Month: December 2024

डोंबिवलीत मालमत्ता कर थकविणाऱ्या क्रिटीकल केअर सेंटरसह पाच गाळे सील

पालिकेच्या ‘ग’ प्रभागाची कारवाई डोंबिवली : वारंवार नोटिसा देऊनही मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या येथील ‘ग’ प्रभाग हद्दीतील वाणीज्य वापर असलेल्या पाच आस्थापना ‘ग’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी सील केल्या. या मालमत्ताधारकांकडे एकूण १६ लाख ५४ हजार ९७७ रूपयांची थकबाकी आहे. पाच गाळे सील करण्यात आलेल्या थकबाकीदारांच्या यादीत डोंबिवली पूर्वेतील नांदिवली रोडवरील गोविंद राजाराम पाटील यांच्या राजाराम निवासमधील पाच दुकान गाळ्यांचा समावेश आहे. या गाळ्यांचे मालक असलेल्या गोविंद पाटील यांच्याकडे मालमत्ता कराची ११ लाख ३७ हजार २३४ रूपयांची थकबाकी आहे. त्यांना ही थकित रक्कम भरणा करण्यासाठी पालिकेने वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. त्यांच्याकडून ही रक्कम भरणा न करण्यात आल्याने त्यांचे व्यापारी गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली, अशी माहिती ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी दिली. मानपाडा रस्त्यावरील लक्ष्मी निवास येथील क्रिटीकल केअर सेंटर यांचीही पालिकेकडे मालमत्ता कराची सात लाख १६ हजार ७४३ इतक रक्कम थकित होती. त्यांनाही पालिकेने वारंवार नोटिसा पाठवून कर भरणा करण्याची ताकीद दिली होती. त्यांनी ही रक्कम वेळेत भरणा केली नाही. त्यामुळे त्यांचे क्रिटीकल केअर सेंटर सील करण्यात आले, असे साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी सांगितले. पालिकेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात आस्थापना सील करण्याच्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, मालमत्ता कर उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त कुमावत, अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे, वरिष्ठ लिपिक नरेश म्हात्रे, लिपिक रामचंद्र दळवी, गोविंद पोटे, मोहम्मद खान यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. गेल्या दोन महिन्याच्या काळात पालिकेचा कर्मचारी वर्ग विधानसभा निवडणूक कामात व्यस्त होता. या कालावधीत मालमत्ता कराची अपेक्षित वसुली पालिकेला करता आली नाही. येत्या चार महिन्यावर पालिकेचा अर्थसंकल्प येऊन ठेपला आहे. मालमत्ता कराचा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी मालमत्ता कर विभागाला आता धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका संपताच प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. जे मालमत्ता कर थकबाकीदार आहेत त्यांच्या मालमत्ता सील करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. कोट ‘ग’ प्रभाग हद्दीत काही मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे. अशा धारकांना वारंवार नोटिसा देऊनही ते कर भरणा करत नाहीत. त्यामुळे अशा मालमत्ताकरधारकांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम आयुक्त डॉ. जाखड, उपायुक्त देशपांडे यांच्या आदेशावरून सुरू केली आहे. ग प्रभाग हद्दीतील एकूण सहा आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. -संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.

रविवारपर्यंत ठाण्यातील वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद

भातसातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात घट निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वितरणाचे नियोजन ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. तसेच, या दुरूस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे. अशा एकूण सुमारे ३० टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’मध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम रविवार, ०१ डिसेंबरपासून सुरू झाले असून या तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे ०५ डिसेंबरपर्यंत पाणी कपात करण्यात आली आहे. ही दुरूस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण ३० टक्के पाणी कपातीचा ठाणे महापालिकेस सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत, संपूर्ण महापालिका क्षेत्रास दररोज ३० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागू नये, यासाठी विभागवार स.९.०० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० या वेळेत एकेका विभागाचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी दुरुस्तीच्या या काळात तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी आवाहन करण्यात आले आहे. दिनांक आणि पाणी पुरवठा बंद असणारे विभाग मंगळवार, ०३ डिसेंबर – माजिवडा, मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुणवाल, डोंगरी पाडा, विजय नगरी, विजय पार्क, वाघबीळ, आनंद नगर, कासारवडवली बुधवार, ०४ डिसेंबर – गांधी नगर, सुभाष नगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपूरम, लोक उपवन, एमएमआरडीए, तुळशीधाम, सुरकरपाडा, सिद्धांचल, कोंकणीपाडा, गावंड बाग, उन्नती, शास्त्री नगर १ व २, मैत्री पार्क गुरूवार, ०५ डिसेंबर – सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळी मंडळ, कोलबाड, गोकूळ नगर, आझाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर शुक्रवार, ०६ डिसेंबर – दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर शनिवार, ०७ डिसेंबर – राबोडी १ व २, आकाशगंगा, जेल टाकी परिसर, जरी मरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनिषा नगर, आतकोणेश्वर नगर, भास्कर नगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिक नगर रविवार, ०८ डिसेंबर – लोकमान्य पाडा नं. १, २, दोस्ती, वेदांत, आकृती संकुल, अरुण क्रीडा मंडळ, मनोरुग्णालय परिसर, रहेजा, कशिश पार्क, शिवाजी नगर, धर्मवीर नगर, साठेवाडी, रघुनाथ नगर, इटर्निटी, विष्णूनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण सोसायटी, घंटाळी, राम मारूती रोड.

एसएनडीटी विद्यापीठात संविधान आणि शहीद दिन

नवी मुंबइ : एसएनडीटी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉँग लर्निंग अँड एक्स्टेन्शन आणि डिपार्टमेंट ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस आणि शहीद दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना विभाग संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी सांगितले की, संविधान समजून घेऊन समाजसेवकांनी त्यातील आपली भूमिका ओळखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्य करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर त्यातून समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी योगदान कसे देता येईल, याबाबतही विचार केला पाहिजे. महिला तसेच उपेक्षित घटकांसाठीही विशेष कार्य करण्याची तळमळ अंगीकारली पाहिजे. सहाय्यक प्राध्यापक विकास जाधव यांनी सांगितले की, महिलांना समान संधी देताना त्यांचा चा राजकारणातीलदेखील सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, तुम्ही माझी मंदिरे बांधण्यापेक्षा माझा अनुनय करा, संविधानातील मूल्ये अंगीकृत करा, याची माहिती सहाय्यक प्राध्यापक डॉ. वाघमारे यांनी दिली. यावेळी विभागातील विद्यार्थीनींनीही मनोगत व्यक्त केले. काहींनी गीते गायली, कविता वाचन केले. याप्रसंगी संविधान प्रस्तावनेचे वाचनदेखील करण्यात आले. देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहिदांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली. 0000

पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांसाठी ८ डिसेंबरला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार 8 डिसेंबरला उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. राज्यात सन 1995 पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येते. ठाणे महापालिका क्षेत्रात, एकूण 1278 बूथवर ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे 2556 कर्मचारी कार्यरत असतील. गेल्यावेळी झालेल्या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात, 0 ते 05 या वयोगटातील 01 लाख 78 हजार 824 बालकांना लस देण्यात आली होती. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा लाभ पालकांनी 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

नायडूंकडून आंध्रात वक्फ बोर्ड बरखास्त

आंध्र प्रदेश :  आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलं आहे. गतमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीयांच्या सरकारने राज्यात वक्फ बोर्डची स्थापना केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील जनतेनं चंद्राबाबू नायडू यांच्याबाजुने कौल…

शरद पवारपक्षाच्या गटनेतेपदी आव्हाड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर, दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी संधी देण्यात आली आहे. तसेच, आमदार…

शिंदे इन अॅक्शन; वाटाघाटी पुन्हा सुरु

स्वाती घोसाळकर मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महत्वाच्या बैठकी रद्द करून दोन दिवस दरे गावी गेल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. दोन दिवस शिंदे यांनी आपला सर्व…

हिंदुनो, तीन मुले जन्माला घाला !

सरसंघचालक भागवातांचे आवाहन नागपूर : हिंदू धर्म ठिकवायचा असाल असेल तर तमाम हिंदू जोडप्यांनी किमान तीन मुले जन्माला घालायलाच पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथील एका…

मुंबई, ठाणेकरांनो आता कपाटातून स्वेटर काढा !

मुंबई : विधानसभेच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय तापमान दिवसागणिक वाढत चालले असले तरी मुंबई ठाण्यासह राज्यातील तापामानात कमालीची घट होत आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा आता चांगलाच घसरला आहे. राज्यामध्ये शनिवारी नाशिक येथे ८.९ या सर्वात…