Month: August 2024

आदिती तटकरे यांच्याहस्ते सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान

किसन जावळे, सोमनाथ घार्गे यांची उपस्थिती अशोक गायकवाड अलिबाग : महाराष्ट्र राज्य मंत्री आदितीताई तटकरे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत कर्जत येथील ” रक्षा” संस्थेच्या दोन शूरवीरांचा भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ वर्धापनदिन दिनानिमित्त सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान सोहळा पार पडला. भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान, अलिबाग येथे पोलीस ग्राउंड वर आयोजित केलेल्या कार्यक्रमात, कर्जत मधील सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान करण्यात आला. सुमित गुरव व अक्षय गुप्ता हे कर्जत येथील “रक्षा सामाजिक विकास मंडळ” या संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. यावर्षी पावसाळ्यामध्ये उत्पन्न झालेली पूर परिस्थिती व विविध आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या जीवावर उदार होऊन सह्याद्रीच्या खडतर डोंगर रांगांमध्ये केलेले शोध व बचाव कार्य व आत्तापर्यंत करत आलेल्या देश सेवेबद्दल यांचा सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्री कु.आदितीताई तटकरे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.सुमित गुरव यांनी गिर्यारोहणाचे प्राथमिक प्रशिक्षण अधिकृत गिर्यारोहण संस्थेतून, जम्मू काश्मीर येथे घेतले आहे. याचबरोबर वायरलेस कम्युनिकेशन याचे प्रशिक्षण रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथून घेतलेले आहे. व त्यांनी अग्निशामन दलाचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.आणि याच बरोबर ते रायगड जिल्हा साठी ते अधिकृतरित्या “आपदा मित्र” म्हणून कार्यरत आहेत. तर अक्षय गुप्ता हे उत्तम गिर्यारोहक आहेत व उत्तम प्रकारचे सर्पमित्रही आहेत. यावर्षी जुलै महिन्यात पोसरी बेंडसे येथे एक व्यक्ती उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जात असताना त्याला सुरक्षितरीत्या जिवंत बाहेर काढण्यात केलेले सहकार्य, तसेच माळशेज घाटातील हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा येथे एक व्यक्ती १४०० फूट खोल पडली होती त्यावेळेस केलेले सहकार्य, याचबरोबर ढाक भैरी येथे अडकलेल्या तीन युवकांना सुखरूपपणे बाहेर काढल्याबद्दल सुमित गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान गुरुवारी,(दि.१५ ऑगस्ट) भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ वा वर्धापन दिनानिमित्त अलिबाग येथे करण्यात आला.

 सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी पाच लक्ष रुपयांचे पहिले पारितोषिक

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2024 नवी मुंबई : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिनांक 7 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी शासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत…

शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ घ्यावा – रामेश्वर पाचे

ठाणे : अनुसूचित जाती नव बौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना (विशेष घटक योजना) जिल्हा परिषद,ठाणे मार्फत राबविण्यात येत आहे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ…

ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे रक्षाबंधन साजरे

आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचा उपक्रम ठाणे : गेली अनेक वर्षे आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजनचे स्वयंसेवक आणि विठाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे रक्षाबंधन साजरे केले जाते. यंदाही हा सोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण यांनी केले तेव्हा त्यांनी नमूद केले की, गेली २० वर्षे ते हा उपक्रम राबवित आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन दशेपासून त्या मनोरुग्णालयात येऊन रक्षाबंधन साजरे करतात याविषयी सांगितले व संस्थेचे सचिव मा. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे देखील हा उपक्रम चालूच आहे याविषयी त्यांनी माहिती दिली. आपण समाजाचे देणे लागतो त्यामुळे आपण अशा विविध उपक्रमांना गेले पाहिजे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे याविषयी भाष्य केले आणि सगळ्यांना नारळी पौर्णिमा – रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना ही परंपरा चालू ठेवा असेही संबोधले. या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मुळीक सर, ममता मॅडम, जाधव मॅडम व इतर सहकारी स्त्री व पुरुष रुग्ण, शारदा एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या विश्वस्त व आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, कार्यक्रम अधिकारी प्रा. संजना भाबल, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अजय ब्राम्हणे, रजिस्ट्रार आकाश ढवळ, विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण, तुषार सावंत व इतर सदस्य मंडळी उपस्थित होते.

वाहतूक सेनेची कार्यकारिणी जाहीर

निलेश भोसले यांची सरचिटणीस पदी नियुक्ती मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिव वाहतूक करण्यात आली आहे. शिव वाहतूक सेनेच्या अध्यक्षपदी उपनेते भाऊ कोरगावकर यांची तर सरचिटणीसपदी नीलेश भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी संदीप (बाबू) मोरे, कोषाध्यक्षपदी विनायक मुरूडकर, उपाध्यक्षपदी साजिद सुपारीवाला, नरेश चाळके, शाम बिस्ट यांची तर सचिवपदी अमिरुद्दीन तालुकदार, विशाल आमकर, संदेश शिरसाट, उमर शरीफ सिद्दीकी यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

माथेरानची महाराणी मिनी ट्रेनच्या जन्माची कहाणी

माथेरान : ‘झुकझुक झुक आगीनगडी धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया’, या पंक्तीची आठवण करून देणारी माथेरान ची महाराणीची निवड जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणजेच युनेस्को मध्ये झाल्याने माथेरानला एक…

नवी महापालिका होईलही, पैशांचे सोंग कुठून आणणार?

ठाणे : अंबरनाथ व कुळगाव-दलापूर नगरपालिकांचे विसर्जन करून नवी महापालिका करण्याची मागणी शिंदेसेनेचे नेते वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली व मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. ठाणे जिल्ह्यातील…

‘सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे किमान वेतन वेळेवर मिळालेच पाहिजे’

