Month: November 2024

महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्ट्राचाराचे खिलाडी- मोदी

चंद्रपुर : महाविकास आघाडी हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खिलाडी आहे असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांचा पक्ष महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणत असल्याचा आरोपही…

‘ठाकरें’साठी सरवणकरांनी तडजोड करायला हवी होती – नांदगावकर

सिध्देश शिगवणकर मुंबई : भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासोबत अनेक ठिकाणी मनसे मैत्रीपूर्ण  लढतीत आमने-सामने रिंगणात आहे. यावर बोलताना नांदगांवकर म्हणाले, हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही, भाजप आणि शिवसेना शिंदे गट…

एकनाथ शिंदेंची राणा दाम्पत्याला ताकीद

महायुतीत राहून विरोधात काम करु नका अमरावती : अमरावतीमधल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याला सक्त ताकीद दिली. ऐन निवडणुकीत राणा दाम्पत्य आणि विरोधकांमधील वाद उफाळून आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

ठाणे जिल्ह्यात ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी वाजविणाऱ्यां’ची डोकेदुखी ?

ठाणे : लोकसभा निवडणूकांमध्ये तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर राष्ट्रवादीने (शरद पवार गट) निवडणूक लढविली होती. परंतु या निवडणूकीमध्ये ‘तुतारीवाजविणारा माणूस’ या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिन्हासोबत ‘ट्रम्पेट’ या चिन्हाला देखील भरमसाठ मतदान झाले. ‘ट्रम्पेट’ला प्रचलित भाषेत ‘पिपाणी’ म्हटले जाते. या पिपाणी चिन्हामुळे शरद पवार गटाला अनेक जागांवर फटका बसला होता. ठाणे जिल्ह्यात आता विधानसभा निवडणूकीसाठी शरद पवार गटाने पाच उमेदवार उभे केले आहेत. या पाचही उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आता पिपाणीमुळे तुतारी वाजविणाऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभेच्या जागा आहेत. महाविकास आघाडीने येथील मुंब्रा कळवा, शहापूर, उल्हासनगर, बेलापूर आणि मुरबाड या मतदारसंघात महायुतीसमोर उमेदवार उभे केले आहेत. यातील मुंब्रा कळवा मतदारसंघात…

श्रीवर्धन विधानसभेमध्ये १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग, ज्येष्ठांचे गृहमतदान -महेश पाटील

अशोक गायकवाड रायगड : १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये माणगाव, तळा, रोहा, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ४७२ व दिव्यांग मतदार ११६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी…

महाराष्ट्रातील बकासुराचा नाश आता जनतारूपी भीम करणार -अनंत गीते

उल्हासनगर : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस चुरशीचं होतांना दिसत आहे, आणि याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ४ मधील मराठा सेक्शनमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ एक भव्य चौक सभा आयोजित करण्यात आली होती. उत्साहाने भरलेली ही सभा शिवसेना नेते अनंत गीते आणि उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांच्या धारदार भाषणांनी गाजली. त्यांनी महायुती सरकारवर जोरदार प्रहार करत, जनतेला जणू महाराष्ट्राच्या भविष्याची शपथ दिली. सभेच्या सुरवातीलाच शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. “लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीच्या तीन महिन्यांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी केलेली फसवणूक आहे. या योजनेतून राज्यातील महिलांची फसवणूक होत आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जणू आरसा दाखवला. त्यांच्या या रोखठोक टीकेने श्रोत्यांत एकच खळबळ उडाली. कल्याण पूर्वचे महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांनी त्यांच्या भाषणात उल्हासनगरातील मूलभूत समस्यांना हात घातला. पाणी, वीज, रस्ते आणि वाढती गुन्हेगारी हे मुद्दे मांडून त्यांनी तीन वेळा आमदार राहूनही विद्यमान आमदारांनी या क्षेत्रात कोणताही विकास न केल्याचे ठणकावून सांगितले. “येथील जनतेला त्रास सहन करावा लागतो. हा त्रास संपवण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी येथील लोकांच्या मनाला हात घातला. शिवसेना नेते अनंत गीते यांनी आपल्या सडेतोड भाषणातून राज्यातील “नीच राजकारण” आणि फोडाफोडीच्या खेळीवर संताप व्यक्त केला. “महाराष्ट्राची संस्कृती नाती जोडण्याची आहे, ती फोडण्याची नाही. परंतु सध्याच्या सरकारने पक्ष, घर, आणि नाती तोडून महाराष्ट्राला एक विषारी झाडासारखे फोडण्याचे काम केले आहे. या झाडाला मुळासकट उपटावे लागेल, आणि हे काम महाराष्ट्रातील जनतारूपी भीम करतील,” असे ते ठामपणे म्हणाले. अनंत गीते यांनी पुढे सांगितले की, “धनंजय बोडारे म्हणजे जनतेचा भीम आहे, जो महाराष्ट्रातील बकासुराचा नाश करणार आहे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांमध्ये जणू नवचैतन्य निर्माण केलं. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार धनंजय बोडारे यांना विधान भवनात भगवा फडकवण्यासाठी त्यांनी मतदारांना मनःपूर्वक आवाहन केले आहे. अनंत गीते म्हणाले, “आज महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराने निर्धार केला आहे की यावेळी महाविकास आघाडीचं सरकार राज्यात निवडून यावं. आमच्या हक्काचे सरकार सत्तेत आणण्यासाठी कल्याण पूर्व मतदारसंघातील जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांना मतदान करावे. त्यामुळे विधानभवनात भगवा फडकेल आणि शिवसेनेचा आवाज बुलंद होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या सभेला शिवसेना संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, कल्याणचे शहरप्रमुख शरद पाटील, दिलीप मालवणकर, प्रकाश तरे, शेखर यादव, रोहित साळवे, अंजली साळवे, वसुधा बोडारे, सुरेंद्र सावंत, राजेंद्र शाहू, कैलास तेजी, जया तेजी, बापू सावंत, मंगला पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपास्थित होते. परिसरातील सर्व शिवसैनिकांनी सभा यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले. शिवसैनिक, महिला आघाडी व हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सभेत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. सभेच्या अखेरीस जनतेने धनंजय बोडारे यांना विधानसभेत पाठवण्याची शपथ घेऊन निश्चय व्यक्त केला.

नजीब मुल्ला यांच्या समोरील घड्याळाचे बटन दाबून त्यांना विजयी करा – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

अनिल ठाणेकर ठाणे : आपण महायुतीमधून लढतो आहोत, महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्यायचे आहे. वेळ बदल घडविण्याची आहे. मतदारसंघातील वेळ बदलायची आहे, चांगली वेळ आणायची असेल तर नजीब मुल्ला यांच्या समोरील घड्याळाचे बटन दाबून त्यांना विजयी करा, असे आवाहन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना केले.तर क्लस्टर डेव्हलपमेंट-रीडेव्हलपमेंट होणार, सुसज्ज रस्ते करणार, कळवा, खारीगाव, पारसिक नगर परिसराचा विकास करणार असे आश्वासन मतदारांना १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी दिले. नजीब मुल्ला यांची प्रचार सभा खारेगाव येथील जय भारत स्पोर्ट्स क्लब च्या पटांगणात आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विभागप्रमुख शाम पाटील,  शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक उमेश पाटील, मनोज लासे,विजया लासे,अनिता गौरी, गणेश कांबळे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, शिवसेना पदाधिकारी राकेश पाटील, रचना पाटील, सुनील पाटील, सुनील गौरी आदी पदाधिकारी तसेच मोठ्यासंख्येने मतदार उपस्थित होते. नजीब मुल्ला यांच्या रुपाने एक आश्वासक चेहरा मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून महायुतीने दिलेला आहे. ठाणे महापालिकेतील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडून देताना खासदार, आमदार,…

प्रताप सरनाईक यांना विविध संस्था – समाज संघटनांचा पाठिंबा जाहीर

अनिल ठाणेकर ठाणे : ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार   शिवसेना , भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस , आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप सरनाईक यांना मतदारसंघातील विविध संस्था , समाज…

वाचन संस्कृती लोप पावली नसून माध्यम बदलले आहे – संदीप चव्हाण   

मुंबई : वाचन संस्कृती लोप पावली नसून वाचनाचे माध्यम बदलले आहे. दिवाळी अंक प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या पिढीला साहित्याची ओळख होण्यास मदत होत असल्याचे मत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी व्यक्त केले. विहंग प्रतिष्ठान आणि नेहरूनगर नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्ल्याच्या नेहरू नगर येथील नागरिक मंडळाच्या सभागृहात दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संदीप चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या प्रदर्शनात महाराष्ट्रातून प्रकाशित झालेले 110 दिवाळी अंक मांडण्यात आले असून हे अंक रसिकांना भरघोस सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्याबद्दल विहंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी सदामंगल प्रकाशनचे आभार मानले. विहंग प्रतिष्ठानने महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळख दिवाळी अंक प्रदर्शनातून जपली आहे. जेष्ठांनी वाचनाची आवड जोपासली तर नवीन पिढी मोबाइल वाचनातून पुन्हा पुस्तक वाचनाकडे वळू शकेल. मात्र वाचन हे कायमच राहील, असा आशावाद संदीप चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. रही भिडे यांनी दिवाळी अंक प्रदर्शनाद्वारे विविध साहित्यिकांच्या दिवाळी अंकातील साहित्याची ओळख करून दिल्याबद्दल विहंग प्रतिष्ठान आणि नेहरूनगर नागरिक मंडळा चे अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरूनगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंग गोरे होते. यावेळी महाराष्ट्र दिनमानचे संपादक विनोद साळवी, पत्रकार हेमंत सामंत, सदामंगलच्या संपादक प्रज्ञा जांभेकर, व्यवस्थापक प्रशांत शिंदे, विधी आयोगाचे माजी सदस्य प्रिन्सिपल डी. एन. संदानशिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्जुक्ता मोकाशी-राव यांनी केले. हे प्रदर्शन रविवार 10 नोव्हेंबर पर्यंत रसिकांना पाहण्यासाठी खुले असून सवलतीच्या दरात रसिकांना अंक विकत घेता येतील. प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी सायंकाळी सहा वाजता स्वरगंध वाद्यवृंदाचा कार्यक्रम सादर होणार आहे.

सद्गुरू श्री वामनराव पै यांची 101 वी जयंती रक्तदान शिबिराने उत्साहात साजरी;

कांदिवली येथील ‘रक्तदान शिबीरास’ भरघोस प्रतिसाद मुंबई दि (प्रतिनिधी)  :  जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या 101 व्या जयंती निमित्त मीनाताई ठाकरे रक्तकेंद्र यांच्या सहकार्याने महिला आधार भवन, कांदिवली…