Month: June 2024

भाजप कार्यकर्त्यावर हल्ला

एकला अटक उल्हासनगर  :  बांधकाम व्यवसायात  सलग्न असलेल्या भाजपा कार्यकर्त्या वर खंडणी साठी जीवघेणा हल्ला करणाऱ्या निलेश सरोजा याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक करून गजाआड केले  आहे. भाजप कार्यकर्त्यावर झालेला हल्ला ही  संपूर्ण घटना…

पुनर्विकासाच्या नावाखाली फसवणूक करण्याऱ्या विकासकांच्या कामांवर टाच आणणार

संजय केळकर यांचे आश्वासन अनिल ठाणेकर ठाणे : पुनर्विकासाच्या नावाखाली कुटुंबांची अशा फसवणूक करण्याऱ्या विकासकांची जिथे जिथे कामे सुरु असतील त्यावर टाच आणली पाहिजे. हे मोकाट सुटले तर पुनर्विकासाच्या नावाखाली अजून सामान्य कुटुंबांना.  या फसवणूक झालेल्या कुटुंबांना बरोबर घेऊन त्यांना मुदतीत न्याय मिळावा याकरिता मला जे जे म्हणून करावे लागेल ते मी करेन असे आ. संजय केळकर यांनी सांगितले. पुनर्विकास मध्ये फसवणूक झालेल्या १६ सोसायट्यांतील २०० सभासदांनी रविवारी ठाण्यातील घंटाळी सहयोग मंदिर हॉल येथे आक्रोश बैठक घेतली. यावेळी त्यांनी आमदार संजय केळकर यांना निमंत्रित केले होते. यावेळी विद्याधार वैशंपायन, ॲड. सुभाष काळे, माजी नगरसेवक सुनेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या आक्रोश बैठकीत फसवणूक झालेल्या सदस्यांनी आपली मते मांडली. आमची घोर फसवणूक जोशी एंटरप्रायझेस च्या विकासकांनी केली आहे. आमची घराची स्वप्ने त्यांनी धुळीस मिळवली आहेत. वर्ष भर भाडेपण नाही. २०२३ ला आम्हाला भाडे दिले तेही आम्ही सतत तगाद लावल्यामुळे आम्हाला मिळाले. आ. केळकर यांनी पाठबळ दिल्यामुळे आमच्या लढाईला मोठ बळ मिळाले असून आम्ही एकत्रित हा लढा आ. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचे या सदस्यांनी सांगितले. यावेळी या फसवणूक झालेल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चिड व आक्रोश दिसत होता.  यावेळी आ. केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबासोबत शेवट पर्यंत उभे राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या बैठकीत १६ सोसायटयांचे जवळ जवळ २०० सभासद उपस्थित होते. जोशी इंटरप्राझेस च्या कळके आणी त्यांच्या भागीदारांनी शेकडो कुटुंबांची जाणून बुजून फसवणूक केली आहे. अनेकांनी आपली साठवलेली पुंजी मधून घरे घेतली होती. पण या फसवणुकीमुळे ही कुटुंबे आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित आहेत.

सीएनजी एसटी चालकांना उष्म्याच्या धोका

ठाणे : प्रदूषणाला आळा घालता यावा, यासाठी ठाण्यातील खोपट एसटी आगाराने डिझेलवर चालणाऱ्या सुमारे ३० गाड्यांचे सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये रूपांतर केले आहे; मात्र असे करताना संबंधित कंपनीने गाडीचालकांच्या जीविताची कोणतीही काळजी घेतलेली दिसत नाही. चालक बसत असलेल्या केबिनच्या खिडक्या कायमच्या बंद केल्याने बाहेरील वारा आत येणे बंद झाले आहे. केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात इंजिनची गरम हवा जमा होत आहे. भरधाव गाडी सुरू असताना चालकाला उष्माघात झाल्यास गाडीतील प्रवाशांच्या जीवितालाही धोका पोहचणार आहे. अनेक संकटांचा सामना करणाऱ्या एसटीचालक आणि प्रवाशांच्या संकटात आणखी एका संकटाची भर पडली आहे. प्रदूषण टाळण्याच्या हेतून एसटी महामंडळाने डिझेलच्या गाड्यांचे सीएनजीत रूपांतर करण्याचे धोरण अवलंबले आहे. या धोरणानुसार ठाण्यातील खोपट एसटी आगाराच्या सुमारे ३० डिझेल गाड्यांचे सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये रूपांतर केले आहे; मात्र असे करताना संबंधित कंपनीने चालकाच्या केबिनमध्ये उजव्या बाजूला असलेल्या मूळ खिडक्यांच्या काचा कायमच्या बंद केल्या आहेत. त्यामुळे गाडी धावतानाही चालकाच्या केबिनमध्ये बाहेरील वारा आत येत नाही. शिवाय केबिनमध्ये इंजिनमुळे प्रचंड प्रमाणात गरम होते. गेल्या महिन्यात केबिनमधील गरम हवा सहन न झाल्याने एका चालकाला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. या चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु अशा प्रसंगानंतरही आगार व्यवस्थापकाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नसल्याचे येथील काही चालकांनी सांगितले. चालकांच्या दुर्दैवाने अशा गाड्या ४००-५०० किलोमीटरपर्यंत लांब पाठवल्या जात आहेत. त्यामुळे चालकासोबतच गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याही जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सीएनजी गाड्यांमधून रूपांतर करण्यात आलेल्या गाड्यांची दुरुस्ती करणेही अवघड झाले आहे. गेल्या महिन्यात एका चालकाला केबिनमधील उष्ण हवेमुळे उष्माघाताचा त्रास झाला. त्याला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. सीएनजी गाड्या चालवताना खूप गरम होते. बाहेरील हवा आत येत नाही. पूर्वीच्या डिझेल गाड्यांच्या खिडकीच्या काचा उघडता बंद करता येत होत्या. परंतु आता त्या कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाड्या चालवणे फारच कठीण झाले आहे. – चालक, खोपट आगार डिझेल गाड्यांमध्ये बदल करून सीएनजी गाड्यात रूपांतर करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या २०० गाड्या ठाणे जिल्ह्यात आहेत. गाडीच्या खिडक्या उघडत नसल्याने त्रास होतोय अशी कोणत्याही चालकाची तक्रार आलेली नाही अथवा कोणाला चक्कर आल्याची माहिती नाही. – विलास राठोड, विभाग नियंत्रक, ठाणे

मुक्‍या प्राण्यांचे शोषण थांबवा

जुहू किनाऱ्यावर दुग्ध उद्योगाविरोधात निदर्शने मालाड-  जागतिक दूध दिनानिमित्त प्राण्यांच्या हक्‍कासाठी कार्यरत असलेल्‍या ‘युनायटेड फॉर कम्पॅशन इंटरनॅशनल फाऊंडेशन’कडून जुहू समुद्रकिनाऱ्यावर दुग्‍ध उद्योगांविरोधात निदर्शने करण्यात आली. मुक्‍या प्राण्यांचे शोषण थांबवा, अशी…

सम्राट,  जश, प्रिजेश, ध्रुव विजेते

गोविंदराव मोहिते बुध्दिबळ स्पर्धेत मुंबई : अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक बुध्दिबळ स्पर्धेमधील ८/१०/१२/१४ वयोगटात मुलांमध्ये सम्राट जिंदल, जश शाह, व्ही. प्रिजेश, ध्रुव जैन यांनी आणि मुलींमध्ये अनिश्का बियाणी, आराध्या पुरो, हुसैना राज, मयंका राणा यांनी विजेतेपद पटकाविले. याप्रसंगी गेली ५ दशके विविध क्रीडा स्पर्धांद्वारे खेळाडूंना प्रोत्साहन देणारे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सोन्याची अंगठी देऊन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी नामवंत बुध्दिबळपटू, क्रिकेटपटू, कॅरमपटू, कबड्डीपटू, व्यायामपटू, क्रीडा पत्रकार तसेच कामगार क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर जिल्ह्यातील नामवंत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह एकूण ११७ खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. ८ वर्षाखालील मुलांमध्ये सम्राट जिंदलने (५ गुण) प्रथम, रेयांश सचदेवने (४ गुण) द्वितीय, ऐडेन लासराडोने (४ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये अनिष्का बियाणीने (२ गुण) प्रथम, पृषा गाडाने (२ गुण) द्वितीय, भावना श्रॉफने (१ गुण) तृतीय; १०  वर्षाखालील मुलांमध्ये जश शाहने (५ गुण) प्रथम, समर्थ गोरेने (४ गुण) द्वितीय, समक्ष कर्नावटने (३ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये आराध्या पुरोने (४ गुण) प्रथम, नित्या बंगने (३ गुण) द्वितीय, वेदा कपूरने (३ गुण) तृतीय; १२ वर्षाखालील मुलांमध्ये व्ही. प्रिजेशने (४ गुण) प्रथम, लोबो फेरद्यनने (४ गुण) द्वितीय, विराज शाहने (३.५ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये हुसैना राजने (२ गुण) प्रथम तर १४ वर्षाखालील मुलांमध्ये ध्रुव जैनने (४ गुण) प्रथम, अर्जुन पाधारीयाने (३ गुण) द्वितीय, आदित्य राणेने (२ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये मयंका राणाने (५ गुण) प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिंकला.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा `पाऊसवेळा’ कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार दिनांक ८ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजता `पाऊसवेळा’ हा कार्यक्रम डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला असून रसिकांसाठी खुला आहे. पावसाआधीचा पाऊस ते परतीचा पाऊस, शैशवातला पाऊस ते प्रौढपणीचा पाऊस, पहाटेपासून मध्यरात्रीपर्य॔तचा पाऊस, आतला नि बाहेरचा पाऊस…..अनुभवा ही यामागची संकल्पना आहे. मराठीतील नव्या जुन्या साहित्यिकांच्या शब्दातून झरणाऱ्या पावसाची अनंत रूपे यावेळी रसिकांना अनुभवता येतील. या कार्यक्रमाची संहिता आणि निवेदन डॅा. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे आहे तर अभिवाचन गिरीश दातार आणि श्रीमती गौरी देशपांडे करतील. त्यांना धनश्री गणात्रा संगीतसाथ देतील.

