सदाबहार अभिनेते; देव आनंद
हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार, चिरतरुण आणि चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते जेष्ठ सिनेअभिनेते दिवंगत देव आनंद यांची आज १०१ वि जयंती. १०१ वर्षांपुर्वी अजच्याच दिवशी म्हणजे २६…
हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार, चिरतरुण आणि चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते जेष्ठ सिनेअभिनेते दिवंगत देव आनंद यांची आज १०१ वि जयंती. १०१ वर्षांपुर्वी अजच्याच दिवशी म्हणजे २६…
भारतीय कामगार चळवळीच्या देदीप्यमान इतिहासात माथाडी कामगार चळवळीला अन्यन्य साधारण असे महत्व आहे. कारण माथाडी कामगारांचे भाग्यविधाते कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या अथक परिश्रमाने तसेच जिद्द आणि चिकाटीने महाराष्ट्रातील माथाडी…
उद्धव ठाकरेंनी ठणकावले मुंबई : महाराष्ट्र दौऱ्यावर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा उल्लेख बाजारबुणगे असा केला असून, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रामधून कुणीच संपवू…
नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये सभा घेत विधानसभा निवडणुकीची रणनीती सांगितली आहे. एकीकडे गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडलेली…
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पाच वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. त्यांच्या नावावर सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित…
भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप! मुंबईच्या पूर्व उपनगरात दुपारपासून तुफान पाऊस सुरू असून काही ठिकाणी रस्त्याला नदीचं रुप प्राप्त झालं आहे. भांडूप, मुलुंड परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. नागरिकांना साचलेल्या पाण्यातून प्रवास…
पाडापाडी झाल्यास जबाबदार नाही, जरांगे यांचा सरकारला इशारा जालना : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी नवव्या दिवशी त्यांचं उपोषण थांबवलं आहे. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण स्थगित करावं अशी मागणी अंतरवाली…
अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी हायकोर्टाच्या पोलिसांवर प्रश्नांच्या फैरी मुंबई : नॉर्मली, एन्काऊंटरला तुम्ही डोक्यात गोळी मारता का? असा थेट सवाल आज न्यायमुर्तींनी सरकारी वकीलांना विचारत बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी प्रश्नांच्या फैरीच झाडल्या… बदलापूर चिमुरडींवरील अत्याचार…
पक्षीगृहाऐवजी अत्यावश्यक सुविधांची मागणी मुंबई : पूर्व उपनगरातील नाहूर गावात महापालिकेच्या भूखंडावर पक्षीगृह (बर्ड पार्क) उभारण्याच्या प्रस्तावाला वन्यजीव तज्ज्ञांनी विरोध केला आहे. येथे पक्षीगृह उभारण्याऐवजी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नाहूर गावातील भूखंडावर पक्षीगृह उभारण्याच्या पालिकेच्या योजनेबाबत ‘रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी महापालिकेला सूचना आणि हरकती सादर केल्या आहेत. महापालिकेबरोबरच शर्मा यांनी या सूचना आणि हरकतींसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये पक्षीगृहाच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला आहे. त्याऐवजी पक्षी-प्राण्यांबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या, अशी मागणी केली आहे. वन्यजीव बचाव केंद्र, प्राणी जन्म नियंत्रण केंद्र, प्राणी अनाथाश्रम, प्राणी स्मशानगृह ही काळाची गरज असून अशा सुविधांवर भर देणे गरजेचे आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्षीगृहापेक्षा प्राणी आणि पक्ष्यांची काळजी चांगल्या पद्धतीने कशी घेता येईल यावर भर देणे आवश्यक आहे. तस्करी तसेच शिकारीचे प्रमाणही बऱ्यापैकी वाढले आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. याचबरोबर पक्ष्यांसाठी पर्यावरणाचा समतोल कसा साधता येईल याकडे लक्ष द्यायला हवे, असे मत ‘रॉ’चे पवन शर्मा यांनी व्यक्त केले. नाहूर गावात महापालिकेच्या मालकीचे सुमारे १७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन भूखंड असून त्यावर हे पक्षीगृह प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या सल्लागारावर सार्वजनिक सुविधांसह पक्षीगृहाचा आराखडा व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आली होती. सल्लागाराला पक्षीगृहाचे चित्र, तपशीलवार प्रकल्प आरेखन आणि बांधकामादरम्यान देखरेख याबाबत अहवाल तयार करावा लागणार आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळविण्याबरोबरच पक्ष्यांच्या प्रजाती निवडणे आणि सार्वजनिक सुविधांचा आराखडा तयार करणे आदी बाबीदेखील अपेक्षित आहेत. उपनगरातील पहिले पक्षीगृह भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि वनस्पती उद्यानात (राणीची बाग) जुना पक्षी विभाग आहे. या विभागात देश-विदेशातील विविध पक्ष्यांचा विहार आहे. नाहूरमधील पक्षीगृह उपनगरातील हे पहिले पक्षीगृह ठरणार आहे. या पक्षीगृहात विविध देशांमधील पक्ष्यांचे स्वतंत्र विभाग असणार आहेत. संबंधित विभागात त्या त्या देशातील पक्षी पाहायला मिळणार आहेत.
कल्याण : कल्याणमधील शंकरराव चौक, दुधनाका-पारनाका ते टिळक चौक या यु आकाराच्या रस्त्याचे रूंदीकरणाचे काम कल्याण डोंबिवली पालिकेकडून २४ वर्षापूर्वी करण्यात आले. या रस्ते रुंदीकरणातील बाधितांना पालिकेने कारवाईपूर्वी कोणतीही सूचना…