Month: July 2024

शेतकरी – कामगारांच्या कल्याणाला शून्य प्राधान्य देणारे बजेट – डॉ. अशोक ढवळ

अनिल ठाणेकर     ठाणे : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये स्पष्टपणे अधिक केंद्रीकरणाचा आणि राज्यांचे अधिकार डावलून शेतीच्या भांडवलीकरणाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. शेती आधारित व्यवसायांचा नफा वाढवणे हेच त्याचे उद्दिष्ट आहे. एकूण अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्राची टक्केवारी सातत्याने कमी होत आहे. २०१९ साली ५.४४ टक्क्यांवरून यंदा ३.१५ टक्क्यांपर्यंत ही घसरण झाली आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रात आर्थिक तरतुदींमध्ये २०२२-२३ सालाच्या तुलनेत २१.२ टक्क्यांची घट झाली आहे. शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणाला शून्य प्राधान्य देणारे बजेट असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळ व सरचिटणीस विजू कृष्णन यांनी दिली आहे. पिकांची खात्रीशीर खरेदी सुनिश्चित करण्यासाठी C2+50% हमी भाव देण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल या अर्थसंकल्पात नाही. MGNREGA, PM-KISAN, PMFBY इ. योजनांसाठी अर्थसंकल्पात शून्य वाढ केली आहे. कृषीक्षेत्राला प्रथम प्राधान्य दिल्याचा दावा अर्थमंत्र्यानी केला आहे पण प्रत्यक्षात मात्र शेतकरी, कामगार, गरिबांचे कल्याण डावलले आहे आणि कृषी क्षेत्राला शून्य प्राधान्य देऊन कॉर्पोरेट्सना प्रथम प्राधान्य दिले आहे. मनरेगाच्या तरतुदीत शून्य वाढ झाल्याने कृषिसंकट वाढणार आहे. अर्थसंकल्पात मनरेगासाठीची तरतूद ८६००० कोटी रू असून त्यापैकी २०२४-२५ मध्ये ४२००० कोटी रू आधीच खर्च केले गेले आहेत (प्रलंबित थकबाकीसह). म्हणजे उर्वरित आठ महिन्यांसाठी  केवळ ४४००० कोटी रू शिल्लक आहेत. यातून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची कष्टकऱ्यांविषयीची असंवेदनशीलता दिसून येते. याचा परिणाम म्हणून ग्रामीण जनतेच्या अडचणीत वाढ होईल. ग्रामीण भागातून स्थलांतर अधिक तीव्रतेने वाढेल. पीक संवर्धनासाठीच्या तरतुदीमध्ये सुमारे २४.७ टक्क्यांची मोठी घट करण्यात आली आहे. खतांच्या तरतुदीतही  सुमारे ३४.७ टक्क्यांची मोठी घट केली आहे. २०२२-२३ सालाच्या तुलनेत ८७२३८ कोटी रू ची ही घट आहे. याचा कृषी उत्पादकतेवर घातक परिणाम होणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा वेगवान विकास आणि रोजगार निर्मितीचा दावा करत मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण करण्याचे धोरण सांगणारी ही घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. पण प्रत्यक्षात हे संघराज्य प्रणालीचे स्पष्ट उल्लंघन आहे आणि राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणारे आहे. राज्ये आणि सर्व सहकारी संस्था केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याचे त्यामागे उद्दिष्ट आहे. खालील बाब लक्षात घेतल्यावर सरकारचा ढोंगीपणा समजू शकतो. २०२२-२३ सालाच्या तुलनेत सहकारासाठी सुमारे ३०.५ टक्क्यांची मोठी घट करण्यात आली आहे. एकीकडे सहकारी संस्थाद्वारे साठवण क्षमता व गोदामे मजबूत करण्याबाबत बोलत असताना यातील तरतुदींमध्ये २४.२ टक्क्यांची घट केली आहे. बायर, अमेझॉन इ सारख्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना कृषी क्षेत्रात मुक्त प्रवेश दिला जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कृषी संशोधन संस्थांमध्ये खाजगी कंपन्यांनाही चॅलेंज मोडमध्ये निधी प्रदान केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी भाषणात सांगितले. यातूनच हळूहळू खाजगी कंपन्याच देशाच्या कृषी संशोधनाची दिशा ठरवतील. कृषी क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) लागू करण्याचा प्रस्ताव असून यात तीन वर्षांत शेतकरी आणि त्यांच्या जमिनींचे कव्हरेज सार्वजनिक छाननी आणि चर्चेनंतरच केले पाहिजे. ६ कोटी शेतकरी आणि त्यांच्या जमिनींचा तपशील जमवण्याची ही योजना शेतकरी आणि जमिनीच्या नोंदींवर खूप गंभीर परिणाम करू शकते. अशी केंद्रीकृत डिजिटल रेजिस्ट्री गोपनीयतेचा भंग करण्यात पटाईत आहेत हे वेळोवेळी उघड झाले आहे. यातून आधार सारख्या उपक्रमांसह आणि कॉर्पोरेट्स व इतर बेईमान एजंटकडून जमीन बळकावण्याचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. ४०० जिल्ह्यांमध्ये DPI चा वापर करून खरीपासाठी डिजिटल पीक सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव आहे. हे देखील गंभीर चिंतेचे कारण आहे. क्रॉप-कटिंग प्रयोगांऐवजी डिजिटल आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी गैरसोयीचे ठरले आहे. विमा कंपन्यांच्या हितासाठी त्यांचा नियमितपणे उपयोग होतो आहे. डिजिटल तंत्रज्ञान पिकासाठी वापरण्याचा प्रस्ताव असलेल्या प्रस्तावावर श्वेतपत्रिका काढणे आवश्यक आहे. हे देशात मोठ्या प्रमाणावर लागू होण्यापूर्वी क्षेत्र आणि उत्पादकतेचे योग्य सर्वेक्षण करणे आणि पिकाची माहिती अचूकपणे होत असल्याचे पुरावे सार्वजनिक करणे गरजेचे आहे. दुसऱ्या बाजूला, कडधान्ये आणि तेलबियांमध्ये आत्मनिर्भरतेची चर्चा सरकारने सुरू केली आहे पण या पिकांसाठी किफायतशीर भावाची तरतूद नाही. ती धोरणात्मक दिशा नसताना हे दावे पोकळ ठरतील. भाजीपाला उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात क्लस्टर्सना प्रोत्साहन देण्याची योजना देखील कॉर्पोरेट कॉन्ट्रॅक्ट शेती मागील दाराने आणण्याचा एक प्रयत्न असू शकतो. शेतकऱ्यांनी सावध राहणे आणि बारीकसारीक धोरणांचे तपशील घेत राहणे आवश्यक आहे. १ कोटी शेतकऱ्यांना झिरो बजेट नैसर्गिक शेती अंतर्गत आणल्याचा दावा यावेळीही करण्यात आला पण याआधी केलेल्या प्रयत्नांची किंवा त्यांच्या परिणामकारकतेची कोणतीही आकडेवारी दिली गेली नाही. पूर्व-अर्थसंकल्पीय आर्थिक सर्वेक्षणामधे जाहीर केले होते की, २०२३-२४ मध्ये कृषी क्षेत्राचा विकास दर १.४ टक्के इतका कमी असून २०२२-२३ मधील ४.७ टक्क्यांच्या तुलनेत अन्नधान्य उत्पादनात घट झाली आहे. एल निनोमुळे होणारा मान्सूनला विलंब आणि खराब मान्सून मुळे हे झाल्याचे सांगितले गेले. कृषीचा उत्पादन खर्च कमी करणे, कमी व्याजाने पीक कर्ज देणे, प्रभावी पीक विमा सुनिश्चित करणे, अखंड वीज व सिंचन सुविधांचा विस्तार करणे, खतांची उपलब्धता करून देणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे C2+50 टक्के नुसार किमान आधारभूत किमती देणे या सर्वात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार अपयशी ठरले आहे. एल निनोचा ठपका ठेवून हे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थसंकल्पात हे स्पष्ट आहे की सरकार या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात अयशस्वी ठरले आहे. या अर्थसंकल्पाचा भर हा निर्यात-केंद्रित शेतीकडे आणि कॉर्पोरेट्सना शेती हवाल करण्याकडे आहे. अखिल भारतीय किसान सभा आपल्या सर्व युनिट्सना या अर्थसंकल्पातून होणाऱ्या शेतकरी व कामगारांच्या विश्वासघाताविरोधात एकजूट होण्याचे आवाहन डॉ. अशोक ढवळे व विजू कृष्णन यांनी केले आहे. ००००

