Month: December 2024

डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज

कल्याण : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात एमएमआरडीएतर्फे काँक्रीट रस्ते कामांसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. महानगर गॅस कंपनीनेही काही ठिकाणी वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. या खोदकामांमुळे डोंबिवलीतील वर्दळीच्या…

डॉ. समीर तोडणकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त २३ कर्मचाऱ्यांचा सन्मान

ठाणे : जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ऑक्टोबर व नोव्हेंबर  महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा…

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ॲग्रिस्टॅक ‘फार्मर आयडी’ – रोहन घुगे

अनिल ठाणेकर ठाणे : विविध योजनांचा लाभ ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचवता यावा यासाठी कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजीटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रिस्टॅक (Digital Public Infrastructure for Agriculture) ही योजना राबविण्यात ये-त असून या योजनेचे प्रत्यक्ष काम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले. केंद्र शासनाने ॲग्रिस्टॅक योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ॲग्रिस्टॅक हे कृषि क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी मदत होणार आहे.ॲग्रिस्टॅक संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी गट विकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांचे नियोजन व कामकाजाकडे नियंत्रण असणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी एम एम बाचोटीकर यांनी दिली.सर्व ग्रामपंचायतींमार्फत कॅम्प नियोजन करण्यात येणार असून शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करून देणार आहेत. शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच निर्मितीमध्ये पथकातील कर्मचारी प्राथमिक जबाबदारी पार पाडणार आहेत. कृषि क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषि उपक्रमांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषि-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होणार आहे. विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना आधार प्रणालीचा वापर करुन लाभार्थीची ओळख पटविण्यात येते. तसेच महसूल विभागाने त्यांच्याकडील अधिकार अभिलेखाचे तसेच गाव नकाशांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग संस्थेने राज्यातील जमिनींचे भू-संदर्भीकरण (जिओ रेफरन्सिंग) करुन दिले आहे. यामुळे शेत जमिनीची  इत्यंभूत अद्ययावत माहिती डिजिटाईज स्वरुपात तात्काळ उपलब्ध होणार असून ॲग्रिस्टॅक (Digital Public Infrastructure for Agriculture) ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात चिनी मांजा, चिनी दोरा वापरण्यास प्रतिबंध

ठाणे : पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. त्यामुळे या…

बदलापूरच्या थकबाकीदार बालाजी हाईट्स सोसायटीचा कांगावा

– दोन लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी , महावितरणचे स्पष्टीकरण कल्याण: बदलापूर पश्चिमेतील प्राईम बालाजी हाईट्स या सोसायटीकडे वीजबिलाची २ लाख ४६ हजार रुपयांहून अधिकची रक्कम थकीत आहे. रितसर नोटिस देऊन वीजपुरवठा खंडित केल्यानंतर सोसायटीकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दमदाटी झाल्याचा अपप्रचार झाला. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर सोसायटी पदाधिकाऱ्यानीच टप्प्याटप्प्याने थकबाकी भरण्याची ग्वाही देत दीड लाख रुपयांचा धनादेश दिला. त्यानंतरच सोसायटीचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे. बदलापूर गाव पश्चिम येथे न्यू डीपी रोड परिसरात प्राईम बालाजी हाइट्स या सोसायटीला सामान्य वापरासाठी (लिफ्ट, अंतर्गत पथदिवे आणि पाणीपंप) महावितरणने मे २०१८ मध्ये वीजपुरवठा दिला आहे. मार्च-२०२४ नंतर सोसायटीने या वीजजोडणीचे बिल भरलेले नाही. थकीत वीजबिलाचा भरणा करण्याबाबत सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अखेर थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याबाबत लेखी नोटीसही बजावण्यात आली. परंतू सोसायटीने थकबाकीचा भरणा केला नाही. त्यामुळे सोसायटीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी जमलेल्या सोसायटीधारकांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करणाऱ्या शाखा अभियंत्यांच्या कामात अडथळा आणला. उलट महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचा कांगावा करत अपप्रचार केला. शाखा अभियंत्यांनी यासंदर्भात बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता सोसायटी पदाधिकारी बाबु तांबे व इतरांनी संपर्क साधून थकबाकी भरण्याचे मान्य केले. प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे दोन धनादेश तातडीने देत उर्वरित थकबाकी लवकर भरण्याची ग्वाही सोसायटी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसमक्ष दिली. त्यानंतर सोसायटीचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला.

नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या शेजारील उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश

ठाणे  : ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकांच्या शेजारील उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे आणि मुलुंड दरम्यान मनोरुग्णालयाच्या लगत ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी अनुषंगिक कामे रेल्वेकडून तर,परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्यावतीने करण्यात येत आहेत. त्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उप नगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, महावितरणचे अधिकारी आदी उपस्थित होते. या पाहणी दरम्यान या प्रकल्पाशी निगडित वेगवेगळ्या विषयांची आयुक्त राव यांनी माहिती घेतली. मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीमुळे काम थांबू नये, यासाठी आयुक्तांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत तात्परुती उपाययोजना आणि महिनाभरात पर्यायी उपाययोजना काढण्याचे निर्देश दिले. तसेच, या वाहिनीचा टॉवर हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे, महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा, असेही आयुक्तांनी सांगितले. नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबतही तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान, आयुक्त राव यांनी आतापर्यंत झालेले काम, पोहोच मार्गाचे काम, पूल आदी कामांचा आढावा घेतला. नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाविषयी माहिती…

महापालिका लोकशाही दिनाचे ६ जानेवारीला आयोजन

२३ डिसेंबरपूर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन ठाणे : ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन ६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. तरी नागरिकांनी जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी म्हणजेच…

ज्या कॉलनीच्या विटा आईने उचलल्या तिथेच घर घेतले-पारधे

ठाणे : माझ्या आईने ज्या कॉलनीच्या विटा उचलल्या,घाम गाळला, त्याच कॉलनीत मी घर घेतले. आईच्या हातात चावी दिली, त्यावेळी तिला या कॉलनीत आता तुझे घर झाले, असे सांगितले तेव्हा ती…

सत्तार राठोड नापास, मंत्रिमंडळातून डच्चू ? 

स्वाती घोसाळकर मुंबई: शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे दोन्ही मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या प्रगति परिक्षेत नापास झाल्याचे वृत्त आहे. त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचे…