Month: August 2024

 एआयएमने दिला भारत बंदचा इशारा

 सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षण निर्णयाविरुद्ध रमेश औताडे     मुंबई : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आरक्षण अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसताना आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्यास मान्यता देताना तो अधिकार राज्य सरकारांना देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जातीनिहाय आकडेवारी पाहता योग्य हा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी ए एम आय ‘आंबेडकरवादी इंडिया मिशन’ने केली असून २१ ऑगस्टला भारत बंद चा इशारा दिला आहे. कायदेतज्ज्ञ, संविधानतज्ञ व इतर जेष्ठ आर पी आय नेत्यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे.  संविधान तज्ज्ञ ऍड. डॉ. सुरेश माने, पँथर नेते सुरेश केदारे, विचारवंत प्रशांत रूपवते, जेष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे, शिक्षण तज्ज्ञ डॉ. जी. के. डोंगरगावकर, चर्मकार नेते अच्युत भोईटे, जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, सतीश डोंगरे उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचा अनाकलनीय आणि वादग्रस्त ठरलेला हा काही पहिलाच निकाल नाही. आजवर असे आरक्षणविरोधी आणि दलितांच्या हिताला मारक निकाल अनेकदा दिले गेले आहेत. असे सांगत ऍड डॉ सुरेश माने म्हणाले, यापूर्वी ‘अट्रोसिटी ॲक्ट ‘ निष्प्रभ करणाऱ्या एका निकालावरून २ एप्रिल २०१८ रोजी दलित संघटनांनी ‘भारत बंद’ केला होता. त्यावेळी देशभरात हिंसाचार माजल्यानंतर केंद्र सरकारने निर्देश दिल्यानंतर त्या निकालाचा फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाला भाग पडले होते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची चिरफाड करीत उपवर्गीकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ईडब्लूएस आरक्षणाचा ५६५ पानांच्या आपल्या निकालात एकदाही उल्लेख का केलेला नाही? ही गोष्ट विशेष आणि आश्चर्यकारक नव्हे काय ? असा सवाल माने यांनी यावेळी करत २१ ऑगस्ट रोजी भारत बंद चा इशारा दिला आहे. ०००००

वार्षिक उद्योग पाहणी सन २०२२-२३ च्या क्षेत्रकामाची कार्यशाळा

ठाणे : वार्षिक उद्योग पाहणी क्षेत्रकामासंबंधी संकल्पना सुस्पष्ट होण्याच्या आणि क्षेत्रकामादरम्यान संकलित केलेल्या आकडेवारीची गुणवत्ता उंचाविण्याच्यानुषंगाने अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय / जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सर्व क्षेत्रीय अधिकारी /…

रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते एस. के. नाईक यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती

अशोक गायकवाड     पनवेल : रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती एस. के. नाईक यांची भाजपा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात अली असून सदरचे नियुक्तीपत्र त्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विस्तारित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड.प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानी बंगल्यावर मराठा आरक्षण मुद्द्यावरती मराठा ठोक मोर्चा काढला परंतु पोलिसांनी त्यांना चौपाटीच्या अलीकडेच अडवले आणि गाडीत टाकून अटक केली.

ही होरपळ काय सांगते?

बांगलादेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचे आरक्षण रद्द केल्याने 93 टक्के जागा नोकरभरतीसाठी खुल्या झाल्या होत्या. त्यामुळे आंदोलकांची प्रमुख मागणी मान्य झाली. पदाचा राजीनामा देऊन पंतप्रधान शेख हसिनाही परागंदा झाल्या. परिणामी,…

दोन राष्ट्रगीतांचे जनक ; गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

आज ७ ऑगस्ट, भारत मातेचे महान सुपूत्र , चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगितकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकात्यातील जोर –…

रोजगारक्षम, कौशल्यधारित तरुणाईसाठी

विशेष सचिन केळकर नव्या दमाच्या सरकारने युवकांना रोजगारक्षम आणि कौशल्यधारित करण्यासाठी काही योजना राबवण्याचा मानस व्यक्त केल्यामुळे युवावर्गात समाधानाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. उद्योगविश्वातील गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमांच्या आखणीला…

भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश

मुंबई : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती/ भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार शासनाने काही नवीन जातींचा अंतर्भाव करून तसेच वगळून अद्ययावत यादी तयार केली आहे. नव्या बदलानुसार…

बांगलादेशासारखे महाराष्ट्रात होणार नाही-मनोज जरांगे

वडीगोद्री ( जालना) : आरक्षणाचा विषय सरकारने समजून घेतला पाहिजे. हा विषय साधासुधा नाही, खूप भयानक वेदना आणि आक्रोश समाजात आहे. पण बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर जे झाले ते महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्र सर्व जाती धर्माचा आहे. त्यामुळे इथे…