Month: November 2024

रायगडमध्ये दोन टक्के मतदान वाढले

अलिबागमध्ये सर्वाधिक 77. 15 टक्के मतदान  पनवेलमध्ये मतदान करण्यात महिला आघाडीवर अलिबागः रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क् बजावला. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत 2024 मध्ये 2 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. 2024 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीपेक्षा 10 टक्के मतदान वाढले आहे. पनवेल मतदारसंघात सर्वात कमी 58.70 टक्के तर सर्वात जास्त अलिबाग मतदारसंघात 77.15 टक्के मतदान झाले आहे. पनवेल मतदारसंघात मतदान करण्यात पुरूषांपेक्षा महिलांची टक्केवारी जास्त आहे. पनवेल मतदारसंघात 59.28 टक्के पुरूषांनी तर 59.19 टक्के महिला मतदारांनी मतदान केले, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गुरूवरी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपनिवडणूक अधिकारी नितीन वाघमारे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड हे सात विधानसभा मतदरसंघ आहेत. या सात मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेबर रोजी  मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात 24 लाख 88 हजार 788 मतदार आहेत. त्यापैकी 17 लाख 16 हजार 403 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. 69.80 टक्के पुरूष मतदारांनी मतदान केले. 68. 12 टक्के महिला   मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  पनवेल मतदारसंघांत मतदान करण्यात  पुरूषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त आहे. 58.28 टक्के पुरूष तर 59.19 टक्के महिलांनी मतदान केले. पनवेल मतदारसंघात सर्वात कमी 58.70 टक्के मतदान झाले. कर्जतमध्ये 74.29, परणमध्ये 76.80, पेणमध्ये 73.02 , अलिबागमध्ये 77.15, श्रीवर्धनमध्ये 61.37 तर…

वाढीव मतदान कोणाच्या पारड्यात?

भाईंदर : मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात तीन टक्के मतदान वाढले आहे. त्याचप्रमाणे मतदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. आता या वाढीव मतदारांनी कौल नेमका कोणाला दिला…

मतदान प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे योगदान

मुंबई : मुंबईतील मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी मतदाराच्या मदतीसाठी सात हजार ११५ स्वयंसेवक मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर कार्यरत होते. यामध्ये ९८ महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) सहभागी दोन…

वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

वाशी : मागील काही दिवसांपासून हवामानात होणाऱ्या बदलामुळे शहरात ताप व सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. दुपारी कडक ऊन; तर रात्री हवेतील गारवा, पुन्हा पहाटेच्या सुमारास थंडी असे वातावरण अनेकांच्या…

३० वर्षांनंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान

१९९५ मध्ये कोणाचं सरकार आलेलं? मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच मतदान २० नोव्हेंबरला पार पडलं. राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान झालं. यावेळी मतदानादिवशी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात ६५.११ टक्के मतदान झाले, जे गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान आहे. यापूर्वी ११९५ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ६१.३९ टक्के मतदान झाले. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी वाढल्याचे श्रेय मुख्यकरुन सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्या प्रचाराला दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला एकूण ४२.७१ टक्के मते मिळाली, तर महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते मिळाली होती. यंदा मतदानाच्या टक्केवारीत किमान ३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वेळी महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार यासाठी मतदानाची वाढलेली टक्केवारी निर्णायक ठरु शकते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात ८.८५ कोटी मतदार होते, जे २०२४ मध्ये वाढून ९.६९ कोटी झाले आहेत. त्यापैकी ५ कोटी पुरुष आणि ४.६९ महिला मतदार आहेत. यंदा ४१३६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ३७७१ पुरुष तर ३६३ महिला उमेदवार आहेत. अधिक मतदानाचा फायदा सत्ताधारी महायुतीला होऊ शकतो, असं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या ज्यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे, त्याचा फायदा भाजपला झाला…

‘न भूतो, न भविष्यती…!’ जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती

ठाणे : एकनाथ शिंदेंचे काय होणार, देवेंद्र फडणवीसांचे काय होणार याच्याशी मला काही घेणे देणे नाही. आमचा मुख्यमंत्री होतोय हे म्हटल्यावर आम्ही कशाला त्यांचे बघायला जाऊ असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चक्क शिंदेंची स्तुती केली आहे. परिवर्तन होणार महाविकास आघाडी सत्तेत येणार असेही ते म्हणाले आहेत. मतांची वाढलेली टक्केवारी ही नेहमीच सत्तेच्या विरोधात असते. सत्तेवर राग असतो म्हणून लोक बाहेर पडून भरभरून मतदान करतात. तुमची लाडकी बहीण योजना चांगली आहे, वाढलेले भाव आणि महागाई हे देखील बहिणींच्या लक्षात आलेले आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात की लाडकी बहीण माझीच योजना त्यात बिघाड झाला. म्हणजे प्रत्येकाने पाचशे पाचशे रुपये वाटून घेतले. आता पैसे वाढवून देणार कारण त्यांच्या बहिणी वाढल्या होत्या. बहिणींवरून आता त्यांच्यात स्पर्धा लागली आहे, असा टोला आव्हाड यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला. आतापर्यंत निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून जायचे. आता पैसे वाटप, पोलिसांवर प्रचंड दबाव आणणे हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय थोडीच झाले असेल असा सवाल करत शिंदेंनी युतीधर्म पाळला त्यांचे अभिनंदन करतो, असे आव्हाड म्हणाले. शिंदेंनी अजित पवारांच्या उमेदवाराला जोरदार समर्थन दिले. भले त्यांनी मला मदत नाही केली. त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला तरी आपला मुख्यमंत्री आपल्या बाजूलाच राहतो हे बरे वाटते. त्यांना महायुतीतून काढून टाकले तर मला वाईट वाटेल असे आव्हाड म्हणाले. बाकीचे वैर सोडून द्या, मुख्यमंत्री माझ्या घराच्या बाजूला राहतो ही सन्मानाची आणि मानाची बाजू आहे, असे संजय शिरसाट यांनी केलेल्या शिंदे शरद पवारांसोबत जाऊ शकतात या दाव्यावर आव्हाड म्हणाले. संजय शिरसाट हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना माझ्यापेक्षा पत्रकारांना हिंट देण्याबाबत जास्त समजते, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. तसेच भाजपा उघडपणे म्हणत असेल की मुख्यमंत्री होऊच देणार नाही याचा अर्थ भाजपचा कुठेतरी प्लान झालेला आहे, असा संशयही आव्हाड यांनी व्यक्त केला.

डोंबिवली विभागीय कार्यालय कचऱ्याचे आगार

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालय हे कचऱ्याचे आगार बनले आहे. कार्यालयाच्या आवारात निवडणूक काळात जप्त केलेले बेकायदा साहित्य टाकले आहे. या साहित्याचा ढीगच येथे तयार झाला…

मतमोजणीसाठी डहाणूत वाहतुकीत बदल

कासा, ता : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी डहाणूतील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. मतमोजणी प्रक्रिया शनिवारी सेंट मेरी हायस्कूल, मसोली येथे पार पडणार आहे. यानिमित्ताने नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी…

बोईसरमधील कंपनीच्या गोदामाला भीषण आग;

परिसरावर प्रदूषणकारी धुराची चादर बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळील कारखान्याच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत गोदामातील तयार आणि कच्चामाल जळून खाक झाला. तर आगीमुळे बोईसर परिसरातील आकाशात मोठ्या प्रमाणात काळाकुट्ट धुर पसरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागला. तारापूर औद्योगिक क्षेत्रात जवळील बेटेगाव येथील दोरखंड तयार करणाऱ्या रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज या कारखान्यातील गोदामाला गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे गोदामातील कच्चा आणि तयार माल जळाल्याने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. आगीची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दल, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि पालघर नगरपरिषद यांच्या एकूण चार बंबानी तातडीने घटनास्थळी पोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. गोदामात साठा केलेल्या ज्वलनशील कच्च्या मालामुळे आग धुमसत असल्याने आकाशात मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला होता. संपूर्ण बोईसर परिसरात काळा धूर पसरल्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागला.  तीन तासानंतर सकाळी दहा वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. आग लागल्याचे समजताच कारखाना आणि गोदाम परिसरातून कामगारांना वेळीच बाहेर काढल्याने कोणत्याही प्रकारचे जीवित हानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

शास्त्रीनगर आरोग्य केंद्राच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण

ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची जागाही बळकावली ठाणे :शास्त्रीनगर  नंबर १ मधील ठाणे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. तशी वर्कऑर्डरही निघाली आहे. या संदर्भात उपायुक्त, वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करुनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने शास्त्रीनगरवासिंयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर मा. नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन भूखंड मोकळा करण्याची विनंती केली आहे. शास्त्रीनगर  हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे. येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र जगदाळे यांनी मंजूर केले आहे. मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतला आहे. तर हत्तीपूल कडून शास्त्रीनगर  नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वन विभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे. या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे. मात्र आचारसंहिता असल्याने काम सुरु करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागाच बळकाविल्या आहेत. आरोग्य केंद्रांच्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहेत. तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त, वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या कडे तक्रारी करुनही अद्याप कारवाई केलेली नाही. माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.