प्रकाश आंबेडकरांनी माविआसोबत यावे
वर्षा गायकवाडांचे आवाहन मुंबई : लोकसभेची निवडणूक लोकांनीच हातात घेतली होती, महाराष्ट्रात यापुढे सत्तांतर लोकच करणार आहेत असा विश्वास नवनियुक्त खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीसोबत यावं, आपण महाविकास आघाडीचं सरकार आणुया असं आवाहनही त्यांनी केलं. काँग्रेस मुख्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी काही ठिकाणी काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. मीही भीमकन्या आहे. मलाही पाठिंबा दिला असता तर समाधान वाटलं असतं. मात्र आता विधानसभेसाठी त्यांनी सोबत यावं असं आवाहन मी करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
