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ केला आणि प्रकल्पाच्या ठिकाणी १५०० पेक्षा जास्त झाडे लावून सस्टेनेबिलिटी महिन्याची सुरुवात साजरी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगडचे क्षेत्रीय अधिकारी जयंत हजारे आणि क्षेत्र अधिकारी मीना पवार, खोपोली व होसूरचे कार्यकारी प्लान्ट प्रमुख कपिल मोदी आणि सावरोली गावाचे सरपंच संतोष गणेश बैलमारे हे यावेळी उपस्थित होते. पावसाच्या पाण्याची साठवण करणाऱ्या या नवीन प्रकल्पामुळे प्लान्टची ताज्या पाण्याची आवश्यकता ५० हजार घन मीटरने कमी होईल. या प्रकल्पामध्ये ९ पुनर्भरण खड्ड्यांद्वारे २.२ लाख घन मीटरपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा जलचरामध्ये पुनर्भरणा केला जाण्याची अपेक्षा आहे.सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले खोपोली हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक औद्योगिक शहर आहे. इथे दरवर्षी १८५०-३९१४ मिलीमीटर पाऊस होतो, त्यामुळे महाराष्ट्रातील सुपीक पाणलोट क्षेत्रांमध्ये खोपोलीचा समावेश होतो. टाटा स्टीलमध्ये जून हा सस्टेनेबिलिटी महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा, जागरूकता सत्रे, वृक्षारोपण मोहीम इत्यादींचा समावेश असणार आहे. 0000