Month: August 2024

विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी २० ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी – किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०४० रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक निश्चित केले असून आता विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी २० ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने २० जून २ च्या पत्रान्वये १ जुलैच्या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते. भारत निवडणूक आयोगाने २४ जुलैच्या पत्रान्वये या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला करून सुधारीत कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमात निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी ६ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर दावे व हरकती ६ ते २० ऑगस्ट या कालावधीत सादर करता येतील. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून २९ ऑगस्ट पर्यंत दाखल दावे व हरकती निकाली काढल्या जातील. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ३० ऑगस्टला होणार आहे. जिल्ह्यातील मतदारांनी व सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जावळे यांनी केले आहे. 0000

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण जागेवरील झोपडयांचे पुर्नवसन त्वरित करावे,

झोपडपट्टी चळवळ अध्यक्ष घनश्याम भापकर यांचा इशारा केतन खेडेकर   मुबंई अंतराष्टीय विमानतळ प्राधिकरण च्या जागेवर ८० हजार पेक्षा जास्त झोपडयाचे पुर्नवसनाच्या प्रश्नावर शासनाने कोणतीही ठोस भुमिका घेतली नाही. सध्या १२-१२-२००६ ला झालेल्या मियाल आणि एम एमआरडीएमध्ये झालेल्या करार नुसार पुर्नवसन होत नसल्याचे स्पष्ट पणे दिसते आहे. विमानतळ लगत असलेल्या झोपडयां पैकी संदेश नगर व ऋतिनगर बैल बाजार हया ३,७४७ झोपडयांचे पुर्नवसन इतर विमानतळ लगत असलेल्या झोपडयांचे दिशा ठरवणारी आहे. मुबंई अंतराष्ट्रीय विमानतळ जागेवर जागेवरील झोपडयांचे पुर्न वसनसाठी बांधण्यात आलेले एच.डी.आय.एल प्रिमिअर, विदया विहार, येथील ३० इमारती (१०,००० घरां) पैकी फक्त ३ इमारती विमानपतन साठी आरक्षित केल्या आहे. सदर सर्व पात्र व अपात्र झोपड्यांसाठी घर व सुख सुविधा मुबंई अंतराष्ट्रीय विमानतळ चालवणारी अदाणी कंपनीला दयायची जबाबदारी आहे. परंतु अस काही होत नसुन त्या झोपडी धारांच्या हक्काची घर इतर प्रकल्पात सोपवण्याची काम होत आहे. तसेच झोपडीचे हस्तातरण शुल्क (४०,०००) व सहशुल्क (२,५०,०००) अदाणी कंपनीला भरण्यास न सागंता, झोपडीधारकांना भरायला सागीतल्यामुळे हया मोठ्या संकटातुन गरीबाना वाचवण्यासाठी आम्ही येत्या 5 ऑगस्ट पासून आझाद मैदनत बेमुदत आमरण उपोषण करत असल्याची माहिती घनश्याम भापकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी झोपडपट्टी चळवळ समितीचे बाळासाहेब वाघ गणेश गायकवाड, नारायण सावंत, श्रीकांत अडांगळे उपस्थित होते. 000

 ऐरोली सगळीकडे कडकडीत बंद

गणेश नाईक यांच्या विरोधात उपोषण विजय चौगुले यांची प्रकृती ढासळली     ऐरोली:: नवी मुंबई झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मागणीसाठी नवी मुंबई शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या समर्थनार्थ ऐरोली मतदार संघात बंद पाळण्यात आला आहे ऐरोली रबाळे तिघा परिसरात कडकडीत बंद असून अन्यत्र संमिश्र प्रतिसाद आहे बंद साठी कुठलेही आवाहन करण्यात आले नसून व्यापारी नागरिकांनीच उत्स्फूर्तपणे बंद केला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे दरम्यान काल रात्रीपासून विजय चौगुले यांची तब्येत बिघडली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे मात्र त्यांनी उपचार होण्यास नकार दिला आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं वक्तव्य त्यांनी केले आहे. नवी मुंबईतील एमआयडीसी भागात असणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन मागणी मान्य होऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते मात्र ऐरोली चे भाजप आमदार गणेश नाईक यांनी हे काम बंद केले या विरोधात विजय चौगुले शिवसेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष यांनी त उपोषण एक ऑगस्ट पासून सुरू केले यादरम्यान काल रात्रीपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते अध्याप त्यांना आराम पडलेला नाही  अशी माहिती चौगुले यांच्या  आजपर्यंत स्विय सहाय्यक यांनी दिली. चौगुले यांनी पुकारलेल्या बंद याच्या समर्थनार्थ ऐरोली मतदार संघात संपूर्णपणे बंद पाळण्यात आला आहे व्यापाऱ्यांनी यांना उत्स्फूर्तपणे समर्थ म्हणून बंद पुकारला आहे ऐरोली दिघा परिसरात कडकडीत बंद असून कोपरखैरणे आणि घनसोलीत बहुतांश दुकाने बंद होती मात्र वैद्यकीय सेवा देणारे दुकाने आणि दवाखाने सुरू आहे. 0000

ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अर्थशास्त्राचे शिक्षक प्रा. डाँ श्रीरंग कुडुक निवृत्त

ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयातील अर्थशास्त्र शिकविणारे लोकप्रिय प्रा. डाँ श्रीरंग कुडुक सर नुकतेच निवृत्त झाले असून त्यांच्या निवृतीनिमीत्ताने एका विविधरंगी कार्यक्रमाचे नियोजन पारसिकनगर कळवा येथे करण्यात आले होते  ! आपल्या शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते विद्यार्थी वर्ग , मित्रमंडळी, राजकीय नेते मंडळी,  सामाजिक क्षेत्रात फार लोकप्रिय होते. अनेक मित्रमंडळी त्यांचा अजातशत्रू म्हणून उल्लेख मोठ्या सन्मानाने करीत करतात . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते  , खेडेगावातील झाडाच्या पारावर भरणाऱ्या शाळेत चौथी पर्यंत शिक्षण घेत पुढे स्वकष्टाने त्यांनी अनेक हाल अपेष्ठांचा सामना करीत त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. वेळ प्रसंगी गवताची कापणी केली तर विद्यार्थी दशेत अर्थांजनासाठी कँन्टीन चालविण्याचे काम ही केले  , एकच वही इयत्ता पास झाल्यानंतर ती नदीच्या पात्रात धुवून पुन्हा दुसर्‍या इयत्तेत त्यांना वापरावी लागली हे वास्तव त्यांनी मनात जपून ठेवले आहे . या सर्व गोष्टींचा बाऊ न करता उत्तरोत्तर प्रगती करत त्यांनी यशाचे शिखर सर केले आहे  , या सगळ्या संधर्षमय आयुष्यात त्यांना त्यांच्या मातोश्री श्रीमती मालनबाई यांचा आशीर्वाद आणि सुविद्य पत्नी जेष्ठ कवयित्री प्रा. नलिनी कुडुक यांची फार मोलाची साथ लाभली हे ते मोठ्या मनाने कबुल करतात  . कुडुक दापत्यांचे सामाजिक क्षेत्रात सुध्दा योगदान असुन अनेक यशस्वी कामे त्यांनी कुठल्याही प्रसिद्धच्या मागे न लागता पार पाडली  ! त्यांच्या निवृतीनंतरच्या समारंभात त्यांच्या मातोश्रींचा नव्वदीचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला  , कलाक्षेत्र  , राजकीय क्षेत्र  , सामाजिक  , साहित्यिक , शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या समारंभात उपस्थित होती  , या समारंभाच्या निमित्ताने स्वागतपर भाषणे  , कराओके संगीत मेजवानी  , लावणीनृत्य  , अशा विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . शेकडो कुडुकप्रेमी लोकांनी या कार्यक्रमात आपला सहयोग नोंदवला  ! या कार्यक्रमाचे नियोजन , सूत्रसंचालन ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ कवि लेखक बाळ कांदळकर यांनी केले तर स्वत: प्रा डाँ श्रीरंग कुडुक आणि प्रा. नलिनी कुडुक यांनी सर्वांचे आभार मानले. 00000

 नाना शंकरशेठ यांचे चरित्र अभ्यासक्रमात

मुंबईच्या अधिष्ठाता डॉ. सौमित्रा सावंत यांनी दिली माहिती     मुंबई, दि. (प्रतिनिधी) :  डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई च्या कला शाखेच्या (द्वितीय वर्ष) अभ्यासक्रमासाठी फलटण येथील तरुण लेखक, साहित्यिक, चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांच्या चरित्राची निवड झाली असल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. सौमित्रा सावंत यांनी दिली आहे. डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ हे मुंबईतील शंभर वर्षापेक्षा जास्त  इतिहास असणाऱ्या व पूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या एल्फिन्स्टन कॉलेज, सिडनहॅम कॉलेज,सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज आणि द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,या महाविद्यालयांचे एकत्रित सार्वजनिक संशोधन विद्यापीठ असून या विद्यापीठाची स्थापना सन २०१९ मध्ये करण्यात आलेली आहे. मुंबईच्या शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतीक, जडणघडणीमध्ये या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या महाविद्यालयांचे योगदान मोलाचे आहे.या महाविद्यालयामधून मुंबईच्या शिल्पकाराचे अर्थात नाना शंकरशेट यांचे चरित्र विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. अमर शेंडे हे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे कार्यवाह असून गेली वीस वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या यशवंतराव चव्हाण विचारधन एक सुवर्ण ठेवा या पुस्तकाची हैदराबाद येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय,कलकत्ता व महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ भेट योजनेसाठी निवड झाली होती.तसेच मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या वरील त्यांच्या बाळशास्त्री या चरित्रा ची दखल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांनी घेतलेली आहे.तसेच अमर शेंडे यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणे येथील प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या चरित्र ग्रंथाच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव विलास पाध्ये, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, सदस्य रवींद्र बेडकीहाळ, सचिव डॉ मीनाक्षीताई पाटील, राजकीय विश्लेषक जेष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी तथा गुरुजी, एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौमित्रा  सावंत, विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास कुलकर्णी, सिडनहॅम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्रीनिवास धुरे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.सुविधा सरवणकर, न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेच्या संचालक प्रा. वंदना कांबळे, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर व दैसपचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, एल्फिन्स्टन चे प्रा.बाळासाहेब खोमणे, साहित्य मंडळाचे प्रपाठक रामेश्वर रोकडे यांनी अमर शेंडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. 0000

मुंबईतून ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सहा लाख अर्ज

प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश     मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी संपूर्ण मुंबईतून आतापर्यंत सुमारे सहा लाख अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून छाननीसाठी प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना दिले आहेत. अर्जांची छाननी वेगाने पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. राज्यातील महिला वर्गाला खूश करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याचा या योजनेचा उद्देश असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत मुंबईमध्ये ही योजना राबवली जात आहे. महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पात्र महिलांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. शिवाय, विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नागरी सुविधा केंद्रावरही (सीएफसी) ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडे आतापर्यंत शहर विभागातून सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत, तर उपनगरातून सुमारे चार लाख अर्ज आले आहेत. अजून अर्ज येण्याची शक्यता असून एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या अर्जांची छाननी करणे हे आता मुंबई महानगरपालिकेपुढचे आव्हान आहे. दोन पाळ्यांमध्ये छाननीचे काम अर्जांची छाननी वेगाने व्हावी याकरिता पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयात १० संगणक उपलब्ध करून स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. प्रत्येक संगणकावर सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री अकरा अशा दोन पाळ्यांमध्ये काम करावे. प्रत्येक पाळीमध्ये या योजनेची सखोल माहिती असलेल्या पर्यवेक्षकांची नेमणूक करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. जाहिरातींसाठी पालिकेचा निधी? या योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने १२ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकात योजनेची संपूर्ण माहिती देणारे फलक लावण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्याकरिता आवश्यक निधी वॉर्ड स्तरावर उपलब्ध अन्य निधीतून करावा असे निर्देश दिले होते. त्यामुळे या योजनेसाठी पालिकेचा निधी का, असा सवाल पालिका वर्तुळात विचारला जात होता. मात्र सुरुवातीच्या काळातील हे परिपत्रक असून नंतर काढलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीपैकी एक टक्का निधी हा या योजनेच्या जाहिरातीसाठी वापरावा असे निर्देश दिले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

उल्हासनगर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 200  विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मरसाळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. उल्हासनगर प्रभाग क्रमांक 7, गरीबनगर  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय या  ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेते, राजेंद्र चौधरी, युवासेना नेते बाळा श्रीखंडे  भाजप नेते संजय सिंग, टी ओ के प्रवक्ता.कमलेश निकम, माजी नगरसेवक डॉ सुरेंद्र सिंग .मातंग समाज नेते सुभाष मरसाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते नामदेव मरसाळे.सखाराम कनगरे  अशोक उमाप. दिलीप अवसरे ,शालिक साळवे, सागर पगारे ,रवीद्र सौदागर ,अतुल शिंदे,प्रकाश ससाणे ,आजय नन्नवरे ,हरी पवार.,राहुल सौदागर आकाश कांबळे, शंकर कांबळे, सोनू गुप्ता. शंकर मरसाळे आदी उपस्थित होते.…

महसूल पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न

कल्याण : ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कल्याण तालुक्यातील जांभुळ येथे महसुल पंधरवडा अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, वृक्षारोपण, विविध दाखल्यांचे वाटप या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे…

बारवी धरण ८९ टक्के भरले

मुसळधार पावसाने सात टक्क्यांची भर     बदलापूर: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणात रविवारी सकाळपर्यंत ८९ टक्के पाणी जमा झाले होते. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या २४ तासात सात टक्के पाण्याची भर धरणात झाली. त्यामुळे समाधान व्यक्त केले जाते आहे. शनिवारी २४ तासात धरण क्षेत्रात सुमारे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे बारवी धरण ८२ टक्क्यांवरून थेट ८९ टक्क्यांपर्यंत पोहोचले. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका आणि औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेले बारवी धरण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरावे अशी सर्वांची आशा असते. त्यामुळे वर्षभर उद्योग आणि पिण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होते. यंदाच्या वर्षात कडक उन्हाळ्यामुळे बारवी धरणाची पाणी पातळी २५ टक्क्यांपर्यंत खाली आली होती. त्यानंतर जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरण क्षेत्रातील साठा समाधानकारक नव्हता. मात्र जुलै महिन्यात पावसाने संततधार का होईना धरणाच्या पाणी पातळीत वाढ केली. सुरुवातीचे तीन आठवडे संथगतीने बारवी धरणात पाणी साठा झाला. मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे बारवी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला. २४ ते २६ जुलै या तीन दिवसात बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. २३ जुलै रोजी बारवी धरणात ५१ टक्के इतका पाणीसाठा होता. तर २६ जुलै रोजी धरणात ६८ टक्के पाणीसाठा होता. या तीन ते चार दिवसाच्या पावसामुळे बारवी धरण वेगाने भरले. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने बारवी धरण संथ गतीने भरत होते. शनिवारी बारवी धरण क्षेत्रात सुमारे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे बारवी धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली. बारवी धरणात शनिवारी ८२ टक्के पाणीसाठा होता तर रविवारी हा पाणीसाठा ८९ टक्क्यांवर पोहोचला. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या काही दिवसात बारावी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अशा व्यक्त होते आहे. रविवारी बारवी धरणाची पाणी पातळी ७१.४० मीटर पर्यंत होती. धरणात सध्या ३०१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा कमीच आहे. गेल्यावर्षी ४ ऑगस्ट रोजी बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले होते. 000000

ठाण्यातील पाचही मतदारसंघात भाजपाच्या नेतृत्वाखाली विजयाचा संकल्प

भाजपा ठाणे जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार     ठाणे : भाजपा ठाणे शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, कळवा-मुंब्रा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व उमेदवांरांच्या विजयाचा संकल्प शनिवारी करण्यात आला. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महायुतीच्या नेत्यांनी ठरविलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्य करण्याचा निर्धार भाजपाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले. भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या महाअधिवेशनानंतर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक खारकर आळीतील महाजनवाडी येथील सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे लोकसभा विस्तारक जयप्रकाश ठाकुर, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ठाणे शहर विधानसभा प्रमुख सुभाष काळे, ओवळा-माजिवडा विधानसभा प्रमुख मनोहर डुंबरे, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती, माजी नगरसेवक संदीप लेले, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरज दळवी आदींसह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या बैठकीला पालघरचे भाजपा खासदार हेमंत सवरा यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येत होते. मात्र, अपरिहार्य कारणामुळे ते अनुपस्थित होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी प्रस्तावना केली. या बैठकीत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रदेश महाअधिवेशनात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार विधानसभा निवडणुकीपर्यंत कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तर आमदार निरंजन डावखरे यांच्या सूचनेनुसार, कोकणात सहापैकी पाच जागांवर महायुतीचा झेंडा फडकविण्यात महत्वाचे योगदान असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन केले. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून खोटे नरेटिव्ह प्रस्थापित करण्यात आले होते. त्याचा मुकाबला भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने करून मतदारांना भाजपाची भूमिका पटवून द्यावी. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचवावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याबरोबरच त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.  नवमतदारांच्या नोंदणीबरोबरच लोकसभा निवडणुकीत वगळलेली व गायब झालेल्या मतदारांची आवर्जून नोंदणी करून घ्यावी. माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चाबरोबरच मंडलांमध्येही मतदारनोंदणी शिबिरे सुरू आहेत. मतदारनोंदणीबाबत सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत, अशा शब्दांत जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. 00000