ठाणे : भारतीय सेनेच्या 25 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त ठाणे व पालघर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी शहीद जवानांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक अंबादास वदक, सैनिकी मुलाच्या वसतिगृहाचे अधीक्षक चंद्रशेखर भोसले यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिक, कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांनीही कारगिल युद्धातील शहिदांना आदरांजली अर्पण केली.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *