Month: September 2024

एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी संप आता मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या संदर्भात बुधवारी संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर…

वेतन आयोग आणि निवृत्ती वेतनाने कर्मचारी होणार मालामाल

केंद्र सरकार एक एप्रिल 2025 पासून देशात एकात्मिक निवृत्ती योजना लागू करणार आहे. यासोबतच एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो. नवीन वेतन आयोग आणि नवीन…

साथीचे आजार टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी गरजेची

राज्याला पावसाने चांगलेच झोडपल्याने राज्यात सध्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यासारख्या साथीच्या आजाराने राज्यातील नागरिक हैराण झाले आहे. साथीच्या आजाराने रुग्णांची संख्या वाढत चालल्याने आरोग्य…

बँकांमधील पैशाचा आटता ओघ चिंताजनक

नोंद कैलास ठोळे बँकांमध्ये ठेवी असतील, तरच त्या कर्ज देऊ शकतात. ठेवी आणि कर्जाचे प्रमाण ठरलेले असते. तो पाळला न गेल्यास बँका अडचणीत येतात. आता बँकांच्या घटत्या ठेवींसाठी बँका नागरिकांना…

संकटाचे नवे ढग

संपूर्ण भारतीय उपखंडातील हवामान मॉन्सूनवर आधारित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रत्येक पैलूवर त्याचा खोल ठसा ऐतिहासिकदृष्ट्याही उमटलेला दिसून येतो. मॉन्सूनशी जमीन, आकाशय आणि समुद्राचा संबंध आहे. उन्हाळ्यात अरबी समुद्र आणि…

जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर करा – गणेश चिंकोले

सुप्रिया सुळे व संजय दिना पाटील यांना निवेदन अनिल ठाणेकर   ठाणे : जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवरती व्हावा याकरिताचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे तसेच खासदार संजय दिना पाटील यांना  देण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टचे विश्वस्त गणेश चिंचोले व राज्य कार्यकारणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख यांनी दोन्ही खासदारांची नुकतीच भेट घेऊन हे निवेदन दिले. जुलै २०२४ मध्ये हातरस येथे एका भोंदू बाबाच्या दरबारात १२४ महिलांच्या दुर्दैव मृत्यूनंतर  हा कायदा संपूर्ण देश पातळीवरती होण्याची गरज  निर्माण झाली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हातरस घटनेनंतर जादूटोणाविरोधी कायद्याची राष्ट्रीय पातळीवर  अंमलबजावणी करण्याची भूमिका मांडली. उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी महत्त्वाची बाब म्हणून त्याचा स्वीकार केला. महाराष्ट्रामध्ये जादूटोनाविरोधी कायदा व्हावा यासाठी करिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सतत प्रयत्न केले. डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर २०१३ महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने  संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने या कायद्याच्या प्रबोधनाचे कार्यक्रम राबवले. त्याचा परिणाम म्हणून आज पर्यंत एक हजारच्या वर  गुन्हे या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत नोंद झालेले आहेत. नंतर महाराष्ट्राच्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या धर्तीवर कर्नाटक सरकारने सुद्धा जादूटोणाविरोधी कायदा केला. मागील महिन्यामध्ये गुजरात सरकारने सुद्धा जादूटोणाविरोधी कायद्याचे विधेयक मंजूर  करून राज्यपालांकडे सही करिता पाठवले. आज महाराष्ट्र मध्ये कुठलाही बुवा बापू महाराज उघडपणे चमत्काराचा दावा करून फसवणूक करायला सहजासहजी धजावत नाही अशी स्थिती आहे. बागेश्वरधाम सारख्या महाराजाला महाराष्ट्रातून पळून  दुसऱ्या राज्यात जावून आपल्या दाव्याला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करावा  लागतो, हा महाराष्ट्रात असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याचा धाक आहे असे मत प्रा प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. असे असले तरी संपूर्ण भारतात सातत्याने घडणाऱ्या घटना या अस्वस्थ करणाऱ्या असतात. नुकत्याच हातरस येथे घडलेल्या घटनेने  हा कायदा संपूर्ण देश पातळीवरती होण्याची गरज प्रकर्षाने आणि निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायदा हा संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर देश पातळीवरची व्हावा याबाबतचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सर्व खासदारांना भेटून देत आहेत. आम्ही सातत्याने या मागणीचा पाठपुरावा करत राहू अशी भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यकारिणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख यांनी स्पष्ट केली.

नाविकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी वचनबद्ध – मिलिंद कांदळगावकर

ठाणे : भविष्यात नाविक कामगारांच्या हितासाठी  अनेक कामगार कल्याणकारी योजना राबविल्या जातील. आपल्या भाषणात  ते पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या नाविकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत असे नुसिचे सरचिटणीस  मिलिंद कांदळगावकर…

 इंद्रलोक सर्वधर्मिय स्मृती उद्यान व स्मशानभूमीचे आरक्षण रद्द

१५ कोटींच्या निधीतून थीम गार्डनसह इतर विकास कामे होणार! आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीवर मनपा आयुक्त संजय काटकर यांनी केले शिक्कामोर्तब!   अनिल ठाणेकर / अरविंद जोशी भाईंदर : जनतेच्या भावनेचा आदर करत इंद्रलोक भागातील सर्वधर्मिय स्मृती उद्यान व पर्यावरण पूरक स्मशानभूमीचे काम रद्द करण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांना पत्र लिहून केली होती. आमदार सरनाईक यांच्या मागणीची दखल घेत मनपा आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले. याऐवजी आता त्याजागेत १५ कोटीच्या विकास निधीतून थीम गार्डनसह इतर विकास कामे विकसित करणार असल्याची घोषणा आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. इंद्रलोक परिसरातील शासकीय जमिनीवर महापालिकेने सर्वधर्मीय  स्मृती उद्यान आणि पर्यावरण पूरक (इको फ्रेंडली) आधुनिक स्मशानभूमी प्रस्तावित केली होती. त्यासाठी १५ कोटींचा निधी राज्य सरकारकडून आला होता. पण या नागरी वस्तीत स्मशानभूमी येणार, सर्वधर्मीय स्मृती उद्यान होणार यामुळे काही लोक नाराज होते. स्थानिक हौसिंग सोसायट्या आणि नागरिकांनी महापालिका आयुक्त व आमदार प्रताप सरनाईक यांना निवेदने दिल्यावर सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्वांची बैठक झाली. यावेळी मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सरनाईक म्हणाले की, लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन सर्वानी लोक भावनेचा आदर केला पाहिजे. मीरा भाईंदर शहरात वेगाने विकास होत आहे. भविष्याची लोकांची गरज ओळखून काही कामे प्रस्तावित केली गेली आहेत. गेल्या २ वर्षात मीरा भाईंदर शहराच्या विकास कार्यासाठी राज्य सरकारकडून ३ हजार कोटी विकास निधी आणला आहे. मीरा भाईंदरचा घोडबंदर खाडी किनारा विकास करण्यासाठी १५० कोटीचा प्रकल्प असून तेथे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करणार आहोत अशी मोठी कामेही शहरात होत आहेत. लोकांना इंद्रलोक सर्वधर्मिय स्मृती उद्यान व पर्यावरण पूरक स्मशानभूमी नको असेल तर ते आरक्षण रद्द करुन लोकभावनेचा आदर करूया. इंद्रलोकच्या  शासकीय जमिनीत चांगले थीम गार्डन किंवा जनहितासाठी चांगली सुविधा विकसित करूया, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. याबद्दल इंद्रलोकच्या नागरिकांनी त्यांचे आभार मानले. भाईंदर पश्चिमेला १२.५ एकर शासकीय जागा असून त्याठिकाणी हे सर्वधर्मीय स्मृती उद्यान प्रस्तावित करावे, अशी सूचना आमदार सरनाईक यांच्याकडून करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, विधानसभा संघटक सचिन मांजरेकर, विक्रम प्रताप सिंग, जिल्हा संघटक निशा नार्वेकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 00000

बोगस शिल्पकार जयदीप आपटेवर  देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांची मागणी राजीव चंदने   मुरबाड : मुरबाड कॉँग्रेस कमिटीच्यावतीने   राज्यपाल यांना मुरबाड  तहसिलदार यांच्या मार्फत शिवद्रोही सरकार मधील भ्रष्ट्राचाराचे शिरोमणीं व खोटा शिल्पकार जयदीप आपटे वर देशद्रोहाची कार्यवाही करावी अश्या आशयाचे निवेदन मुरबाड कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात व किसान कॉंग्रेसचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे, युवक तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम, तालुका सचिव भगवान तारमळे, विभागप्रमुख खोपिवली वसंत कराळे, ओबीसी तालुकाउपाध्यक्ष प्रकाश पवार,  युवक तालुकाउपाध्यक्ष अमोल चोरघे, तालुका पदाधिकारी दिलीप ठाकरे, समीर कराळे आदीं पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित दिले.  राज्यातल्या महाभ्रष्ट युती सरकारने राज्याला काळीमा फासण्याचा विडाच उचलला आहे त्याचा परिपाक म्हणजे राज्यात सुरु असलेला प्रचंड भ्रष्टाचार  आहे. त्याअनुषंगाणे कमिशन द्या आणि टेंडर घ्या हे एकच धोरण राज्यात सुरु असुन शिवद्रोही युती सरकारच्या कमीशनखोरीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला ही सोडले नाही असे प्रतिपादन तुकाराम ठाकरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून प्रत्येक निवडणुकीत मते मागणा-या शिवद्रोही भाजपा शिंदे सरकारने त्यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून महाराजांचा मोठा अवमान केला आहे,या विरोधात राज्यभरातील जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप त्याचा निषेध म्हणुन शिवद्रोही सरकार मधील भ्रष्ट्राचाराचे शिरोमणीं व बोगस शिल्पकार जयदीप आपटे वर देशद्रोहाची कार्यवाही तात्काळ करावी ही मागणी तमाम मुरबाडवासींयाच्या वतीने चेतनसिंह पवार यांनी केली. 000

मदर तेरेसा फाउंडेशनची नशा मुक्ती जनजागृती

 रमेश औताडे   मुंबई : शिक्षण, सदभावना आणि राष्ट्रप्रेम विकसित करण्यासाठी मदर तेरेसा फाउंडेशन चे देशभर कार्य सुरू आहे. समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी आत्तापर्यंत फाउंडेशन ने ४२ ” नशा मुक्ती केंद्र ”  सुरू केली आहेत व अजून त्यांची संख्या वाढत असून त्यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. अशी माहिती फाउंडेशन चे राष्ट्रीय संयोजक व माजी आमदार समाजवादी पार्टी चे राष्ट्रीय सचिव मोहम्मद अरशद खान मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. फाउंडेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उपासना वैश्य यांनी सांगितले की, महिला सक्षमीकरण कार्यशाळा व कुटुंब सल्ला केंद्र फाउंडेशन ने सुरू केले आहे. तर प्रदेश अध्यक्ष अल्ताफ सनाउल्लाह अंसारी म्हणाले, तरुण वर्गात उद्योग व्यवसाय वाढावा यासाठीही फाउंडेशन कार्य करत आहे. राष्ट्रीय मानवाधिकार व न्याय प्राधिकरण चे अध्यक्ष अहमद कुरैशी हे न्याय दान विभागाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन करत आहेत. यावेळी काशिराम विचार मंचचे प्रदेश अध्यक्ष रहमतुल्लाह खान, अब्दुल रहमान तारिक उपस्थित होते. 00000