Month: July 2024

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण  बचाव यात्रा आजपासून सुरू होणार

मुंबई : महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आम्ही २५  तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…

कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांना धक्का

ठाणे : कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला असून त्यापैकी अनेक पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नेमणुका करण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने…

महायुती सरकारच्या घोषणा फसव्या- विजय वडेट्टीवार

नाशिक – केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. दुष्काळ, अवकाळी, गारपीट, कमी पर्जंन्य, पाणी टंचाई, पिकावरील रोग, वादळं अशी नैसर्गिक संकटं कायम उभी आहेतच. वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून…

अर्थसंकल्पावरून राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्पावरू लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक झालेले असताना राज्यसभेतही काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेनेचा ठाकरे गट, तृणूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार आक्रमक झाले. दरम्यान, विरोधी पक्षांमधील खासदारांनी…

ठामपातर्फे 27 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024’ प्रदर्शन

ठाणे (24) : पर्यावरणाचे संवर्धन होण्याच्या दृष्टीकोनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत…

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी केले अभिवादन

रायगड : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी कर्जत तहसीलदार कार्यालयात केले अभिवादन भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवार,(दि.२३ जुलै) रोजी कर्जत तहसील कार्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, महसूल नायब तहसीलदार सोपान बाचकर, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद प्रल्हाद कोटंबे, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार आशा म्हात्रे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी अव्वल कारकून , महसूल सहायक यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 0000

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करा-सुनील जाधव

 अशोक गायकवाड     रायगड : सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या १०० विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.२६ ऑगस्ट २०२४ पूर्वी आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, ३ चर्च पथ, पुणे ४११००१ यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सुनील जाधव यांनी केले आहे. या योजनेचे अटी व शती :- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा (नवबौध्दासहित) व महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा, विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा, पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे व पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी राहील, उत्पन्न मर्यादा रु.६ लक्ष राहील (फॉर्म नं. १६ व तहसिलदार/नायब तहसिलदार सक्षम प्राधिकाऱ्याचे उत्पन्नप्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. शैक्षणिक अर्हता :- महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परिक्षा मंडळातून इयत्ता १० वी व १२ वी ची परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. व इयत्ता १२ वी च्या परीक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरीता विद्याथ्यांने इयत्ता १२ वी च्या परीक्षेत किमान ५५ टक्के गुण व पदवी अभ्यासक्रमासाठी डिप्लोमाच्या परिक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळविणे आवश्यक राहील. लाभाचे स्वरूप :- राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यास संबंधित विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक,शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले शुल्क तसेच भोजन शुल्काची, इत्यादी शुल्क मंजुरी. योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी रु.५ हजार व शैक्षणिक साहित्य तसेच, इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण रु.५ हजार अशी एकूण रु.१० हजार प्रत्येक वर्षी संबंधित विद्यार्थ्यास त्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर दोन टप्प्यात अदा करण्यात येईल. अर्ज मिळण्याचे व सादर करण्याचे ठिकाण : विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ (वेबसाईट) www.maharashtra.gov.in/ ताज्या घडामोडी आणि सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा. 00000

