Month: September 2024

मुरबाडच्या पत्रकार विश्वावर शोककळा

पत्रकार लक्ष्मण पवार यांचे निधन राजीव चंदने      मुरबाड रू मुरबाड होमगार्ड ड्युटी सांभाळून पत्रकारिता करणारे मुरबाडचे नामवंत पत्रकार लक्ष्मण पवार यांचे रविवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.रविवारी होमगार्ड म्हणून बंदोबस्तासाठी मुरबाड पोलीस ठाण्यात हजर होताना ही दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील विविध दैनिकांमध्ये पत्रकार म्हणुन लक्ष्मण पवार हे मुरबाडची जबाबदारी सांभाळत होते.सामाजिक बांधिलकी जपताना ते होमगार्ड म्हणुन देखील पोलीस खात्याला सहकार्याची भूमिका बजावत होते.पत्रकारिता सांभाळून ते पोलीस खात्यासोबत विविध ठिकाणी बंदोबस्तावर असायचे.निवडणुका,विविध सण,मोर्चे, व आपत्कालीन परस्थितीत त्यांची होमगार्ड म्हणुन चोख कामगिरी होती.रविवारी ते ड्युटीवर मुरबाडकडे  येताना गोवेली नजीक त्यांच्या छातीत दुखू लागले.यातच त्यांची प्राणज्योत मालवली.ते 42 वर्षांचे होते.त्यांच्या पत्रकारितेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.एका गुणी पत्रकाराला व चोख कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष होमगार्डला तालुका मुकला आहे,अशा प्रतिक्रिया त्यांच्या जाण्याने समाजात व्यक्त होत आहेत. पवार हे रात्री,बेरात्री, आपत्कालीन परस्थितीत होमगार्ड म्हणुन चोख व नियमित कर्तव्य बजावत होते.दिवसा पत्रकारिता करणे व रात्री बंदोबस्ताची ड्युटी बजावणे यात कदाचित त्यांचा कामाच्या तणावामुळे हा प्रकार घडला असावा अशी मतं यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली आहेत.होमगार्ड पोलीस बळाला सोबत म्हणुन मोलाची भूमिका बजावत असतात,हीच भूमिका बजावत असताना पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,त्यामुळे शासनाने त्यांच्या कुटुंबीयाना आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी होत आहे. पवार हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय पत्रकार होते,त्यांच्या जाण्याने चळवळीचीही हानी झाल्याच्या दुःखद प्रतिक्रिया आंबेडकरी चळवळीत व्यक्त होत आहेत.यावेळी होमगार्डच्या मुरबाड युनिट तर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली.त्यांच्या अंत्यसंस्कार समयी तालुक्यातील मान्यवर,पत्रकार, सामाजिक,राजकीय पुढारी मोठ्या संख्येने सामील झाले होते. पवार हे कर्तव्य चोख बजावणारे होमगार्ड होते.ते स्वतः ड्युटी मागून घ्यायचे,व ती प्रामाणिक पार पाडायचे.त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे.त्यांच्या कुटुंबाला मदत मिळण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत,—-महेंद्र चंदने :- समादेशक अधिकारी,होमगार्ड मुरबाड युनिट

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या तबला वादन स्पर्धेचे निकाल जाहीर

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तबला वादन स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून विजेत्यांचे केंद्राच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. पंडित बाळकृष्ण अय्यर, गिरीश गोगटे, हरेकृष्ण रथ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. छोट्या गटातील विजेते अनुक्रमे – मास्टर कृशांग हरीहरन, स्वरांग दाबके, विहंग मुळ्ये, केशव खटावकर. मोठ्या गटातील विजेते अनुक्रमे – निरज कुमार वैष्णव, विवेक संकपाळ, प्रसाद सोनटक्के, प्रथमेश दाते.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या तबला वादन स्पर्धेचे निकाल जाहीर

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तबला वादन स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून विजेत्यांचे केंद्राच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. पंडित बाळकृष्ण अय्यर, गिरीश गोगटे, हरेकृष्ण रथ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. छोट्या गटातील विजेते अनुक्रमे –

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी  केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली यांच्याशी संवाद साधला.

व-हाळदेवी विसर्जन घाटावर स्त्री सुरक्षेचा गजर

ठाणे : दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला जात असतानाच आशियाँ फाऊंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि स्री सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांवर मात करण्यासाठी “भावाला संस्कार द्या… बहिणी सुरक्षित राहतील” ही संकल्पना राबविणारे अभियान आशियाँ फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहसीन शेख आणि सरचिटणीस दिपा सावंत – खोत यांनी राबविण्यास सुरूवात केली आहे. त्याच अनुषंगाने भिवंडीतील व-हाळदेवी तलाव येथे गणेश विसर्जनाचे औचित्य साधून पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याद्वारे रित्विश्व ग्रुपने शाळा , कार्यालये, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण, पालकांची भूमिका, कायदे या विषयी   गौतम सोनवणे , साक्षी मंचेकर, अस्मिता मोरे, प्रमोद गायकवाड , मृण्मय जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले.  हे पथनाट्य सादर करण्यात रितेश जाधव  आणि मिरेश उजगरे यांनी मोलाची भूमिका बजावली. या पथनाट्याला गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.  

लाडकी बहीण योजना सुपरहीट;

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर पुणे: हे सरकार सामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं, कष्टकरांचं आहे. हे सर्वांचं सरकार आहे, गेल्या दोन वर्षांत आम्ही सहाशे निर्णय घेतले. अनेक छोटे मोठे निर्णय घेतले. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील जाहीर केली. मात्र, अनेक निर्णय…

पुण्यात भाजपा, राष्ट्रवादीत राडा

पुणे : भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी केला, असा आरोप करत भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी…

लाडक्या बहि‍णींमुळे होमगार्ड ‘नावडते’

मुंबई : राज्यात धुमधडाक्यात सुरु असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीणी’ योजनेचा फटका राज्यातील होमगार्डना बसल्याचे समोर आले आहे. लाडक्या बहीणी योजनेला पैसै वळवल्यामुळे निधीअभावी राज्यातील होमगार्डच्या भत्तावाढीला स्थगिती मिळाली आहे. तशा आशयाचं पत्रही सोशल मीडियावर व्हायरल…

ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असणाऱ्या  माउंट मेरीच्या जत्रेला आज मुंबईतील वांद्रे येथे सुरूवात झाली . येत्या १५ सप्टेंबर पर्यंत ही जत्रा सुरु राहणार आहे.