भायंदर मधील इंद्रलोक परिसरात होणारं स्मृती उद्यानाला स्थानिकांचा विरोध झाल्यावर आमदार प्रताप सरनाईकांनी निर्णय फ़िरवला. त्या संदर्भात त्यांच्या कार्यालयात स्थानिकाची सभा घेण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून स्थानिकांचं म्हणणं त्यांनी मान्य केलं. याच व्यासपीठावर त्यांनी आयुक्ताना बोलवून त्यासंबंधिचे पत्र त्यांच्या हातात सुपूर्द केले.
यासंदर्भात आता आयुक्तानावर टीका होतं आहे . राष्ट्रवादी च्या फारुखी यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली आहे तसेच भाजपाने सोशल मीडिया वर भरपूर टीका केली आहे. यासंदर्भात आयुक्ताशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
