Month: September 2024

गणेशोत्सवात नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता प्रचार

नवी मुंबई : या वर्षीचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त साजरा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत करण्यात आले असून विविध माध्यमांतून हे आवाहन नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. या करिता आधुनिक सोशल मिडीयाच्या ऑनलाईन माध्यमांप्रमाणेच पारंपारिक मुद्रित माध्यमांचाही प्रभावी उपयोग करण्यात येत आहे. गणेशोत्सव कालावधीत श्रीगणेशासमोर पूजन करतांना आरत्या म्हटल्या जातात हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला असून दुमड पानांच्या स्वरुपातील या आकर्षक आरती संग्रहाच्या एका बाजूस पारंपारिक आरत्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत व दुस-या बाजूस स्वच्छता विषयक कचरा वर्गीकरण, प्लास्टिक प्रतिबंध, निर्माल कलशांचा वापर, सजावटीत प्लास्टिक व थर्माकोलऐवजी कागद कापड अशा पुनर्वापरयोग्य साहित्याचा उपयोग तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळून शाडूच्या श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करणे आणि नैसर्गिंक जलस्त्रोतांचे रक्षण करीत कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे संदेश प्रसारित करण्यात आलेले आहेत. या आरती संग्रहाचे प्रकाशन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या उपस्थित करण्यात आले. हे आरती संग्रह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सोसायट्या व नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने आरती संग्रहासारख्या पारंपारिक माध्यमाचा उपयोग करुन स्वच्छता व पर्यावरणाचे संदेश प्रसारित करण्यासाठी प्रभावीपणे राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. ००००

गौरीच्या आगमनासाठी बाजारपेठा फुलल्या

गौरीच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या आहेत.  मुंबईतील दादर मार्केटमध्ये गौरीचे मुखवटे तसेच  गौरीच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी  गर्दी उसळली होती…   मुंबई:  गणरायाच्या आगमनानंतर अडीच दिवसातच म्हणजे भाद्रपद मासातील शुद्ध सप्तमीला…

ठामपा क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन

ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला.त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २४५ गणेश मूर्तींचे तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील २७ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले. आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, रायलादेवी, उपवन, नीळकंठ येथील कृत्रिम तलाव, कोलशेत विसर्जन घाट येथे भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची सोमवारी पाहणी केली. दीड दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी आलेल्या अनुभवानुसार सर्व ठिकाणी विसर्जन व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात, स्वच्छता ठेवावी, अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या. या पाहणीच्या वेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, सचिन पवार, मनोहर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, स्थानिक सहाय्यक आयुक्त, स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १३ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १२ टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्या‍त येणार आहेत. यावर्षीही प्लास्टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण कमी झाले आहे. कृत्रिम तलाव (१५) – ८७००, खाडी विसर्जन घाट (०९) – ६५२०, विशेष टाकी व्यवस्था (४९) – १६२१,फिरती विसर्जन व्यवस्था (०६) – २७, मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) – २४५, एकूण:१७११३. यावर्षी फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे. सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर, ‘पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व्यवस्था २०२४’ या शीषर्कावर उपलब्ध उपलब्ध करण्यात आले आहे. गेल्यावर्षीपासून महापालिकेने कृत्रिम तलावांच्या सोबतीने छोट्या टाक्यांचीही व्यवस्था विसर्जनासाठी केली होती. त्यानुसार, गेल्यावर्षी ४२ ठिकाणी टाक्यांची सुविधा उपलब्ध होती. ती संख्या यंदा ४९ एवढी करण्यात आली. तसेच, जेल तलाव, मढवी हाऊस-राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभी नाका, रिजन्सी हाईट्स-आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, देवदया नगर-शिवाई नगर या १० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत.आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, खारीगाव, घोलाईनगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव, निळकंठ वूड्स- टिकूजीनी वाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायलादेवी-१, रायलादेवी-२,  उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर अशा १५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, कोपरी, पारसिक रेती बंदर,  रेतीबंदर -१, रेतीबंदर-२-राणानगर, फास्ट ट्रॅक ब्रिज, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकूम अशा ०९ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था आहे.

