Month: November 2024

पूर्वपिठिका २०२४ निवडणूक काळात अत्यंत मार्गदर्शक – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : प्रसिध्दी माध्यम कक्ष निर्मित रायगड अलिबाग पूर्वपिठिका-२०२४ निवडणूक काळात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केले. निवडणूक काळात ही…

मुरबाड विधानसभा क्षेत्रात नक्कीच परिवर्तन घडेल-सुरेश म्हात्रे

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांना अनुकूल वातावरण आहे. महायुतीच्या कारभाराला कंटाळलेले नागरिक मुरबाड मध्ये नक्कीच परिवर्तन घडवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी आज व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या सरळगाव येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी सरळगाव, टोकावडे येथील कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. तसेच शिरोशी येथील कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले. तर तळेगाव, न्याहाडी, मोरोशी भागात रॅली काढून मतदारांना महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी उमेदवार सुभाष पवार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आप्पा घुडे, महिला उपजिल्हाप्रमुख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचौरे, आरपीआय सेक्युलर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. रुपाली कराळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कविता वारे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत परिवर्तनाची नांदी घडविली. तीच परंपरा विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त करून महायुती सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीला विजयी करावे, असे आवाहन श्री. म्हात्रे यांनी केले. मुरबाड तालुक्याबरोबरच बदलापूर शहर, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातूनही मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरच शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व कॉंग्रेसचे कार्यकर्तेही झोकून कार्य करीत आहेत. महायुतीचे काही भागातील कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नक्कीच परिवर्तन घडेल, असा विश्वास उमेदवार सुभाष पवार यांनी व्यक्त केला. मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २०२१ मध्ये सर्व शाळांमध्ये १०० टक्के शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यातील काही शिक्षक निवृत्त झाले असून, तेथील रिक्त जागी शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शिक्षकांच्या रिक्त जागांच्या मुद्द्यांवरुन तालुक्यातील मतदारांची दिशाभूल केली जात आहे, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले.

कामांचा डोंगर, स्वप्नांचा पाऊस राजेंद्र गावित यांचा महासंकल्प

 रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणी आदींवर संकल्प पत्रात भर योगेश चांदेकर पालघरः पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार माजी खासदार राजेंद्र गावित यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना भविष्यात काय करणार, याचे स्वप्न आपल्या संकल्प पत्राच्या माध्यमातून पालघर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना दाखवले आहे. लायन्स क्लब हॉल पालघर येथे महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, दळणवळण व्यवस्था अशा सर्वच बाबींना स्पर्श करत पुढच्या काळात आपण काय करणार आहोत याचे चित्र त्यांनी मतदारांसमोर उभे केले आहे. या पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे शिवसेना प्रवक्ते केदार काळे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गावित यापूर्वी आमदार, खासदार, मंत्री होते. प्रशासनाचा त्यांना मोठा अनुभव आहे. आपल्या काळात त्यांनी काय काय कामे पालघर जिल्ह्यात केली, याचा विस्तृत आढावा आपल्या संकल्प पत्रात घेतला असून भावी काळात पालघर विधानसभा मतदारसंघासाठी आपण काय करणार आहोत आणि नागरिकांचे जीवन कसे सुसह्य करणार आहोत, त्याचा आढावा त्यांनी घेतला आहे. वचननाम्यात स्थानिकांना रोजगार गावित यांच्या वचननाम्यात प्रामुख्याने स्थानिकांना रोजगारांत प्राधान्य, स्वयंरोजगार, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करणार, शेतकरी व मच्छीमार बांधवांच्या मागण्या पूर्ण करणार, डायमेकर तसेच अन्य व्यावसायिकांना लघुउद्योगांचा दर्जा देणार, पालघर स्वावलंबी व नावीन्यपूर्ण बनवणार अशी पाच वचने मतदारांना दिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी काय काय करणार याचा आढावाही त्यांनी घेतला आहे. आपली विकास नीती कशी असेल यावर त्यांनी भर दिला आहे. आधी केले, मग सांगितले मुंबई, अहमदाबाद महामार्गालगतच्या ७६ गावांना पाणी योजना, मीरा-भाईंदर ते वसई विरार पर्यंत टप्पा क्रमांक १३ अंतर्गत मेट्रो सेवा, पालघर जिल्ह्यातील सहा मोठ्या योजनांसाठी १२४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर, वसई येथे पासपोर्ट कार्यालय, वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी १००१ कोटी रुपयांचा निधी मंजूर, रेल्वे चौपदरीकरणासाठी बाधितांना दुप्पट सानुग्रह अनुदान, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री तसेच वैयक्तिक सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांची प्रकरणे मंजूर, बिरसा मुंडा ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील २५० न जोडलेल्या गावांची रस्त्यांची कामे, सातपाटी मासेमारी बंदर विकास केंद्रासाठी २८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर अशा कामांचा आढावा घेताना यापुढे काय करणार आहोत, हे त्यांनी मतदारांना सांगितले. विरार-डहाणूसाठी ३६०० कोटींचा निधी विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणासाठी ३६०० कोटी रुपये खर्च करून लवकरच विरार डहाणू रेल्वे सेवांची संख्या व वारंवारिता वाढवणार असल्याचे सांगून गावित म्हणाले, की मुला-मुलींच्या वसतिगृहाराहतील विद्यार्थ्यांची क्षमता वाढवणे, तसेच घरकुल, वनपट्ट्यांचे दावे मंजूर करणे या कामांना प्राधान्य देणार आहोत. जव्हार येथे २०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले असून त्यासाठी ९५ कोटी रुपये दिले आहेत. पालघर जिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर असून लवकरच एक मॉडेल हॉस्पिटल म्हणून ते उदयास येणार आहे. या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. ‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत पालघर रेल्वे स्थानकाचे अद्ययावत रेल्वे स्थानकामध्ये रूपांतर होणार असून पालघर-विरार आता अर्ध्या तासावर आले आहे. वैतरणा ते सफाळे खाडीवर पुलासाठी ८६० कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली असून हे कामही लवकरच सुरू होईल असे त्यांनी सांगितले. पाणीयोजनांना प्राधान्य रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करून त्यासाठी विविध शासकीय संस्थांचा निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. वाडा-पोखरण पाणी योजना, पालघर व २६ गावे पाणी योजना तसेच पालघर नगरपालिकेसाठी पाण्याची स्वतंत्र योजना आणि उर्वरित गावांसाठी पाण्याची वेगळी योजना माहीम-केळवेपर्यंत नेण्याचे त्यांनी जाहीर केले. वेती वरोती व साखरा धरणाचे पाणी स्थानिक भूमिपुत्रांना उपलब्ध करून देण्यासाठी वेगळी योजना आखणार असल्याचे गावित यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात डायमेकर व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यासाठी क्लस्टर स्थापन करण्यात येईल तसेच या व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा देण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यामुळे या उद्योगाला बँका सहजपणे कर्ज देऊ शकतील. पर्यटन विकासावर लक्ष केंद्रीत करणार पालघर विधानसभा मतदारसंघात अनेक पर्यटन क्षेत्र आहेत. अनेक धार्मिक पर्यटन क्षेत्रेही या मतदारसंघात आहेत. त्यांच्या विकासासाठी निधी आणून पालघर हे पर्यटनाच्या दृष्टीने आदर्श ठरवणार असल्याचा संकल्प त्यांनी केला. त्यातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथे अद्ययावत मत्स्य मार्केट, शीतगृहाची व्यवस्था केली जाईल. एमआयडीसीमध्ये तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन कंपन्यांना परवानगी देताना रोजगारात स्थानिकांना प्राधान्य द्यावे, यासाठी कायदा आणण्याचा मनोदय गावित यांनी व्यक्त केला; याशिवाय जुन्या कंपन्यात नवीन भरती करताना स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी आपण आग्रह धरू, असे ते म्हणाले. पालघरला कामगार रुग्णालय राष्ट्रीय हित लक्षात घेऊन या ठिकाणी मोठे प्रकल्प सुरू व्हावेत व हे प्रकल्प सुरू झाल्यामुळे गावांमध्ये जाणारे रस्ते खराब होऊ नयेत, म्हणून हे रस्ते नवीन करण्यासाठी राष्ट्रीय प्रकल्पांच्या अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद करण्यासाठी आपण आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिझेलवरील परतावा मच्छीमार सोसायट्यांना एका महिन्यात मिळण्यासाठी योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करू तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपकेंद्र वसई-विरार भागात सुरू करणार आहे. त्याचा फायदा तलासरी भागातील शेतकऱ्यांना होईल. पालघर येथे कामगार विमा रुग्णालय सुरू करणार असल्याचे गावित यांनी सांगितले.

