Month: September 2024

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे भाजपातर्फे आज रक्तदान शिबीर

 संजय वाघुले यांच्याकडून सॅटीस पुलाखाली शिबीर   ठाणे : भाजपाचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय संतु वाघुले यांनी आज शुक्रवारी ,  ठाणे रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटीस पुलालगत भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस हा रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने कोकणातील अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनीही ठाणे रेल्वे स्टेशनजवळ सॅटीस प्रकल्पालगत उद्या शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत शिबीर भरविले आहे. या शिबिरात रक्तदान करून नागरिकांनी सामाजिक जाणीव जोपासून गरजूंना जीवन द्यावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले आहे. या शिबिराच्या यशस्विततेसाठी भाजपाचे सर्व माजी नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांकडून मेहनत घेतली जात आहे.

सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुंबई, : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात…

 ‘पर्यटन आणि शांतता’ हे यंदाच्या पर्यटन दिनाचे घोषवाक्य

 एमटीडीसीमार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रम मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे २७ सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन २०२४’ साजरा करण्यात येणार आहे. युनायटेड नेशन टुरिझम (UN TOURISM) द्वारे सन २०२४ करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Theme) ‘पर्यटन आणि शांतता’ (“Tourism & Peace”) हे घोषित करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये यांच्यातर्फे ‘पर्यटन व शांतता’ या विषयाच्या अनुषंगाने परिसंवाद, चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी  दिली आहे. यावर्षी जॉर्जियाची राजधानी तीबीलीसी येथे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक पर्यटन दिन हा केंद्रिय पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत ‘एमटीडीसी’ची प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स, कलाग्राम इ. ठिकाणी २७ सप्टेंबरपर्यंत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत ‘पर्यटन दिन’ साजरा  करण्यात येणार आहे. एमटीडीसी प्रादेशिक कार्यालयांमार्फत परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ज्ञ व पर्यटन व्यावसायिकांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचबरोबर निबंध स्पर्धांचे प्रत्येक प्रादेशिक स्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी  पर्यटन : शांतता स्थापित करण्याचे एक साधन, पर्यटन व जागतिक शांतता, महाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश, माझ्या स्वप्नातले पर्यटन, भारत व पर्यटन : शांततेचे दूत आणि प्रतिक असे विषय  ठेवण्यात आले आहेत. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून ‘पर्यटन व शातंता’ या घोषवाक्याशी निगडीत प्रत्येक प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा  देखील आयोजित करण्यात येणार आहे. निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्याला पर्यटक निवासात दोन व्यक्तींना २ रात्री ३ दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह. (संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितील पर्यटक निवासात), व्दितीय पारितोषिक विजेत्याला पर्यटक निवासात २ व्यक्तींना १ रात्र २ दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह (संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितीतील पर्यटक निवासांत), तृतीय पारितोषिक विजेत्याला जवळच्या पर्यटक निवासात २ व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस्था दुपारचे जेवण प्रमाणपत्र+ स्मृतीचिन्ह अशी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. पर्यटक निवासांमध्ये माहितीपत्रकांचे प्रकाशन करणे. पर्यटक निवासांत वास्तव्यास आलेल्या पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालून, पर्यटक निवासी वास्तव्यास आलेले अतिथी पर्यटकांना नजिकच्या सुरक्षित- पर्यावरणपूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल, नेचर वॉकचे आयोजन करावे जागतिक पर्यटन दिनाचे उपक्रम प्रभावीप्रणे राबवावे असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सूर्यवंशी यांनी केले आहे. एमटीडीसीच्या  पर्यटन दिनानिमित्त राज्यभर होत असलेल्या प्रादेशिक कार्यालयातील विविध कार्यक्रम, परिसंवाद, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, अनुभवात्मक पर्यटनाची नोंद जागतिक पर्यटन संघटना युनायटेड नेशन्सने घेतली असून  ही  माहिती युनायटेड नेशन्सच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या स्पर्धेसाठी एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, राज्यातील प्रत्येक प्रादेशिक व्यवस्थापक, मानसी कोठारे हे कार्यरत आहेत.

‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडयात विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छता संस्कार

नवी मुंबई : संपूर्ण देशभरात 2 ऑक्टोबरपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा स्वच्छ भारत मिशनच्या आदेशानुसार साजरा करण्यात येत असून या अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ अभियान राबविले जात आहे.…

आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश संपादन करा-राज्यपाल

अशोक गायकवाड अहमदनगर : जीवनात अनेक समस्यांना सामोरे जातांना न डगमगता आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास यश संपादन करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.* लोणी बु. येथील प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पद्मश्री सावजी ढोलकीया, विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे, संस्थेचे विश्वस्त सुवर्णा विखे पाटील, मोनिका सावंत, ध्रुव विखे पाटील, कुलसचिव डॉ. अरुण कुमार व्यास आदी उपस्थित होते. स्नातकांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन राज्यपाल म्हणाले, अनेक महापुरुषांच्या जीवनात आव्हानाचे प्रसंग आलेत, त्यांनी आत्मविश्वासाने त्यावर मात करून उद्दिष्ट गाठले. स्नातकांनी सेवा भावनेने कार्य करताना स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नये. आपल्या यशासाठी आई-वडिलांनी परिश्रम घेतले आहेत हे न विसरता त्यांच्याविषयी कायम श्रद्धा मनात बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.राधाकृष्णन पुढे म्हणाले, लोणीसारख्या ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी आणि समर्पित कार्याच्या बळावर प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठासारखी संस्था उभी राहू शकते हे संस्थेसाठी झटणाऱ्या स्व.विठ्ठलराव विखे पाटील आणि स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे विद्यापीठाचे कार्य इतरांना मार्गदर्शक आहे. वर्षभरात दहा लाख नागरिकांना उपचार देण्याचे संस्थेचे कार्यदेखील उल्लेखनीय आहे. सामान्य कुटुंबीयातून आलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण विद्यापीठात देण्यात येते. सेवाभावनेने काम करणारे डॉक्टर्स येथून तयार होतात. विद्यापीठाने रुग्णावर उपचार करण्यासाठी बहुशाखीय दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि अवयव प्रत्यारोपणसारख्या सुविधा इथे उभारण्यात येत आहेत. संस्थेची प्रगती खरोखर कौतुकास्पद असल्याचे राज्यपाल म्हणाले. मंत्री विखे पाटील म्हणाले, प्रवरा आरोग्य विद्यापीठाच्या माध्यमातून सेवा कार्य सुरू आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले. त्यांची प्रेरणा घेऊन विद्यापीठाचे कार्य सुरू असून सामाजिक बांधिलकीने समाजाच्या प्रत्येक घटकाला सेवा देण्याचे कार्य होत आहे. समर्पण, सामाजिक उत्तरदायित्व, सेवा कार्याची परंपरा प्रवरा आरोग्य विद्यापीठ पुढे नेत आहे, असे त्यांनी सांगितले.वैद्यकीय क्षेत्रात काम करतांना विद्यार्थ्यांनी नवीन संशोधनावर भर देऊन त्याचा समाजासाठी उपयोग करावा असे विद्यार्थ्यांना आवाहन करून श्री.विखे पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पद्मश्री सावजी ढोलकिया यांनी सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्याचेही ते म्हणाले.पद्मश्री ढोलकीया म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मोठे यश संपादन करू शकतात. विद्यार्थ्यांनी आपण सर्वोत्तम असल्याचा आत्मविश्वास बाळगावा. मी कोणत्याही परिस्थितीत उद्दिष्ट गाठू शकतो, ईश्वर चांगले प्रयत्न करणाऱ्याच्या सोबत असतो, मी विजेता आहे हा विचार मनाशी बाळगा. मागचे अपयश विसरून वर्तमानात विजेत्याचा आत्मविश्वास बाळगून काम करा. नशिबावर अवलंबून न राहता विश्वासाने काम केल्यास यश संपादन करता येते. सेवा ही सर्वोत्तम गुंतवणूक असून त्याआधारे सर्वोत्तम यश मिळविता येईल, असा प्रेरक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. मिळालेला सन्मान जबाबदारी म्हणून स्विकारत असून अधिक चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील म्हणाले, ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यासाठी अशा भागात सेवा देणारे कुशल वैद्यकीय अधिकारी घडविण्याचे कार्य विद्यापीठ करीत आहे. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रवरा विशेषोपचार रुग्णालय आणि अवयव प्रत्यारोपण केंद्राचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले. पदवीदान समारंभात ९ स्नातकांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली, तर विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. ९४९ पदवी आणि पदव्युत्तर स्नातकांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात दीक्षांत संचलनाने झाली. कार्यक्रमाला कार्यकारी परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 00000

उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांची मुंबईत बदली

उल्हासनगर: उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांची मुंबईत बदली झाली आहे. उल्हासनगर शहरासाठी त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना शहरातून मोठ्या सन्मानाने निरोप देण्यात आला. उल्हासनगर कॅम्प ३ येथील…

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

 दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बाबींचा समावेश करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी   पनवेल : सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे त्यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीस आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार संदीप नाईक, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, सिडकोचे अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी सर्वसमावेशक निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाकडून अंतिम कार्यवाही सुरु आहे, त्याच अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बाबींचा त्यात समावेश करावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज मुंबई येथे झालेल्या नगरविकास विभागाच्या बैठकीत केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांना निवेदनही दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि,  स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्याने मुख्यमंत्री साहेब तसेच पालकमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून आणि पत्राद्वारे सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत ती नियमित करून सकारात्मक निर्णय घेण्याकरिता पाठपुरावा करीत आहोत. त्या अनुषंगाने सदर घरे नियमित करत असताना प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीतील बाबींचा अंतर्भाव अत्यंत आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करताना गावठाणाबाहेरील प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या विशिष्ट हद्दीचा विचार न करता अर्थात सर्व बांधकामांचा विचार होणे आवश्यक असून प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या निवासी बांधकामांसोबतच अंशतः वाणिज्य किंवा भाडेकरू वापर (निवासी/वाणिज्य/भाडेकरू वापर) ही बांधकामेदेखील नियमित करणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच ठिकाणी त्यावरच प्रकल्पग्रस्तांच्या कुटूंबियांची उपजिविका अवलंबून आहे, त्यामुळे याबाबतही सकारात्मक कार्यवाही झाली पाहिजे. सिडको व्यतिरिक्त नवी मुंबईतील या ९५ गावाअंतर्गत एमआयडीसी अथवा अन्य शासकीय जमिनीवरील प्रकल्पग्रस्तांची घरे देखील नियमित होणे आवश्यक आहे. बिगर प्रकल्पग्रस्तांकरिता रहिवासी वापराकरीता नियमित करणेबाबत शासनाचा / सिडकोचा दर देखील मर्यादित राहिला पाहिजे कारण ही बांधकामे प्रकल्पग्रस्तांनीच बांधलेली असून बिगरप्रकल्पग्रस्तांना राहण्याकरिता अथवा भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. (त्यामुळे दर हा सिडको Reserve Price च्या ३०% ते ५०% असावा ३०० % नको),  यापूर्वी ज्यांना १२.५% योजनेअंतर्गत भूखंडांचे वाटप झाले आहे व ज्यांची बांधकामाची पात्रता त्यामधून वगळण्यात आलेली आहे, सर्वप्रथम अशा सर्व प्रकल्पग्रस्तांची नोड निहाय माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच त्या सर्व प्रकल्पग्रस्तांना जर त्यांच्या वगळलेल्या पात्रतेएवढा भूखंड देणे शक्य नसेल तर वगळलेल्या क्षेत्राएवढा टीडीआर देण्यात यावा व तो टीडीआर त्याच क्षेत्रांत अथवा नोडमध्ये वापरणे शक्य नसल्यास, आजूबाजूच्या क्षेत्रांत अथवा नोडस् मध्ये वापरण्यासाठी परवानगी देण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करीत असताना गावठाणामध्ये अथवा गावठाणाबाहेर अस्तित्वातील कातकरी, ठाकूर, मागासवर्गीय तसेच अन्य भूमीहीन कुटूंबांची घरे देखील नियमित करणेबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. गरजेपोटी घरे नियमित करीत असताना, मुख्य रस्ते, मुलभूत सोयीसुविधा, सामाजिक सेवा भूखंड, आरक्षण, डीपी आरक्षण अशा ठिकाणी येणाऱ्या सर्व जुन्या बांधकामांना योग्य तो मोबदला अथवा टीडीआर देणे आवश्यक आहे. गरजेपोटी क्षेत्राबाहेरील भूखंडांचे सिडकोतर्फे वाटप करताना त्या परिसराकरिता सामाजिक सुविधा तसेच नागरिकांच्या सामाजिक सोयींकरता प्रथमतः भूखंड आरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर उर्वरीत भूखंडांचे (१२.५%) वाटप करणे गरजेचे आहे. या बाबी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उल्लेखित करून प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करून त्यांना दिलासा देताना या बाबींचाही त्यात समावेश करावा, अशी मागणी या बैठकीत केली .

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

पनवेल : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी पनवेलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. युवा मोर्चाच्यावतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेले हे शिबीर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत 8 ही विभागात अनधिकृत बॅनर्स विरुध्द कारवाई नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अनधिकृत बॅनर्स विरुध्द नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने 8 ही विभागात कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 8 ही विभागात दि.18/09/2024 व दि.19/09/2024 रोजी या दोन दिवसात छोटे बॅनर 1893 व मोठे बॅनर 623 असे एकुण 2516 बॅनर्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीचे बॅनर प्रिंट करुन देणारे एकुण 22 प्रिंटींग करणाऱ्या व्यवसायीकांना विभाग कार्यालयामार्फत लेखी सुचना देण्यात आल्या. त्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे जाहिरात/बॅनर्स/पोस्टर्स छापु नये व तसे केल्यास त्यांना महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम 1995 चे कलम 3 नुसार कारवाई करण्यात येईल अश्याही सुचना देण्यात आल्या. यापुढे अनधिकृत बॅनर्स/होर्डींग्ज विरुध्द कारवाई तीव्र करण्यात येणार आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर – डॉ.जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर   भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आ. डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या संदर्भात डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपणाला दोन्ही समाजातील सुजाण नागरिकांनी माहिती दिली की,   जर या पोलीस उपायुक्तांनी मध्ये उडी घेतली नसती तर भिवंडीत दंगल झाली असती; दंगल रोखणार्‍या अधिकाऱ्याला असे बक्षिस दिले जात असेल तर संपूर्ण पोलीस दलाचे मनोबल खच्चीकरण होणार नाही तर काय होईल? आपणाला अंतर्गत माहिती अशी मिळत आहे की, या बदलीला  पोलीस दलातील अनेकअधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. तेथील बीजेपीचा  एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता.  दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम म्हणून पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली. याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकारला आगामी निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असल्याचे सर्वे आले आहेत. त्यामुळेच धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी काहीही करून सत्ताधारी वर्गाला दंगल भडकवायची आहे.  पोलिसांना हत्यार म्हणून पुढे पाठवायचे आणि दंगल घडवायची, हे तत्व सरकारचे आहे . मी पोलिसांनाच विनंती करेन की,  तुम्ही राजकीय हत्यार बनू नका. या सरकारला दंगल घडवूनच निवडणूक जिंकायची आहे. त्यांच्या हातचे बाहुले बनू नका.  आपल्या देशातील हिंदूंना कधीच आक्रमक हिंसा आवडत नाही.  