Month: August 2024

 शेतकऱ्याने बिल्डरला मारहाण करून कार्यालयातील ६५ हजार रुपये केले लंपास

अखेर ४ दिवसांनी गुन्हा दाखल मात्र शेतकरी फरार पनवेल : तालुक्यातील उसर्ली खुर्द गावातील शेतकरी बळीराम भोईर यांच्या जागेवर इमारत विकसित करणारे बांधकाम व्यावसायिक अयाझ मर्चंट यांना शुक्रवारी जागा मालक बळीराम भोईर यांनी आपल्या अन्य ३ साथीदारांसह जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर अयाझ मर्चंट यांनी पनवेल शहर पोलिस ठाणे गाठले असता पोलिसांनी त्यांना प्रथम उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. २ दिवस उपचार घेतल्यानंतर अयाझ मर्चंट हे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात फेऱ्या मारू लागले आणि अखेर ५ दिवसांनी आरोपी बळीराम भोईर यांच्यासह अन्य ३ साथीदारांवर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अयाझ मर्चंट यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात म्हटले आहे की, त्यांनी दिनांक १६ ऑगस्ट रोजी विकसित केलेल्या इमारतीमध्ये ग्राहकांना फ्लॅट दाखवून पुन्हा त्यांना बस स्थानकात सोडले. यानंतर याच इमारतीच्या त्यांच्या विकासक कार्यालयात ते गेले असता, जागा मालक बळीराम भोईर आणि अन्य ३ साथीदार यांनी त्याठिकाणी येवून अतिरिक्त पैशाचा लगादा लावला. यावर अतिरिक्त पैशाशी आपला संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे जगामालक आणि अन्य तिघांनी बांधकाम व्यावसायिक अयाझ मर्चंट यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये अयाझ मर्चंट यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले असून त्यांच्या छातीला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर घटना घडताच अयाझ मर्चंट यांनी पनवेल शहर पोलिस ठाणे गाठले. मात्र नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने पोलिसांनी त्यांना तत्काळ उपचार घेण्यासाठी पाठविले. शहरातील गांधी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अयाझ मर्चंट यांनी संबंधित जागा मालक शेतकरी बळीराम भोईर आणि अन्य ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी अखेर ५ व्या दिवशी जागा मालक शेतकरी बळीराम भोईर यांच्यासह अन्य ३ जणांविरोधात भा. दं. वि. कलम ३०९ (६), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश शेलकर हे करीत आहेत. ००००

 ‘वारी समतेची, वारी मानवतेची’ रविवारी होणार

कोर्टनाका सर्कलजवळ होणार अश्वरिंगण सोहळा   ठाणे : ठाणे ओबीसी एकीकरण समिती आणि मराठा सेवा संघाच्या वतीने यंदाही वारी समतेची आणि वारी मानवतेच्या माध्यमातून यंदाही ठाणेकरांना समतेची वारी अनुभवता येणार आहे. येत्या रविवारी ठाण्यातील कोर्टनाका परिसरात होणाऱ्या या वारीत अश्वरिंगण सोहळा वारकऱ्यांचे आकर्षण ठरणार आहे. या वारीचे आयोजक ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रफुल वाघोले म्हणाले काही कारणास्तव नागरिकांना आषाढी वारीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे त्यांना वारी अनुभवता यावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीवर या वारीचे आयोजन करण्यात आले. या वारीच्या माध्यमातून समतामुलक् विचारांचा जागर घालण्यात येणार आहे. या वारीची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होणार आहे. या वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज हभप भानुदास मोरे देहूकर यांचे किर्तन होणार आहे.या वारीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वारकरी संप्रदायातील संत, महात्मे यांची वेशभूषा केलेले कलावंत सहभागी होतील. त्यामुळे ठाणेकरांनी या वारीत सहभागी होऊन प्रत्यक्ष वारीचा अनुभव घ्यावा असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार-प्रताप सरनाईक

ठाणे : राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून ठाणे शहरामधील हजारो महिलांच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा झाले आहेत. अजूनही या योजनेचे फॉर्म…

क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून वाहतूक नियम पाळा संदेश देत ‘रक्षाबंधन’

माथेरान : क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन विविध सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असून रक्षाबंधनचे औचित्य साधन दरवर्षीप्रमाणे पनवेल मधील विजय सेल जवळील सिग्नलच्या चौकात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना राखी बांधत सुरक्षेची काळजी…

माकप पॉलिटब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्या उपस्थितीत

विधानसभा निवडणूक तयारीसाठी तलासरी व डहाणू तालुक्यांतील माकप पक्ष कार्यकर्त्यांची सभा अनिल ठाणेकर   ठाणे : येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिटब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्या…

जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाला आरोग्य विद्यापीठाची मान्यता

मुंबई : दक्षिण मुंबईतील जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता दिल्यानंतर आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही संलग्नता जाहीर केली आहे. विद्यापीठाने त्यासंदर्भातील पत्रक १९ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाला पाठवले आहे.…

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखू मुक्ती केंद्र सुरू करणार

तंबाखूमुक्त युवा मोहिमेंतर्गत राबवणार उपक्रम   मुंबई : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जागतिक तंबाखू दिनानिमित्त जाहीर मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्त केंद्र स्थापन करण्याचा…

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा   मुंबई : बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर…