Month: July 2024

माथेरानच्या पेमास्टर पार्क पर्यंत ई रिक्षाची सुविधा द्या रहिवाशांची मागणी

माथेरान : माथेरान मध्ये सर्वांसाठी ई रिक्षाच्या माध्यमातून अत्यावश्यक सुविधा उपलब्ध झाली आहे.अनेक आव्हानांचा सामना करत,त्याचप्रमाणे काही लोकांचा वेळप्रसंगी विरोध पत्करून कोणत्याही परिस्थितीत माथेरानला विकासाकडे नेण्यासाठी ई रिक्षाच्या सुविधेला समस्त…

आफ्रोह्चे ठाण्यात आंदोलन अनुसूचित क्षेत्रातील ‘बोगस’ आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्रांची चौकशी आणि अधिसंख्य पदावरील

 कर्मचा-यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन         ठाणे :.सर्वोच्च न्यायालयाचा जगदीश बहिराचा निर्णय पुर्वलक्षी प्रभावाने लागू नसताना या निकालापूर्वी अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त केलेल्या…

एकलव्यांसाठी संधींची खिडकी उघडली आहे तिचा उपयोग करा – अलका धुपकर

ठाणे : आपल्या आर्थिक परिस्थितीने खचून न जाता, विषमतेने भरलेल्या सामाजिक, भौगोलिक परिस्थितीला न घाबरता समता विचार प्रसारक संस्थेने उघडून दिलेल्या खिडकीतून अनेक संधी तुम्हाला खुणावत आहेत. त्यांना गवसणी घालण्यासाठी…

 राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रम संपन्न

ठाणे : राज्यात राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या सामजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध…

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करणेबाबत जाहीर अवाहन

ठाणे : महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्य दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा, यावर…

कबड्डी दिनी आत्माराम मोरे चषक विनाशुल्क शालेय इंडोर कबड्डी स्पर्धा

मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्याने कबड्डी दिन-१५ जुलै रोजी शालेय संघांची कबड्डीप्रेमी आत्माराम मोरे स्मृती चषक विनाशुल्क इंडोर कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली…

कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार श्री.निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रिक करून विजय मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा देताना  समाजसेवक व उपाध्यक्ष  म्युनिसिपल मजदूर युनियन  मुंबई महानगरपालिका सुनिल मोरे दिसत आहे.

खरोखरच मदत करायची असेल तर, ‘लाडकी बहीण’ योजनेची गरज नाही

रमेश औताडे         मुंबई : नॉन स्टॉप पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी एजंट कडून लुटमार सुरू आहे. सरकारने जर खरोखरच आम्हा लाडक्या बहिणींना आर्थिक मदत करायची असेल तर वीजबिल, विमा योजना, मेडिकल, महागाई, शिक्षण या व इतर मूलभूत गरजा मध्ये सवलत द्यावी,  फक्त घोषणा करून एजंटचे, झेरॉक्स दुकानदारांचे, ई महासेवा केंद्रवाल्यांचे खिसे भरण्याचे व भर पावसात घरची सर्व कामे सोडून रांगेत उभे करून आमचा वेळ वाया घालविण्याचे राजकारण करू नये. असे स्पट मत लाडक्या बहिणी लाडक्या भावाकडे करत आहेत. योजनेची घोषणा केली तेव्हा सुरवातीला विविध प्रकारचे दाखले, पुरावे, बँक पासबुक, रेशनकार्ड, लाईटबिल, निवडणूक ओळखपत्र, रहिवाशी पुरावा, डोमासाईल, आधार कार्ड, योजना वयाची मर्यादा, अपुरा अवधी, फोटो, अशी सर्व कागदपत्रे सादर करण्याचे सांगितले. दोन दिवसांनी काही कागदपत्र कमी केले. मात्र वास्तवात   चित्र वेगळे आहे. अंगणवाडी महिला सविस्तर माहिती देत असताना,  ई महासेवा केंद्रात गेले की वेगळी माहिती देण्यात येत होती. टिव्हीवर माहिती वेगळी दिली जाते. वृत्तपत्रात वेगळी माहिती असते, सोशल मीडियावर वेगळी तर नाक्यानाक्यावर वेगळी माहिती मिळत असल्याने अनेक महिला व योजनेसाठी धावपळ करणारे त्यांचे पती, भाऊ इतर नातेवाईक वैतागले आहेत. काही ठिकाणी लग्न प्रमाणपत्र मागितले जाते तर काही ठिकाणी लग्न प्रमाणपत्र गॅझेट मध्ये नोंद असल्याचे पुरावे मागितले जात आहेत. त्यासाठी दोन ते तीन हजार ई महासेवा केंद्रातील एजंट मागत आहेत. पुरावे अर्जंट हवे असेल तर चार ते पाच हजार मागत आहेत. सरकार सांगते तक्रार करा. तक्रार कुठे आणि कशी करायची ? तक्रार नोंदणी करायला गेल्यावर तिथे लाच मागणार नाहीत याची खात्री सरकारने देणार आहे का ? असा सवाल करत संतप्त झालेली जनता तीव्र प्रतिक्रिया देत ” भिक नको पण कुत्र आवर असे बोलत आहेत. अंगणवाडी, आशा सेविका, परिचारक या व इतर विभागातील महिला आंदोलन करत भर पावसात भावाकडे  न्याय मागत आंदोलन करत आहेत. उद्या या १५०० रुपयांसाठी आम्हाला आंदोलन करावे लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुका निकाल पाहून या बहिणीसाठी भाऊ जागा झाला आहे. या आधी बहीण दिसली का नाही ? असा सवाल करत महिला संतप्त झाल्या आहेत. ०००००

डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे वारकरी बांधवांसह विठू नामाच्या जयघोषात झाले दंग !

तरडगाव ते फलटण या मार्गावर वारीत घेतला सहभाग     कल्याण : लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसेच ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांदयावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला. राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यातील संत तुकोबा माऊलींची, संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी मार्गात हजारो वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करत असता. महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभाग होत असतात. गेल्या वर्षी प्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यंदा देखील या वारीत सहभाग घेतला. खासदार डॉ.शिंदे यांनी यांनी आज तरडगाव ते फलटण या मार्गावर श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसेच ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांदयावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा वारकऱ्यांसाठी अनेक उपायोजना राबविल्या आहेत. विशेष दिंड्यांना आर्थिक साहाय्य, वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा, दिंड्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोफत औषधोपचार यांसारख्या उपायोजना राबविण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे यंदाची वारी ही आनंदाची वारी ठरली असल्याचे मत यावेळी वारकरी बांधवांनी व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला. 00000.

डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव गीता खरे यांच्यावर गुन्हा दाखल

गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शेतघरात आश्रय दिल्याचा ठपका अनिल ठाणेकर     ठाणे, उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना आपल्या माळशेज घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपातून उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव आणि शेतघराच्या मालकीण गीता खरे यांच्यासह चार जणांवर मंंगळवारी गुन्हा दाखल केला. रुतिक उर्फ अटल अनिल शुक्ला (रा. म्हारळ, उल्हासनगर), गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ), सुमीत सत्यवान सैनी (रा. योगीधाम, कल्याण), शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक जनार्दन ठाकरे (रा. कल्याण) आणि डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव व शेतघराच्या मालकीण गीता खरे अशी आरोपींची नावे आहेत. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन बबनराव पत्रे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, उल्हासनगर पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तीन ते चार जणांनी केला होता. या प्रकरणातील आरोपी गुन्हा करून फरार झाले होते. उल्हासनगर पोलीस शोध घेत होते. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी माळशेज घाटातील ओतुर पोलीस ठाणे हद्दीतील करंजाळे शेतघरात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन पत्रे, उपनिरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक करंजाळे येथे पोहचले. रात्रीच्या वेळेत ओतुर पोलिसांच्या साथीने उल्हासनगर पोलिसांंनी शेतघरावर छापा टाकला. तेथे १५ जण होते. सहा इसम पोलिसांना पाहून पळून गेले. शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना पोलिसांनी या शेतघरात आरोपींची नावे वाचून दाखवून ते येथे राहतात का म्हणून विचारणा केली. प्रतीकने, अटल शुक्ला याच्या सूचनेवरून सोहन पवार, धीरज रोहेरा, यश पवार येथे राहत आहेत असे सांगितले. हेच गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन उल्हासनगर येथे आणून अटक केली. अटल शुक्ला याने शेतघराचा व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना येथे राहणारे तीन लोक हे उल्हासनगर मधील गंभीर गुन्हयातील आरोपी आहेत. त्यांची राहणे, भोजनाची व्यवस्था कर, अशी सूचना केली होती. त्यामुळे तिघांना या शेतघरात आश्रय मिळाला होता, असे पोलीस तपासात उघड झाले. अटल शुक्लाला गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ) याने शेतघराचा संदर्भ दिला होता. तीन जण गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत हे माहिती असुनही त्यांची माहिती पोलिसांपासून लपवली आणि गन्हेगारांना शेतघरात आश्रय देण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 00000