त्यामुळे येथे शांततेत जनजीवन चालू आहे. एकदा दंगल झाली की दंगलीनंतर जी सामाजिक द्वेषाची भिंत उभी राहते;  ती पडायला नंतर 20 – 25 वर्षे लागतात, समाजामध्ये जेव्हा विद्वेष पसरतो तेव्हा समाजामध्ये जो आपलेपणा असतो, तो गायब होतो. याचे भान ठेवण्याऐवजी निवडणुका जिंकण्यासाठी दंगली माजवल्या जात आहेत.  काल बिहारमधील नेवाडा गावात  80 दलितांच्या झोपड्या जाळण्यात आल्या. एनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथातून  डॉ. बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेचे निर्मूलन ही संकल्पना मांडली होती.  पण, आताची परिस्थिती पाहता, जाती व्यवस्थेचे उच्चाटन तर होताना दिसत नाहीच;  किंबहुना, जातीयवाद अधिकच वाढताना दिसतोय आणि त्याला खतपाणी घातले जातेय. आज जर भाजप 400 पार झाली असती तर काय झालं असतं,  याचा विचार करा ! दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम यांच्या मदतीला संविधानही आले नसते. सगळेच उघड्यावर आले असते.  कमीत कमी आज आमच्यासारखी माणसे बोलतात तरी! बिहारच्या बेलछीमध्ये 27 मे 1977 रोजी  अकरा दलितांना जीवंत जाळण्यात आले होते. त्यावेळेस विरोधात असणाऱ्या इंदिरा गांधी यांना गावात जाण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र,  इंदिरा गांधी हत्तीवर बसून बेलछी गावात गेल्या होत्या. त्यावेळी लाखो आदिवासी आणि मागासवर्गीय त्यांच्या स्वागताला उभे होते. पण, आज एकटा तेजस्वी यादव बोलत आहे. सत्तेत असलेले शांत बसले आहेत.  आज आपण एवढा  प्रवास केला; देश एवढा पुढे गेला आणि आज आपण काय बघतोय तर दलितांचे गावच जाळून टाकले जातेय.   दलितांनी भारतात राहूच नये का? काय परिस्थिती आहे दलितांची? आजही आपण त्यांना गावाच्या बाहेर बघतो. म्हणजे, ज्यांचे जीवन उद्ध्वस्त आहे : त्यांना तुम्ही जगूही देत नाहीत? खरंतर इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी नेवाड्याचा दौरा करून अत्याचारग्रस्त दलितांच्या सोबत आम्ही आहोत, हे सांगायला हवे आहे. त्यांना आता आधाराची गरज आहे. आपली मागणी आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार  यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवाय. ते स्वतः मागासवर्गीय आहेत. त्यांच्या राज्यात जर दलित, आदिवासी,  मागासवर्गीयांवर अत्याचार होत असेल तर ते शोभनीय नाहीच. नितीशकुमार हे जर लोहिया, कर्पूरी ठाकूर यांचा वारसा सांगून समाजवादी विचारधारेवर चालत असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायलाच हवी. अशा घटनांकडे पाहून दलित, मागासवर्गीयांनी काय विचार करावा, हा देश आमचा राहिला आहे की नाही?, असा सवालही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. चौकट वन नेशन… वन इलेक्शन बाबत पत्रकारांनी विचारले असता, हे फक्त वन नेशन… वन इलेक्शन हा प्रकार नाही. तर वन लीडर आणण्याचा प्रकार आहे. या देशातील संविधान आणि लोकशाही संपवण्याची ही सुरूवात झाली आहे. या निर्णयाने सरळ सरळ लोकशाहीची हत्या होईल. भारतीय संविधानाने दिलेला संसदीय लोकशाहीचा ढाचा उद्ध्वस्त करण्याची आणि त्यातून संविधान संपवण्याची ही तयारी सुरू झाली आहे. पण, आम्ही जीव देऊ पण संविधान बदलू देणार नाही, असा इशाराही डॉ. आव्हाड यांनी यावेळेस दिला. 00000