Month: July 2024

 महिलांवरील वाढत्या अत्याचारविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाची जोरदार निदर्शने

निवडणुकांकडे पाहून तरी बहिणींना सुरक्षा द्यावी – ॠता आव्हाड     ठाणे : निवडणुका जवळ आल्याने लाडकी बहीण योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून तरी बहिणींना सुरक्षा द्यावी, असे मत…

मुंबईची पाणीकपात मागे

धरणांमध्ये ७३ टक्के साठा   मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सोमवार, २९ जुलैपासून मुंबईकरांवरील १० टक्के…

नूसीच्या वतीने नोकरीसाठी प्रशिक्षण आणि कल्याणकारी योजना – मिलिंद कांदळगावकर

ठाणे : नाविकांनी नाविकांसाठी चालवलेली नूसी ही कामगार संघटना आहे. नूसीच्या वतीने नोकरी मिळण्यासाठी तरुणांना  प्रशिक्षण व नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कामगार कल्याणकारी योजना राबविल्या जातात, अशी माहिती नुसीचे जनरल सेक्रेटरी…

 बोगद्यातील पाण्याने प्रवासी त्रस्त

निळजे ते लोढा संकुल दरम्यानच्या   डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत रेल्वे प्रशासनाने निळजे ते लोढा गृहसंकुल दरम्यान एक बोगदा नागरिकांना येण्या जाण्यासाठी बांधून दिला आहे. या बोगद्यात पाऊस सुरू झाल्यापासून पाणी तुंबत आहे. मुसळधार पाऊस असला की या बोगद्यात कंबरभर पाणी असते. त्यामुळे निळजे गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, महिलांचे हाल होत आहेत. निळजे गावातील ग्रामस्थांचे बहुतांशी व्यवहार लोढा गृहसंकुल भागात आहेत. या गावातील बहुतांशी मुले लोढा गृहसंकुल परिसरातील शाळांमध्ये, खासगी शिकवणीसाठी, तसेच रहिवासी बाजारपेठेसाठी याच भागात जातात. मध्य रेल्वेने निळजे गावाजवळील लोढा गृहसंकुलकडे जाणारे रेल्वे फाटक दोन महिन्यापूर्वी बंद केले. हे फाटक बंद करण्यापूर्वी फाटक भागात भुयारी मार्ग बांधून देण्याची मागणी निळजे ग्रामस्थांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. अधिकाऱ्यांनी ती मागणी मान्य केली होती. परंतु, एक दिवस रेल्वेने निळजे गावाजवळील रेल्वे फाटक ग्रामस्थांच्या भुयारी मार्गाची पूर्तता न करता रेल्वेने बंद केले. निळजे गावातून रेल्वे फाटकातून गेले की लोढा हेवन गृहसंकुल कमी अंतरावर होते. त्यामुळे ग्रामस्थ याच मार्गाला सर्वाधिक प्राधान्य देत होते. रेल्वे फाटक बंद केल्याने ग्रामस्थांना सोयीचे होणार नाही अशा पध्दतीने रेल्वेने एका बोगदा बांधला आहे. हा बोगदा सखल आणि खोलगट भागात आहे. या बोगद्यातून निळजे ग्रामस्थांना लोढा हेवन भागात जाता येते. या बोगद्यात पाऊस सुरू झाल्यापासून पाणी तुंबते. हे पाणी जाण्यासाठी या भागात गटार किंवा अन्य कोणतीही सोय नाही. त्यामुळे बोगद्यात पाणी तुंबून राहते. या बोगद्यातून प्रवाशांची वर्दळ असते. त्याच बरोबर मोटारी, लहान मालवाहू वाहने याच बोगद्यातून धावतात. त्यामुळे बोगद्यात पाऊस नसला की चिखल होतो. आणि पाऊस सुरू असला की बोगद्यात पाणी तुंबते. मुसळधार पावसात कंबरभर पाणी साचते. त्यामुळे ग्रामस्थांना या भागातून जाणे मुश्किल होते. मुलांना लोढा हेवन भागातील शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिला, मुलांचे या बोगद्यातील पाणी तुंबण्याचा सर्वाधिक त्रास होतो. ग्रामस्थांना विश्वासात न घेता घाईघाईने हा बोगदा बांधला आहे, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. गावापासून दूर अंतरावर हा बोगदा आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत या बोगद्यातून येणे धोकादायक आहे. रात्रीच्या वेळेत निळजे ग्रामस्थांची, नोकरदाररांची मोठी अडचण होते. निळजे गावातून बाहेर पडण्यासाठी रेल्वे फाटक हा एक मधला मार्ग होता. तोच रेल्वेने बंद केल्याने ग्रामस्थांचे खूल हाल सुरू आहेत. ग्रामस्थांना पाणी तुंबलेल्या बोगद्यातून सध्या प्रवास करावा लागतो. 00000

ठामपा आयोजित पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती प्रदर्शनास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : पर्यांवरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तसेच सजावटीचे साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती प्रदर्शनास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठामपा शाळा क्र.…

ठाणे महापालिकेला सफाई कर्मचारी महेन्द्र शिंदे यांनी BSL L.L.B परीक्षेत यश संपादन केले !

ठाणे : ठाणे महानगरपालिकेचा सफाई कामगार महेंद्र पिठुराम शिंदे यांनी BSL L.L.B परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल व्यसनमुक्ती जनजागृती सेवा समितीचे वतीने रविवारी २८ जुलैला “सफाई कामगारांचा जीवन संघर्ष” पुस्तक आणि पुष्पगुच्छ…

साई इंटरप्रायझेसचे संजय मुळे महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अभिनेत्री ईशा देओल यांच्या हस्ते जयपूर येथे पुरस्कार प्रदान     मुंबई : छत्रपती संभाजी नगर येथील साई इंटरप्रायझेसचे मालक श्री. संजय मधुकर मुळे यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी “महाराष्ट्र  भूषण जीवन गौरव” पुरस्काराने गौरविण्यात आले. जयपूर येथे नुकत्याच  झालेल्या “एक्सलंसी आयकॉनिक पुरस्कार वितरण समारंभात सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कॉर्पोरेट अफेअर मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या थ्री फिंगर्स इंटरटेनमेंट लि. च्या वतीने फाव फेअर्स या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून दरवर्षी एक्सलन्सी आयकॉनिक अवॉर्ड पुरस्काराचे आयोजन केले जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा एक्सलंसी आयकॉनिक पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यामध्ये छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत असलेल्या साई इंटरप्रायझेसचे सर्वेसर्वा श्री. संजय मुळे यांची  उद्योग क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यापूर्वी  संजय मुळे यांचा  एक्सलंसी आयकॉनिक अवॉर्डतर्फे ‘उद्योगश्री जीवन गौरव’, नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या ‘नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार’ २०१५, क्वालिटी  ब्रॅण्ड टाइम्स तर्फे  ‘क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार 2015,’ एज्युकेशन अँड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचा ‘राष्ट्रीय निर्माणरत्न पुरस्कार २०१९’अशा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. 00000000

मुरबाडच्या तारांगण शाळेत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

राजीव चंदने     मुरबाड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व्हेसर्वा तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काल मुरबाडच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुरबाड तालुक्यातील तारांगण मतिमंद मुलांच्या निवासी कार्यशाळेत केक कापून तसेच मुलांना फळे व मिष्ठांन्नाचे वाटप करून वाढदिवस साजरा केला. मुलांशी हितगुज करत, संवाद साधत सामाजिक जाणिवेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव, विधानसभा क्षेत्र संघटक भरत गायकर,  तालुका समन्वयक विनायक ढमणे, शहर प्रमुख संदीप बहाडकर, तालुका सचिव नरेंद्र (भाऊ) यशवंतराव, सहसंपर्क प्रमुख नरेश देसले, युवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश चौधरी, युवासेना सचिव मिलिंद घरत आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत कायकर्ते उपस्थित होते. 00000

महसूल सप्ताह नियोजनपूर्वक यशस्वी करा –  किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : महसूल विभागामार्फत१ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबरोबरच विविध योजनांचे लाभ देण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार आहेत. शासननिर्णयानुसार सर्व तालुक्यांमध्ये महसूल सप्ताहाचे नियोजनपूर्वक व समन्वयाने यशस्वी आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे दिले. सप्ताहाच्या पूर्वतयारीची आढावाबैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, श्रीकांत गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, सहायक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी आणि शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी महसूल दिनाबरोबरच १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ०१ ते ०७ ऑगस्ट  या कालावधीत राज्यभरात ‘महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या महसूल सप्ताहनिमित्त जिल्ह्यात या कालावधीत पुढीलप्रमाणे योजना राबविण्यात येणार आहेत. १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ” ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”, २ ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”, ३ ऑगस्ट रोजी ” मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”, ४ ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय”, ५ ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी”, ६ ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा” आणि ७ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 0000

७.५ अश्र्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना शासनाकडून मोफत वीज

मुंबई, दि. २९ : शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४’ शासनाने लागू केली आहे. आता ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. जागतिक हवामान…