प्रभाकर गांजाळे स्मरणार्थ अनाथ विद्यार्थ्यांना स्नॅक्स वाटप

पुणे : जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील मंचर या गावचे कै.  प्रभाकर दशरथ गांजाळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त घोडेगाव जवळील पळसटीका येथील सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान, संचलित बालगृह अनाथ आश्रम येथे पुष्पा प्रभाकर…

 १८ वर्षे नियमित कर भरणाऱ्या घरालाच ठरविले बेकायदेशीर

विचुंबे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह ग्रामसेवकाचा अजब कारभार; ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरून महावितरणने केली लाईट बंद; तक्रारीनंतर पुन्हा केली जोडणी राज भंडारी-   पनवेल : पनवेल तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायतीच्या अगदी समोरच असलेल्या गावठाण जागेतील घराचा नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाला अडसर होत असल्यामुळे १८ वर्षे कर भरणाऱ्या, तसेच सात बारा, ८ अ अशी रीतसर कागदपत्रे असतानाही ग्रामपंचायतीने चक्क करदाता असलेल्या घराला बेकायदेशीर असल्याचे भासवित वेळोवेळी नोटिसा पाठवून धमकवण्याचा प्रकार केला. एवढ्यावरच न थांबता मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बिना नंबर प्लेट असलेल्या जेसिबिने या घराला जमीनदोस्त केले. सदर घरामध्ये सध्या गावातील तरुणांचे एक पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथक आपले सामान ठेवत होते. बेकायदेशीर कारवाई करीत असताना या पथकाचे सर्वच सामान ग्रामपंचायतीने पावसात उघड्यावर अस्ताव्यस्त ठेवल्यामुळे गावातील हे तरुण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांविरोधात कायदेशीर लढाईसाठी मैदानात उतरले असल्याची माहिती पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथकाचे अध्यक्ष उमेश बाळाराम दुंदरेकर यांनी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, विचुंबे ग्रामपंचायत हद्दीमध्ये झपाट्याने लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे येथील रहदारी, वाहनांचे प्रमाण देखील वाढले असल्यामुळे अनेक वर्षांपासून येथील गाढी नदीवर पर्यायी पुलाची उभारणी करण्याची मागणी होत होती. सदरची मागणी मान्य होऊन याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नव्याने पुल बांधण्यात आला. मात्र पुल पूर्णत्वास येत असतानाच या पुलाच्या मार्गावर येथील गावठाण जागेत असणाऱ्या घराचा अडसर सार्वजनिक बांधकाम विभागाला झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने या गावठाण भागातील घराला संपादित करणे गरजेचे होते, मात्र त्यांनी सदर घर खाली करून देण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केला. गेली १८ वर्षे सर्व्हे नं २२८ मधील घर क्रं. २७९ हे नियमितपणे घरपट्टी भरत आले आहे. सन २००६ ते सन २०२५ पर्यंत या घराची घरपट्टी ग्रामपंचायत मध्ये जमा झालेली आहे. एका बाजूला ग्रामपंचायतने कर जमा करायचा आणि कोणा एकाच्या सांगण्यावरून सदर घर हे बेकायदेशीर ठरवायचे, हा दुट्टपीपणा ग्रामपंचायतने आपल्याच गावातील तरुणांसोबत केला असल्याचे सत्य देखील यावेळी समोर आणण्यात आले आहे. विचुंबे येथील सर्व्हे नं. २२८ मधील घर क्र. २७९ या घराचा सातबारा हा गोवंड समस्त गावकरी म्हणून असून त्यावरील घर हे ८ अ च्या उताऱ्यानुसार पूर्णा मुजिकल स्टार तर्फे अध्यक्ष उमेश बाळाराम दुंदरेकर यांच्या नावाने ग्रामपंचायत मध्ये नोंद आहे. ग्रामपंचायतीमार्फत याबाबतची घरपट्टी देखील याच नावाने दिली जाते. मात्र आपण गावचे सरपंच आहे म्हणून काहीही करू शकतो, ही भावना जवळ बाळगून ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा गैरवापर करून सदरची बेकायदेशीर कारवाई केली असल्याचा आरोप पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथकाने केला आहे. सदर बांधकाम बेकायदेशीर ठरविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत १४ वर्षे नोटिसा पाठविण्यात येत आहेत. त्यावर पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथकामार्फत वकिलामार्फत त्यांना तसे उत्तर देण्यात आले आहेत. गेल्या १४ वर्षांत तब्बल ७ वेळा ग्रामपंचायतीने नोटिसा काढल्या आणि प्रत्येक वेळेला पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथकाने वकिलामार्फत ग्रामपंचायतीला उत्तरे दिली. मात्र ग्रामपंचायतीचा कारभार हातात आलेल्या सरपंच आणि ग्रामसेवकासह सदस्यांनी हेतू पुरस्सर सदर घर हे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. याबाबत महावितरणला देखील खोटे पत्र लिहून तोडक करवाईपूर्वी मीटर काढण्यासाठी भाग पडल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. तसेच सदर प्रकार घडल्यानंतर घरमालक म्हणून उमेश बाळाराम दुंदरेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतर महावितरण मार्फत तोडलेल्या घराशेजारी असलेल्या झाडावर पुन्हा मिटरची जोडणी करून आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. याबाबत पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथकाने तोडक कारवाई दरम्यान शांत राहून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सायंकाळी त्यांनी आपले घर बेकायदेशीरपणे तोडले असल्याबाबत तक्रार खांदेश्वर पोलीसात देखील दाखल करण्यासाठी गेले असता खांदेश्वर पोलिसांनी मात्र सदर प्रकरण हे दिवाणी असल्यामुळे तक्रार घेण्यास नकार देत तसे लेखी देवून तक्रारदारांची रवानगी मागच्या पावलांनी धाडली. यावेळी पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथकाचे अध्यक्ष उमेश बाळाराम पाटील यांनी आपल्याला न्याय न मिळाल्यास आम्ही पथकाचे सर्व सदस्य आमरण उपोषण करणार असल्याचं इशारा दिला.तसेच या पथकाने सदर प्रकरण आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या विरोधात हे पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त, नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्या समोर ठेवणार आणि न्याय मिळवणार असा इशारा सुद्धा दिला आहे. 0000

आत्मविश्वासाने न भीता पावले टाका – डॉ. संजय मंगला गोपाळ

ठाणे, शाळेच्या बंदिस्त दुनियेतून कॉलेजच्या मुक्त दुनियेत प्रवेश करताना बदलत्या वातावरणात आपल्या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने न भीता पावले टाकली पाहिजेत, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी मुलांना…

 मुंब्रा-कळव्यातील शरदचंद्र पवार गटातील नगरसेवक अजित पवार गटात

जितेंद्र आव्हाड यांना धक्का ! अनिल ठाणेकर     ठाणे : मुंब्रा- ळवा विधानसभा मतदार संघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटातील…

बेलापूरमध्ये पावसाळी जल उदंचन केंद्राच्या भूमिपूजनाव्दारे नागरिकांना दिलासा

नवी मुंबई : बेलापूर सेक्टर 12 येथे सिडको कालीन 40 वर्ष जूनी पावसाळी जलउदंचन केंद्राची जीर्ण झालेली इमारत तोडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधणे तसेच नवीन पंपींग मशीनरी बसविणे या…

‘माधव’ इमारत तोडल्याने कल्याण मलंगरोड, उल्हासनगर रस्त्यामधील अडथळा दूर

कल्याण : कल्याण पूर्वेतील मलंगरोड-चिंचपाडा ते उल्हासनगर या १०० फुटी रस्त्याच्या मध्यभागी चिंचपाडा भागात माधव अपार्टमेंट नावाची बेकायदा अतिधोकादायक इमारत उभी होती. या इमारतीमुळे कल्याण डोंबिवली पालिकेला या महत्वपूर्ण रस्त्याचे…

संजय केळकर यांच्यामुळे रखडलेला पुर्नविकास दृष्टीपथात !

अनिल ठाणेकर     ठाणे : विकासकामधील अंतर्गत कलहामुळे ठाण्याच्या नौपाड्यातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुर्नविकास बराच काळ रखडल्याने शेकडो रहिवाशी त्रस्त झाले होते.अखेर, आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि…

ठाणे महापालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती ‍निमित्त अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे व उपायुक्त उमेश बिरारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन…