Month: September 2024

उपोषणाचा चौथा दिवस, जरांगेंची प्रकृती खालावली

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावली आहे. सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करुन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. जरांगेंना उपोषणाच्या चौथ्या दिवशी चालणं देखील मुश्कील झालं आहे. सहकाऱ्यांचा आधार घेत ते चालताना दिसत आहेत. मनोज जरांगे यांना थकवा जाणवतोय. ते स्टेज वरून खाली उतरताना ते अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांना उठता येत नव्हते. दरम्यान, सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. तिसऱ्या दिवशीच मनोज जरांगेची शुगर लेवल डाऊन झाली होती. शिवाय त्यांना थकवा जाणवत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने आज जरांगे यांची तपासणी केली होती. यावेळी त्यांना  उपचार घेण्याची विनंती केली होती. मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी सांगितले. आजवर मराठा समाजाने सहकार्याचीच भूमिका घेतली आहे. एक वर्षापासून लढा सुरू आहे.  लाखोंची जनता रस्त्यावर उतरल्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याच वाईट वाटायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया म्हणून जरांगे यांनी दिली होती. मनोज जरांगेंचे सध्या सहावे उपोषण सुरु आहे. आपण सरकारला  संधी देत असून आजवर कोणी काय दिल? यापेक्षा सत्तेत असून जनतेचा तुम्हाला फायदा करायचा नसेल तर तुम्हाला कोण सोडेल? असे सवाल मनोज जरांगे…

महायुतीत महाधुसफूस

अजितदादांचा आमदार भाजपाच्या नीतेश राणेविरोधात आक्रमक कारवाईसाठी फडणवीसांना लिहीले पत्र मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणेंवर कारवाई करा म्हणूण महाविकास आघाडीच्या आमदाराने नव्हे तर महायुतीतीलच अजित पवारांच्या आमदाराने आघाडी उघडलीय. नीतेश राणे…

मराठा, ओबीसी आंदोलनानंतर आणखी एका मोठ्या आंदोलनाला सुरुवात

ठाणे: पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागामध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्न…

आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन

पनवेल : पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागांमध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्या चे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत…

ग्रामपंचायती अंतर्गत नल जल मित्रांची होणार नियुक्ती – रोहन घुगे

ठाणे : जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी/ प्लंबर, मेकॅनिक/फिटर व इलेक्ट्रिशियन/पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जल…

शाश्वत पर्यावरणपूरक विकासाकडे लक्ष देत अभियंत्यांनी अद्ययावत रहावे – आयुक्त डॉ.कैलास शिंदे

नवी मुंबई महानगरपालिकेत अभियंता दिन उत्साहात साजरा   नवी मुंबई : भारतरत्न एम.विश्वेश्वरय्या यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून प्रत्येकाने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे व त्याचा आपल्या कामात वापर केला पाहिजे…

आजपासून भारतात प्रथमच जागतिक फिटनेस फेस्टीवल

ठाणे : शनिवार आणि रविवारी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे जागतिक फिटनेस फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सुमारे सात हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजक…

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवरील वर्दळीच्या ठिकाणची उपहारगृहे हटवली

डोंबिवली : रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन या रेल्वे स्थानकातील फलाटांवरील प्रवासी गर्दीला अडथळा ठरणारी उपहारगृहे हटविण्यात आली आहेत. ही उपहारगृह रेल्वे स्थानका बाहेरील रेल्वेच्या हद्दीत तिकीट खिडकीजवळ,…

आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर

आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामे रखडणार असल्याने वाहन मालक अस्वस्थ   कल्याण : अनेक वर्षाच्या आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे ६६ वर्ष नेतृत्व…