Month: November 2024

महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन 2024 स्पर्धा

हर्षित माहिमकरला दुहेरी मुकुटाची संधी मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) मान्यतेने तसेच ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) आणि एनएससीआय यांच्या संयुक्त विद्यमाने कोर्ट चॅम्पियन 24 द्वारे आयोजित महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धेत हर्षित माहिमकरने पुरुष आणि १७ वर्षांखालील मुले एकेरी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. महालक्ष्मी येथील वेलिंग्डन स्पोर्ट्स क्लब कोर्टवर खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत बिनसीडेड हर्षितने कमालीचे सातत्य राखताना पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित श्वेतांक कर्णिकवर ३४ मिनिटांमध्ये 21-13, 21-10 असा विजय मिळवला. १७ वर्षांखालील मुले गटात दुसऱ्या सीडेड हर्षितने बिगरमानांकित सुमीत माडे याचा 21-16, 21-15 असा पराभव केला. १७ वर्षांखालील मुली एकेरीच्या उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित खुशी पाहवाने अव्वल सीडेड श्रावनी पाटील हिला चुरशीच्या लढतीत 18-21, 21-14, 28 26 असे हरवले. अंतिम फेरीत…

महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स स्पर्धेसाठी १० लाखांची बक्षिसे जाहिर

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२४-२०२५ चे आयोजन महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट हॉल, शिवाजी पार्क, दादर येथे करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात हि स्पर्धा रंगणार असून पुरुष गटातील पहिल्या ३२ तर महिला गटातील पहिल्या १६ विजेत्यांना मिळून एकंदर १० लाखांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुरुष गटातील विजेत्याला रोख रुपये १ लाख ५० हजार, उपविजेत्याला रोख रुपये १ लाख व तिसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूस रोख रुपये ७५ हजारांचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात येईल. तर महिला गटातील विजेतीला १ लाख, उपविजेतीला ५० हजार व तिसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूस रोख रुपये ३० हजारांचे ईनाम व ट्रॉफी देण्यात येणार आहे. शिवाय पहिल्या फेरीपासून खेळाडूने केलेल्या व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅमसाठी रोख पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे. स्पर्धेतील सर्व खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने गणवेश देण्यात येणार असून बाहेर गावच्या खेळाडूंची निवास, चहापान व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेबाबतची संपूर्ण माहिती प्रवेश अर्जासोबत असलेल्या माहितीपत्रकात देण्यात आली असून स्पर्धेचा प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. इच्छुक खेळाडूंनी आपली नावे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे नोंदवावीत. स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या संकेत स्थळावरून करण्यात येईल.

चेंबूरमधील अपक्ष उमेदवार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

मुंबई : उमेदवारी अर्जावर अनुमोदकाची स्वाक्षरी नसल्याने चेंबूरमधील एका अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. याप्रकरणी अपक्ष उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र उच्च न्यायालयाने…

मिरा-भाईंदरच्या विकासात नरेंद्र मेहतांची महत्त्वाची भूमिका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मीरा-भाईंदर : मिरा भाईंदरचा चेहरा मागील दहा वर्षात बदलला  आहे. मेट्रो, पिण्याच्या पाण्याची योजना व इतर अनेक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ह्यामुळे एक प्रकारे शहराचा सर्वांगीण विकास गतीने होत असल्याचे…

जेव्हा गद्दारी झाली तेव्हा जितेंद्र आव्हाड हेच पवारांसोबत पहाड बनून उभे राहिले – कन्हैय्या कुमार

 महाविकास आघाडीचे सरकार आले तर देशाचे राजकारण बदलेल – अजय राय अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र ही शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीवर गद्दारी फार काळ टिकणार नाही. यावेळेस महाराष्ट्रात परिवर्तन होणारच आहे. हे परिवर्तन होत असताना पाच वर्ष मागे जाऊन पहा, जेव्हा अंधारात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा शरद पवार यांच्यासोबतडॉ..जितेंद्र आव्हाड हेच पहाड बनून उभे राहिले होते, अशा शब्दात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनीडॉ..जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवारडॉ..जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ मुंब्र्याच्या एमएप व्हॅली येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत कन्हैय्या कुमार बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रांताध्यक्ष अजय राय यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह हजारो नागरिक उपस्थित  होते. आपल्या भाषणात कन्हैय्या कुमार यांनी देशभरातील विविध मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, येत्या २० तारखेला परिवर्तनासाठी मतदान करायचे आहे. मी काही एवढा मोठा नाहि की तुम्हाला काही शिकवायला आलो आहे. पण, धर्मनिरपेक्षतेच्या प्रत्येक लढाईत ठाम उभे राहणाऱ्याडॉ..जितेंद्र आव्हाड यांना पाठबळ देण्याची भूमिका आपली असली पाहिजे. त्यासाठीच आपण इथे आलो आहोत. आपण देश आणा राज्यातील सत्ताधाऱ्यांना पहात आहात. मी स्वतः विविध राज्यांमध्ये फिरत आहे. पण, गडबड करणे हेच भाजपचे काम आहे. हरयाणामध्ये आपण जिंकत होतो. मात्र, भाजपने गडबडी केली. म्हणूनच प्रत्येक मत महत्वाचे आहे. प्रत्येकाने जितेंद्र आव्हाड यांना मत देऊन सेक्युलर आवाज बुलंद केला पाहिजे. अजित पवारांबाबत बोलताना कन्हैय्या कुमार यांनी, खरी राष्ट्रवादी आणि डॉ..जितेंद्र आव्हाड हे हिमतीने लढत आहेत. म्हणूनच अजित पवारांनी घड्याळ चोरून नेले. पण, आता त्यांचे घड्याळ बंद पडले आहे. तरीही, हे बंद घड्याळ पुढे करून अजित पवार हे जनतेला ‘गुमराह’ करीत आहेत. पण, त्यांनी हे लक्षात ठेवावे; त्यांचा खेळ अनिश्चिततेचा आहे. त्याने आमच्या निश्चिततेला फरक पडणार नाही, असे सांगितले. संविधानाच्या प्रस्तावनेवर कोणाचा विश्वास आहे, हे आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. आपणाला आता ५० कोटी घेऊन गद्दारी केलेल्यांशी लढायचे आहे. कारण, गद्दारीचा पाया रचणारे उपमुख्यमंत्री धर्म…

इथे फक्तडॉ.. जितेंद्र आव्हाड यांनाच समर्थन, कौसा येथील सोसायट्यांनी लावले फलक !

अनिल ठाणेकर ठाणे : कौसा येथील निवासी सोसायट्यांनी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवारडॉ..जितेंद्र आव्हाड यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या सोसायट्यांनी आपल्या आवारात इतर उमेदवारांनी प्रचारासाठी येऊ नये, यासाठी  प्रवेशद्वारांवर भला मोठा फलकच लावला आहे. वाय जंक्शन येथे ग्लोबल पार्क ही प्रचंड मोठी आणि कौसा येथील नुराणी हाॅटेलशेजारी आमीर नामक तीन विंगची सोसायटी आहे. या दोन्ही सोसायट्यांमध्ये शेकडो कुटुंबिय वास्तव्यास आहेत. या सोसायट्यांनी एकमुखी ठराव करूनडॉ..जितेंद्र आव्हाड यांना मते देण्याचा निर्धार केला आहे. १५ वर्षांपूर्वी मुंब्रा – कौसा हा परिसर अविकसित होता. सन 2009 मध्येडॉ..जितेंद्र आव्हाड हे पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर परिसराचा विकास होऊ लागला. आज शहरातील रस्ते, पाणी,  वीज या सर्व समस्या…

महाराष्ट्रधर्म राखण्यासाठीच उद्धव ठाकरेंसोबत – राजन राजे

‘धर्मराज्य पक्षा’चा १३वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रहित जोपासण्यासाठी व महाराष्ट्रधर्म राखण्यासाठीच, ‘धर्मराज्य पक्षा’ने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पाठींबा दिला असल्याचे पक्षाध्यक्ष  राजन राजे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे,…

डहाणू मतदारसंघात विनोद निकोले यांच्यासाठी वृंदा करात मैदानात

अनिल ठाणेकर डहाणू : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्य वृंदा करात यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू (अज) मतदारसंघातील माकप महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विनोद निकोले यांच्यासाठी निवडणूक सभांना संबोधित केले. तलासरी…

दिव्यांच्या चंदेरी सोनेरी तेजोमय प्रकाशाने न्हाऊन निघाली वाळकेश्वरची बाणगंगा 

त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवात महिलाभगिनींचा मोठा सहभाग दिनेश मराठे  मुंबई : कार्तिक मासातील त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने वाळकेश्वर येथील बाणगंगेच्या तिरावर शुक्रवारी सायंकाळी 7:30  ते 9:30 च्या दरम्यान पार्वतीपते हरहर महादेव च्या जयघोषात महामंगल असा देह चित्त भान हरपणारा नयनरम्य दीपोत्सव आणि महाआरती सोहळा मोठया हर्ष उल्हासात संपन्न झाला.या मनाला सुखद आनंद देणाऱ्या महाआरती सोहळ्याचे आयोजन गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट आणि मुंबई महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. उत्तर प्रदेश येथील वाराणसी स्थित श्री काशी मठ संस्थानचे मठाधिपती साम्यमिंद्र तीर्थ स्वामीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात अध्यक्ष प्रविण कानविंदे,सेक्रेटरी शशांक गुळगुळे आणि सीईओ प्रोजेक्ट ऋत्विक औरंगाबादकर यांनी उपस्थित सर्व भाविकांचे स्वागत केले. यंदाच्या 11 व्या वर्षी त्रिपुरारी पूर्णिमा निमित्त वाळकेश्वर येथील बाणगंगेच्या तिरावर भाविकांच्या प्रचंड गर्दीत मोठ्या हर्षोल्हासात  ढोलताशाच्या गजरात हर हर शंभो जय शिव शंभूच्या जय घोषात दीपोत्सव आणि महाआरती संपन्न झाली.या महाआरतीला मुंबईसह ठाणे, डोंबिवली,कल्याण,कर्जत,कसारा येथून लोकं आली होती. बाणगंगेच्या दगडी पायर्‍यांच्या घाटावर बसलेल्या गंगाभक्तांच्या मुखातून हर हर महादेव आणि जय जय गंगे नमामी गंगे,हर हर शंभो जय शिव शंभूचा जयघोष सुरू होता.त्यात भगवी पताका डौलाने नाचवत ढोल ताशा पथकाने उपस्थित तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण केली होती. बाणगंगा काठावर सर्वत्र गगनभेदी घोषणा शंखनाद,केशरी ध्वज नृत्य, पाण्यात पोहणारे,बदकांचे थवे त्यात छोट्या 4 होड्यात फोटोसाठी छायाचित्रकारांची चाललेली लगबग,पायर्‍यावर बसलेली भाविक मंडळी पहायला मिळत होती.स्थानिक तरुण तरुणी, तर दूरवरून आलेले काही भाविक आपल्या पत्नी, लहानग्यांना घेऊन महाआरतीच्या जल्लोषात मग्न होती. त्यातही महिलांनी केलेला साजशृंगार  सर्वांचे चित्त आकर्षित करीत होती. चारही बाजूंनी दिव्यांचा लखलखाट प्रकाशमान होत असल्यामुळे येथे दीपोत्सवाच्या सोहळ्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. बाणगंगेच्या किनारी उभारलेल्या खास सात स्टेजवर मंगलमय गणेश स्तुती,गंगा स्तुती, गीत गात सात षोडशी कन्या पारंपारिक वेषभूषा करीत भरत नाट्यम नृत्य करताना त्यांच्या चेहर्‍यावर आनंदोत्सव झळकत होता. पौरोहित्य सादर करीत असलेल्या मंगलमय श्रीगणेश वंदना,रुद्र सूक्त,पुरुष सुक्त,श्रीसूक्त आणि शांती पाठाच्या मंगलमय वेद मंत्राच्या घोषाने वातावरणात अगदी वाराणसी येथील गंगा आरतीचा अनुभव निर्माण करीत होते तर किनारी बसुन मुली आणि  महिला गंगेत प्रज्वलन केलेले दीप सोडत होत्या.हे विलोभनीय वातावरणात अगदी भक्तिमय झाले होते. हर हर महादेव या जयघोषात शिव तांडव स्तोत्र घेत उपस्थितांचे स्वागत केले गेले .प्रथम धूपारची, दीपारती आणि शेवटी महाआरती झाली.यावेळी सोहळे परिधान केलेले गळ्यातील रुद्राक्ष माला,भगवे अंगरखा या पारंपारिक वेषभूषा केलेले तरुण पुरोहित तालबद्ध होऊन महाआरती करीत होते. भाविकांनी पार्वतीपते हरहर महादेव, गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम च्या जय घोषात सारा बाणगंगा परीसर भाविकांनी  दुमदुमुन सोडला.त्यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता, दुर्गे दुर्गटभारी, शिव तांडव स्तोत्र, पुरुष सूक्त,गंगा स्तुती, रामस्तुती,शिवपार्वती स्तुती आणि जल,वायू,आकाश, अग्नी आणि पृथ्वीचे आभार व्यक्त करीत वेद मंत्र,पौराणिक मंत्र म्हणत वातावरण एका दिव्य सोहळ्याचा आनंद भाविकांनी अनुभवला. येथील स्थानिक बाणगंगा रहिवाशी महिला पुरुष यानी घाट सजविण्यात मोठे सहकार्य केले.येथील घाटावर जागो जागी काढलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या रांगोळ्यांच्या…