बोर्डी ग्रामपंचायतीची वाळू तस्करी

तहसीलदारांनी बजावली स्वामित्व शुल्क भरण्याची नोटीस  ग्रामसेवकाचा नो रिस्पॉन्स! योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायत खुट खाडी येथील पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम करीत असून, या कामासाठी समुद्राची वाळू उचलण्यात आली. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तसेच स्वामित्व परवानगी व शुल्क न भरता ही वाळू उचलण्यात आल्याने तहसीलदारांनी या ग्रामपंचायतीला तसेच सरपंचांना बाजारभावाच्या पाचपट दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. ग्रामपंचायत अथवा स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या कामासाठी वाळू, मुरूम, दगड आदी वापरायचे असेल, तर त्याचे स्वामित्व शुल्क भरणे आवश्यक असते तसेच लिलावात भाग घेऊन वाळू उचलता येते. बोर्डी ही ग्रामपंचायत समुद्रकिनारी आहे. येथे अतिशय शांत, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आहे. बोर्डी हे चित्रपट शूटिंगसाठी तसेच पर्यटकांसाठी ही महत्त्वाचे  ठिकाण आहे. पर्यटकांच्या गर्दीच्या ठिकाणाहूनच वाळू तस्करी बोर्डीचा स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात. अशा पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी पर्यटक…

द्वेष गाडायचा असेल तर जितेंद्र आव्हाड हाच एकमेव पर्याय – संजय सिंह

अनिल ठाणेकर ठाणे : भाजप हा पक्ष फक्त द्वेषाचे राजकारण करीत आहे. धर्माच्या नावावर या देशात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या द्वेषाचे राजकारण आता मुंब्र्यात आणले जात आहे अन् त्या राजकारणाला गाडायचे असेल तर जितेंद्र आव्हाड हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन आप चे राष्ट्रीय प्रवक्ते , खासदार संजय सिंह यांनी केले.  महाविकास आघाडीचे उमेदवार,  आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी संजय सिंह यांनी मुंब्रा येथील अलमास कॉलनी आणि  तन्वीर नगर येथे सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर शमीम खान,  शानू पठाण, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय सिंह पुढे म्हणाले की, इथे डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ जमा झालेले लोक बघून आपले ठाम मत झाले आहे की  त्यांचा विजय एक लाख मतांनीच होणार आहे. आपण जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी येण्याची दोन कारणे आहेत: पहिले म्हणजे, डॉ.जितेंद्र आव्हाड हे दुसर्‍याचे दुःख पाहून त्याच्या दुःखी होणारे व्यक्तिमत्त्व आहे. मी जेव्हा मोदींच्या हुकूमशाहीविरोधात बोललो तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आले. त्याप्रसंगी दिल्लीत माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच धावून आले होते आणि दुसरे कारण म्हणजे जो कोणी द्वेष पसरविणाऱ्या भाजपविरोधात लढतो, त्याच्या सोबत उभे राहण्यासाठी मी नेहमीच सज्ज असतो. जितेंद्र आव्हाड हे द्वेषाच्या राजकारणाविरोधात लढत आहेत. म्हणूनच मी इथे आलो आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्याची भाषा देशाचे विधी मंत्री करीत आहेत. पण, जेपीसीसमोर हा विषय चर्चेला आता आला आहे. 800 पानांच्या अहवालापैकी फक्त 100 पाने वाचून झाली आहेत. त्याआधीच जर कायदा करण्याची भाषा केली जात असेल तर ते संविधानविरोधी कृत्य आहे. हे सरकार संविधानाशी आणि लोकशाहीशी गद्दारी करीत आहेत. आजची स्थिती अशी आहे की, “वतन की हालत सुनायेंगे तो पत्थर भी रोऐंगे” हे शिंदे सरकार नको त्या गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे. माझे म्हणणे आहे की त्यांनी कधी तरी शिक्षण, रोजगार, महागाई, महिला अत्याचार यावर बोलावे, असे आवाहन सिंह यांनी केले. योगी महाराष्ट्रात येतात आणि बटेंगे.. काटेंगेचा  नारा देत आहेत. मी तुम्हाला सांगतोय की हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे. कारण, भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी खोटं बोलण्यात मास्टरकी मिळविली आहे. मोदी म्हणतात की से लोक बेटी पळवतील; लोक सुरक्षित नाहीत. माझे म्हणणे आहे की गेल्या दहा वर्षात जर लोक सुरक्षित नसतील तर मोदींचे अपयश असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा. लक्षात घ्या कोणताच धर्म द्वेष पसरवित नाही. द्वेष हटवण्यासाठी बंद पडलेले घड्याळ फेकून तुतारी वाजविली पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांचा विजय हा तमाम सामन्यजणांचा विजय असणार आहे. त्यामुळेच तुतारी समोरील एक नंबरचे बटन दाबा,असे आवाहन केले. दरम्यान,  डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी, महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे. महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत. असहिष्णुतेची परंपरा आपल्या महाराष्ट्रात वाढीस लागली आहे. ती गाडण्यासाठी आपणाला लढावे लागणार आहे. काल परवा केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून गेले. धर्मद्वेषाचे राजकारण हे सरकार  उघड्या डोळ्याने पहात आहे. द्वेषाचे राजकारण करून आपण विजयी होऊ असे त्यांना वाटत असले तरी आपण ते होऊ द्यायचे नाही. द्वेषमूलक राजकारण करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्रात नक्कीच पराभव होणार आहे, असा विश्वासही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.  विशेष म्हणजे, यावेळेस उपस्थित जनसमुदायाने एक नंबर.. एक नंबर अशा घोषणा देत डॉ.जितेंद्र आव्हाड यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

हवामानबदलामुळे महिलांवरील हिंसाचारात वाढ

पर्यावरण मिलद बेंडाळे हवामानबदलाचे खोलवर सामाजिक परिणाम सध्या पहायला मिळत आहेत. चक्रीवादळ, पूर आणि इतर आपत्तींमुळे महिलांवरील हिंसाचार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आर्थिक असुरक्षितता आणि कौटुंबिक दबावामुळे…

‌‘अमेरिका फर्स्ट‌’मुळे भारताची निर्यात महाग होणार

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे बॉस बनले. भारत आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध खूप चांगले आहेत. दोघेही एकमेकांना चांगले मित्र म्हणतात. ट्रम्प अध्यक्ष बनल्याने भारत आणि अमेरिकेच्या व्यवसायावरही परिणाम होणार आहे.…

नेपाळची नवी कुरापत

नेपाळ हा भारताचा सख्खा शेजारी देश. जगातील एकमेव हिंदू धर्मीय देश. भारत हा देखील हिंदू संस्कृतीचा पाईक त्यामुळे दोन्ही देशातील चालीरीती, संस्कृती, सण, उत्सव, परंपरा सारखीच त्यामुळे नेपाळ हा भारताचा…

जिभेवरी ताबा । सर्वासुखदाता!!

रामायण घडले | महाभारत घडले | त्यांना कारणीभूत | होते कुजके शब्द || म्हणून शब्द जपावा | शब्द पुजावा | शब्द पुसावा | बोलण्या आधी || घासावा शब्द | तासावा…