उन्हाचा तडाखा अजून कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही उलट वाढतच जात आहे याचा फटका पशू पक्षांना देखील बसताना दिसत आहे ठाणे गावदेवी येथे अशाच एका कॉपर्स स्मित बारबेट पक्षाला उष्माघाताचा त्रास होऊन पक्षी रस्तावर पडला होता पक्षी मित्रांनी या पक्षाला उचलून पाणी पाजून जीवदान दिले … फोटो प्रफुल गांगुर्डे

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या पहिल्या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर यांच्या सहयोगाने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर येथे १ जून २०२४ रोजी महाराष्ट्रातील कॅरम खेळाडूंसाठी पहिले वातानुकूलित प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रात एकंदर ८ कॅरम बोर्ड मांडण्यात आले असून सायंकाळी ५ ते रात्रौ ९ दरम्यान हे केंद्र सराव व प्रशिक्षणासाठी खुले असणार आहे. महाराष्ट्रातील नोंदणीकृत खेळाडूंसाठी हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय व अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेपूर्वी  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरुष व महिला गटातील खेळाडूंचे शिबीर या केंद्रात आयोजित केले जाणार आहे. विशेष करून ज्युनिअर गटातील मुला मुलींना या प्रशिक्षण केंद्रात खेळाच्या प्रशिक्षणासोबतच नियमांची माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड वेणू नायर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी कॉम्रेड वेणू नायर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गरजू खेळाडूंना या उपक्रमाचा विशेष फायदा व्हावा व महाराष्ट्रात अधिक गुणी खेळाडू तयार व्हावेत म्हणून या केंद्रासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिशनला स्पर्धा आयोजित करण्यासाठी संस्थेचा हॉल व इतर सहकार्य करण्याची ईच्छा व्यक्त केली. असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमासाठी कॉम्रेड वेणू नायर यांनी रुपये १ लाख देणगी जाहिर केली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने  मानद सचिव अरुण केदार यांनी नॅशनल मजदूर युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड वेणू नायर, युनियनचे सहाय्यक चिटणीस कॉम्रेड विनय सावंत तसेच इन्स्टिट्यूटचे सचिव कॉम्रेड चेतन सावल यांचे कॅरमचे घड्याळ भेट देऊन स्वागत केले. तसेच प्रशिक्षण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्धल आभार मानले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार उपस्थित होते. शिवाय अनेक कॅरम खेळाडूंनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपला प्रतिसाद नोंदविला. अधिक  माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ वर संपर्क करावा.