मेधा पाटकर यांचा आंदोलनाचा  इशारा ठाणे :सफाई कामगार हे शहराची साफसफाई करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात; मनोरुग्णालयातील सफाई कामगार तर रुग्णालयाच्या साफसफाई बरोबर मनोरूग्णांच्या सफाईचीही जबाबदारी उचलतात. त्यांच्या कामाचं महत्व जाणून त्यांना खरं तर कंत्राटी पद्धतीने कामावर न ठेवता कायम स्वरूपी नोकरीत सामावून घ्यायला हवं पण या कामगारांना न्यायालयाने आदेश देऊनही किमान वेतन दिले जात नाही की मागील वेतनाची थकबाकी अजून दिली जात नाही, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर म्हणाल्या. ठाण्यातील शासकीय मनोरुग्णालयातील सफाई कामगार किमान वेतन मिळावं आणि वेतन थकबाकी मिळावी म्हणून १३ ऑगस्टपासून साखळी उपोषण करत आहेत. त्यांचे मनोबल वाढवून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मेधाताईंनी आंदोलन स्थळी भेट दिले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, कंत्राटदाराने कामगारांना वेळाच्या वेळी वेतन, भत्ते दिले नाहीत तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते कामगारांना देऊन कंत्राटदारांकडून वसूल केले पाहिजेत असा कायदा असताना इथे अधिकारी ते न करता कंत्राटदारावर सर्व सोपवतात. या कामगारांना अजून जुलै महिन्याचे वेतन दिलेले नाही. लवकरच कामगारांना न्याय नाही मिळाला तर साखळी उपोषणाचे रुपांतर बेमुदत उपोषणात होईल, असा इशाराही त्यांनी मनोरुग्णालयाच्या प्रशासनाला या वेळी दिला. यावेळी मेधाताईंनी महिलांना राखी बांधून या बंधनात आपण एकत्रितपणे राहून आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे असे सांगून त्यांना धीर दिला. सफाई कामगारांना जुलै महिन्याचे वेतन रूग्णालय प्रशासन अदा करेल, आजच्या आज वेतन साठी प्रस्ताव अतिरिक्त संचालक डॉ स्वप्निल लाळे यांना पाठवण्याचे आदेश उपसंचालक डॉ अशोक नंदापुरकर यांनी डॉ नेताजी मुळीक आणि सीएओ श्री लांजेवार व प्रशासकीय अधिकारी डॉ रानडे यांना दिले. प्रादेशिक मनोरुग्गणालयातर्फे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ अशोक नंदापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वैद्यकीय अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक, CAO गजानन लांजेवार AO. डॉ. रानडे यांच्या आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामगारांच्या वतीने श्रमिक जनता संघ  युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर, उपाध्यक्ष डॉ संजय मंगला गोपाळ, महासचिव जगदीश खैरालिया, कार्यकारी सचिव अजय भोसले, कामगार प्रतिनिधी संघटक दिनानाथ देसले, अनिता कुमावत, सोनी चौहान, संजय सैदाणे , महेश निचिते आदी उपस्थित होते. यावेळी वागळे इस्टेट पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री जगताप  उपस्थित होते. यावेळी सहा.संचालक डॉ चाकूरकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री पाटणकर ही उपस्थित होते. सदरच्या प्रस्तावावर मा. आरोग्य आयुक्त यांची मंजूरी घेऊन सोमवार पर्यंत वेतन अदा करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे अतिरिक्त संचालक डॉ स्वप्निल लाळे यांनी युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांना मोबाईल वर चर्चा करताना आश्वासन दिले आहे. मागील पाच वर्षाच्या थकीत किमान वेतनाच्या फरकाची रक्कम ९५ लाख सात हजार चारशे छत्तीस रूपये, बोनस पोटी थकीत रक्कम एकवीस लाख पन्नास हजार एकशे शहाण्णव रूपये आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम बारा लाख एकशे चौसष्ठ रूपये अशी एकूण एक कोटी अठ्ठावीस लाख सत्तावन्न हजार सातशे शहाण्णव रूपये इतकी रक्कम सफाई कामगारांना देय असलेल्या रकमेचे मागणी पत्र यावेळी युनियन तर्फे उपसंचालक डॉ नंदापुरकर यांना सादर करण्यात आले. या बरोबरच इएसआयसी आणि अन्य सोयी सुविधा आदी इतर प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. सफाई कामगारांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सदस्य अजित डफले, स्वराज अभियानचे सदस्य सुब्रोतो भट्टाचार्य, समता विचार प्रसारक संस्था मीनल उत्तूरकर, सुनिल दिवेकर, किसन सिंग बेदी, अनमोल साळवी, मोनाली सरोदे.श्रमिक जनता संघाचे कार्यकर्ते किसन गडगिळे आणि सामाजिक कार्यकर्ते शरद जोशी हे उपस्थित होते.

आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा 

ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटी आणि आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या रॉट्रॅक्ट क्लब व एनसीसी कॅडेट्स यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांनी ठाण्यातील आनंद दिघे जिद्द स्कूल मधील विद्यार्थ्यां सोबत रक्षाबंधन…

उद्योजक विजय केळुसकर यांचे आकस्मिक निधन

 ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई : पालघर जिल्ह्यातील तारापूर जवळील रासायनिक कारखान्याचे मालक, पश्चिम उपनगरातील प्रथितयश उद्योजक विजय शंकर केळुसकर यांचे काल रात्री बोरीवली पूर्व येथील एका खासगी रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी अनुराधा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. काही काळापूर्वी त्यांच्या दोन्ही मुलांचे ऐन उमेदीच्या काळात निधन झाल्यामुळे केळुसकर परिवार दुखाच्या छायेतून बाहेर येत नाहीत तोवर कर्ते सवरते उद्योजक विजय केळुसकर काळाच्या पडद्याआड गेले. जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील एकता विनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपनगराचा राजा, मागाठाणे मित्र मंडळ तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य संचालित जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे ते खंदे समर्थक होते. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विजय केळुसकर यांनी बोरीवली येथे येऊन आपला ठसा उमटविला होता. ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. काल सकाळी प्रकृती बरी वाटत नसल्याने स्वतःच चालत ते इस्पितळात गेले. त्यांना वैद्यकीय तपासण्या केल्या नंतर अती दक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु रात्रीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे जय महाराष्ट्र नगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी बोरीवली पूर्व येथील दौलतनगर स्मशानभूमित स्व. विजय केळुसकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व थरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.