Month: June 2024

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या -छायादेवी शिसोदे

ठाणे : ठाणे जिल्हयात खरीप हंगामास सुरूवात झालेली असून जिल्हयात खरीप हंगामाखाली 60,000 हेक्टर एवढे क्षेत्र आहे, त्यापैकी भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 56,000 हेक्टर एवढे आहे. भात बियाण्यांची विक्री मोठ्या…

प्रशासकांकडून ई रिक्षाच्या चार्जिंग स्पॉटची पाहणी

माथेरान : नुकताच हातरीक्षा चालकांच्या हाती पर्यावरण पूरक ई रिक्षाचे स्टेरिंग आल्यामुळे पर्यटकांसह स्थानिक लोक मोठया प्रमाणावर या स्वस्त आणि सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेत आहेत.सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सनियंत्रण समितीने…

ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेने कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या या पत्रकात म्हटले आहे की, कोकण विभागीय क्षेत्रात राहणारे व ज्यांची  कोकण पदवीधर मतदार संघाचे यादीत नावे आहेत अश्या सर्व निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस बांधवांना संघटनेतर्फे विनंती करण्यात येत आहे की, श्री डावखरे निरंजन वसंत हे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे आहेत. श्री. डावखरे निरंजन वसंत  हे आपले सर्वांचे खास मित्र व परिचयाचे असून ते पोलिसांना सतत मदत करीत असतात. ते या क्षेत्रात महान कार्य करीत आहेत. तरी कोकण परिसरातील नोंदणी झालेले सर्व पदवीधर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी बुधवारी, २६ जुन २०२४ रोजी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण पदवीधर मतदारसंघातुन उमेदवार असलेले श्री. डावखरे निरंजन वसंत यांच्या नावासमोरील प्रथम क्रमांकाचा 1 आकडा टाकून त्यांना बहुसंख्य मतांनी निवडून द्यावे, अशी विनंती संघटनेचे  सल्लागार सोपानराव महांगडे, काशीनाथ कचरे, राजाभाऊ तांबट, मोतीलाल जाधव, अध्यक्ष माधव माळवे, कार्याध्यक्ष  रघुनाथ घरटे, सचिव व खजिनदार बाळासाहेब दंडवते आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

पावसाळ्यात दुर्घटना घडू नयेत, यासाठी दक्ष रहा – पालक सचिव सुजाता सौनिक

ठाणे,  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामांचा तसाच पावसाळ्याच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यंदाच्या…

कल्पक, प्रयोगशील प्रकाशक माधव जोशी यांचे निधन

ठाणे : परममित्र पब्लिकेशनचे संस्थापक तथा अभाविपचे माजी पूर्णकालिन कार्यकर्ते माधव जोशी यांचे बुधवारी (ता.१२ जून) मध्यरात्री अल्पशः आजाराने निधन झाले. मृत्यु समयी ते ६६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,…

गोदी कामगारांना मिळालेले फायदे टिकविणे हेच कामगार चळवळी समोर मोठे आव्हान

मुंबई, स्वातंत्र्य सेनानी, मुंबईचे माजी महापौर,  माजी खासदार व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांनी ७० वर्ष बंदर व गोदी कामगार चळवळीचे  नेतृत्व करून ६२  वर्ष मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्तपदी काम केले.…

तलासरी तहसील व पोलीस कार्यालयावर माकपचा हजारोंचा धडक मोर्चा

अनिल ठाणेकर ठाणे : पोलीस आणि प्रशासन यांच्या दादागिरीविरुद्ध तलासरी तहसील व पोलीस कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, माकपचे पाॅलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, किसन गुजर, किरण गहला, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, रामू पागी, सुनीता शिंगडा, नंदू हाडळ, लहानी दौडा, सुरेश भोये, चंद्रकांत घोरखाना यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा जबरदस्त धडक मोर्चा काढण्यात आला. गेले काही महिने तलासरी तालुक्यात पोलीस आणि प्रशासन भाजप-आघाडीच्या राज्य सरकारने आणलेल्या दबावाला बळी पडून सामान्य आदिवासी, महिला यांवर दादागिरी करीत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देणे, त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणे, त्यांच्यावर खोट्या केसेस करणे, त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल न घेणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. कहर म्हणजे थेट तलासरी पंचायत समितीच्या सभापती सुनीता शिंगडा यांच्याच जमिनीवर अतिक्रमण करण्याची भाजपच्या गुंडांनी हिम्मत केली. याचा समाचार घेणे भागच होते.  या त्यांच्या दादागिरीविरुद्ध जबरदस्त मोर्चा काढून त्यांना अद्दल घडवण्याचा निर्णय मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटना यांनी घेतला. आठवडाभर जोरदार प्रचार करून बुधवारो, १२ जून २०२४ रोजी हजारो महिला व पुरुषांचा मोर्चा दणकेबाज घोषणा देत तहसील आणि पोलीस स्टेशनच्या आतच घुसला. अखेर सर्व अधिकार्‍यांनी तातडीने शिष्टमंडळाला बोलावून चर्चा केली. सर्व तक्रारी ताबडतोब सोडवण्याचे आश्वासन दिल्यावरच मोर्चा संपला. 0000

शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

 कल्याण व भिवंडीतील मागासवर्गीय मुलांमुलींचे ठाणे :- इयत्ता 8 वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व महाविद्यालयीन विभागातील प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या भिवंडी व कल्याण येथील मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वसतिगृह कार्यालयात प्रवेश अर्ज मोफत उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वसतीगृहांचे गृहपाल प्र. ना. मडावी यांनी केले आहे. वसतीगृहात प्रवेशासाठी अर्जासोबत लागणारी प्रमाणपत्रे (सर्व छायांकीत प्रती)- 1. गुणपत्रिका, 2. शाळा सोडल्याचा दाखला, 3. जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी), 4. उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकारी),  5. रहिवासी दाखला (सरपंच/तलाठी/नगरसेवक), 6. आधार कार्ड तसेच प्रवेश घेतेवेळी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. 1. शाळा / महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, 2. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत, 3. वैद्यकीय प्रमाणपत्र 4. पासपोर्ट साईज फोटो  5.  10 रुपयांचे कोर्ट फी टिकीट लावून वसतिगृह नियमाचा करारनामा करुन द्यावे लागेल. अधिक माहितीसाठी संपर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, भिवंडी, मानसरोवर शॉपीग कॉम्पलेक्स, पहिला माळा, भिवंडी, (संपर्क क्र 9767612897) मागास तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, भिवंडी, मानसरोवर शाँपिग कॉम्प्लेक्स, दुसरा माळा भिवंडी.मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत), कल्याण, गौरी अपार्टमेन्ट, पाचवा माळा, बेहतुरकर पाडा, कल्याण पश्चिम, (संपर्क क्र. ९७६७६१२८९७). या वसतिगृहात वर्ग 11 ते 12 व पॉलिटेक्निक प्रथम / आय. टी. आय मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. (हे वसतिगृह शासकीय इमारत, गौरीपाडा, कल्याण, येथे स्थलांतरित करण्यात येत आहे.) 000

दृष्टिबाधितांच्या सक्षमीकरणासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे –  रमेश बैस

अशोक गायकवाड मुंबई :नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड – ‘नॅब’ – संस्थेने ब्रेल पुस्तक छपाईसाठी खरेदी केलेल्या अत्याधुनिक ‘ब्रेलो ३००’ या प्रिंटिंग मशीनचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. १२) संस्थेच्या वरळी येथील मुख्यालयात करण्यात आले. राज्यपालांनी दिलेल्या स्वेच्छा निधीतून खरेदी केलेल्या या छपाई मशीनमुळे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी क्रमिक पुस्तके, धार्मिक पुस्तके, पत्रिका व अवांतर पुस्तके छापता येणार आहेत. तंत्रज्ञान सर्वांकरिता, विशेषतः दिव्यांग व्यक्तींकरिता वरदान सिद्ध होत आहे. मात्र दिव्यांगांना नोकरी व्यवसायाकरिता आज नवनवी कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक झाले आहे. या दृष्टीने त्यांना कौशल्याबाबत अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. दिव्यांगांना ज्ञान व कौशल्यात अग्रेसर ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने ऑडिओ पुस्तके तयार केली पाहिजे तसेच ती स्वस्त व सहज उपलब्ध करून दिली गेली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. नॅब इंडिया संस्थेने दृष्टिबाधित व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे व सर्वोत्कृष्ट दिव्यांग सहायता केंद्र बनण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी केले. यावेळी दहावी बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या शिक्षकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘नॅब’ संस्थेच्या इमारतीची दुरुस्ती व रंगकाम तसेच इमारतीवर सौर पॅनेल बसविण्यास आर्थिक सहकार्य करणाऱ्या मार्श इंडिया, एचएसबीसी व कन्सर्न इंडिया फाउंडेशन या संस्थेच्या प्रतिनिधींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘नॅब’ च्या कार्याची माहिती देणाऱ्या एका माहितीपटाचे देखील प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला नॅब इंडियाचे अध्यक्ष हेमंत टकले, कार्यवाहक मानद महासचिव डॉ. विमल कुमार डेंगला, सचिव हरेंद्र मल्लिक, कार्यकारी संचालिका पल्लवी कदम तसेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे समिती सदस्य, कर्मचारी आणि निमंत्रित उपस्थित होते.

डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

अशोक गायकवाड मुंबई:राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के यांची सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.* सातारा येथील डॉ धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय येथे प्राचार्य असलेल्या डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची नियुक्ती ते पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, या पैकी जे अगोदर त्या दिवसापर्यंत केली आहे. सातारा येथे नव्याने स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डी टी शिर्के यांची २१ ऑक्टोंबर २०२२ च्या शासन आदेशान्वये नियुक्ती केली होती. त्यानंतर दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ व १३ एप्रिल २०२४ च्या मा. राज्यपालांच्या आदेशान्वये पुढील सहा-सहा महिन्यांकरिता त्यांचेकडे पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. डॉ ज्ञानदेव म्हस्के यांनी प्राणिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्राप्त केली असून गेल्या १९ वर्षांहून अधिक काळापासून ते प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ एस. एस. मंथा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आप्पासाहेब पाटील, पुणे येथील भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शिवाजीराव कदम, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. गंगा प्रसाद प्रसाई (युजीसी प्रतिनिधी) हे ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांची निवड जाहीर केली.