पावसाळ्यात इनडोअर क्रिकेटच्या सुविधांचा लाभ घ्या – वेंगसरकर

मुंबई : या वर्षीचा क्रिकेट मौसम आता संपला असून लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. मात्र पाऊस आहे म्हणून चार महिने घरात बसून न राहता या वेळेचा सदुपयोग करताना शारीरिक फिटनेस आणि क्रिकेटचं तंत्र पक्कं कारण्यासाठी इनडोअर क्रिकेटच्या सुविधांचा लाभ करून घ्या असे आवाहन भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी एजिस फेडरल इन्शुरन्स कप या १५ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केले. तुम्ही जर असे केलेत तर ऑक्टोबर मध्ये जेव्हां नवीन मोसमाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही फॉर्मात राहू शकाल. मुंबईतील युवा क्रिकेटपटूनसाठी  पावसाच्या चार महिन्यात इनडोअर क्रिकेटच्या सुविधा या महत्वपूर्ण ठरू शकतात असेही त्यांनी पुढे सांगितले. माहुल, चेंबूर येथील वेंगसरका क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पोर्टींग्स क्लब कमिटी ठाणे संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी मुंबई क्रिकेट क्लब संघावर ९९ धावांनी विजय मिळविला. मुंबई क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र याचा लाभ उठवत स्पोर्टींग्स क्लब कमिटी संघाने निर्धारित ४० षटकांत ७ बाद २५७ धावांचे लक्ष्य उभारले.  त्यांच्या प्रणव अय्यंगार याने सर्वाधिक ७९ धावा करताना तिसऱ्या विकेटसाठी रुद्र बन्दीछोड (४४) याच्या साथीने ९१ धावांची तर नंतर युग पाटील (४५) यांच्यासह चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भर टाकली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई क्रिकेट क्लबच्या अरहाम शहा (४७) आणि आरव ठाकर (४६) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली त्यावेळी हा संघ जोरदार लढत देणार असेच वाटत होते. मात्र हे दोघे बाद होताच त्यांच्या अन्य फलंदाजांनी देवांश शिंदेच्या अचूक गोलंदाजीसमोर सपशेल शरणागती पत्करली. देवांशने केवळ १८ धावांत ७ फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवत त्यांचा डाव ३३ षटकांत १५८ धावांतच गुंडाळला. देवंशाला युग पाटीलने २६ धावांत २ बळी मिळवत चांगली साथ दिली.  अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अपेक्षेप्रमाणेच देवांश शिंदेची निवड करण्यात आली.  स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आणि सर्वोत्तम खेळाडू म्हणून कृष्णा पोस्वाल (१३ बळी) याला गौरविण्यात आले तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून अरहाम शहा (१६२ धावा) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून श्लोक शिगवण (५ झेल) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एम.सी.ए.चे खेळपट्टी बनविण्यात विशेषज्ञ  नदीम मेनन आणि एजिस फेडरलचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय गंगार्डे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. संक्षिप्त धावफलक –  स्पोर्टींग क्लब कमिटी ठाणे – ४० षटकांत ७ बाद २५७ ( विवान हजारे २५, रुद्र बन्दीछोड ४४, प्रणव अय्यंगार ७९, युग पाटील ४५) वि वि. मुंबई क्रिकेट क्लब – ३३.१ षटकांत सर्वबाद १५८ (अरहाम शहा ४७, आरव ठाकर ४४; देवांश शिंदे १९ धावांत ७ बळी , युग पाटील २६ धावांत २ बळी )

तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी जागृतीची गरज-न्या. डॉ. सुधीर देशपांडे

अशोक गायकवाड रत्नागिरी : तंबाखूचे दुष्परिणामाविषयी ज्येष्ठांनी तरूण पिढीस जागृत करणे काळाची गरज आहे, असे आवाहन तालुका विधी सेवा समिती, खेडचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले आहे. खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन विषयावर शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधीश १ डॉ. देशपांडे म्हणाले, तंबाखूमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होतात.माणसाच्या शरीरातील सर्व क्रियांवर तंबाखूचे दुष्परिणाम होत असतात, सिगरेटचे सेवन केल्याने फुफ्फुसामध्ये अनेक विष द्रव्य साचून फुप्फुसाची क्षमता कमी होते तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ यांच्या व्यसनावर माणसे प्रचंड पैसा खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या घराची आर्थिक गणित बिघडते. मन कमकुवत बनते शरीर खंगून जाते. तरुणांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांच्यामध्ये वैफल्य निर्माण होते. वैफल्य आणि व्यसनाधीनता या चक्रामध्ये तरुण अडकतो. त्यामुळे नागरिकांनी आजूबाजूच्या सर्व व्यसनाधीन लोकांचे तरुणांचे याबाबतीत प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक बाबी डॉक्टर देशपांडे यांनी विशद करून सांगितल्या. व्यसनाधीनतेच्या विरोधात जनजागृती करण्यात येईल, अशी ग्वाही आणि भावना ज्येष्ठ नागरिकांनी याप्रसंगी व्यक्त केली. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकवृंद मोठ्या संख्यने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ, खेडचे अध्यक्ष आबा निकम व सदस्य ओमप्रकाश लठ्ठा तसेच तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी एस. के. जोशी व सहदेव अंधारे यांनी परिश्रम घेतले.