 पुण्यातील पवन सिंह यांची सलग दुसऱ्यांदा ज्युरी म्हणून निवड

 ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धेसाठी   पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध गन फॉर ग्लोरी या नेमबाजी (शुटींग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक व नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे संयुक्त महासचिव पवन सिंह यांची जुलै महिन्याच्या शेवटी सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी ज्युरी अर्थात पंच म्हणून निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेचे पंच म्हणून निवड होणारे सिंह हे पहिलेच भारतीय असून यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या नेमबाजी स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिलेले एकमेव भारतीय बनल्यानंतर पवन सिंह यांवर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (आयएसएसएफ) ने पुन्हा एकदा विश्वास दाखविला असून याही वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ते आरटीएस (रिझल्ट, टाईमिंग व स्कोअर)चे पंच सदस्य म्हणून काम पाहतील. नेमबाजी या खेळात ऑलिम्पिक खेळांमध्ये काम करणारे पवन सिंह हे एकमेव भारतीय अधिकारी आहे हे विशेष. लागोपाठ दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करताना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली याबद्दल मी नम्रपणे धन्यवाद व्यक्त करतो असे सांगत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पवन सिंह म्हणाले, “नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन या दोघांनी माझ्या कामावर दाखविलेला विश्वास आणि मला दिलेल्या पाठींब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यावर्षी होत असलेले पॅरिस ऑलिम्पिक माझ्यासाठी दोन कारणांनी खास आहे. यापैकी पहिले कारण म्हणजे नेमबाजी पंच म्हणून माझे हे सलग दुसरे ऑलिम्पिक असेल. तर दुसरे कारण म्हणजे आपण या ऑलिम्पिकसाठी नेमबाजांचा सर्वांत मोठा संघ घेऊन सहभागी होत आहोत. या स्पर्धेत आपले २१ नेमबाज २७ पदकांसाठी स्पर्धेत उतरत आहेत. नेमबाजांच्या संख्येचा विचार केल्यास आपल्या खेळाडूंची संख्या ही सर्वाधिक आणि चीनच्या संघानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेली संघ संख्या असेल.” माझा मित्र आंतरराष्ट्रीय नेमबाज पद्मश्री गगन नारंग यांची देखील भारतीय संघाचे ‘चीफ-डी-मिशन’ अर्थात पथकप्रमुख म्हणून निवड झाली आहे, ही देखील माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असेही पवन सिंह यांनी नमूद केले. एखाद्या स्पर्धेसाठी अशा पद्धतीने एकाच संस्थेतील नेमबाज अर्थात खेळाडू, पंच आणि पथकप्रमुख म्हणून वेगवेगळ्या व्यक्तींना मिळत असलेली संधी खऱ्या अर्थाने विशेष आहे, याकडे पवन सिंह यांनी लक्ष वेधले. गगन नारंग आणि पवन सिंह हे दोघे पुण्यातील ‘गन फॉर ग्लोरी’ (जीएफजी) या नेमबाजी संस्थेचे सह-संस्थापक आहेत. गन फॉर ग्लोरी अकादमीच्या दोन नेमबाज इलावेनिल वेलारिव्हन आणि रमिता या देखील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघाचा भाग असून महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धांमध्ये त्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जीएफजीने आपल्या स्थापनेपासून आजवर एकूण ३३० आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. गेल्या चार वर्षांत जीएफजीच्या पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी १२७ आंतरराष्ट्रीय पदकांवर आपले नाव कोरले असून पदक जिंकण्यामध्ये जीएफजी दुसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेत्या नेमबाजांच्या संख्येवरून गेल्या काही वर्षांत जीएफजीच्या यशाचा आलेख हा सातत्याने वाढता असल्याचे लक्षात येते. अलीकडेच ऑलिम्पिक निवड चाचण्यांमध्ये जीएफजीच्या सहा नेमबाजांनी विविध श्रेणींमध्ये भागही घेतला होता. इलावेनिल आणि रमिता या दोघीही निवड चाचण्या जिंकून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. या चाचण्यांदरम्यान दोघांनी देखील उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. शेवटच्या पात्रता फेरीमध्ये रमिताने ६३६.४ गुण नोंदविले तर अंतिम फेरीत इलावेनिलने २५४.३ गुण मिळवीत अनौपचारिक विश्वविक्रम नोंदवला आहे. एनआरएआयच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक असताना, पवन सिंह यांनी जजेस आणि ज्युरींकरीता अनेक कोर्सेस  हाती घेतले. यामध्ये २०२३- २४ साली – एकूण प्रशिक्षित प्रशिक्षक/ अधिकारी/ रेफरी आयएसएसएफ – प्रशिक्षक ६५ | आयएसएसएफ – जजेस – ३६ एनआरएआय प्रशिक्षक – ८६ | एनआरएआय जजेस – ९२ | एनआरएआय रेफरी – २० 0000

 ९ ऑगस्टला हुतात्म्यांना अभिवाद!

 राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या विद्यमाने   मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता, दरवर्षाप्रमाणे नाना चौक,अग्निशमनदल येथून गवालिया टॅंक, ऑगस्ट क्रांती मैदानावरील हुतात्मा स्मारकापर्यंत हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गिरणी कामगारांची मूक मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.संघटनेचे अध्यक्ष,माजीराज्यमंत्री आमदार सचिनभाऊ अहिर सरचिटणीस गोविंदराव मोहिते मूक मिरवणुकीचे नेतृत्व करतील.मूक मिरवणुकीत अन्य उद्योगातील कामगार कार्यकर्ते‌ मोठ्या संख्येने सहभागी होतील.रामिमसंघाच्या वतीने गेली ७५ वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे.सघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड,उत्तम गिते, सूनिलअहिर,मिलिंद तांबडे,संजय कदम,विजय काळोखे,किशोर रहाटे,साई निकम आदी पदाधिकारी मोर्चाच्या संयोजनात सहभागी होतील.मूक मिरवणूकीच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सचिनभाऊ अहिर सरचिटणीस गोविंदराव मोहिते ऑगस्ट क्रांती मैदानावरील हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन करतील. 00000

मास्टर्स पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेत पेणच्या रमेश खरे यांना सुवर्ण

मुंबई : इंदौर, मध्य प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग इक्विपड आणि अनईक्विपड स्पर्धेत रायगड, पेणच्या 75 वर्षीय रमेश खरे यांनी शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पेणच्या…