मुंबई : राज्यात राजकिय अस्थिरता निर्माण होऊन खिचडी सरकार सत्तेत बसले. मात्र राज्याची  जनता आता सावध झाली आहे.  जनतेला आता बदल हवा आहे.  याच सर्वात मोठ उदाहरण आहे चेंबूरची जनता. चेंबूरच राजकीय गणित बदललं आहे. पुरोगामी मतांची विभागणी होऊन मनुवादी सत्तेत निवडून गेल्याचा आजवरचा इतिहास चेंबूरकरांनी पाहिलाय, परंतु २०२४ ची निवडणूक पुरोगामी विचारांचा आमदार निवडून देणार अशीच चित्र विभागात दिसून येत आहे, दोन शिवसेना यांच्यातील मत विभागणी आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांचा पारंपरिक मतदार वंचितच्या पारड्यात झुकते माप देताना दिसून येतेय, शिंदे सेना यांची भाजपसोबत असणारी जवळीक आणि ठाकरे सेना यांचा मोदींबाबत असणारा सॉफ्ट जिव्हाळा निवडणुकी नंतर गणिते बदलून दोन्ही सेना भाजपवासी होतील ही भीती मतदारांना वाटत असून मतदार महाआघाडी सेना पेक्षा वंचित बहुजन आघाडी उमेदवार यांच्याकडे झुकू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *