Month: August 2024

बँक लिंकेज संदर्भात रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळा संपन्न

ठाणे  : आर्थिक वर्ष २०२४-२५ या कालावधीत जास्तीत जास्त पतपुरवठा (बॅंक कर्ज) उपलब्ध करून देणे, ऑनलाइन बँक लिंकेज करणे ही प्रक्रिया राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा अग्रणी बँक, वागळे इस्टेट येथे सर्व बँक व्यवस्थापक व उमेद कर्मचारी यांची १२ ऑगस्टला एक दिवशीय कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली. या कार्यशाळेची सुरुवात दिपप्रज्वलन व मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्तविक प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा सह जिल्हा अभियान संचालक एमएसआरएलएम,  छायादेवी शिसोदे यांनी केले. तसेच राष्ट्रीय संसाधन प्रशिक्षक (NRP) खान्डेराव दिक्षित यांनी कार्यशाळेचे प्रशिक्षण दिले. गटाचे बँक लिंकेज NRLM MIS पोर्टलवर ऑनलाइन प्रक्रिया करणे व आर्थिक वर्ष २०२४-२५ या कालावधीतील आर्थिक व भौतिक लक्ष साध्य करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  प्रशिक्षणादरम्यान उद्भवलेल्या शंकांचे निरस जिल्हा व्यवस्थापक – आर्थिक समावेशन प्रतिक्षा आगीवले यांनी केले. एनआरएलएम मध्ये आर्थिक समावेशन उपक्रम एनआरएलएम च्या समूहांना त्यांच्या सामाजिक व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेळेवर, प्रभावी आणि पारदर्शक आर्थिक सेवा प्रदान करतात, तसेच जीवन संरक्षण आणि वृद्धापकाळसाठी संरक्षणात्मक कवच प्रदान करते. स्वयं सहाय्यता समूहांचे आर्थिक व सामाजिक दृष्ट्या जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत स्वयं सहाय्यता समूहांना विविध बँकेद्वारे बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो उपलब्ध झालेल्या कर्जाचा वापर करून महिला प्राथमिक गरजा पूर्ण करतात तसेच व्यवसाय सुरू करतात. आर्थिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ पर्यंत एकूण २५९८० स्वयंसहाय्यता समूहांना ७५८९६.६७ (लक्ष) बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उमेद अंतर्गत विविध अभिनव उपक्रम गावस्तरावर राबविले जात आहेत. स्वयंसहाय्यता समूहांना व्यवसायामध्ये वृद्धी निर्माण करणेसाठी विविध बँकांच्या माध्यमातून शून्य टक्के व्याज दरातून कर्ज पतपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. बँक व्यवस्थापक यांचे एक दिवसीय प्रशिक्षण मध्ये आर्थिक समावेशन बाबत मार्गदर्शन करण्यात आले, Online बँक प्रस्ताव सादर करण्याचे प्रशिक्षण, PMJJBY, PMSBY, अटल पेन्शन योजना, आरोग्य विमा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, सुमतीबाई सुकाळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना, मुद्रा कर्ज योजना, आणि वैयक्तिक उद्योग व्यवसायाकरिता मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ठाणे सोनाली देवरे, जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापक अभिषेक पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक (MSRLM) सारिका भोसले, तसेच  जिल्ह्यातील सर्व  बँक व्यवस्थापक, सर्व MSRLM चे अधिकारी, प्रभाग समन्वयक, माविम कर्मचारी व सर्व बँक सखी आदि प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सदर प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हा अभियान व्यवस्थापक सारिका भोसले व जिल्हा व्यवस्थापक- आर्थिक समावेशन प्रतिक्षा आगीवले यांनी केले. कार्यशाळेचा समारोप सारिका भोसले यांनी सर्वांचे आभार मानून केले. 00000

डायघरवासियांना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिला दिलासा

अनिल ठाणेकर   ठाणे : कल्याण तालुक्यातील डायघर येथील भागात नागरिकांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. याविषयी त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे हत्यारही उपसले होते. मात्र संवेदनशील जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्यांच्या या प्रश्नांबाबत चर्चेतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्यासह तेथील नागरिकांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित केले होते. या बैठकीस ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, कल्याण तहसिलदार सचिन शेजाळ, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, डायघरवासिय उपस्थित होते. यावेळी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी तेथील समस्यांचा पाढाच वाचला. बहुतांश समस्या या त्या परिसरात साचलेला कचरा, दुर्गंधी अन् त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक समस्या याबाबतीतील होत्या. यावर जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे विषय अतिशय गांभीर्याने घेण्याचे सूचित केले. तसेच या परिसरातील कचरा तात्काळ हटवावा, त्या कचऱ्यावर आवश्यक ती प्रक्रिया करावी, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय येथील नागरिकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मुर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचीही मागणी केली. ही मागणी तात्काळ मान्य करीत ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी तेथे कृत्रिम तलावाची लगेचच उभारणी करण्यात येईल, असे आश्वासित केले. शेवटी जिल्हाधिकारी महोदयांनी डायघरवासियांसाठी तातडीने घेतलेल्या या बैठकीबद्दल आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्यासह उपस्थित सर्व नागरिकांनी आभार मानले. 00000

 मनपाच्या लिपिकांना कामाचे ‘जड झाले ओझे’

४१% पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण     मुंबई : मराठा  आरक्षण सर्वेक्षण, त्यानंतर लोकसभा निवडणूक कामासाठी मुंबई पालिकेचा  कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर कार्यरत होता. आता विधानसभा आणि नंतर मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठीही पालिका कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाची सेवा करावी लागणार आहे. आधीच पालिकेत नवी भरती नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे.  लिपिक संवर्गातील कर्मचारी तर पिचून गेले आहेत. या संवर्गात ४१ टक्के पदे अजून भरलेलीच नाहीत. पालिकेच्या आस्थापनेवर लिपिक संवर्गाची एकूण ५,५६० पदे आहेत. त्यातील फक्त ३,३०० पदे कार्यरत आहेत. एकूण कर्मचाऱ्यांपैकी फक्त ५९ टक्के  पदे भरली  आहेत. २,२६० पदे रिक्त आहेत. एकूण पदांच्या तुलनेत ४१ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. कर्मचाऱ्यांचे आस्थापनाविषयक प्रश्न, सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे देय दावे निकाली काढणे, नागरी सेवा देण्यास विलंब होत आहे. हे कर्मचारी मानसिक तणावाखाली कर्तव्य पार पाडत आहेत, अशी तक्रार दी म्युनिसिपल युनियनने पालिका आयुक्तांकडे केली आहे. फक्त ८०० कर्मचारी पात्र १) कार्यकारी सहायक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी २४ मे २०२३  रोजी  परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार निम्न संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून निवड पद्धतीने एकूण १,१७८ पदे प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षण राखून भरण्याचा निर्णय घेतला. २) १२ ऑगस्ट २०२३ च्या परिपत्रकानुसार परीक्षा घेतली.  परिपत्रकामध्ये नमूद अटीनुसार ८०० कर्मचारी पात्र ठरवून त्यांची कार्यकारी सहायक पदावर नियुक्ती केली आहे. गुणांमध्ये शिथिलता आणा १) परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक  (१२) ११ मधील निकषांनुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवडीचे निकष शिथिल करण्याचे अधिकार आयुक्तांना  राहतील, असे नमूद केले आहे. त्यामुळे आयुक्तांनी निवडीचे निकष शिथिल करावेत. उत्तीर्णतेसाठीची ४५ टक्के  गुणांमध्ये शिथिलता आणून कार्यकारी सहायक संवर्गाची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी युनियनने केली आहे. 00000

जिल्हा परिषदेच्या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी तत्वावर भरती – बाळासाहेब राक्षे

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे, प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या कालावधीसाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र उमेदवारांची उपशिक्षक, पदवीधर शिक्षक या पदावर एकत्रित मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने…

२७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार- डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या २७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचे…

कर्जत तालुक्यात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेणार : सुधाकर घारे*

अशोक गायकवाड   कर्जत : कर्जत तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या विरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने कर्जत येथील टिळक चौकात साखळी उपोषण सुरु केले आहे. रायगड…

 नवी मुंबई, पुण्यासह राज्यभर ईडीचे छापे

ज्ञानराधा मल्टिस्टेट कोऑपरेटीव्ह सोसायटी प्रकरण एक कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त     मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतील १६८ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात सुरेश कुटे व इतरांविरोधात सुरू असलेल्या तपासाअंतर्गत सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई येथे विविध ठिकाणी नुकतेच छापे टाकले. या कारवाईत डी-मॅट खाते, बँक खाते यांच्यासह संशयित कागदपत्रे, डिजिटल उपकरणे असे एकूण एक कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली. यातील आरोपी सुरेश कुटे आणि संबंधितांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या (डीएमसीएसएल) माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूक योजना राबविल्या. त्यानंतर, कुटे यांच्या विरोधात फसवणुकीचे नऊ गुन्हे दाखल झाले. सहकारी संस्थेच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या स्वरूपात १६८ कोटी रुपयांच्या करण्यात आलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीने याप्रकरणात ९ ऑगस्ट रोजी बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई येथील विविध ठिकाणी छापे टाकले. ईडीने या कारवाईत जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे ईडीकडून सोमवारी सांगण्यात आले. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानराधा मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ५२ पेक्षा जास्त शाखा आहेत. याचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुरेश ज्ञानोबाराव कुटे, यशवंत व्ही. कुलकर्णी आणि अन्य संबंधित करत होते. विविध ठेव योजना आणत त्यांनी १२ ते १४ टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचा दावा केला. वैयक्तिक कर्ज, साधे कर्ज, पगार कर्ज, मुदत कर्ज, सुवर्ण कर्ज आणि एफडीआर कर्ज अशा विविध योजना सुरू केल्या. यात आतापर्यंत नोंदवलेल्या गुन्ह्यांनुसार, गुंतवणूकदारांसह झालेल्या फसवणुकीची अंदाजित रक्कम १६८ कोटी रुपये आहे. सुरेश कुटे आणि इतरांनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना डीएमसीएसएलकडे पैसे जमा करण्याचे आमिष दाखविल्याचे ईडीच्या तपासातून उघड झाले आहे. 0000

उल्हासनगर रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

आयुक्तांकडून पाहणी     उल्हासनगर : बृहमुंबई व ठाणे महापालिकेच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रस्त्यातील खड्डे भरण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी घेतला. या तंत्रज्ञानाचा वापर करून सोमवारी नेताजी चौकातील खड्डे भरण्यात आले असून आयुक्त अजीज शेख यांनी खड्डे भरण्याची पाहणी केली. उल्हासनगरातील रस्त्याची अवस्था दैयनिय झाली असून वाहन चालकासह नागरिक हैराण झाले. वाहन चालक व नागरिकांना दिलासा देण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी मुंबई, ठाणे शहराच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रस्त्यातील खड्डे भरण्याचा निर्णय घेतला. सोमवारी नेताजी चौकातील रस्त्याचे खड्डे या तंत्रज्ञानातून भरण्यात आले असून आयुक्त अजीज शेख यांनी भरलेल्या खड्ड्याची पाहणी केली. हे तंत्रज्ञान परिणामकारक ठरलेतर, हे तंत्रज्ञान रस्त्यातील खड्डे भरण्यासाठीं वापरणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त अजीज शेख यांनी दिली. याच आधुनिक तंत्रज्ञान वापरुन छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुल, चालीया चौक, श्रीराम चौक, धोबीघाट रस्ता व शहाड रस्त्यातील खड्डे भरण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिली.

कल्याणमधील शहाड, रामबाग परिसराचा पाणी पुरवठा रात्रीपासून बंद

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेची उल्हास नदी काठच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राची कल्याण पश्चिमेतील शहाड, रामबाग, बिर्ला महाविद्यालय परिसर, जोशीबाग, मिलिंदनगर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला सोमवारी मध्यरात्री दीड वाजता…

ठाण्याला नवे सायबर पोलीस ठाणे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटनाची शक्यता

ठाणे : गेल्याकाही वर्षांपासून ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर गुन्ह्यांची मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. फसवणूक झाल्यानंतर नागरिकांनी तक्रारी कुठे करायच्या असा प्रश्न निर्माण होत असे. अनेकदा तक्रारदाराला पोलीस ठाण्यातून मुख्यालय,…