जम्मू : जम्मू–काश्मीरमधिल विधानसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. ओमर अब्दुल्ला आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले की, राज्यात पुन्हा एकदा दहशतवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र भाजप सरकार दहशतवाद जमिनीत गाडून टाकेल असे त्यांनी ठणकावून सांगितले.
“काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आले तर दहशतवाद सुरू होईल. मी तुम्हाला वचन देतो. आम्ही दहशतवादाला गाडून टाकू. आम्ही दहशतवादाला अशा स्तरावर गाडून टाकण्याचा संकल्प केला आहे की, तो परत येऊ शकत नाही.” याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे वातावरण पाहत असल्याचे सांगत ना अब्दुल्लांचं सरकार बनतंय ना राहुल गांधींचं सरकार. यावेळी खोऱ्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा दावा अमित शाह यांनी केला आहे.