ठामपा क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन

ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला.त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २४५ गणेश मूर्तींचे तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील २७ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले. आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, रायलादेवी, उपवन, नीळकंठ येथील कृत्रिम तलाव, कोलशेत विसर्जन घाट येथे भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची सोमवारी पाहणी केली. दीड दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी आलेल्या अनुभवानुसार सर्व ठिकाणी विसर्जन व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात, स्वच्छता ठेवावी, अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या. या पाहणीच्या वेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, सचिन पवार, मनोहर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, स्थानिक सहाय्यक आयुक्त, स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १३ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १२ टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्या‍त येणार आहेत. यावर्षीही प्लास्टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण कमी झाले आहे. कृत्रिम तलाव (१५) – ८७००, खाडी विसर्जन घाट (०९) – ६५२०, विशेष टाकी व्यवस्था (४९) – १६२१,फिरती विसर्जन व्यवस्था (०६) – २७, मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) – २४५, एकूण:१७११३. यावर्षी फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे. सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर,

स्वच्छ, सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

अशोक गायकवाड नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप वाव आहे. शहराचा विस्तार होत असताना योग्य नियोजन आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासावरही लक्ष द्यावे लागणार आहे. त्यादृष्टीने स्वच्छ, सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. शासकीय विश्रामगृहात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यावेळी उपस्थित होते. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, जिल्ह्याच्या अविकसित भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने क्षेत्र निश्चित केल्यास शासन स्तरावरून सहकार्य मिळविणे सोयीचे होईल. कृषी आणि पशुधनाच्या विकासावरही विशेष लक्ष देऊन ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासालाही चालना देण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. औद्योगिकदृष्टीने विकसित होणाऱ्या नाशिकसारख्या शहरात तंत्रशिक्षणासाठी आधुनिक सुविधांनीयुक्त संस्था असणे गरजेचे आहे. आयआयएम, आयआयटी दर्जाच्या सुविधा असणाऱ्या तंत्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्था येथे गरजेच्या आहेत. शासनस्तरावरही याबाबतचा विचार करण्यात येईल, असे राज्यपाल राधाकृष्णन सांगितले. राज्य शासनाच्या विविध पथदर्शी योजनांच्या जिल्ह्यात होत असलेल्या अंमलबजावणीबाबत राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सविस्तर माहिती घेतली. महसूल दस्तावेजचे डिजिटायझेशन, राज्यात सेवा हक्क कायद्याची चांगल्यारीतीने अंमलबजावणी होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या हक्कांची योग्यरितीने जपणूक व्हावी. बचत गटांना आदिवासी भागात पोषण आहार पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे. वायनरीच्या गरजेनुसार द्राक्ष पिकाबाबत संशोधनाला चालना देण्यात यावी, कांदा प्रक्रिया उद्योगाबाबतही प्रयोग व्हावेत. त्यासाठी बाजाराची मागणी आणि पुरवठा साखळीचा अभ्यास व्हावा. शासन प्रक्रिया उद्योगांना सहकार्य करीत असल्याने अशा उद्योगांना चालना देता येईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली. कृषी विकासाच्या बाबतीत विशेषतः द्राक्षे आणि कांदा पिकाच्या बाबतीत अधिक संशोधन होण्याच्यादृष्टीने कृषी विद्यापीठांशी सहकार्य करून त्याला गती द्यावी, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले. जल जीवन मिशन, पीएम किसान, राज्य शासनाच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी घेतली. नाशिक शहराने स्वच्छ भारत अभियानात यशस्वी होण्यासाठी उत्तम नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी, राज्यपाल महोदयांनी जिल्हा प्रशासन महानगरपालिका, आदिवासी विकास, पोलिस विभाग यांच्या संदर्भातील विविध बाबीवर चर्चा केली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी, शहर आणि लगतच्या परिसर विकासासाठी पायाभूत बृहत् आराखडा करण्याची गरज व्यक्त केली. येथील परिसर पर्यावरणाच्यादृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे त्याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. याबाबत आराखडा तयार करून सादर करण्याची सूचना राज्यपाल राधाकृष्णन यांनी केली. कुंभमेळ्याची पूर्वतयारी करतांना विकासकामांचे योग्य नियोजन करावे अशी सूचना राज्यपालांनी केली. जिल्हाधिकारी शर्मा यांनी, जिल्ह्यात तंत्रशिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्था स्थापण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले. जिल्ह्याला पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. त्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात रोजगार निर्मितीच्या अधिक संधीसाठी आयटी पार्क उभारण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीनंतर राज्यपाल राधाकृष्णन यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीशीसंवाद साधत जिल्ह्याच्या विकासाबाबत चर्चा केली.

माऊंट मेरी जत्रेनिमित्त बेस्टच्या १२१ जादा बस

मुंबई : वांद्रे (प) येथील माऊंट मेरी जत्रा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासून सुरू होत असून त्या निमित्त १५ सप्टेंबरपर्यंत जादा बस चालवण्यात येणार आहेत. बेस्टकडून संपूर्ण आठवडाभर १२१ अतिरिक्त बस वांद्रे रेल्वे स्थानक (प.) ते हिल रोड उद्यान या दरम्यान चालवण्यात येतील. तसेच बेस्ट बसमार्ग क्रमांक सी-७१, ए-२०२, ३२१ मर्या., ए-३७५, ४२२, ४७३ व सी-५०५ या बसमार्गावर अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येतील. माऊंट मेरी चर्च, फादर अॅग्नल आश्रम या परिसरात जत्रेसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर वांद्रे स्थानक (प) येथे लोकलने येऊन तेथून बेस्टच्या बसने प्रवास करतात. परंतु बस माऊंट मेरी चर्चपर्यंत चालवणे शक्य नसते. त्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानक (प) ते हिल रोड उद्यान दरम्यान जादा बस सोडण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त वांद्रे परिसरातून धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या नियमित बसमार्गावरही अतिरिक्त बसगाडया चालवण्यात येतील. जत्रेनिमित्त वांद्रे स्थानक (प) आणि माऊंट मेरी चर्च परिसरात होणारी प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन प्रवाशांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती संपूर्ण कालावधीसाठी केली आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 २. ५ लाख मुंबईकरांना ‘एसटी’नं पोचवलं कोकणात

 गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई : गणेशोत्सव म्हटलं की कोकणात एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. गणेशोत्सव आणि कोकण हे एक वेगळं समीकरण पाहायला मिळतं. आता गणेशोत्सवाच्या काळात अनेक चाकरमानी कोकणात जात-येत असतात. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी लालपरीला म्हणजे एसटीला प्राधान्य दिलं आहे. गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघरसह आदी शहरातून जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त चाकरमानी एसटीने आप-आपल्या गावी म्हणजे कोकणात गेल्या ५ दिवसांत पोहोचले आहेत. तब्बल ५००० पेक्षा जास्त बसेसद्वारे एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करून एक नवा विक्रम केला आहे. ३ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब या अडचणीवर मात करत एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे अडीच लाख पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात किरकोळ अपघात वगळता एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली. या बद्दल महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, आता १२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या परतीच्या वाहतुकीसाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागातील आगारातून गट आरक्षण व व्यक्तिगत आरक्षणाला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ३ ते ८ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेस ना पर्याय म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात १०० बसेस तैनात ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे.

वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई

Photo-6   कल्याण : कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या, तसेच, या वाहनांमुळे सकाळच्या वेळेत पालिका सफाई कामगारांना वाहने उभी असलेल्या भागाची सफाई करता येत नाही. त्यामुळे अशी वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कल्याण डोंबिवली पालिकेचा घनकचरा विभाग आणि कल्याण वाहतूक विभागातर्फे संयुक्तपणे दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पहिल्या पाहणी दौऱ्यात १५ वाहन मालकांवर कारवाई करण्यात आली. दुर्गाडी किल्ला येथील दुर्गा चौक, लालचौकी, सहजानंद चौक ते शिवाजी चौक हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. सर्व प्रकारची जड अवजड, हलकी वाहने या रस्त्यांवरून धावतात. लालचौकी ते आधारवाडी, गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्यांवरून सर्व प्रकारची वाहने धावतात. या वर्दळीच्या रस्त्यावर दुतर्फा मोटार, ट्रक सारखी वाहने उभी करून ठेवली जातात. अनेक वेळा या वाहनांमुळे या रस्त्यांवर वाहन कोंडी होते. कोंडी झाल्यानंतर या वाहनांचे मालक परिसरात नसतात. त्यामुळे ही वाहने आहे त्या जागेवरून हटविणे वाहतूक पोलिसांना अवघड होते. या भागातील वाहन कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते. या वर्दळीच्या रस्त्यांवर अनेक वाहने अनेक महिने एकाच जागी उभी आहेत. ही वाहने एकाच जागी अनेक महिने उभी राहत असल्याने सकाळच्या वेळेत पालिका सफाई कामगारांना वाहने उभी असलेल्या भागाची सफाई करता येत नाही. अशा वाहनांखाली कचरा साचून रहातो. त्यामुळे पालिकेच्या घनकचरा विभागाची अशा वाहनांमुळे डोकेदुखी वाढली आहे. ही वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून हटविण्याची मोहीम गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवली पालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी सुरू केली आहे. रस्त्यांवरील वाहनांचे क्रमांक पाहून त्यांच्या वाहन मालकांचा शोध घेऊन वाहतूक विभाग, पालिकेने अशा वाहन मालकांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्यास सुरूवात केली आहे. ही वाहने तातडीने वर्दळीच्या रस्त्यावरून हटविण्याच्या सूचना केल्या आहेत. वाहनतळ सोडून सार्वजनिक वर्दळीच्या रस्त्यावर वाहन उभे केल्याने आणि स्वच्छतेमध्ये बाधा आणल्याने पालिकेने एकूण १५ वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अनेक वाहन मालकांनी वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या नोटिशीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यांच्यावर आरटीओच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे, असे पालिका, वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. अशाप्रकारची मोहीम डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यावर राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या

गणेश भक्तांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांचा कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला जात आहे. गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी नदी, खाडी, ओहोळ असे नैसर्गिक जलस्त्रोत प्रदुषित करू नयेत. अधिकाधिक भाविकांनी पालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करावे, हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध भागात एकूण ६३ कृत्रिम तलाव पालिकेने निर्माण केले आहेत. भाविकांना आपल्या घर परिसरात गणपती विसर्जन करण्याची संधी मिळावी. प्रत्येक भाविकाला दोन ते तीन किलोमीटर अंतर वाहन, पायी चालत जाऊन गणपती विसर्जन करण्यास लागू नये. वाहन कोंडीचा कोणालाही त्रास होऊ नये. तसेच जलप्रदुषण होऊ नये, नैसर्गिक जलस्त्रोत स्वच्छ रहावेत हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे, असे पालिका आयुक्तांनी सांगितले. विसर्जन आपल्या दारी या शीर्षकाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. कृत्रिम तलावांमध्ये एक निर्माल्य कलश ठेवण्यात आला आहे. तेथे भाविकांना निर्माल्य टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निर्माल्यापासून खत तयार करून ते पालिकेचे बगिचे, उद्यानांमधील झाडांंसाठी वापरण्यात येते. गेल्या काही वर्षापासून गणेश भक्त घराजवळील कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जनाला प्राधान्य देत आहेत. भाविक शाडूच्या मूर्तींचा अधिक प्रमाणात वापर करत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक पुढाकार घ्यावा, हाही या उपक्रमा मागील उद्देश आहे, असे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. गणपती विसर्जन काळात कोळी बांधवांकडून पालिकेला मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त डॉ. जाखड यांनी कोळी बांधवांचे कौतुक केले. यावेळी आयुक्तांचा कोळी बांधवांची टोपी आणि शाल देऊन कोळी बांधवांतर्फे सन्मान करण्यात आला.

पत्रकार मित्र असोसिएशनच्या आरती संग्रहाचे भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्याहस्ते प्रकाशन

अशोक गायकवाड पनवेल : भाजपचे निष्ठावंत अशी ओळख असलेले विक्रांत पाटील यांनी आतापर्यंत पनवेलकरांशीही बांधिलकी जपली आहे. प्रत्येक नागरिकाशी त्यांनी दायित्व वृध्दींगत केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे भावी आमदार म्हणून तरुणपीढी त्यांना साद घालत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्याहस्ते असोसिएशनचा आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव लक्षात घेता पत्रकार मित्र असोसिएशनने विविध देवी देवतांच्या ३२ आरत्या एकत्र असलेला आरती संग्रह संपादित केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना एकाच पुस्तकात सर्व आरत्या सापडतील या उद्देशाने तयार केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेश महासिचव तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले. सामाजिक, सांस्कृतीक कार्यात पत्रकार मित्र असोसिएशन नेहमीच अग्रेसर असते असे म्हणत त्यांनी असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले. भाजपचे निष्ठावंत अशी ओळख असलेले विक्रांत पाटील यांनी आतापर्यंत पनवेलकरांशीही बांधिलकी जपली आहे. प्रत्येक नागरिकाशी त्यांनी दायित्व वृध्दींगत केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे भावी आमदार म्हणून तरुणपीढी त्यांना साद घालत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्याहस्ते असोसिएशनचा आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे आधारस्तंभ दिपक महाडीक, संस्थापक केवल महाडीक, उपाध्यक्ष सुनील भोइर, कार्याध्यक्ष नितीन जोशी, दैनिक युवक आधारचे संतोष आमले उपस्थित होते. पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील, खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चंद्रकांत लांडगे यांनीही या आरतीसंग्रहाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.