Month: November 2024

ठाणे जिल्ह्यात ‘नोटा’ला ४७ हजार मतदान, शहापूर आणि ओवळा माजिवडा मतदारसंघात नोटाला अधिक पसंती

ठाणे : ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीमध्ये ‘नोटा’वर अर्थात ‘वरील पैकी कोणताही उमेदवार नको’ या पर्यायासाठी तब्बल ४७ हजार २४२ जणांनी मतदान केले. सर्वाधिक मतदान शहापूरमध्ये झाले असून या ठिकाणी ४…

पसंतीचा वाहन क्रमांक घरबसल्या मिळण्याची सुविधा

मुंबई : लाखो-करोडो रुपये खर्च करून नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आता ऑनलाइन पद्धतीने आकर्षक वाहन क्रमांक मिळवण्याची सुविधा आरटीओद्वारे राज्यभरात सुरू केली जाणार आहे. त्यामुळे घरबसल्या पसंतीचा वाहन क्रमांकाची नोंद…

 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार

 लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा   ठाणे : एकनाथ शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढलेला उमेदवार आता निकालानंतर शिंदेंच्याच पक्षात प्रवेश करणार आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांनी ही  घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. मनोज शिंदे हे काँगेसमधून बंडखोरी करीत कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उभे राहिले होते. यामुळे शिंदे यांची काँग्रेसने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा चांगलाच सुफडासाफ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र उबाठा पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच एकतर्फी निवडणूक होणार अशी चर्चा झाली. तर काँगेसमधून बंडखोरी करीत मनोज शिंदे यांनी देखील या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला होता. उबाठा पक्षाचे उमेदवार असताना काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी निवडणुकीत उडी मारल्याने शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागताच मनोज शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाची घोषणा केली. लवकरच महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे मनोज शिंदे यांनी सांगितले. ०००००

डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती आणि डोंबिवलीतील फ, ग आणि ह प्रभागातील वितरण वाहिन्यांवरील गळती थांबविणे आणि व्हाॅल्व्ह दुरुस्तीच्या कामासाठी डोंबिवली…

ठाणे जिल्ह्यात पशुगणनेस प्रारंभ

ठाणे : पशुगणनेला सोमवारपासून ठाणे जिल्ह्यात प्रारंभ होणार आहे. २८ फेब्रवारीपर्यंत ही मोहीम चालणार आहे. तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती केली आहे. पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांची अंमलबजावणी करणे, निधीची…

ठाणे महापालिकेच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाळकुम येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क…

 २७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न

प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या अध्यक्षतेखाली अनिल ठाणेकर ठाणे : कर्नाटकमधील निपाणीतील कारदगा येथे २७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ नाटककार-साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या ‘योद्धा कर्मयोगी’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सीमाभागातील मराठीप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या संमेलनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाचा हा योग रविवारी जुळून आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, उद्योजक राजेंद्र पवार, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळचे संचालक इंद्रजीत पाटील, ब्रम्हाकुमारी साक्षी कमलापुरे, कारदगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अभिनंदन मुराबट्टे, चिंतामणी मगदूम, स्वागताध्यक्ष पद्मावतीताई अलंकार, डॉ. अच्युत माने, माजी आमदार सुभाष जोशी, श्री जंगली महाराज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद खराडे, प्रा. चंद्रकुमार नलगे फाऊंडेशनच्या अध्यक्ष अनिता नलगे, कन्नड बळग संघाचे गौरवाध्यक्ष राजू खिचडे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. निपाणी येथील साहित्य विकास मंडळाकडून आयोजित करण्यात आलेले २७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन कारदगा येथे रविवारी संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची निवड करण्यात आली होती. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सीमाभागाचा उज्ज्वल इतिहास आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ, तसेच ग्रामीण साहित्य आणि ग्रामसंस्कृती यांच्या अनुबंधाचा पट उलगडून दाखवला. सीमाभागातील मराठी भाषक बंधू-भगिनी मराठी भाषा, संस्कृती आणि विचार प्राणपणाने जपण्याचे काम करत आहेत, असे सांगत प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी सीमाभागातील मराठीजनांचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्राने सीमाभागातील मराठीजनांना नेहमी आपलेच मानले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील निपाणी-बेळगावसह ८६१ गावांतील मराठीजनांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहिले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत सीमाभागातील मराठीजनांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. महाराष्ट्र राज्याच्या कल्याणकारी योजना, तसेच आरोग्यसेवांचा लाभ सीमाभागातील मराठीजनांना मिळावा, यादृष्टीने महायुती सरकारने सकारात्मक पावले उचलली आणि यापुढेही महायुती सरकार सीमाभागातील मराठीजनांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा विश्वासही प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. याविषयी बोलताना प्रा. डॉ. प्रदीप ढवळ म्हणाले की, सीमाभागातील मराठीजनांच्या लढ्याशी शिवसेना नेहमीच एकनिष्ठ राहिली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे सीमावासीयांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या विचारांवर काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीदेखील त्यांच्या तरुणपणी सीमालढ्यातील आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. त्यासाठी कर्नाटकमध्ये त्यांना महिनाभराचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. सीमावासीयांच्या वेदना आणि दु:ख माहीत असलेला एकनाथ शिंदे यांच्यासारखा शिवसैनिक सव्वादोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाला. तेव्हापासून त्यांनी सीमावासीयांच्या हितासाठी जे जे करणे शक्य आहे ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी जनांमध्ये त्यांच्याविषयी, राज्य सरकारविषयी आणि महाराष्ट्राविषयी सकारात्मक भावना आहेत. या ग्रामीण साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन होणे, ही त्यामुळेच ऐतिहासिक गोष्ट ठरली आहे. सीमाभागातील मराठीजन या चरित्रग्रंथाचे नक्कीच स्वागत करतील, असा विश्वास असल्याची भावना प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी याप्रसंगी व्यक्त केली. ००००

 तेजज्ञान फाउंडेशनच्या वतीने रजत जयंती ध्यान महोत्सवाचे आयोजन

 ८ डिसेंबर रोजी पनवेलमध्ये तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत आयोजन   राज भंडारी पनवेल : हॅपी थॉट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेच्या स्थापना दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी १ डिसेंबर रोजी वाशी येथे तर ८ डिसेंबर रोजी पनवेल येथे तसेच १५ डिसेंबर रोजी अलिबाग येथे रजत जयंती ध्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी विजेंद्र जैन, प्रज्ञा कोळवणकर, प्रभात कोळवणकर, आशा सरकटे, विलास साठे, शागुप्ता गदने आदी उपस्थितांनी कार्यक्रमाच्या रुपरेशेबद्दल माहिती दिली. ज्ञान ध्यान केंद्रात १ डिसेंबर रोजी वाशी सेक्टर १५ येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० ते १२ या वेळेत होणाऱ्या या महोत्सवाचे उद्‍घाटन व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक तथा लेखक डॉ.अजित मगदूम, के.जे.सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्रिन्सिपॉल डॉ.विवेक सुन्नपवर आणि म.टा.सन्मान पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध अभिनेते अमोल देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दिनांक ८ डिसेंबर रोजी पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात सकाळी १० ते १२ यावेळेत आयोजन करण्यात आले असून यावेळी पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ.योगेश्वर दयाळ कौशिक आणि जिमनॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाचे टेक्निकल कमिटी चेअरमन पवन भोईर यांच्या उपस्थितीत याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अलिबाग येथे पार पडणारा कार्यक्रम हा जे.एस.एम.कॉलेजच्या सभागृहात दिनांक १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:३० ते ६:३० यावेळेत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी रायगड भूषण डॉ.के. डी. पाटिल, स्त्री शक्ती पुरस्कार प्राप्त डॉ.निहा राऊत आणि महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या ध्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरु सरश्री यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेचे महत्त्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फाउंडेशनचे सर्व साधक, ध्यानप्रेमी आणि नागरिकांना उत्साहपूर्वक निमंत्रण करण्यात आले आहे. आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी या महोत्सवाचा एक भाग व्हा!, असे आवाहन फाउंडेशनमार्फत करण्यात आले आहे. 00000

पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे २८ नोव्हेंबरला प्रकाशन

मुंबई :भारतातील पोर्ट उद्योगात सर्वात जुनी असलेली १०४  वर्षाची  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन आहे. स्वातंत्र्यसेनानी, मुंबईचे माजी महापौर, माजी खासदार व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांच्या…

 एकनाथ शिंदेकडून आमदार महेंद्र थोरवे यांचा सत्कार

दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल माथेरान:‘महेंद्र हा आमचा वाघ आहे. निवडणूक काळात अनेक संकटे आली पण  तो मुळीच घाबरला नाही. मी कर्जतकराना धन्यवाद देतो की तुम्ही शिवसेना पक्षाला साथ दिली आणि तुमचा महेंद्र आत्ता दुपटीने विकास करेल हा विश्वास आहे’, असे गौरवोद्गार एकनाथ शिंदे यांनी महेंद्र थोरवे यांच्याबद्दल काढले. नुकताच विधानसभा निवडणूका पार पडल्या असून महायुतीच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदार संघातील उमेदवार महेंद्र थोरवे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आशीर्वाद घेतले.खऱ्या अर्थाने कर्जत खालापूर मतदार संघातील जवळपास २९०० कोटी रुपयांची विकास कामे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे तडीस नेली आहेत. त्यामुळे आगामी काळात सुध्दा या मतदार संघातील जी काही प्रलंबित कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने मार्गी लागणार आहेत. ह्या मतदार संघात अत्यंत चुरस पहावयास मिळाली आहे परंतु केवळ अडीच वर्षाच्या कार्यकाळात आमदार महेंद्र थोरवे यांनी झपाटून कामे केल्यामुळेच ह्या मतदार संघाचा कायापालट होत आहे. महेंद्र थोरवे यांचा मुख्यमंत्र्यांकडुन छोटेखानी सत्कार होताना हा समस्त मतदार संघातील कार्यकर्त्यांचा सन्मान आहे असे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले.यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले,शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.